Posts

Showing posts from August, 2022

सरस्‍वती गणपत पाटील विदयालय, केळठण शाळेत शैक्षणिक साहित्‍याचे वाटप

Image
 विविध स्‍वयंसेवी संस्‍थाकडून, दानशूर व्‍यक्‍तींकडून मदतीचा हात देवघर विभाग शिक्षण प्रसारक ट्रस्‍ट अंतर्गत सरस्‍वती गणपत पाटील विदयालय , केळठण ही शाळा गेल्‍या २० वर्षांपासुन आदिवासी , दुर्गम भागात ज्ञानदानाचे कार्य करत असुन शाळेत ८वी ते १०वी पर्यंत माध्‍यमिक वर्ग कार्यरत आहेत. परिसरातील आदिवासी व गरीब कुटुंबातील शेकडो मुलांना या शाळेमुळे लाभ झालेला आहे. शाळेची शैक्षणिक प्रगती व गुणवत्‍तादेखील वाखाणण्‍याजोगी असुन दरवर्षी दहावीच्‍या उत्‍तूंग निकालातून ती प्रतीत होत असते. शाळेतील अनेक मुलांनी क्रिडा क्षेत्रात उंच भरारी घेत तालूका , जिल्‍हा , राज्‍य पातळीवर आपले व शाळेचे नाव कोरले आहे. वर्जेश्‍वरी , गणेशपुरी यासारख्‍या नैसर्गिक , पवित्र व पर्यटनस्‍थळापासुन हाकेच्‍या अंतरावर वसलेली ही शाळा मुलांच्‍या कलागुणांमुळे उत्‍तरोत्‍तर चांगली कामगिरी करत आहे. यामुळेच समाजातील अनेक दानशूर मंडळी सढळ हस्‍ते या शाळेसाठी व मुलांसाठी मदत करताना दिसतात. नुकतेच २५ ऑगस्‍ट २०२२ रोजी सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने आणि सचिन तेंडुलकर फाउंडेशन यांच्‍या संयुक्त विद्यमाने या  शाळेतील सर...

असा साजरा करा गणेशोत्सव

Image
यंदाच्या गणेशोत्सवावर कुठलेही निर्बंध नसल्याने ग्रामीण व शहरी भागात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार या शंका नाही. यासाठी आकर्षक व भव्य दिव्य गणेशमूर्ती, सजावट, आरास करण्याकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा कल आहे. कोरोना व इतर साथीच्‍या आजारांचा प्रादुर्भाव पाहता या उत्‍सवाला आरोग्‍य उत्‍सव म्‍हणून साजरा करण्‍यासाठी सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घ्‍यायला हवा. सार्वजनिक मंडळांनी प्रबोधनात्मक देखाव्यांबरोबरच आरोग्‍य उपक्रमांनी यंदाचा गणेशोत्‍सव साजरा करावा. उत्‍सव काळात आरोग्‍य व रक्‍तदान शिबीरे आयोजित करणे, विविध संसर्गजन्‍य व असंसर्गजन्‍य आजारांचे रुग्‍ण शोधणे, त्‍यांना औषधोपचार मिळवून देणे, आरोग्‍यासाठी जनजागृती करणे, आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने परिसरातील नागरीकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन शिबीरे आयोजित करणे, गंभीर व दुर्धर आजाराच्‍या रुग्‍णांच्‍या दिर्घकालीन उपचारांसाठी मदत मिळवून देणे, विविध शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे यासारखी अनेक कामे या गणेशोत्‍सवादरम्‍यान करता येतील. एकंदरीत, येणाऱ्या श्रीगणेश उत्‍सवाची व मूर्तींची भव्‍यता...

समाज चुकीच्या दिशेने जातोय

Image
सन २००२ मध्ये गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आल्यानंतर उसळलेल्या दंगलीत ५ महिन्यांच्या बिलकीस बानो या गर्भवती महिलेवर बलात्कार करून तिच्या ३ वर्षांच्या मुलीसह कुटुंबातील ७ जणांची हत्या करणाऱ्या आरोपींची सुटका होताना त्यांना मिठाई भरवून व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. या घटनेच्या सीबीआय चौकशीत ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. ११ आरोपींपैकी एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात शिक्षा माफ व्हावी यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हा निर्णय गुजरात सरकारला घेण्यास सांगितले आणि सरकारने एक कमिटी स्थापन करून त्यांची शिक्षा माफ केली. स्त्री स्वातंत्र्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या देशात ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना अशा प्रकारे मोकाट सोडणे व त्यांच्या सुटकेचा आंनद व्यक्त करणाऱ्यांच्या आसुरी मानसिकतेची कीव करावीशी वाटते. न्यायाच्या प्रतीक्षेत लढा देत असलेल्या अत्याचारपीडित महिलांचे खच्चीकरण करणारी ही घटना आहे. महिलांवरील अत्याचारात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर जातीय व्यवस्थेचा कुठलाही अडथळा त्यात नसायला हवा. अशा प्रक...

