Posts

Showing posts from October, 2020

दिवाळी करू साधेपणाने

Image
२०२० हे वर्ष सर्वार्थाने सर्व स्तरांतील लोकांसाठी अत्यंत अडचणीचे ठरले आहे. कोरोनाने जनजीवन ठप्प केल्यानंतर वादळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली व अतोनात नुकसान केले. टाळेबंदीच्या पाच सहा महिन्यांच्या काळात अनेक व्यवसाय कायमचे बसले तर लाखो नोकऱ्यांवरही गदा आली. अशा परिस्थितीत सर्वच हिंदू सण अत्यंत साधेपणाने साजरे केले गेले ही खरे तर सामाजिक गरज तसेच आपणा सर्वांचा नाईलाज होता. सर्वसामान्य लोकांचे अर्थकारण पार बिघडून गेल्याने येणारी दिवाळीदेखिल फार उत्साहाने साजरी होण्यासारखे वातावरण नाही. कोरोनाने आज आपले अनेक आप्त, स्वकीय, मित्र, बांधव हिरावून नेले असून येता काही काळ तरी आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी कठीण व धोक्याचा आहे. मास्क, स्वच्छता व सोशल सिस्टंसिग ह्या नियमांचे पालन प्रत्येकाने कटाक्षाने करायला हवे. दिवाळीसारखा आपल्या कौटुंबिक आयुष्यातील मोठा सण यंदा आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक काळजी घेऊन साधेपणाने साजरा करणे हितकारक आहे. गरीब व गरजू लोकांना जमेल तितकी मदत करण्याचा प्रयत्न आपली यंदाची दिवाळी नक्कीच आंनददायी व मनाला समाधान देणारा ठरवेल.  वैभव मोहन पाटील  ...

नाट्यगृहे कधी उघडणार

Image
कोरोना काळात बंद असलेली नाट्यगृहे अद्यापि उघडण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारे अनेक कलाकार व कर्मचारी नाटकाची तिसरी घंटा कधी वाजणार या प्रतीक्षेत आहेत. आधीच अडचणीत असलेला नाट्यव्यवसाय सहा सात महिन्यांपासून बंदच असल्याने हवालदिल आहे. नाटकांमध्ये काही सुप्रसिद्ध टीव्ही कलाकारदेखील सहभागी असले तरी आता टीव्ही मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण सुरू झालेले असल्यामुळे हे कलाकार बऱ्यापैकी कार्यव्यस्त झालेले आहेत. मात्र नाट्यसृष्टीशी निगडित बहुतांश कलाकार, सहकलाकार व कर्मचारी हे मध्यमवर्गीय असून नाट्यप्रयोगांवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हा वर्ग नाट्यगृहे उघडण्याकडे डोळे लावून बसलेला आहे. त्याचबरोबर नाटकावर नितांत प्रेम करणारा मोठा दर्शक वर्ग महाराष्ट्रात आहे. नाट्यप्रयोग बंद असल्याने ज्वलंत अभिनयाचा आस्वाद घेऊ इच्छिणाऱ्या नाट्यप्रेमींचा हिरमोड होत आहे. अनलॉक मध्ये अनेक उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक काळजी घेऊन खरेतर नाट्यगृहे उघडण्यास काहीच हरकत नाही. नाट्यप्रेमी हा तसा जाणता व शिस्तप्रिय वर्ग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे...

लोकल सुरू झाल्यास गर्दीला जबाबदार कोण?

