Posts

Showing posts from December, 2021

नवे वर्ष, आरोग्याचा संकल्प

Image
नूतन वर्षाभिनंदन २०२२ २०२२ ह्या नव्या कोऱ्या वर्षाची सुरुवात होत आहे. गेल्‍या दिड दोन वर्षांपासुन आपण कोरोना हया महाभयंकर जागतिक महामारीच्या सावटाखाली वावरत आहोत. गेल्‍या वर्षी देशात शिरकाव केलेला कोरोना विषाणू अदयाप आपल्‍यातून जाण्‍यास तयार नाही. या साथीच्‍या पहिल्‍या दोन लाटांमध्ये मोठी जिवितहानी झाली आहे. आपले अनेक परिचीत आप्‍तजनदेखील या जिवघेण्‍या साथीच्‍या लाटांमध्‍ये मृत्‍यूमुखी पडले. त्यात सध्‍या ओमायक्रॉन या कोरोनाच्‍या नव्‍या प्रकाराची भिती सर्वत्र पसरलेली आहे. या प्रकाराचा प्रसार परदेशांमध्‍ये मोठया वेगाने होत असल्‍याने त्‍या दृष्‍टीने आपण खबरदारी घेतलीच पाहीजे. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्‍टंसींगचे नियम व मास्‍कचा वापर आपण कटाक्षाने करायलाच हवा. त्‍याचबरोबर सर्वच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांनी कोविड लसीचे दोन्‍ही डोसदेखील घेणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. या पार्श्वभूमीवर नव्‍या वर्षात पदार्पण करत असताना आपल्‍यापुढे अनेक आव्‍हाने अजूनही आ वासुन उभी आहेत. मात्र आरोग्‍याच्‍या बाबतीत आपण बाळगलेली सतर्कता आप...

वऱ्हाडयांच्या संयमाची परीक्षा

Image
अत्यंत कळीच्या मुद्द्याला हात घातला आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमध्ये नववरवधूचे कपडे, मेकअप, फोटो सेशन यामध्ये खर्ची पडणारा वेळ वऱ्हाडी मंडळींच्या संयमाची प्रतीक्षा पाहणारा ठरत आहे. व्यस्त जिवनमान व एका दिवशी एकापेक्षा अधिक कार्ये यामुळे पाहुणे मंडळींना लग्नासाठी फार वेळ थांबण्यास जमेनासे झालेय. त्यामुळे लग्न लागल्यानंतर वधू वर याना भेटून निघण्याच्या घाईत अनेक जण असतात. अशात लग्न लागल्यानंतर होणाऱ्या विधिदरम्यान त्यांना भेटता येत नाही. त्यांनतर होणारा कपडे बदलण्याचा 'विधी' प्रतीक्षा आणखी काळ वाढवणारा ठरतो. त्यात प्रत्येक क्षणाचा इव्हेंट कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सज्ज असणारे फोटोग्राफर नवरा नवरीची पाठ सोडायला तयार नसतात. प्रत्येक विधिदरम्यान असंख्य पोझ इच्छिणाऱ्या फोटोवाल्यांची कसरत पाहणाऱ्यांनाही कंटाळवाणी बनून जाते. मात्र या सर्वात ज्याच्या प्रतीक्षेत पाहुणे असतात तो मूळ स्वागत समारंभ सुरू होण्यास खूप वेळ जातो. त्यानंतर मग वधू वराला भेटण्यासाठी लांबलचक रांगा लागतात. यादरम्यान अनेक वऱ्हाडी कंटाळून कुटुंबियांनाच भेटून काढता पायदेखील घेतात. त्यामुळे लग्नसमारंभांमध्ये...

