Posts

Showing posts from October, 2019

नवे मराठी सरन्यायाधीश

Image
सरन्यायाधीश पदी न्यायमूर्ती बोबडे यांची नियुक्ती समस्त मराठी जनांसाठी अभिमानास्पद बाब आहे. तब्बल चार दशकांनंतर मराठी पताका न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर फडकणार असल्यामुळे महाराष्ट्र व मराठीचा तो सन्मानच म्हणावा लागेल. न्यायमूर्ती बोबडे आपल्या अनुभवसंपन्नतेच्या जोरावर पदाला योग्य न्याय देतील व त्याचा सन्मान वाढवतील याबाबत अजिबात शंका नाही. वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या राजीनाम्याबाबत घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर न्यायव्यवस्थेवर उपस्थित होत असलेले प्रश्न व त्यातून न्यायव्यवस्थेला अधिक बळकट व पारदर्शक करण्याचे मोठे आव्हान नव्या सरन्यायाधीशांसमोर असणार आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

ईव्हीएम बाबत जनप्रबोधन आवश्यक

Image
गेल्या काही वर्षांत ईव्हीएम घोटाळ्यामुळे भाजप सरकार देशात व विविध राज्यांमध्ये एकतर्फी सत्ता मिळवत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. वस्तुतः ईव्हीएम हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. त्यामुळे त्या मशीनमध्ये फेरफार करता येणार नाही असे म्हणणे थोडे धारीष्ट्याचे ठरेल. मात्र मागील एक दोन वर्षांमधले काही राज्यांमधले निकाल व नुकताच जाहीर झालेला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल पाहिला तर ईव्हीएम मॅनेज करणे म्हणावे तितके सोपे व शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ईव्हीएम ही बदलत्या व आधुनिक काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रांत प्रभावी प्रवेश केलेला असताना मतदानासारख्या संवेदनशील क्षेत्रात ईव्हीएम सारख्या मशीनचा उपयोग रास्तच आहे. मात्र यांत्रिकीकरणात मानवी हस्तक्षेपाद्वारे मनासारखे बदल घडवणे अशक्य अजिबात नाही हेदेखील समजून घेतले पाहिजे. त्यामुळे निवडणुकीसारख्या भारतीय घटनेतील सर्वोच्च नागरी अधिकारामध्ये ही पारदर्शकता टिकून राहणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी इव्हिएमचे कार्य, त्यातील तांत्रिक बाबी, फेरबदलाच्या शक्याअशक्यता व त्याची गरज लोकांसमोर परिणामकारकरीत्या मांडून प्रबोधन गरजेचे आहे. तू...

ऑनलाईन शुभेच्छांची दिवाळी

Image
आजकाल दररोज सकाळी उठून मोबाइल हातात घेतला की जवळपास 400 ते 500 मेसेजेस व्हाट्सअप वर दिसतात. त्यातील दिवाळी शुभेच्छांचेच 300 ते 350. शुभेच्छा द्याव्या पण किती ? मोबाईल, फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर मुळे आजकाल कुणी आप्तेष्ट वा मित्रमंडळींना फोन वगैरे करण्याच्या भानगडीत पडेनासाच झालाय. डायरेक्ट शुभेच्छा मेसेज द्वारेच दिल्या जातात व स्विकारल्यादेखील जातात. काल लोकलमध्ये बसल्याबसल्या असे मेसेज व्हाट्सअप वर चाळत होतो तर काही मेसेज चक्क शेकडो वेळा रिपीट झाल्याचे, तोच तोच मेसेज पुन्हा पुन्हा पाठवला जात असल्याचेही पाहायला मिळाले तेदेखील प्रत्येक मेसेजच्या खाली पाठविणाऱ्याचे नाव पत्ता जोडून. आता व्हाट्सअपवर, एका ग्रुपमध्ये दोनशेच्या वर जणांना मेसेज पाठविता येत असल्याने अनेक मेसेज सर्वच ग्रुपवर अनेक वेळा रिपीट झाल्याचे देखील आढळले. अर्थात यामध्ये चांगले व वाचनीय मेसेजची संख्यादेखील होती बरं का, पण ती अत्यंत नगण्य. यामध्ये काही संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळीत गोरगरिबांसाठी राबविलेले उपक्रम, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, लेखकांचे दिवाळी अंकांतील लेख, कविता, दिवाळी निमित्त राबविले ज...

