Posts

Showing posts from June, 2022

रस्ते विकासाचा मार्ग ग्रामीण भागातून जावा

Image
 पायाभूत विकासाचा नवा अध्याय हा लेख (दै लोकसत्ता २८ जून) वाचला. रस्ते व महामार्गांच्या विकासाबाबत सरकारी धोरण उदात्त आहे यात अजिबात शंका वाटत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये महामार्गांच्या निर्मितीवर खर्चित झालेल्या निधीचा आकडा अवाढव्य आहे. त्यामुळे बीओटी तसेच परदेशी गुंतवणुकीतून अशा मार्गांचे जाळे विणून त्याचा भार कर, टोल या विविध रुपात अप्रत्यक्षपणे जनतेवरच टाकण्यात येत आहे. एकीकडे मोठमोठे महामार्ग देशातील उद्योग जगताला समृद्ध करत असताना दुसरीकडे ग्रामीण रस्ते मात्र अजूनही दुरावस्थेच्या शापातून मुक्त होऊ शकलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अनेक राज्य महामार्ग, अंतर्गत ग्रामीण रस्ते आज अखेरची घटका मोजत आहेत. अपघाती मृत्यू, इंधनाचा अपव्यय व प्रदूषणाची आकडेवारी तर डोके गरगरवणारी आहे. रस्ते बांधकामात लागलेली भ्रष्टाचाराची कीड नैतिकता आणि गुणवत्ताही संपवणारी आहे. अशा स्थितीत पायाभूत सुविधांची राष्ट्रीय उजळणी करत बसण्यापेक्षा राज्यांतर्गत रस्ते व महामार्ग विकसित करण्यावर भर द्यायला हवा. ग्रामीण रस्त्यांची भरभराट केल्यास उद्योग व्यवसायाच्या संधी तिथेही उपल...

अशा आंदोलनांनी नक्की काय साध्य होते?

Image
सरकारने एखादा धोरणात्मक निर्णय घेतला की त्याला विरोध करण्याचा नवा ट्रेंड समाजात पसरत चालला आहे. वास्तविक विरोध करणारे हे मूठभर हिंसक लोक सर्व जनतेला वेठीस धरतात व सरकारी मालमत्तेची प्रचंड नासधूस करतात. यात काही विरोधी गटातील नेते व समाजकंटकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो. तरुण मुलांची माथी भडकवायची, त्यांना निरनिराळी अमिषे दाखवायची व त्यांना आक्रमक आंदोलने करण्यास भाग पडायचे हे प्रकार देशातील लोकशाहीला मारक ठरत आहेत. एखाद्या गोष्टीला विरोध करण्याचे वैचारीक व संविधानिक मार्ग उपलब्ध असताना त्यापासून सोयीस्कर लांब राहून तोडफोडीचे आंदोलन करून इप्सित साधता येते हा विषारी गैरसमज वेगाने पसरत चालला आहे. यात सर्वसामान्य कार्यकर्ते, गरीब कुटुंबातील मुलांची आयुष्ये अक्षरशः उध्वस्त होत आहेत. अशा आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या मुलांची शैक्षणिक आयुष्ये व्यपगत होऊन करियर बर्बाद झाली आहेत. दाखल गुन्ह्यांमुळे त्यांना पासपोर्ट मिळत नसल्याने शिक्षण नोकरीसाठी परदेशी जाण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत. अग्निपथ कायद्याच्या घातला गेलेला धुडगूस अविचारी व सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवल्‍याचे द्योतक आहे....