Image
पर्यायाचे आव्‍हान हा लेख (दिनांक २६ ऑक्‍टोबर) वस्‍तुस्थितीचा वेध घेणारा आहे. लॉकडाऊन काळात निर्माण झालेला सार्वजनिक वाहतुकीचा सावळागोंधळ अजुन मिटलेला नाही. मुंबई व उपनगरांमध्‍ये गेल्‍या काही वर्षांमध्‍ये वाढलेल्‍या भरमसाठ गर्दीचा ताण स्‍वस्‍त व जलद वाहतुक म्‍हणून रेल्‍वेवर पडत आहे. याच रेल्‍वेला पर्याय म्‍हणून उभ्‍या राहिलेल्‍या मोनो, मेट्रोसारख्‍या सुविधांचा म्‍हणावा तसा दिलासा मुंबईच्‍या गर्दीला झालेला नाही. स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या वाहतुक सेवा मर्यादीत असल्‍यामुळे त्‍यांचादेखील फार परिणाम दिसुन येत नाही. मात्र आजवर कधीही अनुभवास न आलेल्‍या कोरोना टाळेबंदीच्‍या काळात पुरेसा वेळ मिळाल्‍याने गर्दी व सार्वजनिक परिवहन सेवांची सांगड घालुन उपाययोजना करता येणे शक्‍य होते. राज्‍य सरकार, केंद्र सरकार व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांनी आपापल्‍या अखत्‍यारीतील परिवहन सेवांना घेऊन एकत्रितरित्‍या हा प्रश्‍न सोडवावयास प्राधान्‍य दयायला हवे. मात्र तसा सामोपचाराचा प्रयत्‍न अदयापी न झााल्‍याने सार्वजनिक आहतूक आजदेखील प्रचंड संभ्रमावस्‍थत आहे. विविध उपायांव...

स्त्री पुरुष समानता काळाची गरज

Image
स्त्री ही असहाय, अबला, दुर्बल, कमजोर ह्या प्रतिमा व मानसिकता आता समाजातून पुसायला हव्यात. आज सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्री पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करताना दिसत आहे. यामुळेच राजकीय व शासकीय दोन्ही स्तरांवर अनेक ठिकाणी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्त्रिया उच्च पदावर विराजमान आहेत. अत्याचार, बलात्कार, मारहाण यासारख्या घटनांमधून स्त्रियांची दुर्बलता प्रकर्षाने पुढे येत असल्यामुळे स्त्रीला खऱ्या अर्थाने शक्तिशाली होण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षणाचे धडे गिरवायला हवेत. यासाठी लागणारे प्रशिक्षण व हत्यारे बाळगण्याचे अधिकार तिला मिळायला हवेत. स्त्रीवर बसलेला शारीरिक कमकुवतपणाचा शिक्का पुसून तिला सर्वार्थाने सक्षम बनवले तरच विकृत व पुरुषी अहंकार तिच्या वाट्याला जाणार नाही. स्त्री पुरुष समानता ही काळाची व समाजाची मूलभूत गरज आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

काळोखाला भेदून टाकू

Image
मिशन सेव्ह द अर्थ - एक अनोखे अभियान विराग मधुमालती, हे नाव आज आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकले असेल. अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केलेले विराग मधुमालती हे नाव केवळ मुंबई महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी भूषणावह ठरले आहे. नवी मुंबई येथे वास्तव्यास असणारे व सामाजिक उपक्रमांची प्रचंड ओढ असलेल्या विराग यांना समाजिक बांधीलकीतून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या इर्षेने पछाडले आहे. पेशाने इंजिनिअर असलेल्या विराग यांनी गेल्या काही वर्षांत विपरीत परिस्थितीवर मात करत आपल्या जिद्दीच्या जोरावर अनेक विश्वविक्रमाँना गवसणी घातली आहे. मग तो चीनचा ४५६ तासांचा सलग गायनाचा विक्रम मोडीत काढून ५५५ तासांचा सलग गायनाचा विक्रम स्थापित केलेला असो की ३०० गायकांच्या सहभागाने रिले पद्धतीने गायलेले चित्रपटगीत असो. सुप्रसिद्ध गायक, निर्माता, दिग्दर्शक, गायन अभिनय प्रशिक्षक या सर्वच पातळ्यांवर ते प्रचंड यशस्वी ठरले आहेत. नेत्रदान चळवळीमध्ये त्यांनी दिलेले योगदान नक्कीच दखलपात्र होते. नेत्रदानाचे आवाहन घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. स्वतः डोळ्यावर पट्टी बांधून ...