कोकणातील शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती

Image
सध्या सर्वत्र सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांतील शेतकरी या पावसाने देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणातील मुख्य व्यवसाय असलेला भातशेतीचा व्यवसाय प्रचंड संकटात सापडला आहे. शेतातील उभी व कापलेली पिके नष्ट होताना शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी पाहावी लागत आहेत. कापणी केलेले पीक कुजण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कोकणातील बहुतांश शेतकरी उपजीविकेसाठी केवळ शेतीवर अवलंबून असतो. मे जून चा हंगाम पेरणी तर ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये कापणी व झोडपणी केली जाते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा यंदा मात्र खंडित झाली आहे. गर्मीच्या समजल्या जाणाऱ्या एन ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस पडू लागल्याने शेतकऱ्यांना पिके ठेवायची व साठवायची कुठे हा प्रश्न पडू लागला आहे. संपूर्ण हंगाम घामाने व काबाडकष्टाने राबून पिकवलेल्या भातशेतीला यावेळी अवकाळी पडलेल्या पावसाचा फटका बसला आहे. भात हे कोकणातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने कापणी करून ठेवलेली भातशेती ओली झाली आहे. सप्टेंबर...

शद्बरसिक दिवाळी अंक 2019

Image
"स्वच्छता" - निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली स्‍वच्‍छतेचे महत्‍व आपल्‍या जिवनात अनन्‍यसाधारण आहे. आज बदलत्‍या जिवनशैलीमुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे आजार जन्‍म घेत असुन त्‍यांवरील उपचार पध्‍दती  खर्चाची व्‍याप्‍तीदेखील वाढत आहे. हया आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी सर्वात मोठी काळजी घ्‍यावी लागेल ती स्‍वच्‍छतेची. वैयक्तिक व सामाजिक स्‍वच्‍छता ही माणसाच्‍या आरोग्‍यावर विपरित व दुरगामी परिणाम करते. सार्वजनिक स्‍वच्‍छतेची सुरुवात वैयक्तिक स्‍वच्‍छतेपासून होते. प्रत्‍येकाने आपले घर व परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. शिक्षण ही विकासाची पहिली पायरी आहे व स्‍वच्‍छता हा विकासाचा अविभाज्‍य भाग आहे. आपल्‍या घरांची,  गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता वैयक्‍तीक योगदानातून कशी होईल याचा विचार प्रत्‍येकाने करणे व त्‍यायोगे ``स्वच्छतेतून समृध्दीकडे'' ही संकल्पना मूर्तरुपात येणे अपेक्षित आहे. अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छते अभावी उदभावणाऱ्या रोगांमुळे पिडीत असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे स्‍वच्‍छतेतून लोकांचे आरोग्‍यमान उंचाव...

एक्झिट पोलचे आकडे येतात कुठून?

Image
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान संपल्यासंपल्या विविध चॅनेलवाल्यांनी एक्झिट पोलचे आकडे दाखवण्यास सुरुवात केली. बहुतांशी सर्वच चॅनेलनी महायुतीला दोनशेपार जागा मिळतील असा तर्क लावून विरोधकांचा पार धुव्वा उडेल असे चित्र उभे केले आहे. देशातील व राज्यातील सध्याची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता हे अंदाज अपेक्षितच होते. मात्र एक्झिट पोलची ही आकडेवारी नेमकी येते कुठून व कशाच्या आधारे याचा एकदा शोध लावला पाहिजे. लोकशाहीत गुप्त मतदानाला महत्व असल्यामुळे लोकांनी केलेले मतदान कुठल्या एक्झिट पोलद्वारे माहिती केले जाते हे पाहणे रंजक ठरेल. बरं मतदान केंद्रांबाहेर किंवा घरोघरी चॅनेलवाले कधी, कुणी कुणाला मतदान केले हे विचारल्याचे पाहण्यात नाही. त्यामुळे हा सर्व्हे नेमका कुठल्या भागांत व मतदारांमध्ये केला जातो हे अनाकलनीय आहे. मागील काही निवडणुकांचा अनुभव पाहता लोकांचा कल भाजप शिवसेनेकडे अधिक असल्याचे दिसून येत असले तरी एक्झिट पोलचा खेळ व चॅनेलमधील स्पर्धा ही हवेचा रोख पाहून अंदाजे हवेत मारलेले दगड तर नाहीत ना?  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई  ...

