Posts

Showing posts from July, 2023

प्रसारमाध्यमे गप्प का?

Image
आजकाल कुठलीही गोष्ट केवळ प्रसिद्धी आणि राजकीय स्वार्थापोटी केली जाते. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजली जाणारी देशातील प्रसारमाध्यमेही ह्या खेळात सामील होत आहेत हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. मणिपूर मध्ये महिलांवर झालेले अतोनात अत्याचार व घडलेला हिंसाचार दोन महिने दडपला जातो व जेव्हा एका घटनेचा व्हिडिओ समोर येतो तेव्हा अनेकांची सहानुभूती अचानक जागी होते हे  सारे अनाकलनीय आहे. कॅमेऱ्यासमोर आलेल्या त्या एका घटनेवरून तेथील अराजकतेची कल्पना करता येईल. अशा कित्येक घटना कॅमेऱ्याआड दडपल्या गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीड आणणाऱ्या ह्या घटनेबाबत सतत लाईव्ह राहणारी राष्ट्रीय, स्थानिक प्रसारमाध्यमे मूग गिळून गप्प का बसली हाही एक यक्षप्रश्नच आहे. महिलांप्रती दाखवल्या जाणाऱ्या सहानुभूतीचादेखील केवळ राजकीय व प्रसिद्धीसाठी वापर केला जात असेल अशा प्रवृत्तींच्या भावनादेखील मृत झाल्यात असेच म्हणावे लागेल.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

अशा घटना रोखायला हव्यात

Image
रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी या आदिवासी वस्‍तीच्‍या सर्वात दुर्गम गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. दरड कोसळून घडलेल्‍या ह्या दुर्घटनेत २८ जणांचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍याची घटना ह्रदय हेलावणारी आहे. गडाच्‍या पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव अक्षरशः उद्ध्वस्त झालं आहे. इर्शाळवाडी दरड दुर्घटना ही जणू काही वर्षांपूर्वी  झालेल्‍या माळीण दुर्घटनेची पुनरावृत्तीच आहे. यामुळे डोंगरमाथ्‍यांच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या गावांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्‍हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. जिल्‍हा प्रशासनाने अशा प्रकारच्‍या धोकादायक स्‍थळांचा आढावा घेऊन सुरक्षेच्‍या दृष्‍टीने उपाययोजना करण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. इर्शाळवाडीसारख्‍या दुर्गम ठिकाणी जिथे कुठलीही व्‍यवस्‍था उपलब्‍ध नाही अशा ठिकाणे हेरुन तिथे दरड कोसळण्‍याच्‍या परिस्‍थीतीचा आढावा घेऊन पावसाळयात आपात्‍कालीन व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन दयायला हवी. ज्‍याप्रमाणे महामार्गांवर दरळ कोसळण्‍याच्‍या संभाव्‍य ठिकाणी लोखंडी जाळया बसवण्‍यात येतात त्‍याप्रमाणे डोंगरमाथ्‍यांशेजारी वसलेल्‍या गावांना संरक्षण दयायला हवे. प्रसंगी सुरक्षित...

तब्बल २२ वर्षांनी झाली वर्गमित्र प्रसादची भेट

Image
३० जुलै - जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने * तब्बल २२ वर्षांनी झाली वर्गमित्र प्रसादची भेट * आपला जवळचा मित्र वा सोबती काही दिवस जरी नजरेआड झाला तरी आपण अस्वस्थ होतो. मित्रांमधील नात्याचे ही पकड शालेय जीवनापासून ते कॉलेजपर्यंत अगदी घट्ट बांधलेली असते. मात्र एकदा शिक्षण संपवून करीअरच्या मागे लागले की शाळा कॉलेजमधील जुने मित्र भेटेनासे होतात आणि मग अचानक एके दिवशी त्यांची भेट झाल्यावर होणारा आनंद गगनात मावेनासा असतो. अशीच घटना दोन महिन्यांपूर्वी माझ्या बाबतीत घडली. वाड्यात पीजे कॉलेजला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना माझ्याच वर्गात शिकलेला प्रसाद गणोरे हा माझा वर्गमित्र मला उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाडा येथे सुरू असलेल्या एका बाल संस्कार शिबिरादरम्यान त्या दिवशी भेटला. आपला वाढदिवस शिबिरातील मुलांसोबत साजरा करण्यासाठी प्रसाद सहकुटुंब तिथे आला होता. नेमके त्याच दिवशी मीदेखील आमचे परमस्नेही हभप श्री राजेश बांगर यांनी आयोजित केलेल्या त्या निवासी बाल संस्कार शिबिराला भेट देण्यासाठी तिथे पोहोचलो होतो. योगायोगाने आम्हाला कॉलेजमध्ये शिकवणारे प्राध्यापक मोकाशी सर देखील शिबिरातील मुल...