हॉटेल्स चे खाणे टाळा

Image
अनलॉक करता करता राज्यातील सर्व हॉटेल्स व बार सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हॉटेलमधल्या जेवणावळ्या व पार्ट्या पुन्हा एकदा जोमाने सुरू झालेल्या आहेत. वास्तविक ज्या लोकांना घरचे जेवण दुर्लभ असते त्यांच्यासाठी हॉटेल्सचा मोठा आसरा असतो. त्यामुळे हॉटेल्स सुरू करण्याचा फायदा नक्कीच लोकांना होणार आहे. मात्र या हॉटेल्समध्ये नीट स्वच्छता राखली गेली नाही तर संसर्गाचा धोकादेखील मोठा होऊ शकतो हे ध्यानात ठेवले पाहिजे. मग हॉटेल, टेबल्स, किचन, भांडी यांची स्वच्छता असो की ग्राहकांची आरोग्य तपासणी करणे असो. सर्वच गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे व तशी लक्ष ठेवणारी मोठी यंत्रणा आज पालिका प्रशासनांकडे उपलब्ध नाही. हॉटेल्स मालक केवळ व्यवसायिक दृष्टिकोनातून आपला व्यवसाय करत असल्याने त्यांच्याकडून ह्या बारीक सारीक गोष्टींवर दुर्लक्ष होणार हे निश्चित आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वच्छता, प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे तेही ग्राहकांना सांभाळून छोट्या हॉटेल व्यासायिकांसाठी केवळ अशक्यप्राय बाब आहे. किचन मध्ये वापरले जाणारे साहित्य, भांडी व खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांची स्वच्छता, सुरक्षितता बघायची क...

तातडीने नुकसान भरपाई मिळायला हवी

Image
सातत्याने विविध संकटांना तोंड देत असलेल्‍या शेतक-यांना अतिवृष्टीने पुन्हा एकदा मोठा तडाखा दिला आहे. मागील आठवडयात झालेल्‍या अवकाळी वादळी वा-याने शेतक-यांच्‍या पिकांचे मोठया प्रमाणात आर्थीक नुकसान झालेले आहे. काढायला आलेली पिके पावसात नष्‍ट झाल्‍याने डोळयासमोर शेतीची बरबादी शेतक-यांच्‍या नशीबी आली. शेतीवर अवाक्‍याबाहेरील व कर्जे काढुन  खर्च करणारा शेतकरी उभे पिक वाहून गेल्‍याने पार कोलमडला आहे. अशा परिस्‍थीतीत शेतक-यांना तातडीने मदत देण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. काढणीसाठी आलेले भात, सोयाबीन, मका, उस व इतर अनेक पिकांचे मोठी नुकसान झाले आहे. उभी असलेली पिके पुर्णपणे शेतात आडवी झाले. काहीतरी ठिकाणी तर वाहून गेली. त्यामुळे शेतक-यांवर वारंवार येणा-या संकटात आणखी भर पडली आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी विवंचेनत सापडला आहे. कोरानाच्‍या या कठीण काळात आर्थीक परिस्थिती नसतांनाही पिके उभी केली होती. मात्र तीदेखील पावसाने नेस्‍तनाबूत झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीला मिळाले आहे. शेतकरी आज हतबल आहे. त्‍यातच या विषयावरुन सध्‍या...

पत्रकारिता व्यवसायिक होतेय

Image
पूर्वी गावामध्‍ये एक दोघांकडेच टिव्‍ही असायचा. ठराविक वेळेत लागणारे कार्यक्रम पाहण्‍यासाठी त्‍या घरांकडे लोकांची विशेषतः बच्‍चेकंपनीची गर्दी व्‍हायची. निरनिराळे कार्यक्रम पाहण्‍यासाठी विशिष्‍ट वयोगटातील व्‍यक्‍ती त्‍या ठिकाणी यायच्‍या व तो कार्यक्रम आटोपल्‍यावर आपापल्‍या कामाला निघुन जायच्‍या. बातम्‍यांसाठीदेखील दूरदर्शनवर एक ठराविक वेळ असायचा ज्‍यावेळेस गावातील जेष्‍ठ, जाणकार लोक थोडया वेळेकरीता एकत्र जमायची. मात्र आता बातम्‍यांचे स्‍वरुप २४ तासांचे मानवी आयुष्‍य  ब्रेक करणारे झालेय. एखादया ठिकाणी एखादी घटना घडली काही क्षणांत ती विविध न्‍यूज चॅनल्‍सच्‍या माध्‍यमातून सर्वदूर पोहोचते. मोठया घटनेच्‍या ठिकाणी सर्वच चॅनल्‍सवाले ताबडतोब पोहचत असल्‍याने बातमीची सत्‍यता समोर येण्‍याअगोदरच तिचा उहापोह सुरु होतो. चर्चा, तर्कवितर्कांना अगदी उत येतो. टिआरपी वाढवण्‍याच्‍या नादात अनेक चॅनल्‍सवाले उतावळेपणा करत बातमीला अतिरंजित करण्‍याचा प्रयत्‍न करतात. यातुन अनेकदा चुकीचे, संदर्भीहीन, गैरसमज पसरवणारे संदेश दर्शकांपर्यंत पोहोचतात व कित्‍येकदा समाजात तेढ निर्माण करतात. आजकाल चॅनल्‍समध...