शिक्षण पध्दतीत आमूलाग्र बदल आवश्यक

Image
दहावी-बारावीच्या निकालाचे आकडे दरवर्षी वाढत आहेत. यंदा दहावीचा राज्याचा निकाल जवळपास ९७% लागला. अनेक शाळांतील १००% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वास्तविक निकालाची ही स्थिती आशादायी असली तरी भविष्याची चिंता वाढवणारीही आहे. याने महाविद्यालयीन व उच्च शिक्षणातील प्रवेश, स्पर्धा परीक्षांची तयारी, रोजगार क्षेत्रामध्ये प्रचंड चुरस निर्माण होणार आहे. जागा कमी आणि उमेदवार अधिक ही परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली आहे. त्यातून मग शिक्षण क्षेत्रात वशिलेबाजी, आर्थिक तडजोडीसारखे प्रकार घडण्याची शक्यतादेखील बळावते. लाखोंच्या संख्येने दरवर्षी विविध शाखांमधून यश मिळवत बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तेव्हढ्या संधी उपलब्ध आहेत का याचा विचार करायला हवा. यासाठी महाविद्यालयीन, उच्च व तंत्र शिक्षणाला पर्याय आणणे अपरिहार्य आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा कलागुण जोपासणाऱ्या व त्या कलागुणांच्या आधारे स्वयंरोजगाराच्या वाटा चोखाळणारी शिक्षण पद्धती अंमलात आणणे काळाची गरज आहे. व्यवसाय व रोजगाराभिमुख शिक्षण भावी पिढीला लाभदायी ठरेल.  केवळ उच्च पदव्या मिळवून देणारे नव्हे तर भविष्यात पायावर उभे राहाय...

राजकीय धक्के जनतेला नवे नाहीत

Image
गेल्‍या  दोन दिवसांपासुन राज्‍यातील राजकारण मंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या बंडानंतर ढवळुन निघाले आहे. प्रसारमाध्‍यमे दिवसरात्र यासंदर्भात लाईव्‍ह घडामोडी दाखवण्‍यात व्‍यस्‍त आहेत. कधी नव्‍हे अशी अभूतपूर्व परिस्‍थीती सध्‍या सत्‍तास्‍थापनेबाबत निर्माण झालेली असली तरी राज्‍यातील जनतेला त्‍याबाबत प्रचंड उत्‍सुकता आहे. सत्‍तेबाबत मोठी संदिग्‍धता असली तरी महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात काहीही घडू शकते हे यापुर्वीच्‍या काही घटनांनी सिध्‍द झाले आहे. त्‍यामुळे राजकीय धक्‍के राज्‍यातील जनतेला नवे नाहीत. त्‍यामुळे कोणाचेही सरकार सत्‍तेवर आले तरी सर्वसामान्‍य जनतेला फार काही फरक पडेल असे वाटत नाही. शेवटी लोककल्‍याणकारी निर्णय घेणारे व ते राबवणारे शासन जनतेला अपेक्षित असते. त्‍यामुळे हे राजकीय नाटय सर्वसामान्‍यांनी फार गांभिर्याने घेण्‍याची आवश्‍यकता नाही.       वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई

पर्यावरण संतुलन महत्वाचे

Image
जागतिक पर्यावरण दिनाच्‍या निमित्‍ताने निरोगी आयुष्‍यासाठी पर्यावरण संतूलन राखणे महत्‍वाचे राज्यभरात सर्वत्र उष्णतेची लाट पसरलेली आहे. निसर्गाची अपरिमित व न भरून येणारी हानी, वृक्षतोड, शहरे व ग्रामीण भागांचे आसुरी काँक्रीटीकरण, नष्ट होत चाललेले जलसाठे व ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम ही कारणे वाढलेल्या उष्णतेला देता येतील. अनियमित ऋतूचक्र व लुप्त होत चाललेला निसर्ग यामुळे वातावरणात झपाट्याने बदल घडत असून त्याचा विपरीत परिणाम मानवी जनजीवनावर तसेच आरोग्यावर होताना दिसत आहे. राज्यात वाढलेली गर्मी आज आबालवृद्ध, महिला, प्राणी, पक्षी या सर्वच घटकांना त्रासदायक ठरत असून त्यावर मात करण्यासाठी पर्यावरण संतुलन राखण्याचे मोठे आव्हान आज आपणा सर्वांसमोर आहे. सध्या सर्वत्र पसरलेला वाहनांचा भस्मासुर व त्यामुळे होत असलेले प्रदूषण याचा विचार केला तर या वाहनांवर कुठेतरी नियंत्रण आणले पाहिजे असे आपणा सर्वांनाच वाटत असते. मात्र त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्‍न केले पाहिजेत. आरोग्याचा व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी पुण्यातील सुनील कुकडे यांनी पुणे ते विषाखापट्टणमपर्यंतचा 1355 किलोमीटरचा सायकलव्...