स्वच्छतेत नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय सरस

Image
स्वच्छ रुग्णालयाच्या बाबतीत नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयास केंद्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार स्वच्छतेच्या बाबतीत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या सरकारी रुग्णालयांना दरवर्षी केंद्र शासनाच्या वतीने "कायाकल्प" ह्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येते. स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. शुक्रवार 18 ऑक्‍टोबर 2019 रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते या रूग्णालयाला ‘कायाकल्प राष्ट्रीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय आणि पिंपरी चिंचवड येथील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचाही यावेळी सन्मान करण्यात आला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात रूग्णालय व रूग्णालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात केंद्र शासनाच्या मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या देशातील रुग्णालयांना ‘कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कार 2018-19’ने गौरविण्...

फायर ऑडिट प्रबोधन आवश्यक

Image

पीएमसी प्रश्न तातडीने निकाली काढावा

Image
पीएमसी बँकेच्या दोन खातेधारकांचा हृदयविकाराच्या धक्क्याने व एकाचा आत्महत्तेने मृत्यू झाला. एन निवडणूक व दिवाळीच्या धामधुमीत बँकेच्या लाखो खातेधारकांची खाती गोठवल्याने त्यांच्या संतापाचा कडेलोट झालेला आहे. महिना उलटत आला तरी आरबीआय व सरकार सर्वसामान्य लोकांचा लॉक झालेला पैसा काढण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने दिवसेंदिवस हे प्रकरण आणखीनच चिघळत चाललेले आहे. आयुष्यभराची मिळकत या बँकेत अडकून पडल्याने व ती परत मिळण्याचे कोणतीही चिन्हे निर्माण होत नसल्याने खातेधारकांचे नाहक जीव जात आहेत. हे प्रकरण ईडी, सीबीआय, सर्वोच्च न्यायालायमार्फत हाताळले जात असून दररोज नवनव्या घोषणा, अटकसत्र, धाडी, पंचनामे, मालमत्ता जप्ती, आंदोलने सुरू आहेत. मात्र निवडणूक प्रचारात अडकून पडलेल्या राजकीय पक्षांना ह्या प्रकरनात लक्ष घालण्यासाठी तूर्तास तरी वेळ दिसत नाही. सामान्य नागरिकांसोबतच अनेक पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्था, गुरुद्वारे यांचे पैसे या बँकेत अडकून पडल्याने यंदा त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खातेधारक प्रचंड तणावाखाली असून आरबीआय व सरकारवर दबाव वाढवण्य...

बंडखोरीचा फटका सर्वच राजकीय पक्षांना

Image
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट वाटपानंतर बंडखोरीची लागण बहुतांशी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना झाली आहे. वर्षानुवर्षे पक्षाकार्याचे काम केल्यानंतर एन निवडणुकीच्या वेळी निवडणूक लढण्याची संधी न मिळाल्याने अनेक इच्छुकांच्या संतापाचा कडेलोट होणे स्वाभाविक आहे. त्यात राजकीय अस्तित्व व सत्तेचा उपभोग घेण्यासाठी इतर पक्षातून प्रवेश केलेल्या नेत्यांना पक्षाने तिकिटे जाहीर केल्याने संतापात भरच पडली आहे. या बंडखोरीची सर्वाधिक लागण सेना-भाजप युतीला झल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही बंडखोरी थोपवण्यासाठी पुढाकार घेत इशारा दिला आहे. देशाच्या व राज्याच्या राजकारणात वरिष्ठ स्तरावरून पक्षवाढीला सर्वाधिक महत्व दिले जात असल्यामुळे अधिकाधिक जागा जिंकून याव्यात यासाठी पक्षानिष्ठेपेक्षा हमखास निवडून येणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते. याच सूत्रानुसार भाजपने नव्याने पक्षात दाखल झालेल्या राजकारणातील अनेक रथी महारथीना तिकिटे दिली आहेत ज्यांची निवडणूक जिंकण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत बंडखोरीचा फटका भाजपसाहित सर्वच राजकीय पक्षांना बसणार असला तरी अशा बंडखोरीला मतदानात लोक कोणत्या कल...