अशा मालिका हव्यातच कशाला

Image
झी मराठी वाहिनी ही दर्जेदार मालिकांसाठी व निर्मितीसाठी ओळखली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ह्या वाहिनीवर सुरू असलेल्या काही मालिका सुज्ञ प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या ठरत आहेत. वास्तवाशी कुठलाही संबंध नसलेल्या गोष्टी ह्या मालिकांच्या भागांतून दाखवण्यात येत आहेत. माझ्या नवऱ्याची बायको, अग बाई सासूबाई ह्या मालिकांमध्ये दाखवण्यात आलेली पात्रे उघड उघड अनैतिक संबंध व विवाहबाह्य प्रेमप्रकरणांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. मग तो नवऱ्याची बायको मधला गुरुनाथ असो की सासूबाई मधला सोहम. मालिका लांबवायची म्हणजे किती व कशी यालाही मर्यादा हव्यात. काहीही दाखवून ते प्रेक्षकांच्या गळ्यात उतरवण्याच्या कवायतीला काय म्हणावे? झी वाहिनीच्या पुण्याईने घरोघरी पाहिल्या जाणाऱ्या या मालिकांमधून दाखवला जाणारा बीभत्सपणा, पोरकटपणा संस्कृतीला धरून नसून तो त्वरित थांबवला पाहिजे. त्याऐवजी प्रबोधनात्मक व ऐतिहासिक पात्रांवर आधारित मालिका झी ने प्रेक्षकांसमोर आणाव्यात व आपले वेगळेपण टिकवून ठेवावे. प्रेक्षकांना चालते म्हणून टीआरपी साठी काहीही खपवायचा प्रयत्न करू नये. झी तर्फे आज अने...

१५ ऑक्‍टोबर - जागतिक हाताची स्‍वच्‍छता जागरुकता दिन

Image
१५ ऑक्‍टोबर - जागतिक हाताची स्‍वच्‍छता जागरुकता दिन  १५ ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक हाताची स्‍वच्‍छता जागरुकता दिन म्‍हणून साजरा केला जातो. आरोग्‍य व स्‍वच्‍छता या दोन घटकांचा अत्‍यंत घनिष्‍ट संबंध असुन निरोगी आयुष्‍यासाठी प्रत्‍येकाने आपल्‍या जिवनात स्‍वच्‍छतेचा अवलंब करणे गरजेचे आहे. सध्‍याच्‍या कोरोना साथपरिस्‍थीतीच्‍या काळात तर स्‍वच्‍छतेची ही गरज अधिक प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे. नाका तोंडावाटे होणा-या संसर्गासाठी हात हा अवयव सर्वाधिक कारणीभुत ठरत असल्‍यामुळे हाताची नियमित स्‍वच्‍छता अनिवार्य ठरते. कोणतेही काम करण्‍यापूर्वी वा केल्‍यानंतर हात स्‍वच्‍छ धुणे व निर्जंतुक करण्‍याचा नियम संसर्ग टाळण्‍यासाठी यापुढे कटाक्षाने पाळावा लागणार आहे. एकंदरीत, स्‍वच्‍छता हा नियम नसून सवय असायला हवी. सार्वजनिक स्‍वच्‍छतेची सुरुवात वैयक्तिक स्‍वच्‍छतेपासून होते. प्रत्‍येकाने आपले घर व परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी प्रयत्‍न केले तर 'स्‍वच्‍छ भारत' संकल्‍पना प्रत्‍यक्षात उतरण्‍यास वेळ लागणार नाही. स्‍वच्‍छतेचे धडे प्रत्‍येकाला शालेय जिवनापासुन व कुटुंबांतून मिळायला हवेत. ...