नवी मुंबईत पार्किंगचा प्रश्न गंभीर

Image
वाढत्या वाहनांमुळे नवी मुंबईमधील पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. रस्त्याच्या दुतर्फा पार्क केलेल्या वाहनांनी निम्म्याहून अधिक रस्ता व्यापला जात आहे व रहदारीस त्याचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. नवी मुंबईतील सर्वच रस्त्यांची अवस्था अशीच असून या बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे. रहिवाशी संकुलांमध्येदेखील इमारतींसमोरील रस्त्यांवर ही वाहने सर्रास उभी केली जातात. एकही असा रस्ता सापडत नाही जिथे अनधिकृतपणे उभी असणारी वाहने नाहीत. यामुळे बऱ्याचदा इमारतींमधून वाहने बाहेर काढताना, अरुंद रस्त्यांवर दोन चारचाकी वाहने पास होण्यास अडथळा निर्माण होतो. अनेक वाहने तर महिनोंमहिने रस्त्याच्या कडेला उभी केलेली दिसतात. नागरी स्वच्छता व सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनदेखील ही वाहने अत्यंत धोकादायक असल्यामुळे वेळीच अशा बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेणे किंवा ती जप्त करणे क्रमप्राप्त ठरते. या वाहनांचा वाली कोण असा प्रश्नही अनेकदा पडतो. भर रस्त्यात उभी करण्यात येणारी ही वाहने रहदारीसाठी मोठा अडथळा ठरत असल्याने त्यांच्यावर वेळोवेळी कारव...

मानवतेसाठी योग

Image
राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत आरोग्य भवन येथे जागतिक योग दिन साजरा जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक २१ जून २०२२ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आयुष अभियानामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन आरोग्य भवन, मुंबई येथे करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य सेवा आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक डॉ रामास्वामी एन., आरोग्य संचालिका डॉ साधना तायडे, वित्त संचालक श्री बिवलकर, सहसंचालक डॉ विजय कंदेवाड, डॉ पदमजा जोगेवार, श्री संजय सरवदे, डॉ एकनाथ माले, श्रीमती रेहाना काझी, डॉ विजय बाविस्कर, अधीक्षक अभियंता श्रीमती दिपाली भाईक, योगसाधक डॉ निरंजन पटेल, आयुष अभियानाचे सहाय्यक संचालक डॉ अविनाश भागवत आदी मान्यवर तसेच आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. जागतिक योग दिनाचे यंदाचे घोषवाक्य मानवतेसाठी योग (YOGA FOR HUMANITY) असे असून योगातून मानवतेचा संदेश दिला गेला आहे. आयुक्त डॉ रामास्वामी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आरोग्य सेवेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना योग दिनाच्या शुभे...

शाळा सुरू, काळजी घ्या

Image
कोरोनाची दोन वर्षे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती मंदावणारी ठरली. घरी बसून घेतलेले शिक्षण सर्वच मुलांना फलदायी ठरलेले नाही. अभ्यासक्रम, परीक्षा याबरोबरच मुलांच्या कला व क्रीडागुणांनाही ब्रेक लागल्याने हे नुकसान भरून न येणारे आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर यंदा शाळा प्रत्यक्षात सुरू करणे क्रमप्राप्तच होते. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर आता शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्राथमिक शाळांमधील मुलांचे लसीकरण अद्याप न झाल्याने संसर्गाचा धोका हा सर्वाधिक याच गटात आहे. त्यात शालेय वर्गांमध्ये सामाजिक अंतर राखणे तसेच मुलांना स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देणे शाळांची जबाबदारी आहे. मुलांच्या शाळेपर्यंतच्या प्रवासात स्कुल बस व व्हॅनमध्ये गर्दी होऊ न देण्याची खबरदारी घ्यायला हवी. मुलांना शालेय अभ्यासक्रमासोबतच व्यक्तिगत स्वच्छता व संसर्गजन्य आजारांबाबत जागृत ठेवणे शिक्षकांची जबाबदारी आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना त्याबाबत योग्य सूचना वेळोवेळी देऊन शाळेत पाठवणे आवश्यक आहे. मास्कचा वापर हा शाळेत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी करायलाच हवा. शाळेतील वर्ग...

