घरबसल्या मिळवा ई संजीवनीद्वारे मोफत आरोग्यसेवा
केंद्र शासनाचा अभिनव उपक्रम कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. आज या आजारावर नियंत्रण मिळवण्यात काही अंशी तरी आपल्याला यश मिळाले आहे असेच म्हणावे लागेल. याला कारणीभुत आहे ते आपल्या देशात व महाराष्ट्रात अगदी वेळेवर जाहीर केलेला लॉकडाऊन. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता राज्यातील जनतादेखील लॉकडाऊनच्या काळात गेल्या सहा सात आठवडयांपासुन घरात बसुन प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करत आहे. त्यामुळेच इतर देशांच्या तुलनेत व आपल्या लोकसंख्येच्या मानात करोनाचा फार प्रसार व संसर्ग आपल्याकडे अदयापपर्यंत होऊ शकलेला नाही. मात्र या लॉकडाऊनच्या काळात एक महत्वाची समस्या उदभवलेली आहे व ती महणजे ज्या लोकांना अथवा रुग्णांना वैदयकीय उपचारासाठी घराबाहेर पडणे शक्य होत नाही त्या रुग्णांना वेळेत उपचार मिळणे अडचणीचे ठरत आहे. मात्र अशा रुग्णांसाठी केंद्रीय आरोग्य विभागाने पुढाकार घेत एक नवीन योजना सर्वांसमोर आणली आहे. ई संजीवनी या नावाने सुरु करण्यात आलेल्या या योजनेनुसार रुग्णांचा घरबसल्या तज्ज्ञ डॉक्टरांशी थेट...