सणांचे बदलते स्वरूप
गेल्या काही वर्षामध्ये दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचे स्वरूप पूर्णतः पालटले आहे. हे सण साजरा करण्यामागील उद्देश बाजूला पडून त्यात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा व अर्थकारण शिरले आहे. राजकीय पक्षांच्या दृष्टीने ही मोठी सुवर्णसंधीच असते. त्यामुळे राजकीय पक्ष पुरस्कृत गणेश मंडळांमध्ये प्रचंड चढाओढ पाहायला मिळते. भव्यदिव्य देखावे व आरास यासाठी मोठा खर्च करण्यात येतो. सध्या या सणांचा एक प्रकारचा इव्हेंट झाल्याचे पहायला मिळते व त्यातूनच गणेशोत्सवात 'नवसाला पावतो' ही संकल्पना पुढे आली. अशा प्रकारचा प्रचार करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्याचा घेतलेला निर्णय आशादायक आहे. सर्वच मोठ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये खूप प्रमाणावर अर्थकारण होत असते. यात तगडया प्रायोजकांच्या जाहिराती मंडळांच्या मंडपांत आढळतात. काही मंडळांचे गणपती नवसाला पावतात, असा समज असल्याने भाविकांच्या मोठया रांगा लागतात. काही गणपतींच्या दर्शनासाठी ‘सेलिब्रेटीं’ची गर्दी असते, त्यांना पाहण्यासाठीच भाविक गर्दी करतात. महाराष्ट्रात गोपाळकाला, गणेशचतुर्थी, नवरात्रोत्सव अशा सणांच्या कालावधीत आनंदाला उधाण आलेले असते. नऊ थर, १०...