Posts

Showing posts from May, 2020

संकटात संधी शोधा

Image
लॉकडाऊनमुळे सध्‍या राज्‍यातील बहुतांश उदयोग धंदे, व्‍यवसाय सर्वच बंद आहे. यासाठी महाराष्‍ट्रात आलेले अनेक छोटे मोठे उदयोजक, कामगार, मजुर आपापल्‍या राज्‍यात परतलेले आहेत. असे असले तरी मुख्‍यमंत्री व उदयोगमंत्री राज्‍यात नवे उदयोग व्‍यवसाय आणण्‍यास उत्‍सुक आहेत. नव्‍या उदयोगांना लागणा-या सर्व प्रकारच्‍या सोयी सवलती देण्‍यास राज्‍य सरकार सकारात्‍मक आहे. खरेतर राज्‍यातील तरुणांसाठी ही एक प्रकारची संधीच आहे. आपल्‍याकडील उदयोग हे एकतर परप्रांतीयांच्‍या हातात आहेत किंवा परप्रांतीयांच्‍यामुळेच चालतात असा एक समज आहे आणि तो ब-याच अंशी सत्‍यदेखील आहे. स्‍थानिकांना भांडवल व मनोबलाअभावी उदयोग व्‍यवसायांमध्‍ये पाय रोवता येत नाही हे वास्‍तव आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर भुमिपुत्रांना आता उदयोग व्‍यवसाय सुरु करण्‍यास संधी चालून आली आहे असे म्‍हटल्‍यास ते वावगे ठरणार नाही. आज मुंबईतील छोटे मोठे उदयोग व्‍यवसाय करणारे अनेक परप्रांतिय काम नसल्‍याने आपापल्‍या प्रांतात परतले आहेत. आता स्‍थानिकांसाठी चालून आलेली ही संधी दवडली जाऊ नये. उदया पुन्‍हा सर्व व्‍यवहार सुरु झाल्‍यानंतर परप्र...

हवाहवासा लोकल प्रवास मिस झाल्‍यासारखा वाटतोय

Image
हवाहवासा लोकल प्रवास मिस झाल्‍यासारखा वाटतोय लोकल ट्रेनमध्ये दररोज उपनगरांमधून मुंबईच्या दिशेने लाखो प्रवाशी नोकरी व्यवसायानिमित्त नियमित प्रवास करतात. मी देखील त्यातलाच एक. मात्र  आज  लॉकडाऊनमुळे सर्वच  बंद आहे. त्‍यामुळे कार्यालयीन वाहनाव्‍दारे सध्‍या हा प्रवास सुरु आहे. घणसोली येथून ट्रान्सहार्बर मार्गावरून ठाणे येथे पोहोचून ठाण्याहून सकाळी ९.५४ ची ठाणे - सिएसएमटी जलद लोकल कामावर जाण्यासाठी पकडतो. गेली अनेक वर्षे ह्या लोकलने प्रवास केल्याने सर्व परिचित सहप्रवाशांचा आमचा एक छानसा ग्रुप ह्या लोकलमध्ये तयार झाला आहे. हा प्रवास केवळ वेळ घालवण्यासाठी न करता अनेक वर्षांच्या एकत्रित प्रवासाने एकमेकांशी एक भावनिक ऋणानुबंध सर्व सहकारी प्रवाशी वर्गात तयार होत आहेत. यामुळेच प्रत्येकाची सुखदुःखे एकमेकांसोबत या प्रवासात शेअर केली जातात व त्यात सहभागी होण्याचा प्रयत्नदेखील केला जातो. कुणाच्या घरचा लग्नसमारंभ असेल, पूजा, वाढदिवस वा इतर कौटुंबिक सोहळा असला तरी लोकलप्रवासातील हे हमसफर हमखास हजेरी लावतात व शुभेच्छा देतात. लोकलप्रवासातच दसरा, दिवाळी, गुढीपाडवा इतकेच काय एखाद्याच...