बेरोजगारांची ही लूटमार कशासाठी?

Image
बुधवारी आमदार रोहित पवार यांनी लाखो बेरोजगार उमेदवार जे महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. राज्यातील एमपीएससी या शासकीय आयोगासह टीसीएस सारख्या खाजगी संस्था सध्या शासनाच्या विविध रिक्त पदांच्या भरती साठी बेरोजगार उमेदवारांकडून वसूल करत असलेले शुल्क अवाजवी आहे. अशा परीक्षांसाठी अर्ज करणारे बहुतांश उमेदवार गरीब, दुर्बल, शेतकरी कुटुंबातून परीक्षांची तयारी करत असतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अजिबात विचार न करता फी चे आकडे ठरवले जात आहेत. एमपीएससी परीक्षांसाठी सध्या जवळपास ३५० रूपये मोजावे लागत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या तलाठी भरतीसाठी जवळपास १००० रुपये शुल्क उमेदवारांना भरावे लागत आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील यूपीएससी सारख्या परीक्षांचे शुल्क केवळ १०० रुपये असताना महाराष्ट्रात बेरीजगारांची ही लूट का असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाखो उमेदवारांकडून वसूल केल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या ह्या शुल्काचे पुढे काय होते हेदेखील सर्वांना कळायला हवे. राजस्थान सारख्या राज्याने बेरोजगारांकडून केवळ एक...

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे दुःखद निधन

Image
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या ८८व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. जयंत सावरकर यांनी मराठी रंगभूमिपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९५५ पासून रंगभूमीशी नाळ जुळलेल्या सावरकर यांनी त्यावेळी पडद्यामागे राहून मिळेल ती छोटीमोठी कामे अगदी प्रोम्पटिंग केले, प्रॉपर्टीची मांडणी केली, पार्श्वसंगीत वाजवण्यास मदत केली, तर कधी हिशोब लिहिणे तर कधी डोअर किपिंगचे सुद्धा काम त्यांनी केले होते. मोठ्या संघर्षातून त्यांनी नंतर नाट्य, टीव्ही व चित्रपटसृष्टीत आपला जम बसवला. मिळालेल्या भूमिकेशी अत्यंत प्रामाणिक राहिल्याने त्यांना सकारात्मक भूमिका मिळत गेल्या व त्यांनी त्या भूमिकांना योग्य न्यायदेखील दिला. अपराध मीच केला या नाटकात त्यांनी साकारलेली गोळे मास्तरची भूमिका खूप गाजली. प्रपंच, ईजा बिजा तिजा, धमाल बाबल्या गणप्याची, गडबड गोंधळ, झंगडगुत्ता, गजरा, अपूर्णांक,अलीबाबा चाळीस चोर, अल्लादीन जादूचा दिवा, आम्ही जगतो बेफाम, एकच प्याला, कळलाव्या कांद्याची कहाणी अशा नाटक चित्रपट तसेच मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने...

रस्ते सुस्थितीत करा

Image
महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा पार खेळखंडोबा झालेला आहे. विधानसभा निवडणुकांना जेमतेम एक वर्ष बाकी असताना राष्ट्रवादीतील एका गटाने थेट भाजप सेनेच्या युती सरकारमध्ये सामील होत लोकांना आणखी एक धक्का दिला. लोकशाही मध्ये लोकांच्या मतांना आणि आता भावनांनादेखील शून्य किंमत राहिल्याचे दिसून येत आहे. आपण फक्त उमेदवारांना मते द्यायची मग त्यानंतर त्या उमेदवाराने पक्ष धोरणे, तत्वे सोडून कुठल्याही राजकीय पक्षासोबत मिलाप करावा अशी न भूतो परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. यात मतदारांना काय मिळते? तर वर्षानुवर्षे खराब रस्ते, गर्दीचा व जीवघेणा प्रवास, महागाई आणि बेरोजगारी. केंद्र व राज्य सरकारकडून रस्ते विकासासाठी मोठमोठे प्रकल्प राबविले जात असताना मुंबई ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील मुंबई गोवा, नाशिक, भिवंडी वाडा मनोर महामार्गांची दुरवस्था कुणालाच दिसत नाही. वर्षातून एकदा हे रस्ते डागडुजी करून दुरुस्त केले जातात जे एकाच पावसाळ्यात चाळणीसारखे होऊन जातात. या रस्त्यांचे फोटो पाहिल्यावर चांद्रयान मोहीमेत चंद्राच्या पृष्ठभागावरील फोटो काढल्याचा भास होतो. त्यामुळे रस्त्यांच्या देखभालीसाठी दरवर्षी ...