वाचन मंदिरे खुली करा

Image
मुंबई महाराष्‍ट्रातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोरोनाला टक्‍कर देत प्रवास, व्‍यापार सर्वच सुरु झाले आहे. हॉटेल्‍स, मॉल्‍स यासारख्‍या गोष्‍टीही सुरु आहेत. मात्र राज्‍यातील वाचनालये अजुन सुरु करण्‍यात आलेली नाहीत. वास्‍ताविक लॉकडाऊनमध्‍ये लोकांना घरी बसुन आलेला क्षीण घालवण्‍यासाठी बुध्‍दीला चालना देणा-या वाचनालयांचा आधार होता. वाचनप्रिय लोकांची रोडावत चाललेली संख्‍या पाहता या ठिकाणी फार गर्दीदेखील होत असल्‍याचे चित्र नाही. पुस्‍तके वगळता येथे कोरोना संसर्ग पसरण्‍याचा धोका नाही. मात्र वृत्‍तपत्रे व कागदांमधून तसा संसर्ग वाढण्‍याचा धोका फार कमीच. वाचनालयांतुन कोरोनापेक्षा ज्ञान अधिक पसरणार आहे. त्‍यामुळे कोरोनाच्‍या नावाखाली ही वाचन मंदिरे फार काळ बंदिस्‍त ठेवणे उचित नाही. 'वाचाल तर वाचाल' ही युक्‍ती आपल्‍याला ज्ञानसंपन्‍नतेकडे घेऊन जाणारी आहे. सुशिक्षित समाजाकडे वाटचाल करणा-या महाराष्‍ट्राला सुसंस्‍कृत बनवण्‍यामागे व वाचनसंस्‍कृती प्रबळ बनवण्‍यासाठी या वाचनालयांचा मोठा हात आहे. त्‍यामुळे अधिक काळ ही वाचन मंदिरे बंद न ठेवता वाचनप्रेमींसाठी ती खुली करणे इष्‍ट ठर...

तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी हवी

Image
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने सुट्ट्या सिगारेट, विडीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश नुकताच निर्गमित केला आहे. राज्यातील शाळा – कॉलेजमधील तरुणाई मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे सिगारेट पासून गुटख्याच्या आहारी गेले आहे. दरम्यानच्या युती सरकारच्या काळात शैक्षणिक संस्था तसेच रुग्णालये व धार्मिक स्थळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी लागू करण्यात आली. मात्र स्थानिक प्रशासनांच्या उदासीनतेमुळे आजही त्याची ठोस अंमलबजावणी होत नाही ही वस्तुस्थिती आहे. केंद्राच्या कायद्यानुसार सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३ अंतर्गत सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतेवेळी पाकिटाच्या ८५ टक्के भागावर सिगारेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश स्पष्ट शब्दात छापणे बंधनकारक आहे. त्यामुळे सिगारेट पाकिट अथवा बिडी बंडल खरेदी केल्यानंतर त्यावर संभाव्य धोक्याची स्पष्ट कल्पना दिली असल्यामुळे आरोग्य जनजागृतीचा उद्देश सफल होतो. मात्र सुटी म्हणजे सिगारेटच्या पाकिटातून एकेक सिगारेट काढून वि...

११ ऑक्टोबर - आंतराष्ट्रीय बालिका दिन

Image
आज ११ ऑक्‍टाेबर,आंतराष्‍ट्रीय बालिका दिन. देशामध्‍ये महिलांंवर अत्‍याचाराच्‍या घटना सातत्‍याने घडताना दिसत आहेत. आजदेखील स्‍त्री हा कायमच समाजातील उपेक्षित व कमकुवत घटक समजला जातो ज्‍याचा परिणाम स्‍त्रीवरील अत्‍याचाराच्‍या घटनांमध्‍ये होताना दिसत आहे. स्‍त्री सक्षमीकरणाचा परिणाम म्‍हणावा तितक्‍या प्रमाणात दिसत नसल्‍याने स्‍त्री -पुरुष लिंगामधील विषमता वाढत चालली आहे. स्त्री भ्रुण हत्या हा आपल्या समाजातील अत्यंत संवेदनशील विषय आहे. गर्भात असतानाच मुलीचा जीव घेतल्याने आज देशातील अनेक राज्यांत मुलींचा जन्मदर खूपच कमी झालेला आहे. मुलांच्या संख्येच्या तुलनेत मुलींची संख्या बहुतांश राज्यांत कमालिची घसरली असल्याचे दिसून येत आहे. आजदेखील पुरुषप्रधान संस्कृतीचा पुरस्कार करणारे समाजघटक अस्तित्वात आहेत याचेच खरेतर अप्रूप वाटते. या घटकांच्या माध्यमातून पुरुषी अहंकार पुढे रेटला जात आहे व त्यामुळे वंशाचा दिवा वगैरे या संकल्पना आजदेखील जोर धरून आहेत. आज अनेक कुटुंबे आपण पाहिली तर मुलगा व्हावा यासाठी नवस, आराधना व गर्भलिंगपरिक्षा करत असताना आपणास दिसतात. मुलगा हाच वंशाचा दिवा, तोच आपल्या व...