एव्हढी गर्दी कशासाठी

Image
गेले काही दिवस सीएसएमटी रेल्‍वे स्‍थानकाशेजारील परिसरात पी डिमेलो रोडवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. हजारो परप्रांतीय या ठिकाणी सकाळपासुन भर उन्‍हामध्‍ये रस्‍त्‍यावर उभे राहुन स्‍टेशनमध्‍ये जाण्‍याच्‍या प्रतिक्षेत थांबताना दिसत आहेत. लॉकडाऊनमध्‍ये अडकलेले व मुंबईत रोजगार शिल्‍लक न राहिल्‍याने ही गर्दी आता गावाकडे प्रयाण करते आहे असे चित्र आहे. मात्र ही प्रचंड गर्दी खरेतर या लॉकडाऊनमध्‍ये व सध्‍याच्‍या परिस्‍थीतीस अनुकुल नाही. एकीकडे सोशल डिस्‍टंसिंग राखण्‍यासाठी सरकार आटोकाट प्रयत्‍न करत असताना परप्रांतियांची ही गर्दी अनेकांच्‍या जिवावर बेतु शकते. बरे ज्‍या ठिकाणी ही गर्दी मार्गक्रमण करत आहे तिथेदेखील परिस्‍थीती वेगळी नाही. त्‍यामुळे आजाराचा प्रसार वाढल्‍यास त्‍यास जबाबदार कोण हा मोठा प्रश्‍न उपस्थित होईल. परप्रांतीय कामगारांना त्‍यांच्‍या गंतव्‍य ठिकाणी पोहोचवणे गैर नाही मात्र त्‍यासाठी हजारोंनी गर्दी करण्‍याएवढी घाई का हे कळत नाही. लोकांना आपापल्‍या इच्छित स्‍थळी जाण्‍यासाठी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने रेल्‍वे सेवा सुरु करण्‍याचे संकेत सरकारने दिले असताना एकाच वेळी होणारी ही गर्दी सोश...

पोलिसांनो, काळजी घ्‍या

Image
पोलिसांनो, काळजी घ्‍या कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा आता १००० च्‍या वर गेलेला आहे. यामध्‍ये १०० पेक्षा अधिक पोलिस अधिका-यांनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. खरेतर आरोग्‍य यंत्रणांबरोबर पोलिसदेखील या कोरोनाविरुध्‍दच्‍या युध्‍दातील आघाडीचे शिलेदार आहेत. आज महाराष्‍ट्रातील परिस्‍थीती ब-याच अंशी नियंत्रणात आहे याला जबाबदार पोलिसांची कर्तव्‍यनिष्‍ठता आहे. २४ तास रस्‍त्‍यांवर उतरुन काम करत आहेत, लोकांना घराबाहेर पडू नका म्‍हणून भावनिक साद घालत आहेत तर प्रसंगी पालक बनून लाठीचा मारदेखील देत आहेत. अगदी गावाकडे निघालेल्‍या लोकांना सहकार्य करण्‍यापासुन ते अडचणीत सापडलेल्‍या लोकांना मार्ग दाखवण्‍यापर्यंत सर्व प्रकारची मदत पोलिस आज जागोजागी करताना दिसत आहेत. हि मदत करत असताना पोलिसांनाच या आजाराची लागण आता मोठया प्रमाणावर होताना दिसत आहे. कोरोनाविरुध्‍दच्‍या या लढाईत पोलिसांची भुमिका अत्‍यंत मोलाची असल्‍याकारणाने त्‍यांनी आता स्‍वतःची अधिक काळजी घेण्‍याची गरज आहे. पोलिसांना आजाराची लागण होत असल्‍याने त्‍यांचे मनोधैर्य खच्‍ची होता कामा नये. त्‍यांनी मानसिक दडपणाखाली येऊन काम करता काम...

