कामगारांच्या आरोग्यासाठी - १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा राज्य कामगार विमा योजना ही अधिनियम, १९४८ च्या अन्वये सुरु करण्यात आली. आजार, प्रसूती, काम करताना आलेली विकलांगता इत्यादींसाठी तरतुदी करून कामगारहिताचे संरक्षण करणे हा तिचा हेतू आहे. ही योजना संपूर्ण भारतात लागू असून तिच्याखाली हंगामी नसलेल्या परंतु वीसपेक्षा अधिक कामगारांना रोजगार देणार्या कारखान्यांतील सर्व कामगारांना लागू आहे. कारखान्यांप्रमाणेच इतर आस्थापनांमधील कामगारांकरितादेखील ही योजना लागू करता येते. राज्य कामगार विमा योजनेमध्ये आजारपण, मातृत्व, तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपाचे अपंगत्व, सेवेतील इजेमुळे होणारे मृत्यू व त्यामुळे कमविण्याच्या क्षमतेत होणारी घट यासारख्या आकस्मिक घटनांमध्ये कामगारांचे हितरक्षण करणारी ही योजना आहे. अधिनियमामध्ये कामगार व त्यांच्या लगतच्या अवलंबीतांच्या वैद्यकीय देखभालीची हमी देण्यात आली आहे. अधिनियमाचा आधार घेऊन केंद्र सरकारने योजना प्रशासित करण्यासाठी राज्य कामगार विमा महामंडळाची स्थापना केली. त्यानंतर, ही योजना दिल्ली व कानपूर येथे २४ फेब्रुवारी १९५२ रोजी प्रथम अंमलबजावणी करण्यात आली. अधिनिय...