चूल आणि मूल ही संकल्पना बदला

Image
देशातील मुलींसाठी लग्नाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सध्या पुरुषांसाठी विवाहाचे किमान वय २१ आणि महिलांचे १८ वर्षे आहे. आता सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करणार आहे. भारतात लहान वयात मुलींची लग्ने उरकण्याचा प्रघात वाढत आहे. मुलींचे शिक्षण व करिअर घडवण्याच्या वयात लग्न झाल्यामुळे मुलींच्या आयुष्यातील प्रगती खुंटते. अनेकदा मुलींना केवळ कुटुंबाच्या आग्रहास्तव नाईलाजाने लग्नाच्या बोहल्यावर चढावे लागते. यामुळे चूल आणि मूल ही संकल्पना अजूनही भारतीय स्त्रियांच्या आयुष्यातून पुसली जात नाही. लहान वयात लग्न झाल्याने गरोदरपणात अशक्तपणा व कुपोषणाचे प्रमाण देखील वाढते आहे. याचा परिणाम साहजिकच नवजात बालकांवर होतो. जन्मणारे बाळ हे दोष, कुपोषित, उणिवा घेऊन जन्माला येते. यासाठी सरकारचा मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. महिलांना निरोगी बनवणे, त्यांना कुपोषणापासून वाचवणे, कमी वयातील लग्नामुळे मातामृत्यूचा धोका कमी करणे आणि महिला...

करिअर घडवण्याच्या वयात लग्न नकोच

Image
देशातील मुलींसाठी लग्नाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सध्या पुरुषांसाठी विवाहाचे किमान वय २१ आणि महिलांचे १८ वर्षे आहे. आता सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करणार आहे. भारतात लहान वयात मुलींची लग्ने उरकण्याचा प्रघात वाढत आहे. मुलींचे शिक्षण व करिअर घडवण्याच्या वयात लग्न झाल्यामुळे मुलींच्या आयुष्यातील प्रगती खुंटते. अनेकदा मुलींना केवळ कुटुंबाच्या आग्रहास्तव नाईलाजाने लग्नाच्या बोहल्यावर चढावे लागते. यामुळे चूल आणि मूल ही संकल्पना अजूनही भारतीय स्त्रियांच्या आयुष्यातून पुसली जात नाही. लहान वयात लग्न झाल्याने गरोदरपणात अशक्तपणा व कुपोषणाचे प्रमाण देखील वाढते आहे. याचा परिणाम साहजिकच नवजात बालकांवर होतो. जन्मणारे बाळ हे दोष, कुपोषित, उणिवा घेऊन जन्माला येते. यासाठी सरकारचा मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. महिलांना निरोगी बनवणे, त्यांना कुपोषणापासून वाचवणे, कमी वयातील लग्नामुळे मातामृत्यूचा धोका कमी कर...

एसी लोकलचा अट्टाहास कशासाठी?

Image
प्रवाशांचा प्रवास गारेगार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एसी लोकल आता अडचणीच्या ठरू लागलेल्या आहेत. अवाच्या सव्वा तिकीट दरांमुळे कुठलाही प्रवाशी या लोकलकडे फिरकत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने त्या बिनकामाच्याच ठरताना दिसत आहेत. एकीकडे अन्य लोकल तुडुंब गर्दीने तर दुसरीकडे एसी लोकल रिकाम्या धावताना दिसत आहेत. मध्य, पश्चिम, हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर या एसी लोकल अधून मधून विनाप्रवाश्यांच्याच धावत आहेत. ही लोकल स्टेशनवर आली की कुणीही त्या गाडीत चढत नसल्याने फलाटांवरील प्रवाशी संख्येत लगेच वाढ होते व पुढील गाडीवर त्याचा अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे एसी लोकलचा हा अट्टाहास नेमका कशासाठी केला असा प्रश्न पडतो. या लोकलचे तिकीट दर कमी करून प्रवाशांना त्याचा खराखुरा लाभ देणे गरजेचे आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

लग्नसमारंभाचा आदर्श

Image
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मुलीचे लग्न नोंदणी पद्धतीने करून समाजासमोर एक प्रकारचा स्तुत्य आदर्श ठेवला आहे. सामाजिक प्रतिष्ठेपायी लग्नसमारंभांवर वारेमाप खर्च करणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. त्यात सामाजिक प्रतिष्ठा लाभलेले लोकप्रतिनिधी, मंत्री, अधिकारी, धनाढ्य व्यवसायिक यांच्या मुलांची लग्ने आजकाल डोळे दिपवणारी ठरत आहेत. मात्र याच शोभेच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे कर्जबाजारी होत आहेत. याला आळा घालून लग्नासारखे कौटुंबिक समारंभ साधेपणाने उरकण्यासाठी समाजातील जागरूक लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. मंत्री आव्हाड यांनी मुलीचे लग्न अत्यंत साधेपणाने उरकून ते समाजमाध्यमांसमोर आणून एक नवा पायंडा पाडलेला आहे. त्याची पुनरावृत्ती येत्या काळात समाजात होणे काळाची गरज बनली आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