माझी आदिशक्‍ती ''माझी पत्‍नी'' - २५ वर्षांचा सुखमय आनंदी प्रवास - भावेश पाटील (भाई मामा)

Image
लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त मामांनी लिहलेला लेख *माझी आदिशक्‍ती ''माझी पत्‍नी''* २५ वर्षांचा सुखमय  -आनंदी  प्रवास मी आपणा जवळ  मांडतो आज 13/05/2020 आमच्‍या लग्‍नाचा २५वा  वाढदिवस. आजच्‍याच दिवशी सन १९९५ मध्‍ये आम्‍ही माझा कौटुंबिक साक्षीने व आपल्या उपस्तितीत   प्रेमविवाह केला. त्‍याची किंमतदेखील मला काही काळ चुकवावी लागली कारण घरून थोडा विरोध होता  मात्र लग्‍नाच्‍या पहिल्‍या दिवसापासुन आम्‍हाला माझी मोठी बहिण पुष्‍पा (बाई) व भावोजींची मोहन पाटील तसेच माझा मोठा भाऊ / मित्र दिलीप याची मोठी साथ लाभली व त्यांनी घरची नाराजी दूर करून जी आजवर कायम आहे. अगदी लग्‍नासाठी आई बाबांची संमती घेण्‍यापासुन ते जमवतायेतील तितके आप्‍तेष्‍ट - नातेवाईक गोळा करुन आमचे लग्‍न लावण्‍यापर्यंत बरेच काही. ब-याच प्रकरणात प्रेमविवाह फार यशस्‍वी होत नाहीत हा आपल्‍या समाजातील असलेला समज आमच्‍या बाबतीत मात्र खरा ठरला नाही. आज आमच्‍या हा २५ वर्षांच्‍या संसारात अनेक चढउतार आले, किंबहुना सर्वसामान्‍य नवराबायकोच्‍या आयुष्‍यात येतात त्‍यापेक्षा कितीतरी जास्‍त. मात्र आजही आम्...

ग्रीन झोनमधील गर्दी धेकादायक

Image
ग्रीन झोनमधील गर्दी धेकादायक सध्‍या महाराष्‍ट्रामध्‍ये उदभवलेल्‍या अभूतपूर्व अशा कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभुमीवर सरकारी यंत्रणांमार्फत युध्‍दपातळीवर प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखण्‍यात येत आहेत. गेले जवळपास दिड - दोन महिने लोक लॉकडाऊनमध्‍ये आहेत. सर्वच व्‍यवसाय, कार्यालये, कारखाने बंद अवस्‍थेत असल्‍यामुळे लोकांना तसे घराबाहेर पडण्‍याचे कारणही नाही. मात्र घरात बसुन तरी किती दिवस राहायचे हा विचार करणारेही अनेक आहेत. त्‍यामुळे कधी एकदा हा लॉकडाऊन संपतो व बाहेर पडतो या विचारात अनेकजण आहेत. त्‍यातच आता सरकारने महाराष्‍ट्राची रुग्‍णसंख्‍येनुसार ग्रीन, ऑरेंज व रेड  झोन अशी विभागणी केल्‍याने लोकांच्‍या आशा आणखीच पल्‍लवीत झालेल्‍या आहेत. ग्रीन झोनमधील व्‍यवहार ब-याच अंशी सुरु करण्‍यास सरकारने परवानगी दिल्‍याने आता या भागात लॉकडाऊनचे नियम मोठया प्रमााणावर शिथील झालेले आहेत. मात्र याचा फायदा घेत ग्रीन झोनमधील जिल्‍हयांमध्‍ये लोक मोठया प्रमाणावर रस्‍त्‍यांवर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. ग्रीन झोनमधील जिल्‍हयांमध्‍ये गेल्‍या काही दिवसांपासुन एकही कोरोना पॉझीटिव्‍ह रुग्‍ण न आढळल्‍याने...

