Posts

Showing posts from February, 2026

मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने...

Image
डिजिटल युग आणि मराठी वाचन संस्कृती मराठी ही केवळ भाषा नसून एक संस्कृती आहे. अनदीकाळापासून या भाषेचे महत्व व अस्तित्व अधोरेखित आहे. मराठी भाषेमध्ये जितके साहित्य उपलब्ध आहे तितके खचितच अन्य एखाद्या भाषेत तयार झाले असणार. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक ह्या सर्वच क्षेत्रांत मराठी भाषेचे आमूलाग्र योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच मराठीला एक जागतिक वारसा लाभलेला आहे जो केवळ महाराष्ट्रपुरता सीमित नाही. भारत देशात भाषावार प्रांतरचना अस्तीत्वात आहे. याच विभागणीतून मराठी भाषकांच्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन आज अनेक वर्षे उलटून गेली आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाला गती आणि दिशा देण्यासाठीच महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. भाषावार प्रांतरचनेची उद्दिष्टच भाषांना समृद्ध करण्याची होती.  परंतु मराठी भाषा संवर्धनासाठी जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध प्रयत्न सातत्याने झाले नाहीत किंवा करण्यात आलेले प्रयत्न पुरेशा सामर्थ्याने झालेले नाहीत. म्हणूनच आज मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल चर्चा करण्याची गरज प्रकर्षाने भासत आहे. आजचे युग विज्ञ...

मुलांनो, जोमाने अभ्यास करा, पण आरोग्य सांभाळून !

Image
*मुलांनो, तब्‍येत सांभाळुन अभ्‍यासाला न्‍याय दया ! यश तूमचेच* महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा १० फेब्रुवारीपासून तर दिनांक २० फेब्रुवारीपासुन इयत्ता दहावीची परीक्षादेखील सुरु झाली आहे. दहावी व बारावीची वर्षे ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी वर्षे. त्यामुळे विद्यार्थी गेल्या काही अनेक महिन्‍यांपासुन विदयार्थी अभ्‍यासात मग्‍न आहेत. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे. राज्‍यातील १०,६६४ महाविदयालयांतील १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत ज्‍यात ७ लाख ९९ हजार ७७३ विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे, ३,८०,६९२ विद्यार्थी  कला शाखेचे, तर ३,२०,१५२ विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देत आहेत. ३३८७ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडत आहे. तसेच १६ लाख १५ हजार विद्यार्थी दहावीची परिक्षा देत आहेत. यंदा परीक्षा नियोजित वेळेपेक्षा अगोदर सुरू झालेल्या असून निकालही लवकर जाहीर होण्‍याची शक्‍यता आहे. खरेतर दहावी व बारावीची वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाची व टर्निंग पॉईंट ठरणारी वर्षे....

जॉयचा दिघाशी (भिवंडी) येथे विदयार्थी सहाय्यता उपक्रम संपन्न

Image
दिघाशीतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ‘जॉय’ची आनंदरेषा भिवंडी : १४ फेब्रुवारीचा दिवस अनेकांसाठी प्रेम व्यक्त करण्याचा असतो; मात्र ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दिघाशी गावात आज प्रेमाची एक वेगळीच अनुभूती साकारली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जोगेश्वरी येथील जॉय ऑफ गिव्हिंग या संस्थेने कै. विठ्ठल अमृत पाटील विद्यालयात आयोजित केलेला विद्यार्थी सहाय्य उपक्रम उत्साहात आणि समाधानाच्या वातावरणात संपन्न झाला.  यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक वृत्त प्रकाश चे संपादक मनीष वाघ सपत्नीक उपस्थित होते.जॉय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे, समन्वयक वैभव पाटील, कार्याध्यक्ष असूंता डिसोझा, पदाधिकारी मिना भुतकर, भूषण मुळे, अविनाश कारगुटकर, निलेश घोडविंदे, वज्रेश्वरी आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक डॉ प्रभाकर भेरे, शाळेचे मुख्याध्यापक  गुरुदत्त पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  तसेच सहशिक्षक माधुरी भोईर, राजेंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, रुचिता पाटील, रामू बेंदर, स्वप्नाली पाटील, शोभा मढवी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी प्रकाश कामडी, मनोज गायकवाड, रसिका न्हानवे...