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय "कायाकल्प" राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Image
स्वच्छ रुग्णालयाच्या बाबतीत केंद्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार स्वच्छतेच्या बाबतीत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या सरकारी रुग्णालयांना दरवर्षी केंद्र शासनाच्या वतीने "कायाकल्प" ह्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येते. स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. शुक्रवार 18 ऑक्‍टोबर 2019 रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते या रूग्णालयाला ‘कायाकल्प राष्ट्रीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय आणि पिंपरी चिंचवड येथील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचाही यावेळी सन्मान करण्यात आला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात रूग्णालय व रूग्णालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात केंद्र शासनाच्या मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या देशातील रुग्णालयांना ‘कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कार 2018-19’ने गौरविण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब क...

कर्जमाफीची वेळच येऊ नये यासाठी उपाययोजना आवश्यक

Image
निवडणुका आल्या की शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा जोर धरू लागतो. कर्जमाफीसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचा फायदा किती व कोणत्या लोकांना झाला हे एकदा सर्वांसमोर यायला हवे. यासाठी गावनिहाय कर्ज माफ केलेल्या शेतकऱ्यांची नावे ऑनलाईन जाहीर करायला हवीत. त्यावर आक्षेप अथवा दुरुस्ती करण्यासाठी त्याच पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी जेणेकरून सर्वांसाठी ही आकडेवारी सहज उपलब्ध होईल. शिवसेनेने सरकारमध्ये असताना कर्जमाफीवरून घेतलेली सरकारविरोधी भूमिका सर्वश्रुत असल्यामुळे नव्या सरकारमध्ये तरी ते आपल्याला न पटलेल्या बाजू सुधारन्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. वास्तविकता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी त्यांना कर्ज काढण्याची वेळच येऊ नये यासाठी शेतीक्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सरकारने आवश्यक उपाययोजना व ठोस नियोजन करायला हवे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

वचननाम्यांचे ऑडिट व्हावे

Image
निवडणुकीची धामधूम सध्या जोरात सुरू आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षदेखील मतदारांवर घोषणांचा पाऊस पाडत आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी जाहीरनामे, वचननामे लोकांसमोर आणले जातात. अनेक मतदार तर हीच वचने पाहून मतदानासाठी आपले चिन्ह निवडतात. मात्र वचननाम्यातील आश्वासने ही किती खरी व खोटी ठरतात हे पाहण्यासाठी आपल्याकडे ठोस यंत्रणा उपलब्ध नाही हे विदारक सत्य आहे. वास्तविकता सरकारच्या ठराविक कारकिर्दीत या वचननाम्यांचे ऑडिट झाले पाहिजे. मतदानावेळी राजकीय पक्ष व नेत्यांनी मतदार राजाला दिलेली किती आश्वासने पूर्ण केली याचा लेखाजोखा ठेवला गेला पाहिजे. मुळात वचननामे प्रकाशित करतानाच सत्ताधारी पक्षात राहील्यास किंवा न राहील्यास काय करता येईल याची विभागणी करून तशी वचने द्यावीत. त्यामुळे सरकार कुणाचेही असो निवडून आलेल्या प्रत्येक सत्ताधारी किंवा विरोधी लोकप्रतिनिधीला जाब विचारता येईल. निवडून आलेला आमदार हा लाखोंच्या जनसमुदयाचे प्रतिनिधित्व करत असतो. मात्र लोकांच्या उदासीन धोरणामुळे त्याला पुढच्या पाच वर्षांत अश्वासनांचे काय झाले याचा जाब विचारण्यासाठी लोकांना धारिष्ट किंवा वेळ मिळत नाही ही शोकांतिका ...