घाबरू नका पण जागरूक राहा

Image
नमस्कार, आज संपूर्ण जग कोरोना या जीवघेण्या विषाणूच्या सावटाखाली असताना महाराष्ट्रातील जनता सरकारी आवाहनाला प्रतिसाद देत ज्या एकीने, धैर्याने व ऊर्जेने या आजाराला दूर पळवण्याचा प्रयत्न करतेय त्यासाठी खरंतर शब्दच नाहीत. हेच धैर्य व संयम येत्या काही दिवसांसाठी आपल्याला टिकवून ठेवायचा आहे. नेटानं सुरू असलेली ही लढाई आपण जिंकू व पुन्हा एकदा स्वच्छंदी आयुष्य जगू अन त्यावेळी कोरोना विषाणू आपल्या जीवनात, प्रवासात व देशातदेखील नसेल हा आत्मविश्वास आम्हाला नक्कीच आहे. करोनाचा हाच प्रवास व सर्वांच्या सुरक्षेचा संदेश आम्ही एका कवितेतून आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. माझ्या या कवितेला आपल्या आवाजाचा साज चढवणारे आमचे कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व सिनेकलावंत-दिग्दर्शक या सर्वांचेच मनःपूर्वक आभार.. (विशेष आभार - श्री प्रतीक शेजोळ व श्री विजय सोनोने, बुलढाणा) *घाबरू नका पण जागरूक राहा* वैभव मोहन पाटील

डॉक्‍टर नव्‍हेत ''देवदूतच''

Image
डॉक्‍टर नव्‍हेत ''देवदूतच'' सााधारण दोन आठवडयांपूर्वीची घटना आहे. कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे सध्‍या सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. अशातच ठाण्‍याच्‍या पारसीक नगर येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या माझे मामांची तब्‍येत अचानक बिघडली. दोन वर्षांपूर्वी झालेला त्रास त्‍यांना पुन्‍हा एकदा उदभवला. तीन चार दिवसांपासुन अस्‍वस्‍थता व अशक्‍तपणामुळे बेजार झालेले मामा त्‍या दिवशी दुपारी झोपल्‍यानंतर सायंकाळी उशीरापर्यंत उठेचनात. घरामध्‍ये असलेल्‍या मामी व मामाचा मुलगा अनूप दोघेही घाबरले. त्‍यांची ती अवस्‍था पाहून मामींचा सायंकाळी सातच्‍या सुमारास मला फोन आला. मामी तशा खंबीर, अनेक अडचणीच्‍या प्रसंगी प्रसंगावधान दाखवत योग्‍य मार्गदर्शन करणा-या म्‍हणून त्‍यांची कुटुंबात ओळख आहे. मात्र त्‍यांचा फोनवरील थोडासा बदललेला स्‍वर लगेच लक्षात आला व प्रसंगााचे गांभिर्य लक्षात घेत भावाला घेऊन मी लगेच पारसीक नगरच्‍या दिशेने निघालो. रस्‍त्‍यातच १०८ या हेल्‍पलाईनवर फोन करुन रुग्‍णवाहिकेची व्‍यवस्‍था केली. रुग्‍णवाहिका व आम्‍ही एकाच वेळेस साडेसातच्‍या सुमारास मामांच्‍या घरी पोहोचलो. मामांची हालचाल ...

सामान्यातले असामान्य व्यक्तिमत्व - शरद यशवंत पाटील । वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Image
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल आपण बऱ्यापैकी अपडेट असतो. मात्र आपण ज्या गोष्टी विविध माध्यमांतून पाहतो, वाचतो, ऐकतो त्यावर प्रतिक्रिया वा प्रतिसाद देण्याच्या भानगडीत आपण पडत नाही. वेळ नसणे, लोक काय विचार करतील, मीच का, उगाच पुढारीपणा नको, मला काय करायचे, लाजरेपणा ह्यासारख्या गोष्टी त्याला खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरतात. कुणाचा वाढदिवस किंवा सणासुदीला शुभेच्छांचा वर्षाव करणारे ग्रुप एखादी अनधिकृत, अनुचित, चुकीची वा बेकायदेशीर बाब कुणी पुढे आणली तर सामसूम असतात ही वस्तुस्थिती आहे. खरे तर अशा संवेदनशील संदेशांवर सोशल मीडियाने तुटून पडण्याची गरज असते. सोशल मीडिया काय करू शकते हे आपल्याला दंगली, अफवा, बेजबाबदार वक्तव्ये करणाऱ्यांची काय गत होते या अलिकडच्याच काही उदाहरणांवरून लक्षात येईल. सोशल मिडियाप्रमाणेच दररोज वर्तमानपत्रांतून लिखाण करून आपल्या परिसरातील वास्तव सर्वांसमोर ठेवण्याचे काम पत्रकार मंडळी अगदी पोटतिडकीने करत असतात. बातमीमागचे सत्य दाखवण्याचे काम अनेक पत्रकार अग्रलेखांच्या माध्यमातून करतात. असे लेख रोज वर्तमानपत्र घेऊन आपणास वाचणे शक्य ह...