वेग मर्यादा आणि लेनची शिस्त पाळा

Image
मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक शंकाकुशंका व्यक्त करण्यात येत असल्या तरी राज्यातील या महत्वाच्या महामार्गावर सातत्याने सुरू असलेली अपघातांची मालिका चिंताजनक अशीच आहे. मागील वर्ष - दीड वर्षांच्या काळात तब्बल ३०० अपघात या मार्गावर झाले व त्यात १२५ मृत्यू झाले ही आकडेवारी धक्कादायक आहे. या ठिकाणी घडणाऱ्या अपघतांनंतर अपघातग्रस्तांचे प्राण वाचवणाऱ्या उपाययोजना तर आवश्यक आहेतच मात्र अपघातांची कारणमीमांसा करून असे अपघात टाळण्यासाठीदेखील पावले उचलणे क्रमप्राप्त आहे. दुर्दैवाने ते न झाल्याने अपघातांची मालिका थांबत नाही. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी बसवण्यात आलेल्या स्पीड गन्सची उपयुक्तता अनाकलनीय आहे. एक्सप्रेस वेवर लेनची शिस्त पाळली जात नसल्याचे प्रमुख कारण बहुतांश अपघातांना आहे. मधल्या लेनमध्ये हलकी वाहने, डाव्या बाजूला जड वाहने व उजव्या बाजूला ओव्हरटेक करणारी वाहने महामार्गावर धावणे अपेक्षित आहे. मात्र अनेकदा ट्रक, ट्रेलर, टेम्पो यासारखी जड वाहने मधल्या व उजव्या बाजूकडील लेनमध्ये दिसतात. याम...

ओलीम्पिक खेळाडूंना पाठबळ मिळावे

Image
भारतात ज्या प्रमाणात आयपीएलसारख्या क्रिकेट स्पर्धांना अवाजवी महत्व दिले जाते त्या प्रमाणात इतर खेळांना दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. खेळाला प्रोत्साहन व आवश्यक सुविधा न मिळाल्याने खेळाडू मागे पडतात. यासाठी गेल्या कित्येक वर्षांमध्ये ऑलिम्पिक, राष्ट्रकुल सारख्या क्रीडा प्रकारांमध्ये भारताची कामगिरी समाधानकारक होऊ शकलेली नाही. मात्र आता अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावरून मिळणाऱ्या सोयी सुविधांचा विचार न करता आपला खेळ उंचावण्यासाठी जीवापाड मेहनत घेताना दिसतात. यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या २२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली आहे. इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरातील अलेक्झांडर स्टेडियमवर २२वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा खेळवली गेली. यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. टोकियो ऑलिंपिकमधील यशानंतर भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेतही आपल्या देशाचा गौरव वाढवला आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताने सात पदकांची कमाई केली होती. त्यामुळे साहजिकच राष्ट्रकुल...

नैसर्गिक व उपजत अभिनयाचा कलाकार

Image
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाने उल्लेखनीय भूमिका साकारणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांचे निधन मनाला चटका लावून गेले. टूरटूर, मोरुची मावशी, भटाला दिली ओसरी ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली होती. त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर अनेक नाटकांमधून भूमिका साकारल्या. रंगभूमीनंतर त्यांनी आपला मोर्चा टेलिव्हिजन आणि चित्रपटांकडेही वळवत आपल्या खुमासदार अभिनयाने चित्रपटांना वेगळा दर्जा प्राप्त करून दिला. त्यांनी नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक चित्रपटांमधून प्रशांत दामले, सचिन पिळगावकर, जयवंत वाडकर अशा दिग्गज कलाकारांबरोबर भूमिका साकारल्या. मंगळवारी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'दुसरी बाजू' हा पुर्नप्रसारीत कार्यक्रम पाहिला. त्यात विक्रम गोखले यांनी प्रदीप पटवर्धन यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी आप...

आरोग्य भवन, मुंबई येथे आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न

Image
आरोग्य भवन, मुंबई येथे आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध सरकारी व निम सरकारी कार्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य सेवा आयुक्तालयाचे मुख्यालय असलेल्या मुंबईच्या आरोग्य भवन येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. कार्यालयातील विविध प्रशासकीय विभागांमध्ये कर्मचाऱ्यांनी तिरंग्यातील रंग केंद्रस्थानी ठेवून आकर्षक सजावट केली होती. तसेच आरोग्य भवन इमारतीला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठीक ८ वाजता रोजी मुख्यालयात आरोग्य सेवा आयुक्त डॉ रामास्वामी एन यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले. याप्रसंगी आरोग्य संचालिका डॉ साधना तायडे, सहसंचालक डॉ विजय कंदेवाड, डॉ एकनाथ माले, डॉ गौरी राठोड, सहा संचालक डॉ अरुण यादव, डॉ संजीवकुमार जाधव, डॉ रघुनाथ राठोड, डॉ महेंद्र केंद्रे, डॉ दुर्योधन चव्ह...