लसीचा दुसरा डोस अपरिहार्यच

Image
ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या प्रकारचे रुग्ण सध्या राज्यात आढळू लागलेले आहेत. जगातील अनेक देशांमध्ये या विषाणूचा वेगाने पसरणारा फैलाव पाहता त्याबाबतची आवश्यक काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे जे हत्यार आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे त्याचा उपयोग नक्कीच होत आहे. मात्र लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यास अद्यापही अनेक जण संकोच वा टाळाटाळ करताना दिसतात. गैरसमजुतीतुनही लस न घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाचा उद्रेक पुन्हा होऊ द्यायचा नसेल तर सर्वांनी स्वयंस्फूर्तीने लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. सध्या विषाणूला रोखण्यासाठी आपल्याकडे मास्क व लसीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

पुस्तकभेटीत मिळणारा आनंद अवर्णनीय

Image
वाचनसंपदा समृद्ध करणारी भेट ठाण्यात राहणारी बहीण दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनासाठी घरी येणार होती. नेहमीची ओवाळणी, भेट वस्तू याव्यतिरिक्त काहीतरी विशेष भेट द्यावी असा विचार मी करत होतो. तेव्हा नजर घरातील माझ्या पुस्तक संचयाकडे गेली. वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे कुठेही गेलो तरी नवनवीन पुस्तक खरेदीकडे माझा अधिक कल असतो. त्यामुळे अशा अनेक पुस्तकांचा संचय घरी झालेला आहे. मग कुणाचा वाढदिवस, लग्न, सेवानिवृत्ती असली की ही पुस्तके आवर्जून मी त्या व्यक्तीला भेट देत असतो. बहीण नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेवर शिक्षिका आहे. तिच्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक परिचयाचे असल्यामुळे अधूनमधून विविध माध्यमातून त्यांच्या संपर्कात असतो. त्यामुळे विचार केला की बहीण घरी आली की तिला तिच्या शाळेसाठी काही पुस्तके भेट करायची जेणेकरून ती पुस्तके शाळेतील लायब्ररीत जमा होतील व मुलांची वाचनसंपदा वृद्धिंगत होण्यासाठी कामी येतील. त्यामुळे आदल्याच दिवशी संग्रहातील काही बोधपर पुस्तके काढून पिशवीत बांधून ठेवली. रक्षाबंधनाला बहीण घरी आली. मोठ्यांचा व लहानग्यांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पड...

प्राथमिक शाळा पुढील वर्षी सुरू कराव्यात

Image
मागील दीड वर्षांपासून बंद झालेल्या शाळांच्या घंटा हळूहळू वाजायला लागलेल्या आहेत. महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नसताना शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. कोरोनाचे नवनवे प्रकार परदेशातून भारतात दाखल होत असताना शालेय विद्यार्थ्यांना लसीविना शाळेमध्ये गोळा करणे घातक ठरू शकते. मागील संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाइन शिक्षणाद्वारेच पूर्ण करण्यात आले. यंदाच्या वर्षाचेदेखील दोन तीन महिनेच शिल्लक राहिलेत. ओमायक्रोन या नव्या विषाणूची भीती सर्वत्र पसरलेली आहे. सार्वजनिक प्रवास, स्थळांवर केवळ लसीचे डोस घेतलेल्या लोकांनाच प्रवेश दिला जातोय. अशा वेळी ज्यांच्यापर्यंत अद्याप प्रतिबंधात्मक लस पोहोचलीच नाही त्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. आज शाळांतील वर्गांची पटसंख्या पहिली तर सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम लहान मुलांकडून कसे पाळले जाणार हाही प्रश्न आहेच. त्यामुळे किमान प्राथमिक वर्ग सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून शासनाने थेट पुढील शैक्षणिक वर्षातच प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तर तो ...

संवेदनशील व कवी मनाचा सेवाव्रती - डॉ कैलास जवादे

Image
सेवाव्रती डॉक्टर पद्मश्री डॉ डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या सर्जरी विभागाचे प्राध्यापक, अवयवप्रत्यारोपन विभागाचे प्रमुख व डी वाय रुग्णालयाचे अनुभवी सर्जन डॉ कैलास जवादे यांच्याशी माझा संपर्क अगदी अलिकडला. दोन वर्षांपूर्वी आजीच्या गाठीचे ऑपरेशन नेरूळच्या डी वाय पाटील रुग्णालयात त्यांनी केल्यानंतर त्यांच्याशी आलेला संपर्क उत्तरोत्तर वाढत गेला आणि डॉ जवादे हे केवळ एक निष्णात सर्जन नसून अनेक कलागुण अंगी बाळगणारे आसामी आहेत हे हळूहळू लक्षात आले. शस्त्रक्रिया क्षेत्रातील आपल्या अनुभवाच्या जोरावर आणि आपल्या नेतृत्व कौशल्यावर त्यांनी डी वाय पाटील रुग्णालयात आपल्या डॉक्टरांची एक उत्तम टीम तयार केली आहे ज्याच्या बळावर रुग्णालयाचा नावलौकिक वाढवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. यामुळेच रुग्णालयातील अवयवप्रत्यारोपन विभागाचे प्रमुख म्हणूनही ते काम पाहत आहेत. अनेक यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ जवादे यांचे वर्तन व राहणीमान अत्यंत साधे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे एमबीबीएस, अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयात एमएस सर्जरीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ जवादे सरांनी...

लढवय्या अधिकाऱ्याचे अपघाती निधन चटका लावणारे

Image
तामिळनाडूत कुन्नूर येथे कोसळलेल्या हवाईदलाच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे संरक्षण दल प्रमुख म्हणजेच सिडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी व अन्य ११ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय संरक्षण दलासह देशासाठी ही अत्यंत धक्कादायक घटना असून सर्व स्तरांतून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख पद भूषवणाऱ्या एका अधिकाऱ्याचा अशा पद्धतीने झालेला मृत्यू हवाईदलाच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. हवाईदलाची विमाने व हेलिकॉप्टर ही तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. कुठल्याही आपात परिस्थितीत उपयोगी पडणाऱ्या हवाईदलाच्या हेलिकॉप्टरबाबत अशा प्रकारचा अपघात दुर्दैवी आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली कारगील युद्धानंतर   आलेल्या अनुभवावरून कारगील रिविव्ह कमिटीने केलेल्या शिफारशीवरून संरक्षण दलात चिफ ऑफ डिफेंस स्टाफ सिडीएस या पदाची निर्मिती केली गेली. मोठ्या आपत्कालिन परिस्थितीत किंवा देशाच्या संरक्षणासाठी लष्कर, वायूदल, नौदल या तिन्ही दलांमध्ये समन्वय राहावा यासाठी सीडीएस पदाची निर्मिती करण्याची शिफारस करण्यात आली. हे पद निर्माण...

आरोग्य सेवांचे सक्षमीकरण

Image
आरोग्‍य सेवांचे सक्षमीकरण   कोविड -१९ हया जिवघेण्‍या आजाराच्‍या पार्श्‍वभुमीवर आरोग्‍य हया घटकाचे आपल्‍या आयुष्‍यातील महत्‍व पून्‍हा एकदा स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍याचबरोबर सार्वजनिक आरोग्‍य सेवांची निकड व महत्‍वदेखील प्रकर्षाने अधोरेखीत झालेले आहे. कोविड आजारातून समाजातील सर्वसामान्‍य व दुर्बल घटकांना बाहेर काढण्‍याचे यशस्‍वी काम सार्वजनिक आरोग्‍य व्‍यवस्‍थेने केले. त्‍यामुळे भविष्‍यातील कोणत्‍याही साथपरिस्‍थीतीमध्‍ये सार्वजनिक आरोग्‍य सेवा ही नागरीकांच्‍या दृष्‍टीने सर्वात मोठी उपलब्‍धी असणार आहे. मात्र यासाठी सार्वजनिक आरोग्‍य सेवांच्‍या सक्षमीकरणासाठी गेल्‍या काही वर्षांमध्‍ये करण्‍यात आलेल्‍या प्रयत्‍नांचा व भविष्‍यातील आव्‍हांनाचा उहापोह करणे क्रमप्राप्‍त ठरते. लोकसंख्‍येच्‍या वाढत्‍या गरजांमुळे उपलब्‍ध सरकारी आरोग्‍य यंत्रणांवर अधिकचा ताण पडताना दिसत आहे. यासाठी शासकीय आरोग्‍य संस्‍थांचा विस्‍तार व नव्‍या संस्‍था कार्यान्वित करण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. भौगालिक परिस्थितीनुसार अस्तित्‍वात असलेल्‍या आरोग्‍य संस्‍थांचे मोजमाप व निकड आता लोकसंख्‍येच्‍या...