निगेटिव्ह चाचण्यांतून पॉझिटिव्ह संदेश

Image
''निगेटिव्‍ह'' चाचण्‍यांमधुन ''पॉझीटिव्‍ह'' संदेश महाराष्‍ट्रातील कोरोना रुग्‍णांची संख्‍या जवळपास १५ हजारांच्‍या घरात जाऊन पोहोचली आहे. तर ६०० च्‍या आसपास रुग्‍ण या आजाराने मृत्‍यूमुखी पडले आहेत. यातील सर्वाधिक रुग्‍णसंख्‍या मुंबईतील असुन मुंबई हे या आजाराच्‍या बाबतीत आज देशातील सर्वाधिक संवेदनशील शहर बनले आहे. जवळपास दहा हजाराच्‍या घरात रुग्‍ण एकटया मुंबईत असुन मृत्‍यूंचा आकडादेखील मुंबईत सर्वाधिक म्‍हणजे साडेतीनशेच्‍या वर आहे. त्‍यामुळे मुंबईकरांनी आज सर्वात जास्‍त काळजी घेण्‍याची गरज आहे. मुंबईला लागून असलेल्‍या ठाणे व नवी मुंबई शहरातदेखील कोरोनाबाधित रुग्‍णांची संख्‍या झपाटयाने वाढत आहे जी नक्‍कीच चिंतेत टाकणारी आहे. मृत्‍यू झालेल्‍या रुग्‍णांमध्‍ये अधिक रुग्‍ण हे ४० वर्षावरील असल्‍यामुळे वय जास्‍त असलेल्‍या रुग्‍णांमध्‍ये मृत्‍यूचा आकडा अधिक असल्‍याचे निदर्शनास येत आहे. प्रतिकार शक्‍ती किंवा विविध व्‍याधींनी ग्रस्‍त रुग्‍णामध्‍ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे. तसेच हा आजार आता बाहेरील देशातून आलेल्‍या बाधित व्‍यक्‍तींना सोडून समा...

चटका लावणारी एक्झिट

Image
बुधवारी ज्येष्ठ अभिनेते इरफान खान तर गुरुवारी जेष्‍ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. ऋषी कपूर हे गेल्या दोन वर्षांपासून ल्युकेमिया आजाराशी लढत होते. ६७ वर्षाचे ऋषी कपूर यांचे लाखो चाहते असुन सिनेसृष्‍टीतील एक सदाबहार चेहरा म्‍हणून ते ओळखले जात होते. कोरोना आजाराच्‍या पार्श्‍वभुमीवर त्‍यांची या जगातुन झालेली एक्‍झीट नक्‍कीच चटका लावणारी आहे. ऋषी कपूर हे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असत. विविध विषयांवर ते आपली रोखठोक मते मांडताना दिसत. ऋषी कपूर हे दिग्गज अभिनेते राज कपूर यांचे द्वितीय पुत्र होते. ऋषी कपूर यांना दोन भाऊ रणधीर कपूर आणि राजीव कपूर आहेत. तर ऋतू नंदा आणि रिमा जैन या दोन बहिणी आहेत. ऋषी कपूर यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९७३ साली बॉबी या चित्रपटातून केली होती. त्‍याअगोदर त्‍यांनी बालकलाकार म्हणून श्री ४२० आणि मेरा नाम जोकर चित्रपटातही काम केले होते. इमरान हाश्मीसोबतचा द बॉडी हा चित्रपट ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दोन वर्षांपूर्वी ऋषी कपूर यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. ऋषी कपूर हे व्‍यक्‍तीमत्‍व हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार, उत्‍साही असे होते. चित्रपटा...