स्वच्छता व आरोग्य

Image
आज १५ ऑक्‍टोबर. जागतिक पातळीवर हा दिवस 'हाताची स्‍वच्‍छता जागरुकता दिन' म्‍हणून साजरा केला जातो. स्‍वच्‍छतेचे महत्‍व आपल्‍या जिवनात अनन्‍यसाधारण आहे. आज बदलत्‍या जिवनशैलीमुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे आजार जन्‍म घेत असुन त्‍यांवरील उपचार पध्‍दती व खर्चाची व्‍याप्‍तीदेखील वाढत आहे. हया आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी सर्वात मोठी काळजी घ्‍यावी लागेल ती स्‍वच्‍छतेची. वैयक्तिक व सामाजिक स्‍वच्‍छता ही माणसाच्‍या आरोग्‍यावर विपरित व दुरगामी परिणाम करते. सार्वजनिक स्‍वच्‍छतेची सुरुवात वैयक्तिक स्‍वच्‍छतेपासून होते. प्रत्‍येकाने आपले घर व परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. शिक्षण ही विकासाची पहिली पायरी आहे व स्‍वच्‍छता हा विकासाचा अविभाज्‍य भाग आहे. आपल्‍या घरांची,  गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता वैयक्‍तीक योगदानातून कशी होईल याचा विचार प्रत्‍येकाने करणे व त्‍यायोगे ``स्वच्छतेतून समृध्दीकडे'' ही संकल्पना मूर्तरुपात येणे अपेक्षित आहे. अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छते अभावी उदभावणाऱ्या रोगांमुळे पिडीत असलेल्यांची आकडेवारी वाढ...

कंत्राटी कामगारांचाही विचार व्हावा

Image
राज्याच्या तिजोरीवर हजारो कोटींचा बोजा स्वीकारून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटच म्हणावी लागेल. महाराष्ट्रासह अन्य राज्यात  होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही घोषणा केली असली तरी त्याचा फायदा ५० लाख कर्मचारी व ६५ लाख निवृत्तीवेतन धारकांना मिळणार आहे. लवकरच ही वाढ विविध राज्यांतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीदेखील लागू होण्याची शक्यता आहे. मात्र  केंद्र शासनाच्या विविध योजना व आस्थापनांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी  व मानधन तत्वावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीदेखील सरकारने काही प्रमाणात निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्र्यांच्या अनेक योजनांमध्ये राबणारे मानधन तत्त्वावरील कर्मचारी अथक मेहनतीने सरकारी सेवा लोकांपर्यत पोहोचवण्याचे काम करत आहेत. मात्र त्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन व सरकारी योजनांच्या यशस्वीतेतील त्यांचे योगदान पाहता नियमित कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने मानधनवाढीसाठी त्यांचादेखील विचार होणे गरजेचे आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली,...

स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न आवश्यक

Image
आपल्या देशात स्त्री पुरुष भेदभावाची पूर्वापार चालत परंपरा बऱ्याच अंशी खंडित झाली असली तरी आजही अनेक कुटुंबात मुलगा हाच वंशाचा दिवा समजला जातो. यामुळे देशातील जवळपास सर्वच भागांत थोड्याफार फरकाने लिंग गुणोत्तरामध्ये कमालीची तफावत आढळते. गर्भलिंगनिदानासारख्या समाजाला शाप ठरलेल्या बाबीचा उपयोग स्त्री अर्भकाला गर्भातच संपवण्यात होत असेल ती नक्कीच चिंतनीय गोष्ट आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्वत्र आदिशक्तीचा गजर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी महिलांचा आदर करण्याविषयी केलेले वक्तव्य देशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराला वाचा फोडणारे आहे. महिलांकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहणाऱ्या समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. कुटुंबामध्ये समाधान व आंनद देणारी आई, बहीण, पत्नी हवी मात्र मुलगी नको हा दृष्टिकोन बदलण्याची खरी गरज आहे. आज अनेक महिला आपल्या कर्तबगारीच्या जोरावर सर्वच क्षेत्रांत अग्रेसर असल्याचे पाहायला मिळते. मात्र समाजातील दुर्लक्षित व  दुर्बल स्त्रियांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यापक प्रयत्न आवश्यक असून त्यासाठी सरकारबरोबरच सर्व क्षेत्रातील घटकांचे योगद...