जलवाहतूक नोकरदारांच्या उपयोगाची हवी

Image
बेलापूर ते भाऊच्या धक्क्यापर्यंत १६ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या जलवाहतुकीचा फायदा नक्की कुणाला होणार हे सर्वस्वी या प्रवासाचे तिकीट दर, वेळ व स्थानिकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. आज नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने प्रवास करणारा वर्ग बहुतांश नोकरदार आहे. रेल्वे अथवा बसने प्रवास करणे किफायतशीर असल्याने या दोन मार्गाने प्रवासाकडेच त्यांचा अधिक ओढा आहे. बस अथवा रेल्वे प्रवासभाड्याइतकी जलवाहतूक स्वस्त मिळेल अशी शक्यता सध्यातरी नाही. ट्रान्स हार्बर मार्गावर सुरू झालेल्या व हार्बर मार्गावर सुरू होत असलेल्या एसी लोकलची जी अवस्था आहे तीच अवस्था या जलवाहतुकीची होऊ नये. आज सामान्य लोकल खचाखच तर एसी लोकल पूर्णपणे रिकाम्या धावताना दिसत आहेत. यावरून या मार्गांवरून प्रवास मरणारे श्रीमंत नसून सर्वसामान्य चाकरमानी आहेत लक्षात घ्यायला हवे. जलवाहतुकीचा लाभ नवी मुंबईच्या बेलापूर व आसपासच्या नोडमध्ये वास्तव्य करणाऱ्या प्रवाशांना मिळणार असला तरी त्याचे तिकीट दर किती असतील यावर तेथील प्रवाशी संख्या अवलंबून असेल एव्हढे नक्की. रेल्वे वा बसने साधारणतः वीस रुपयांमध्ये मुंबईकडे प्रवास होतो. जलवाहतुकीच...

अधिक ताणले की तुटते

Image
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने आता विराम घ्यावा असे वाटते. कुठलीही गोष्ट अधिक ताणली की ती तुटते हा इतिहास आहे. वास्तविक एसटी कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची विलीनीकरणाची मागणी रास्तच आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एसटी कर्मचारी अगदीच तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. सध्याची महागाई पाहता त्यांच्या वेतनात वाढ होणे गरजेचेच आहे. यासाठी त्यांनी पुकारलेले आंदोलन त्यांच्या अधिकारक्षेत्रातील व न्यायहक्कांसाठीच आहे. मात्र त्यांची विलीनीकरणाची मागणी सध्या न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या अखत्यारीतील असल्याने ती पूर्ण होण्यासाठी न्यायालयाने निश्चित केलेला तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे व तोवर आंदोलनामुळे सर्वाधिक बाधित झालेला ग्रामीण भागातील सर्वसामान्य प्रवाशी ताटकळत ठेवणे उचित नाही. राज्याच्या बहुतांश ग्रामीण भागात शेतकरी, मजूर, विद्यार्थी व नोकरदारांना आजही एसटीशिवाय पर्याय उपलब्ध नाही. एसटी संपामुळे त्यांच्या हालांना पारावार उरलेला नाही. न परवडणारी खाजगी वाहतूक अनेकांच्या आवाक्याबाहेरील आहे. त्यांचा विचार कुठेतरी होणे आवश्यक आहे. सरकारने एक पाऊल पुढे येत एसट...