जीवावर बेतणारे पर्यटन काय कामाचे?

Image
सहलीसाठी जाणारे पर्यटक, विविध दुर्घटनांमध्ये दगावण्याचे प्रकार नवे नाहीत. अतिउत्साहीपणा, अतिधाडस, आततायीपणा, सेल्फीचा नाद, मद्यपान करून पाण्यात उतरणे, स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान नसणे यासारखे घटक अपघातास कारणीभूत ठरत आहेत. दुर्घटनांमध्ये सातत्याने होणाऱ्या मृत्यूंमुळे अनेक धबधबे व पावसाळी पर्यटन स्थळे प्रशासनाला बंद ठेवावी लागतात. वास्तविक पावसाळ्यात निसर्गाचे एक प्रकारे विलोभनीय दृष्य पाहायला मिळते. त्यामुळे हौशी पर्यटकांना पावसाळी सहल म्हणजे एक पर्वणीच असते. निसर्गाचा खराखुरा आस्वाद पावसाळ्यातच घेता येतो. त्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी बंदी आणून एक प्रकारे पर्यटकांच्या निसर्ग अनुभवण्याच्या अधिकारावर गदा आणली जाते. पर्यटक याबाबत अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त करतात. स्थानिकांचे रोजगार बुडत असल्याने त्यांनीही यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे हुल्लडबाजी करून अपप्रकार करणाऱ्यांना रोखण्यासाठी पावसाळ्यात अशा ठिकाणी विशेष सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करायला हवी. तसेच पर्यटकांनीही वर्षा सहलीचा आणि पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत असताना का...

कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी सौ सुवर्णा मुरंजन सेवानिवृत्त

Image
मागील महिन्यात आरोग्य विभागातील तब्बल ४ वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाले. हे सर्व अधिकारी विभागात अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत होते. त्यांच्या निवृत्तीने विभागात नक्कीच एक पोकळी निर्माण झाली आहे यात शंका नाही. या अधिकाऱ्यांच्या योगदानाबद्दल थोडेसे....  सौ सुवर्णा मुरंजन, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य सेवा आरोग्य सेवा आयुक्तालयात प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या एक उत्तम, अभ्यासू अधिकारी सौ सुवर्णा मुरंजन ह्यादेखील ३७ वर्षाहून अधिक काळ शासकीय सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्या. राज्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आस्थापनाविषयक बाबींमध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांच्यावर सोपवलेल्या कुठल्याही विषयाची माहिती त्यांच्याकडे तात्काळ उपलब्ध असायची. शासन निर्णय, नियम, कार्यप्रणाली, मार्गदर्शिका यांबाबत त्यांना खडानखडा माहिती असल्यामुळे मा आयुक्त सरदेखील त्यांचा उल्लेख 'एनसायक्लोपीडिया' म्हणून करायचे. सहकारी व वरिष्ठांशी त्यांचे अत्यंत कणखर, हजरजबाबी, ठाम परंतु सौहार्दपूर्ण संभाषण त्यांच्यातील एका जबाबदार अधिकाऱ्याची...

वारी प्रश्नमंजुषा विजेत्यांचा सार्थ ज्ञानेश्वरी आणि तुळशीमाळ देऊन सन्मान

Image
पालघर जिल्ह्यातील देवघर वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आषाढी वारी कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन वारी प्रश्नमंजुषेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. आळंदी येथील प्रसिद्ध कीर्तनकार देवघरवासी हभप पांडुरंग महाराज भोईर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ह्या स्पर्धेतील विजेत्यांचा घरी जाऊन त्यांचा सार्थ ज्ञानेश्वरी आणि तुळशीमाळ देऊन सन्मान करण्यात आला. ठाणे पालघर जिल्ह्यातील अनेक परमार्थ प्रेमींनी ह्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आषाढी एकादशी पर्यंत विचारण्यात आलेल्या वारीविषयक प्रश्नांवर बहुतांश स्पर्धकांनी अचूक उत्तरे दिली मात्र सर्वात आधी उत्तर देणाऱ्या स्पर्धकांची नावे विजेतेपदासाठी विचारात घेण्यात आली. निकालानंतर सौ.प्रतिभा पष्टे, डोंगस्ते,पालघर, श्रीमती प्रभावती पाटील घणसोली, नवी मुंबई, सौ. पुनम खेडकर, पुणे यांनी विजेतेपद मिळवले. विजेत्यांना घरपोच ज्ञानेश्वरी आणि तुळशीमाळ भेट देऊन सन्मान करण्यात आला. हभप पांडुरंग भोईर यांनी स्वतः विजेत्यांचा सन्मान केला. नोकरी करत असताना अनेक वेळा मला माझ्या उत्कृष्ट कामाबद्दल तालुका, जिल्हा आणि रा...