श्री समर्थ विद्यालय जोगेश्वरी चा १०० टक्के निकाल

Image
श्री समर्थ विद्यालय जोगेश्वरी चा १०० टक्के निकाल मुंबई - गणेश हिरवे माध्यमिक शिक्षा परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीचा जोगेश्वरी पूर्व बांद्रेकरवाडी येथील श्री समर्थ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून सिद्धी ज्ञानेश्वर सत्रे ही संपूर्ण शाळेतून ८७.४० टक्के गुण मिळवून प्रथम, तर पूर्णिमा रामदास तरळ ८६.६० व अर्चना सचिन चिमलगी ८३.६० टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वातिय आणि तृतीय आल्या.संस्थेचे अध्यक्ष डॉ वळंजू यांनी शाळेचा निकाल १०० टक्के लागल्यामुळे शाळेतील शिक्षक, पालक,सर्व विद्यार्थी संस्थेचे पदाधिकारी यांचे कौतुक केल्याचं  शाळेचे मुख्यद्यापक मधुकर पोर्लेकर यांनी संगितले.या शाळेत शिकणारी बहुतांश मूल ही आरे कॉलनी येथील आदिवासी पाड्यातील आहेत व त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचे डॉ वळंजू यांनी नमूद केलं.

वेब सिरीज सेन्सॉर कक्षेत आणा

Image
सध्या निरनिराळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून रिलीज होत असलेल्या वेब सिरीज मधून अश्लील संवाद व चित्रीकरणाचा मारा दर्शकांवर सुरू आहे. हिंदीसोबतच मराठी वेब सिरीजमधूनदेखील ही अश्लीलता आता दिसू लागली आहे. वेब सिरिजच्या प्रोमोमधून तरुण वर्गाला आकर्षित केले जाते. भडक आणि अश्लील संवादफेकीतून वेब सिरिजना रंजक मुलामा देण्याचे काम करण्यात येत आहे. यातील कुठलीही वेब सिरीज कुटुंबासमवेत पाहण्याच्या लायकीची नाही. वेब सिरीज शेवटच्या भागात आटोपती न घेता पुढील सिझनची प्रतीक्षा दर्शकांना लावली जाते. अशा अनेक मराठी व हिंदी वेब सिरीज तरुणाईला आकर्षित करून गुन्हेगारीचे विकृत दर्शन घडवत आहेत. सेन्सॉरचे कुठलेही नियम या सिरीजना लागू नसल्याने बेलगाम पद्धतीने कथानक रंगवले जाते ज्यात भडक दृश्ये व भाषेचा वापर केला जात आहे. तरुणाईला बिघडवणाऱ्या अशा वेब सिरीजवर बंधने आणण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजात वाढत चाललेल्या विकृती व गुन्हेगारीला कुठेतरी या वेब सिरीज जबाबदार आहेत. त्यामुळे अशा वेब सिरीजना आवर  घालुन त्यांना सेन्सॉरच्या कक्षेत आणण्याची गरज प्रकर्षाने भासत आहे.  वैभव मोहन पाटील...

एसएससी परीक्षेचा १००% निकाल - के जी पाटील विद्यालय, देवघर व सरस्वती गणपत पाटील विद्यालय, केलठणची दैदिप्यमान कामगिरी