मानसिक आरोग्य दिन

Image
१० ऑक्‍टोबर रोजी मानसिक आरोग्‍य दिन साजरा होत आहे. मानसिक आरोग्‍याचे महत्‍व आपणा सर्वांना विदीतच आहे. शारीरीक स्‍वास्‍थ्‍य हे ब-याच अंशी मानसिक स्‍वास्‍थ्‍यावर अवलंबुन असते. मनाने व्‍यक्‍ती सुदृढ असेल तर कोणत्‍याही गंभीर आजारावर मात करण्‍यासाठी त्‍याच्‍या शरीरात पर्याप्‍त उर्जा आपोआपच निर्माण होत असते. त्‍यामुळे मानसिक स्‍वास्‍थ अबाधित राखणे तितकेच महत्‍वपूर्ण आहे. विशेषतः सध्‍याच्‍या कोविड साथीमध्‍ये रुग्‍ण मानसिक दृष्‍टया खचल्‍याने व घाबरल्‍याने मृत्‍यू पावल्‍याची अनेक उदाहरणे देता येतील. त्‍यामुळे शारीरीक आरोग्‍याबरोबरच मानसिक आरोग्‍याला दुर्लक्षित करुन चालणार नाही. कोरोना पॉझीटीव्‍ह व्‍यक्‍तींपैकी बहुतांशी व्‍यक्‍ती हया कोणतेही लक्षणे नसलेल्‍या किंवा सौम्‍य लक्षणे असलेल्‍या आढळुन येत आहेत. या रुग्‍णांचे अहवाल पॉझीटिव्‍ह आल्‍याने त्‍यांची गणना कोरोना रुग्‍णामंध्‍ये होत आहे. सामान्‍यतः बाधित व्‍यक्‍तीच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींना विलगीकरण कक्षामध्‍ये भरती केले जाते. आणि सदर व्‍यक्‍ती संशयीत रुग्‍ण म्‍हणून ओळखल्‍या जातात. लक्षणे नसतील तर या व...

डॉ मयुरी गेडाम यांची अभियान कार्यालयातून एक्झिट

Image
डॉ मयुरी गेडाम, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक यांनी आज अभियानातुन अनपेक्षित एक्झिट घेतली. साधारण दीड वर्षे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयात एसपीएम म्हणून सेवा बजावलेल्या डॉ गेडाम ह्या एक प्रतिभासंपन्न व हुशार अधिकारी होत्या. अभियानाचा वार्षिक आराखडा बनवणे, त्याची अंमलबजावणी, मार्गदर्शक सूचना व जिल्ह्यांना निधींवाटपासंदर्भातील इतर कामांमध्ये त्यांची चांगली पकड होती. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकारी व सल्लागारांबरोबर समन्वयाची भूमिका त्यांनी उत्तररित्या बजावली. राज्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांबरोबर सौहार्दाचे व सहकार्याचे संबंध राखल्यामुळे त्यांची अभियानातील कारकीर्द यशस्वी ठरली. कोविड कालावधीतदेखील त्यांनी कार्यालयात कर्तव्यनिष्ठेने कोविड निधीच्या सुयोग्य नियोजनात भूमिका वठवली. या कार्यालयात येण्याअगोदर त्या भारतीय नौदलातील वैद्यकीय पथकात उच्चपदस्थ अधिकारी होत्या. त्यांचे पतीदेखील नौदलातील वरिष्ठ अधिकारी आहेत व त्यांच्या विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या बदलीमुळे डॉ मयुरी यांनी मुंबईतील अभियान कार्यालयास रामराम ठोकला. मूळचे न...