इर्शाळवाडीला गरज आधाराची

Image
रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी या आदिवासी वस्‍तीच्‍या सर्वात दुर्गम गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास इर्शाळगडावर दरड कोसळून घडलेल्‍या दुर्घटनेत १६ जणांचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍याची घटना ह्रदय हेलावणारी आहे. गडाच्‍या पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव अक्षरशः उद्ध्वस्त झालं आहे. ४५ ते ५० घरांच्‍या वस्‍तीच्‍या हया गावातील बहुतांश घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. मुंबई-पुणे जुना महामार्गावरुन जात असताना कर्जत आणि पनवेलच्या मधोमध इर्शाळगडला जाण्यासाठीचा रस्ता असुन हे स्‍थळ रायगडमधील प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंटदेखील आहे. खालापूरजवळून मोरबे डॅम मार्गे गावाकडे जाता येते. इर्शाळवाडी दरड दुर्घटना ही जणू काही वर्षांपूर्वी  झालेल्‍या माळीण दुर्घटनेची पुनरावृत्तीच आहे. यामुळे डोंगरमाथ्‍यांच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या गावांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्‍हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. जिल्‍हा प्रशासनाने अशा प्रकारच्‍या धोकादायक स्‍थळांचा आढावा घेऊन सुरक्षेच्‍या दृष्‍टीने उपाययोजना करण्‍याची आवश्‍यकत...

केसीराव यांचा खटाटोप कशासाठी?

Image
बीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या एंन्ट्रीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पंढरपुरला विठ्ठलदर्शनानिमित्ताने आलेल्या चंद्रशेखर राव यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केले. तसेच बीआरएस महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार असल्याची मोठी घोषणादेखील त्‍यांनी केली आहे. त्‍यांच्‍या या घोषणेमुळे आधीच बिघडत चाललेली महाराष्ट्रातील राजकीय परिस्‍थीती आणखीच बिघडणार आहे. वास्‍ताविक के सी राव हे संघर्षातुन पुढे आलेले नेतृत्‍व आहे. त्‍यांच्‍या नेतृत्‍वकौशल्‍याच्‍या बाबतीत शंका घेण्‍याचे कारण नाही. मात्र त्‍यांनी महाराष्‍ट्रासारख्‍या पुरोगामी व राजकीय प्रतिभासंप्‍पन्‍न राज्‍यात हातपाय पसरवणे संयुक्‍तीक ठरत नाही. महाराष्‍ट्रातील अस्थिरतेचा फायदा उचलण्‍याचा ते प्रयत्‍न करणार असतील तर महाराष्‍ट्रातील सर्वपक्षीय नेते त्‍यांच्‍याविरोधात रान उठवतील यात शंका नाही. त्‍यांच्‍या तेलंगणा मॉडेलची भांडाफोड करणा-या अनेक गोष्‍टी राज्‍यातील नेत्‍यांकडे आहेत. त्‍यात त्‍यांचे ग्रामविकासाचे फसलेले धोरण, सरपंचांची नाराजी, केंद्राचा पंचायत राज निधी इतर कामांसाठी वळवण्‍याचा प्रकार ...

सर्वसमावेशक सरकारी धोरण हवे

Image
तृतीयपंथीयांना सुरक्षारक्षक म्हणून सेवेत घेऊन पुणे महानगरपालिकेने खरोखरच एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. तृतीयपंथीयांची वाढती संख्या व त्यांना मिळत असलेली सापत्नपणाची सामाजिक वागणूक या धर्तीवर त्यांचे मुख्य प्रवाहात येण्याचे रस्ते तूर्तास तरी बंदच आहेत. जोवर शिक्षण, रोजगार व सामाजिक सन्मान या गोष्टी त्यांना प्राप्त होत नाहीत तोवर ते दुर्लक्षित म्हणूनच राहतील. तृतीयपंथी म्हटल्यावर रेल्वे, सिग्नल्सवर भिक मागणारे, आरडा-ओरडा करणारे, दुसऱ्यांना त्रास देणारे असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु त्यांच्या स्वभावाला असे बनण्यासाठी खतपाणी सुध्दा आपल्या या समाजानेच घातले हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी केवळ स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्म घेतला नाही म्हणून त्यांच्या सन्मानपूर्वक जीवन जगण्याला, कौशल्याला आणि कलेला मारणं कितपत योग्य आहे? चुकीच्या विचारसरणींमुळे आजही तृतीयपंथीय लोकांना बहुतांश लोकांकडून तिरस्काराचा सामना करावा लागतो. सरकारच्या सर्व योजना स्त्री व पुरुषांसाठी आहेत. रेल्वे, बसस्थानक अशा वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी स्त्री व पुरुषांसाठी जागा ठरवून दिलेल्या असतात. मात्...

जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींवर बंदी हवीच

Image
सोशल मीडियावर आजकाल विविध माध्यमांतून जुगारातून मिळणाऱ्या लाभाच्या जाहिराती सुरू आहेत. या जाहिराती करण्यात काही सिनेकलावंत, खेळाडू व इतर सेलिब्रेटी आघाडीवर आहेत. रमी, लॉटरी यासारख्या जुगारसाम्य खेळांतून फायदा झाल्याचे सांगणारी काही उदाहरणेदेखील वारंवार अशा जाहीरातींतून दिली जातात. मात्र लोकमान्यता मिळालेल्या व प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या कलाकार, खेळाडू अशा जाहिरातींमध्ये काम करून जुगाराला प्रोत्साहन देणार असतील ते अयोग्य आहे. वास्तविक अशा लोकांना लोक आपला आदर्श मानतात. त्यांनीच जुगाराच्या माध्यमातून लोकांना देशोधडीला लावण्याचा अट्टाहास केवळ जाहिरातींतून मिळणाऱ्या पैशासाठी चालवला तर त्याचे विपरीत परिणाम समाजावर होतील. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर खेळाच्या मैदानातून निवृत्त झाला असला तरी आयपीएल व विविध उपक्रमांतून तो नेहमीच लोकांसमोर येत असतो. मात्र सध्या तो पेटीएम फर्स्टच्या जाहिरातीतून दिसतोय. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहे. त्यांचे देशासह जगभरात असंख्य चाहते आहेत. त्यामुळे भारतरत्न असणार्‍या व्यक्तिने पेटीएम फर्स्ट सारख्या जुगार चालवणार्‍या अ‍ॅपची जाहीरात करणे योग्य...

मोबाईल खिशातून पडला अन..

Image
सन २००८-०९ सालची घटना असेल. नोकरीवर नवीनच रुजू झालो होतो. रोजचा घणसोली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचा रेल्वे प्रवास म्हणजे माझ्यासाठी एक दिव्यच पार करण्यासारखे होते. घणसोलीवरून ट्रान्स हार्बरने ठाणे आणि ठाण्यावरून मध्य रेल्वेमार्गे सीएसएमटी असा रोजचा गर्दी आणि धकाधकीचा प्रवास असायचा. ठाण्यावरून लोकल पकडताना प्रचंड दडपण असायचे. अशातच नऊ नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून धीम्या लोकलसाठी चार  किंवा जलद लोकलसाठी सहा नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्यात आणि ब्रिजवर प्रचंड कसरत असायची. प्रचंड रेटारेटी, डब्यातील असह्य गर्दीतून प्रवास करत ऑफिसला पोहोचल्यावर काहीतरी मोठा पराक्रम केल्याचा भास व्हायचा. अशातच एके दिवशी ठाणे स्थानकात जिन्यावरून चढताना खिश्यातून काहीतरी पडल्याचा भास झाला. पण गर्दीमुळे त्या ठिकाणी उभे राहून नक्की काय पडलेय हेदेखील पाहणे सोयीचे नव्हते. त्यामुळे नऊ नंबर प्लॅटफॉर्मचा जिना चढल्यावर पाहतो तर खिशातून मोबाईल गायब होता. गर्दीच्या रोजच्या धक्क्यांपेक्षा हा धक्का मला मोठाच होता जो पचवणे सहज शक्य नव्हते. त्यामुळे थोडे थांबून गर्दी कमी झाल्यावर तो जिना अक्षरश...

आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी सौ सुवर्णा मुरंजन सेवानिवृत्त

Image
सौ सुवर्णा मुरंजन, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य सेवा आरोग्य सेवा आयुक्तालयात प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या एक उत्तम, अभ्यासू अधिकारी सौ सुवर्णा मुरंजन ह्यादेखील ३७ वर्षाहून अधिक काळ शासकीय सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्या. राज्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आस्थापनाविषयक बाबींमध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांच्यावर सोपवलेल्या कुठल्याही विषयाची माहिती त्यांच्याकडे तात्काळ उपलब्ध असायची. शासन निर्णय, नियम, कार्यप्रणाली, मार्गदर्शिका यांबाबत त्यांना खडानखडा माहिती असल्यामुळे मा आयुक्त सरदेखील त्यांचा उल्लेख 'एनसायक्लोपीडिया' म्हणून करायचे. सहकारी व वरिष्ठांशी त्यांचे अत्यंत कणखर, हजरजबाबी, ठाम परंतु सौहार्दपूर्ण संभाषण त्यांच्यातील एका जबाबदार अधिकाऱ्याची जाणीव करून देणारे होते. मलादेखील कामकाजात उद्भवणाऱ्या अनेक अडचणींवर त्यांचेकडे तात्काळ सल्ला व मार्ग उपलब्ध असायचा. त्यांच्याशी बोलताना सदैव सकारात्मकता जाणवायची. हवी असलेली माहिती तात्काळ व अपेक्षेपेक्षा कमी कालवधीत उपलब्ध करून देणाऱ्या अधिकारी म्हणून मी मुरंजन मॅडमचा उल्लेख करी...

राज्य मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा विभागाचे डॉ अरुण यादव सेवानिवृत्त

Image
डॉ अरुण दिनकरराव यादव, सहाय्यक संचालक, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा डॉ अरुण दिनकरराव यादव. आरोग्य विभागातील मला भावलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक संवेदनशील अधिकारी. मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याच्या अंमलबजावणीत सेवेचा बहुतांश काळ घालवलेले डॉ यादव, सहाय्यक संचालक पदावरून आयुक्तालयातून सेवानिवृत्त झाले. कार्यालयातील बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांच्या व नातलगांच्या वैद्यकीय उपचारांमध्ये सदैव मदतीला धावून जाणारे अधिकारी म्हणूनदेखील ते परिचित आहेत. कामकाजात आपली भूमिका कुठलीही तडजोड मान्य न करता ठामपणे मांडणाऱ्या डॉ यादव सरांनी आपल्या भूमिकेसाठी अनेकदा वरिष्ठांची नाराजीही पत्करली. होटा कायद्याच्या सर्व बारीकसारीक खाचाखोणा माहीत असलेल्या डॉ यादव यांच्या निवृत्तीने या विभागात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील जिल्हा रुग्णालये, महिला रुग्णालयांसह मुंबईतील काही मोठ्या रुग्णालयांत महत्वाच्या पदावर काम केलेले डॉ यादव हे कान नाक घसा विशेषज्ञ. उत्तम रुग्णालयीन प्रशासक म्हणूनदेखील त्यांनी आपली छाप पाडली आहे. मूळचे कोल्हापूरचे असलेल्या डॉ यादव यांना पत्नीच्या निधनानंतर मोठ्या कौटुंबिक समस्या...

ऐतिहासिक घटनांची साक्षीदार "जव्हारची शिरपामाळ"

Image
मागील आठवड्यात पालघरमधील जव्हार येथे जाण्याचा योग आला. निमित्त होते आमच्या जॉय ऑफ गिव्हिंग या सामाजिक संस्थेच्या वतीने तेथील कर्णबधिर मुलांच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाच्या नियोजित कार्यक्रमाचे. त्यावेळी जव्हारचे सौंदर्य जवळून न्याहाळण्याचा आनंद घेतला. ठाण्यावरून गुजरात हायवेमार्गे मनोर फाट्यावरून उजवीकडे वळण घेतले की सरळ विक्रमगडमार्गे जव्हारला जाता येते. जव्हार हे एक नैसर्गिक शहर आहे. समुद्रसपाटीपासूनची त्याची उंची ५१८ मीटर आहे. त्यामूळे हे हिल स्टेशनच आहे. मुंबईपासून जव्हार १५० तर नाशिक पासून ८० किलोमीटरवर आहे. जव्हार मधील बहुसंख्य लोक आदिवासी समाजाचे आहेत. जव्हार हे खूप सुंदर ठिकाण असल्याने मुंबई, ठाणे, नाशीक यासारख्या शहरातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. डोंगरामाथ्याची वळणे व रिपरिप पडणाऱ्या पावसाचा आस्वाद घेत आम्ही दुपारी एकच्या सुमारास जव्हारला पोहोचलो. शाळेतील कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही तेथून जवळच असलेल्या 'शिरपामाळ' ह्या एतिहासिक स्थळाला भेट दिली. शिवरायांची अद्भुत दूरदृष्टीची आणि पराक्रमाची साक्ष देणारी ही शिरपामाळ म्हणजे एका दिव्य स्...