Image
दोन्ही शाळांनी राखली परंपरा कायम देवघर विभाग शिक्षण प्रसारक ट्रस्‍टच्‍या के.जी.पाटील विदयालय, देवघर व सरस्‍वती गणपत पाटील विदयालय, केळठण या दोन्‍ही शाळांचा यंदाचा दहावीचा (एसएससी) निकाल १०० टक्‍के लागला आहे. ८वी ते १०वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण देणाऱ्या या दोन्‍ही शाळांनी आपल्‍या एसएससीच्‍या सर्वोत्‍तम निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. के. जी. पाटील विदयालय, देवघर येथील ३१ विदयार्थी व सरस्‍वती गणपत पाटील, केळठण या शाळेतील ३२ विदयार्थी दहावी बोर्डाच्‍या परिक्षेला यंदा बसले होते. सर्वच्‍या सर्व विदयार्थी चांगल्या गुणांनी उत्‍तीर्ण झाले असुन उत्‍तीर्ण विदयार्थी, दोन्‍ही शाळांमधील शिक्षक, मुख्‍याध्‍यापक तसेच संस्‍थेचे सर्व स्‍तरांतुन अभिनंदन करण्‍यात येत आहे. के जी पाटील विद्यालयात नाज शानहवाज खान याने ८७% गुण मिळवत शाळेत पहिला, उल्का पुंडलीक पाटील हिने ८३.२०% गुण मिळवत दुसरा तर साक्षी रविंद्र भोईर हिने ७९.४०% गुण मिळवत तिसरा येण्याचा बहुमान मिळवला. १९९९ पासून कार्यरत असलेल्या व देवघर गावचे शिक्षणप्रेमी व्यावसायीक के जी पाटील यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिल...

विद्यार्थ्यांचा हुरूप वाढवणारा निकाल

Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजेच एचएससी बोर्डाचा निकाल  बुधवारी जाहीर झाला. राज्यातील ९४.२२ टक्‍के मुले उत्‍तीर्ण झाली आहेत. कोकणाचा निकाल सर्वाधिक ९७.२१ टक्के असून मुंबईचा सर्वात कमी ९०.९१ टक्के लागला आहे. परिक्षेस बसलेल्‍या १४ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांपैकी तब्‍बल १३ लाख ५६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोरोना संकटात दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. कोरोना काळात दोन वर्ष परीक्षांचं वेळापत्रक कोलमडलं होतं. शाळाही बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांसाठीही आव्हानं वाढली होती, अशा परिस्थितीत बोर्डाची परीक्षा देण्याचं टेंशन विद्यार्थी आणि पालकांना होतं. मात्र गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत य निकालात ४ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी बारावीचा निकाल अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या निकालाच्या आधारेच विद्यार्थ्यांच्‍या उच्‍च  शिक्षणाच्‍या वाटा खुल्‍या होतात. वैद्यकीय, इंजिनिअरींग, आर्कीटेक्चर, नर्सींग अशा विविध क्षेत्रांतील प्रवेशासाठी सीईटीसोबतच बारावी परीक्षेलाही महत्त्व असत...

समाजभान जोपासणारा जॉय ऑफ गीविंग ग्रुप

Image
समाजभान जपणारा जॉय ऑफ गीविंग ग्रुप कोरोना काळामध्‍ये अनेक सामाजिक संस्‍था व व्‍यक्‍तींनी समाजभान जोपासत गरजूंसाठी सढळ हस्‍ते मदत केली. यात जिवनावश्‍यक वस्‍तुंपासून दररोजच्‍या जेवणापर्यंत सर्व प्रकारची मदत यथाशक्‍ती करण्‍याचा प्रयत्‍न समाजातील संवेदनशील घटकांनी केला. वास्‍ताविक स्वार्थ व वैयक्तिक हितासाठी झगडणाऱ्या आजच्या दुनियेत सामाजिक बांधिलकी व माणुसकी लोप पावत चालली आहे. प्रत्येक जण इथे फक्त स्वतःपुरताच विचार करतो. यामुळे गरीब श्रीमंत दरी समाजात वाढत चालली आहे. ही दरी कमी करायची असेल समाजातील गरीब, दुर्बल व वंचित घटकांचा विचार कुणीतरी करायला हवा. त्यांच्या अपेक्षा फार नसल्या तरी जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची मदत त्यांना मिळायला हवी. यासाठी समाजातील धनाढ्य, उद्योगपती, मोठमोठ्या सामाजिक संस्था यांचेमार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहेच पण समाजभान जपणाऱ्या संवेदनशील नागरिकांचा सहभागदेखील मोठा बदल घडवू शकतो. कोरोनाने आपल्‍याला बरेच काही शिकवले आहे. पैसा, संपत्‍ती, मालमत्‍ता या बाबी क्षणभंकूर असुन या सर्वांपेक्षा व्‍यक्‍तीचे आरोग्‍य व इतरांना केलेली मदत आयुष्‍या...