दसऱ्याच्या सर्वांना आरोग्यमयी शुभेच्छा 💐

Image

आरोग्‍यदायी जिवनासाठी पुरेशी ''झोप'' आवश्‍यक

Image
आरोग्‍यदायी जिवनासाठी पुरेशी ''झोप'' आवश्‍यक  दिवसभरात आपण शारीरीक हालचालीच्‍या अनेक गोष्‍टी करत असतो. सकाळी उठल्‍यापासुन रात्री झोपेपर्यंत आपल्‍या शरीरातील इंद्रिये अविरतपणे काम करत असतात. मात्र दिवसभरात आलेला थकवा दूर करण्‍यासाठी झोप अत्‍यंत महत्‍वाची असते. झोपल्यावर शरीराच्या सर्व क्रिया मंदावतात, अवयवांना आराम मिळतो. नीट झोप झाली नाही तर चिडचिडेपणा, थकवा, अंगदुखीसारखा त्रास होतो. या स्थितीत व्यक्तींची एकाग्रता, चपळता आणि विचारशक्ती कमी झाल्यामुळे त्यांच्या कामात चुका होतात. चुका झाल्‍याने अनेकदा व्‍यक्‍ती अडचणीत सापडतो किंवा अपघातही घडू शकतात. सततच्या अनियमित झोपेमुळे मेंदूचे आणि मानसिक आजार होण्याची शक्यता बळावते. लहान मुलांना पुरेशी झोप अत्‍यंत गरजेची असते. त्‍यांच्‍या अर्धवट झोपेने त्‍यांच्‍यात अनेक शारीरीक विकार उदभवू शकतात. लहान मुलांची झोप नीट न झाल्यामुळे चंचलपणा, अशक्‍तपणा, बुद्धीचा खुरटलेला विकास असे त्रास संभवतात. झोपेचे तास हे वयानुसार बदलतात. लहान मूल दिवसा व रात्री अनेक तास झोपते. याउलट वृध्द माणसांची झोप कमी असते. त्‍यामुळे वयाच्या मानाने पुर...

नेत्रदान श्रेष्ठ दान

Image
माणूस आपल्याला मिळालेल्या अवयवांची विशेष काळजी घेत असतो. कान, नाक, डोळे, हात, पाय ही नीटनेटकी व व्यवस्थित असतील तर मनुष्य आयुष्यात कितीही मोठया संकटाला सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे हे अवयव जपण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असतो. मात्र समाजात आज एक किंवा अधिक अवयव नसणारे लोकदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत हेदेखील विसरून चालणार नाही. त्यातूनच अवयवदानाची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात दृढ झाली. आज अवयवदानाने अनेक लोकांना नवसंजीवनी मिळाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. आपल्या सर्व अवयवांमध्ये अत्यंत महत्वाचा व संवेदनशील अवयव म्हणजे आपले डोळे. डोळे ही सजीवांना त्यातही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी मानली जाते. मात्र, सर्वांनाच ही देणगी मिळालेली नाही. जन्मजात आंधळे असणे किंवा अपघाताने अंधत्व येणे यामुळे अशा व्यक्ती सृष्टीच्या सौंदर्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. मात्र, आज विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या आधारे आपण एका व्यक्तीची दृष्टी दुसर्‍या एका अंध व्यक्तीला देऊन त्याचे जीवन प्रकाशित करू शकतो. नेत्रदानाच्या माध्यमातून मनुष्याला अंधकारातून उजेडाकडे घेऊन जाणारी प्रक्रिया वैद्यक क्षेत्रात उपलब्ध आहे. त...