लोकांना गरजेच्या वस्तू परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणे महत्त्वाचे

Image
महाराष्ट्रातील राजकारणाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. विधानसभा निवडणुकांना जेमतेम एक वर्ष बाकी असताना कित्येक वर्षांची परंपरा असलेले राजकीय पक्ष फोडून होत असलेली सत्तांतरे अनाकलनीय आहेत. आत्मसन्मान, तत्व व निष्ठेशी एव्हढी प्रतारणा अनेक दशकांमध्ये प्रथमच होताना दिसत आहे. सत्तेच्या मोहात सुरू असलेला हा खेळखंडोबा राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा आहे. एकीकडे महागाई कमी करण्यासाठी कोणतेही ठोस नियोजन नाही, रस्ते अपघातांमधे दररोज शेकडो जीव जात असताना दुसरीकडे सत्तालोभाने जनतेचे प्रश्न दुर्लक्षित होताना दिसत आहेत. भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले असताना तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर भाज्यांची विक्री रेशन दुकानांमध्ये स्वस्त दराने करून शेतकरी व नागरिकांनाही दिलासा देण्याचे पाऊल सरकारने उचलावे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला तर उत्पादनही नक्कीच वाढेल. तसेच मागणी व पूरवठ्यावर सरकारी नियंत्रणदेखील राहील. सरकार कोणतेही असो, कितीही राजकीय पक्षांचे बनलेले असो, लोकांचे प्रश्न सुटणे व त्यांना गरजेच्या वस्तू परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणे राज्यहिताचे आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मु...

'आधार बेस मतदान' संकल्पना राबवा

Image
'आधार बेस मतदान' संकल्पना राबवा  आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांना वारंवार सूचना देण्यात आल्‍या. त्‍यानुसार बहुतांश पॅन कार्ड आधारला जोडली गेली असतील यात शंका नाही. या प्रक्रियेमुळे आर्थिक व्यवहारांना आधारच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेले योग्यच आहेत मात्र त्याची उपयुक्तता लोकांपर्यंत पोहोचू शकलेली नसल्याने त्याबाबत अजुनही प्रचंड संभ्रमावस्था आहे. खरेतर पॅन कार्ड आधारशी जोडताना मतदार ओळख क्रमांक आधारशी जोडून संपूर्ण मतदानाची प्रक्रियाच आधार बेस करण्याची गरज आहे. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच लोकसभा, विधानसभा निवडणुका होत आहेत. आपल्याकडे पारंपरिक पद्धतीच्या मतपत्रिकांद्वारे होणाऱ्या मतदानप्रक्रियेत काळानुरूप बदल घडून आला आणि आता मतपत्रिकांची जागा ईव्हीएम मशीन सारख्या अद्ययावत यंत्रांनी घेतली असून केवळ एक बटन दाबून आपले मत नोंदवता येते. यामुळे मतदानप्रक्रियेतील वेळ व खर्च वाचला असे म्हटले जात असले तरी या ईव्हीएम मशिन्सवर मध्यंतरी अनेक शंका उपस्थित करण्यात आल्यामुळे बराच गदारोळ झाला होता. त्यांनतर पुन्हा जुन्याच...

ईडी तपासाचे पुढे काय होते?

Image
मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची ईडी चौकशी करण्यात आली. अनेक नेते अजूनही चौकशीच्या फेऱ्यात आहेत. अनधिकृत कामे, कमाईपेक्षा अधिक संपत्ती जमवणे, सार्वजनिक कामांमध्ये घोटाळे यासाठी ह्या चौकश्या करण्यात येत आहेत. मात्र ह्या चौकश्यांचे पुढे काय होते हे नंतर कळतच नाही. प्रसारमाध्यमेही ठराविक पाठपुराव्यांतर विषय संपवून टाकतात. त्यामुळे ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया केवळ राजकीय सोयीसाठीच केल्या जातात का असाही संशय घेण्यास वाव निर्माण होतो. पाठपुरावा करणारे तक्रारकर्ते व बातम्या प्रकाशित करणारी माध्यमे ठराविक काळानंतर अचानक विषयातून एक्झिट घेताना दिसत आहेत. त्यामुळे आपली विश्वासार्हता टिकवण्यासाठी आता ईडीनेच आपल्या कारवायांच्या सत्य व सद्यस्थितीची माहिती देणारी श्वेतपत्रिका काढावी.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना हव्यात