माझे कुटुंब, माझी जबाबदारी

Image
माझे कुटुंब, माझी जबाबदारी  कोरोनाविरुध्‍द लढण्‍यासाठी राज्‍य शासनाने १५ सप्‍टेबर २०२० पासुन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही महात्‍वाकांक्षी मोहीम महाराष्‍ट्रभर राबविण्‍यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आज राज्‍याच्‍या सर्वच भागांत मोठया प्रमाणावर वाढताना दिसत आहे. संसर्गाची साखळी खंडीत करण्‍याची आवश्‍यकता आज प्राधान्‍याने  निर्माण झाली आहे. यासाठी १५ सप्टेंबरपासून राज्‍यभरात राबविण्यात येत असलेली ही मोहिम कोरोनाच्या नियंत्रणासाठी अधिक प्रभावी ठरणार आहे. घरोघरी जाऊन करण्‍यात येणा-या या सर्व्‍हेक्षणात संशयित कोरोना रुग्‍ण, मधुमेह, ह्रदयविकार, किडणी आजार, लठठपणा, कोमॉर्बिड अवस्‍थेतील रुग्‍ण शोधण्‍याचे महत्‍वपूर्ण काम करण्‍यात येत आहे. कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर सर्व्‍हेक्षणाव्‍दारे आरोग्य शिक्षण साधणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या मोहिमेद्वारे कोरोना व विविध आजारांचे रुग्‍ण शोधुन काढणे, लोकांना कोरोना विषाणूसोबत जगायला शिकवणे व त्यासाठी काही नियम व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. घरोघर...

नवी मुंबईकरांचा अंत पाहू नये

Image
*नवी मुंबईकरांचा अंत पाहू नये* मध्य, पश्चिम मार्गांबरोबरच नवी मुंबईदेखील प्रचंड प्रमाणात विस्तारत गेलेली असून या नगरीत  कामधंद्यानिमित्त येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांमध्येदेखील भरमसाठ वाढ झालेली आहे. असे असताना हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गाला म्हणाव्या तितक्या प्रमाणात रेल्वे प्रशासनाकडून महत्व व न्याय दिला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रवाशी संख्या वाढूनही मर्यादित लोकलफेऱ्या, जुन्या व वापर झालेल्या रेल्वेगाड्या, मर्यादित तिकीट खिडक्या, प्रशस्त स्थानके असली तरी सुविधांची वानवा तसेच सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तीनही मार्गांवर पुरेश्या विशेष गाड्या चालवल्या जात असताना ट्रान्स हार्बर मात्र मोठ्या प्रवाशीसंख्येचा असूनदेखील गेले पाच सहा महिने बंद असल्याचा जमा आहे. इतका अन्याय होत असला तरी नवी मुंबईतील जनता फार सोशिक आहे. अन्याय होत असल्याचे समोर दिसत असले तरी त्यासाठी प्रशासनास त्रास देणारे मोठे आंदोलन वा संघर्ष कधी झाल्याचे कधी दिसून आलेले नाही. त्यामुळे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता नवी मुंबईकरांचा अधिक अंत पाहू नये आणि लोकलफेऱ्या तसेच सुविधांमध्ये वाढ करावी....

मदतीला धावून येणारी धाडसी मावसबहिण - ज्योत्स्नाताई

Image
शनिवार १९ सप्टेंबर रोजी सकाळी एक अत्यंत धक्कादायक बातमी कानावर पडली. ठाण्यात वास्तव्यास असलेली माझी मावसबहिण ज्योत्स्नाताई हीचे अल्पशा आजाराने अवकाळी निधन. बातमी एकताच मी पुरता हादरून गेलो. क्षणभर विश्वासच बसेना म्हणून ठाण्यातील माझ्या भावोजींना विचारणा करण्यासाठी फोन केला. बातमी खरी असल्याचे कळल्यावर डोक्यात ज्योत्स्ना ताईचा चेहरा व अनेक प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेले. अत्यंत मनमिळावू, धाडसी, सर्वांना मदत करणारी ज्योत्स्ना ताई अशी अवकाळी आपल्यातून निघून जाईल असे तिच्या ठणठणीत प्रकृतीमुळे अजूनही खरे वाटत नाही. कौटुंबिक जिव्हाळ्यात वावरणाऱ्या ज्योत्स्नाताईने कठीण प्रसंगात अनेकांना आधार दिल्याचे लहानपणी मी अनुभवले आहे. मधल्या काळात तिच्याशी संपर्क होत नसला तरी तिच्या आठवणी मनात कायमच्या घर करून आहेत. अशीच एक माझ्या लहानपणीची घटना. तेव्हा मी माझ्या पालघर जिल्ह्यातील देवघर या गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथी इयत्तेत शिकत होतो. परीक्षा आटोपल्यावर शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या होत्या. त्यामुळे रोज गावातील मित्रांबरोबर हिंडणे, फिरणे, खेळणे हाच दिनक्रम ठरलेला होता. आमच्या शाळेसमो...

मास्कची सक्ती हवीच

Image
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आज सर्वात मोठा इलाज आहे तो म्हणजे मास्क. या विषाणूचा नाक व तोंडावाटे होणारा संसर्ग टाळण्यासाठी मास्क हा संरक्षक भिंतीचे काम करतो. त्यामुळे आगामी काळात प्रत्येकाने मास्क वापरणे अनिवार्य आहे. मात्र काही अतिउत्साही व अतिआत्मविश्वास असलेल्या व्यक्ती सार्वजनिक ठिकाणीही मास्कचा वापर टाळताना दिसत आहेत. राज्यातील सर्वात गर्दीचे शहर समजल्या जाणाऱ्या मुंबई शहरात ‘विना मास्‍क’ विषयक जनजागृती करतानाच दंडात्‍मक कारवाई अधिक तीव्र करण्‍याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्‍यादी ठिकाणी ‘मास्‍क नाही तर प्रवेश नाही’, ‘नो मास्‍क, नो एन्‍ट्री’, अशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच सर्व बसेस, टॅक्‍सी, रिक्षा इत्‍यादींमध्येदेखील मास्क नसेल तर प्रवास नाकारला जाणार आहे. मास्कची सक्ती जोवर होत नाही तोवर कोरोना प्रसाराला आळा घालणे शक्य होणार नाही. सार्वजनिक वाहतूक सेवा बऱ्याच अंशी पूर्ववत झाली आहे. येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांसाठी मुंबई उपनगरीय लोकल वाहतूक देखील सुरू होण्याचे संक...

महात्मा गांधी जयंती निमित्ताने

Image
आज २ ऑक्‍टोबर गांधी जयंती म्‍हणजे महात्‍मा गांधीजींचा जन्‍मदिवस. स्‍वातंत्र्यसंग्रामामध्‍ये अहिंसेच्‍या मार्गाने लढा देऊन यश मिळवणारे महापुरुष म्‍हणजे राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी. महात्‍मा गांधींंच्‍या आयुष्‍याबाबत अनेक गोष्‍टी आज साहित्‍यातुन उपलब्‍ध झालेल्‍या आहेत. बापुजींच्‍या जिवनातील अनेक घडामोंडींचे साक्षीदार बनलेल्‍या वास्‍तु देशामध्‍ये अस्तित्‍वात आहेत ज्‍या त्‍यांच्‍या संघर्षाची आठवण करुन देतात.  त्‍यातीलच एक म्‍हणजे सेवाग्राम आश्रम. मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच बापूंजीच्या जीवनाचा आरसा असलेले महाराष्‍ट्रातील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे वर्धा येथील हा सेवाग्राम आश्रम. गांधीजींनी त्यांच्या वृद्धापकाळातील सर्वाधिक काळ म्हणजेच 12 वर्षे सेवाग्राम आश्रमात घालविला आहे. विदर्भातील वर्धा या शहरापासून 8 किलोमीटरवर असलेल्या सेवाग्राम या गावी 300 एकर जमिनीत हा आश्रम वसला आहे. बापूजींच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या व त्यांच्या विश्वात घेऊन जाणाऱ्या या आश्रमाला मी अनेकदा भेट दिली आहे. या ठिकाणी नियमितपणे दररोज सहाच्या सुमारास खुल्या प्रांगणात प्रार्थना केल...