लेतलतीफपणा थाम्बणार

Image
एक्सप्रेसला उशीर झाल्यास प्रवाशांना तासनिहाय नुकसान भरपाई देण्याचा आयआरसीटीसीचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. रेल्वेच्या लेटलतीफपणामुळे बोटे मोडणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय सुखद धक्का देणारा असला तरी त्यामुळे रेल्वेची विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे गाडीची अचूक वेळ पाळण्यासाठी रेल्वेची जबाबदारी आणखी वाढणार असून त्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. रेल्वे क्रॉसिंग, सिग्नल बिघाड, उपनगरीय लोकलच्या वेळा व इतर आपत्तीजनक स्थितीमध्ये वेळेत गाड्या चालवणे जिकिरीचे असतानादेखील रेल्वेने उचललेले हे शिवधनुष्य प्रशंसनीयच आहे. रेल्वे एक तास लेट झाली तर 100 रुपये, दोन तास लेट झाल्यास 250 रुपये प्रवाशांना नुकसानभरपाई मिळणार असली तरी रेल्वे वाहतूक वेळेवर चालवण्यासाठी प्रशासन आटापिटा करणार हाच आनंद प्रवाशांना अधिक सुखावून जाणार आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

अन्यथा लोक पून्हा सावकारीकडे वळतील

Image
बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने पंजाब  अँड महाराष्ट्र या मुबंई स्थित बँकेवर आर्थिक व्यवहारांसाठी निर्बंध लादले आहेत. मंगळवारी अचानक एक परिपत्रक काढून सदर निर्बंध तात्काळ लागू करण्यात आले व लाखो खातेदारांना जबरदस्त धक्का दिला. गेली अनेक वर्षे सुरळीतपणे सुरू असणारे बँक व्यवहार तडकाफडकी बंद झाले व खातेधारकाना स्वतःच्याच खात्यातून पैसे काढण्यास मनाई करण्यात आली. वास्तविकता बँकेकडून होत असलेली ही अनियमितता आरबीआयला एका रात्रीत नक्कीच समजली नसणार. त्यामुळे बँकेवर निर्बंध लादले जाणार असल्याची कल्पना आरबीआयने आधीच लोकांना द्यायला हवी होती जेणेकरून लोकांनी आपल्या ठेवी सुरक्षित स्थळी हलवल्या असत्या. सहकारी बँकांमध्ये ठेवी ठेवणारे ग्राहक हे सर्वसामान्य लोक असतात हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा कष्टाचा पैसा गोठवून आरबीआयने काय साध्य केले हे समजन्यापलीकडे आहे. या निर्बंधामधून आरबीआयने  उलट बँकेलाच सवलती देऊन सर्वसामान्य खातेधारकाना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. खरेतर अशा वेळी बॅंकेला त्यांच्या ग्राहकांची देणी चुकती करण्याचे आदेश देऊन मगच कारवाई सुरू करायल...

बेरजेशिवाय गत्यंतर नाही

Image
शिवसेना भाजप ह्या पारंपरिक युतीमध्ये 'थोरल्या बंधुत्वाच्या' मुद्द्यावरून अनेकदा वादाचे प्रसंग आले. ह्या वादाची कितीही धुसफूस असली तरी हिंदुत्व व सत्ताकारणाच्या मुद्यावर तसेच महाराष्ट्रात विरोधकांना मात देण्यासाठी त्यांनी युतीमध्ये कधी खंड पाडला नाही. निवडनूकीपूर्वी किंवा नंतर युतीविना हे दोन्ही पक्ष अधुरेच आहेत. मात्र देशातील व राज्यातील सध्याचे एकंदरीत राजकीय वातावरण तसेच भाजपकडे नेते व कार्यकर्त्यांचा वाढता ओघ पाहता युती झाली जागावाटपाचे गणित म्हणावे तितके सोपे नक्कीच नाही. शिवसेनेची पाळेमुळे राज्यातील कानाकोपऱ्यात रुजलेली आहेत तर भाजपकडे तगड्या उमेदवारांचा प्रचंड भरणा आहे. अशा परिस्थितीत अनेक मतदारसंघात जागावाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता असून एन निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून बंडखोरीची संभावना आहे. सोमवारी एका पत्रकाद्वारे युतीची घोषणा करण्यात आली असली तरी युतीला अंतिम स्वरूप मिळण्यासाठी अजून बरेच टप्पे पार पडायचे आहेत त्यामुळे युतीबाबत काय अंतिम निर्णय होईल हे पाहण्यासाठी काही वेळ थांबावे लागेल. मात्र दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तरी स्वबळावर सत्ता मिळवणे जिकीरीचे ठरण...