Image
समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी ट्रॅव्हल बसला बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. समृद्धीवरील हा सर्वात भीषण अपघात आहे. ह्या महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून सातत्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. आजवर ३००च्या वर लोकांनी या महामार्गावर विविध अपघातांमध्ये आपला जीव गमावला आहे. त्यामुळे महामार्गाच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. भरधाव वेगात चालणाऱ्या गाड्या, चालकांना संमोहित करणारा महामार्ग, नादुरुस्त वाहने, अप्रशिक्षित चालक याचा नाहक फटका निष्पाप प्रवाशांना बसत आहे. महामार्गांवर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे चालक तर बेदरकारपणे गाड्या चालवतात. ह्यांच्यावर चाप बसवायलाच हवा. त्यामुळे असे अपघात पुन्हा होऊ न देण्यासाठी कठोर उपाययोजना आखाव्याच लागतील. वाहनांचे वेग नियंत्रित करायला हवेत, परिवहन विभागाच्या चौक्या जागोजागी असायला हव्यात, चालकांसाठी ठरविक अंतरावर विश्रांती थांबे असावेत, अपघातानंतर त्वरित मदतीसाठी तत्पर...

शैक्षणिक पाया मजबूत होण्यासाठी मूल्यमापन गरजेचे

Image
गेल्‍या काही वर्षांपासुन प्राथमिक शिक्षणात मुल्‍यमापनापासुन सुट देण्‍यात आलेली होती. त्‍यानुसार आठवीपर्यंतच्‍या मुलांना सरसकट उत्‍तीर्ण करण्‍याचे सरकारचे धोरण होते. मात्र यामुळे अभ्‍यास व परिक्षांच्‍या टेन्‍शनपासुन मुले व शाळा ब-यापैकी बिनधास्‍त झाल्‍याचे पाहायला मिळत होते. आता नव्‍या धोरणानुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्‍या विदयार्थ्‍यांना परिक्षा देऊन उत्‍तीर्ण व्‍हावे लागणार आहे. त्‍यामुळे सरसकट सर्वच मुले आज पुढच्‍या वर्गात उन्‍नत करण्‍याची पध्‍दत बंद होणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर गेल्‍या दोन वर्षांपुर्वी शैक्षणिक वर्षांपासुन शाळा व परिक्षा नसल्‍यातच जमा होत्‍या. त्‍यामुळे ना मुलांची शिकवणी सुरु ना परिक्षा अशी विदारक परिस्‍थीती होती. अशा परिस्‍थीतीत मुलांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. वास्‍ताविक शैक्षणिक जगतात सुरु असलेला हा सावळागोंधळ विदयार्थ्‍यांचे शैक्षणिक आयुष्‍य कमजोर करणारा होता. आता परीस्‍थीती पुर्वपदावर येत आहे. परिक्षा हा मुलांच्‍या शैक्षणिक आयुष्‍यातील अविभाज्‍य भाग आहे. त्‍यामुळे मुलांचा शैक्षणिक पाया मजबुत होणेसाठी त्‍यांचे मुल्‍यमापन हे ...

मुंबईजवळच्या बेटाची इतकी दुरवस्था का?

Image
घारापुरी हे बेट शेकडो ग्रामस्थांचे हक्काचे गाव असून आज ते पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील एक महत्वपूर्ण स्थळ बनले आहे. गेट वे ऑफ इंडिया वरून या ठिकाणी जाण्यासाठी बोटींची सुविधा असून दररोज हजारो पर्यटक येथे एलिफंटा लेणी पाहण्यासाठी भेट देत असतात. त्यामुळे अनेकांच्या उपजीविकेचे ठिकाणदेखील हे बेट बनलेले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली मात्र मुंबई व नवी मुंबईसारख्या शहरांपासून हाकेच्या अंतरावरील ह्या लोकवस्तीपर्यंत नीट विजदेखील पोहोचू शकत नसेल तर येथील ग्रामस्थांचे दुसरे दुर्दैव ते काय? ७० वर्षे या ठिकाणी वीजच नव्हती. २०१८ साली पोहोचवण्यात आलेली वीज पाच वर्षेदेखील देखभालीअभावी टिकू शकलेली नाही. या बेटाला युनेस्कोचा जागतिक दर्जा लाभलेला आहे मात्र तिथपर्यंत विजेसारखी मूलभूत बाबदेखील पोहोचू शकत नसेल तर काय म्हणावे इथल्या व्यवस्थेला? वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई