Posts

Showing posts from June, 2020

बालसंस्कार ग्रुपच्या ऑनलाईन लॉकडाऊन स्पर्धेचा व आंनदवारी प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहीर

Image
पाठांतर, गायन, चित्रकला, निबंध स्पर्धा बालसंस्कार ग्रुप देवघर व देवघर विभाग शिक्षण प्रसारक ट्रस्ट यांच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भव्य ऑनलाईन बालसंस्कार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात पाठांतर, गायन, चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा निकाल दिनांक १ जुलै २०२० आषाढी एकादशीच्या दिवशी लागला. यावेळी परीक्षक व आयोजकांनी व्यक्त केलेले मनोगत :- * आयोजक व परिक्षकांचे मनोगत* नमस्कार बालमित्रांनो, संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोना महामारीच्या संकटकाळात आपण सर्वांनी अत्यंत धीराने व संयमाने परिस्थितीचा सामना केलात त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. या जागतिक संकटामुळेच आपले सालाबादप्रमाणे होणारे निवासी बालसंस्कार शिबीर यंदा आपण घेऊ शकलेलो नाही. कर्म, निसर्ग व नियती याच्यापुढे कुणाचे काहीच चालत नाही. त्यामुळेच माणसामाणसांत संक्रमित होणारा कोरोना विषाणू आज माणसामुळेच माणसाच्या जिवावर उठलाय. आज आपल्यातलेच अनेक बांधव या विषाणूचा मोठ्या जोमाने मुकाबला करत आहेत. मग ते कोरोनाबाधित रुग्ण असतील किंवा आपले डॉकटर, नर्स, पोलीस किं...

सेवानिवृत्ती सन्मानाची

Image
आज १ जुलै, डॉक्टर्स डे. कोरोना प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर समाजातील डॉक्टरांचे महत्व पुन्हा एकदा सर्वांच्या दृष्टीने अधोरेखित झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याच परिस्थितीत, आरोग्य सेवेतील परिचारिका विभागाचे उपसंचालक डॉ आर टी चव्हाण हे काल ३० जून रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी निष्ठेने व कर्तव्यतत्परतेने पार पाडणे, वरिष्ठांच्या निर्देशानुसार प्रामाणिकपणे कामकाज करणे, सहकारी वर्गाशी व कर्मचार्यांशी अत्यंत खेळीमेळीचे संबंध यामुळे डॉ चव्हाण विशेष लक्षात राहतात. पेशाने नेत्रशल्यचिकित्सक असलेल्या डॉ चव्हाण यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा दिलेली आहे. धुळे, नाशिक, नंदुरबार येथे विशेषज्ञ म्हणून तर औरंगाबाद येथे विभागीय उपसंचालक म्हणून त्यांनी कामकाज पाहिले. गेल्या काही वर्षांपासून ते आरोग्य सेवा आयुक्तालयात नर्सिंग विभागाची धुरा सांभाळत आहेत. २३ जानेवारी १९८९ रोजी सेवेत रुजू झालेल्या डॉ चव्हाण यांची तब्बल ३१ वर्षांची शासकीय सेवा त्यांच्यासाठी खूप मोलाची ठरली. या कारकिर्दीत त्यांनी अनेक चढउतार पाहिले. मात्र या सर्वांमधू...

लोकांची जबाबदारी वाढली

Image
सरकारने जाहीर केलेला पहिला अनलॉक ३० जूनला संपतोय. मात्र कोरोना रुग्णांची वाढत चाललेली संख्या पाहता सरकार पुन्हा लॉकडावूनकडे वळतेय की काय अशी एक अटकळ लावली जात होती. मात्र रविवारच्या संबोधनात मुख्यमंत्र्यांनी सरकार पुन्हा लोकडाऊनच्या मनःस्थितीत नसल्याचे सूतोवाच दिले आहे. त्यामुळे आता नागरिकांची जबाबदारी खूप वाढली आहे. लोकडाऊनमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था व जनजीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी पुन्हा टाळेबंदी परवडणारी नक्कीच नाही मात्र दैनंदिन व्यवहार पूर्ण क्षमतेने जोमात सुरू करणेदेखील या परिस्थितीत धोकादायक आहे. महाराष्ट्रात आज दररोज सरासरी पाच हजारांच्या वर रुग्ण कोरोनाला बळी पडताना दिसत आहेत. रुग्णसंख्या दोन लाखांकडे झपाट्याने धाव घेत आहे. दिवसेंदिवस हे चित्र भयावह होत जाणार हे निश्चित आहे. कारण पुढे पावसाळा व त्यामुळे उदभवणारे साथरोग आहेत. त्यातच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये येणारे अडथळे, त्यामुळे रुग्णशोध व निदान यामध्येदेखील बऱ्यापैकी विलंब होत आहे. त्यातच वाढत चाललेले मृत्यू थोपवण्याचे आव्हानदेखील समोर उभे आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू सध्या तीन आकड्यांमध्ये आहेत. अशा परिस्थितीत बहुत...

बँका आरबीआयच्या कचाट्यात

Image
शासकीय बँका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आता पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्‍याचा निर्णय नुकताच केंद्रिय मंत्रीमडळाने घेतलेला आहे. गेल्या काही वर्षांपासुन सहकारी बँकांमधून मोठे घोटाळे उघड झालेले आहेत. त्‍यामध्‍ये लाखो ठेविदारांच्‍या ठेवी अडकलेल्‍या असुन त्‍याचा बॅंक ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रातील  पंजाब अँड महाराष्ट्र कॉ-ऑपरेटिव्ह बँकेवर अंतर्गत अनियमिततेमुळे आरबीआयने निर्बंध आणले असुन गेल्‍या नऊ महिन्‍यांपासुन हजारो खातेधारकांचे लाखो रुपये या बॅंकेत अदयापी अडकुन पडले आहेत. असे घोटाळे टाळण्यासाठी सहकारी बँकांना ‘आरबीआय’च्या अधिकार कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नक्‍कीच स्‍वागतार्ह आहे. आता सर्वच सहकारी बॅंकांचा ताळेबंद आरबीआय या शिखर बॅंकेकडे राहणार असल्‍यामुळे सहकारी बँकांमधील ठेवीदारांना आपला पैसा सुरक्षित असल्याची हमी मिळणार आहे. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये अनेक सहकारी बॅंकांतील घोटाळयांमुळे सर्वच सहकारी बॅंकांतील ठेविदारांमध्‍ये असुरक्षिततेचे वातावरण होते जे आता निवळणार आहे. आतापर्यंत सहकारी बँक पूर्णपणे ‘आ...

लक्षणे नसतील तर गृहवीलगिकरण करा

Image
लक्षणे नसतील तर गृहवीलगिकरण करा कोविड पॉझीटिव्‍ह रुग्‍णांचे आकडे वाढत चाललेत. बाधित लोकांच्‍या संपर्कात आलेल्‍या लोकांनादेखील मोठया प्रमाणावर कोरोनाची लागण होत असल्‍याचे चित्र आहे. मात्र यातील बहुसंख्‍य लोकांमध्‍ये कोणतीही लक्षणे आढळुन येत नाहीत. त्‍यामुळे काही दिवस रुग्‍णालय अथवा कोविड सेंटरमध्‍ये मुक्‍काम केल्‍यानंतर लक्षणे दिसुन येत नसल्‍यामुळे त्‍यांना घरी सोडण्‍यात येत आहे. वास्‍ताविकतः लक्षणे नसतील तर लगेच रुग्‍णालयात जाऊन उपचार घेण्‍याची गरज नाही. अशा व्‍यक्‍तींकडून घोषणापत्र लिहून त्‍यांना गृह विलगीकरणात ठेवण्‍याच्‍या सूचना यापुर्वीच शासनाने दिलेल्‍या आहेत. मात्र ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी अदयापी अशा प्रकारे लक्षणे नसलेल्‍या पॉझीटिव्‍ह व संशयित व्‍यक्‍तींना क्‍वारंटाईन सेंटरमध्‍ये भरती केले जात आहे. ग्रामीण भागात रुग्‍णसंख्‍या अजुनही नियंत्रणात असल्‍याने या कोविड सेंटरवरील भार प्रकर्षाने दिसुन येत नाही. मात्र शहरी भागात मात्र याच्‍या विपरीत अवस्‍था आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाण्‍यासारख्‍या मोठया व दाटीवाटीच्‍या शहरांत रुग्‍णसंख्‍या झपाटयाने वाढत आहे. यात लक्षणे असलेल्‍य...

गावाचं गावपण शोधणारे जुहूगावचे लालाशेठ

Image
लोक पुढारले पण गावे हरवली नवी मुंबई ही पूर्वी खाडीकिनारी वसलेली गावखेड्यांची नगरी होती हे सर्वांना ठाऊकच आहे. इथे अनेक छोटी छोटी गावे स्वतःचे अस्तित्व टिकवून होती ज्यात आगरी कोळी लोकांचा भरणा अधिक होता. शेती हाच प्रमुख व्यवसाय, जोडीला मासेमारी व इतर जोडधंदे होतेच. कालांतराने मुंबईवर पडणारा अतिरिक्त भार कमी व्हावा यासाठी नवी मुंबईचा शोध लावला गेला. सुनियोजित शहरे वसवणारे म्हणून ओळख असलेल्या सिडकोच्या माध्यमातून ही २१व्या शतकातील आधुनिक नगरी वसवली गेली ज्यामध्ये स्थानिकांच्या जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या व तिथे आज आलिशान इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. अगदी बेलापूरपासून ते दिघ्यापर्यंत नोडस्वरूपात पसरलेल्या या नवी मुंबईचे मोजमाप पूर्वी बेलापूर, आगरोळी, करावे, दारावे, तुर्भे, वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, चिंचपाडा, दिघा यासारख्या गावांमध्ये व्हायचे. सिडकोने नव्या मुंबईचा विकास करताना स्थानिकांची गरजेपोटी बांधलेली घरे टिकून राहावीत यासाठी या गावातील घरांना अभय दिल्याने आजही ही गावे प्रत्येक नोडमध्ये आपले पारंपरिक अस्तित्व टिकवून आहेत. गावठाणे म्हणून संबोधल्या जाणाऱ्या ह्य...

रुग्ण बरे होतायेत

Image
कोविड पॉझीटिव्‍ह रुग्‍णांचे आकडे वाढत चाललेत. बाधित लोकांच्‍या संपर्कात आलेल्‍या लोकांनादेखील मोठया प्रमाणावर कोरोनाची लागण होत असल्‍याचे चित्र आहे. मात्र यातील बहुसंख्‍य लोकांमध्‍ये कोणतीही लक्षणे आढळुन येत नाहीत. त्‍यामुळे काही दिवस रुग्‍णालय अथवा कोविड सेंटरमध्‍ये मुक्‍काम केल्‍यानंतर लक्षणे दिसुन येत नसल्‍यामुळे त्‍यांना घरी सोडण्‍यात येत आहे. वास्‍ताविकतः लक्षणे नसतील तर लगेच रुग्‍णालयात जाऊन उपचार घेण्‍याची गरज नाही. अशा व्‍यक्‍तींकडून घोषणापत्र लिहून त्‍यांना गृह विलगीकरणात ठेवण्‍याच्‍या सूचना यापुर्वीच शासनाने दिलेल्‍या आहेत. मात्र ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी अदयापी अशा प्रकारे लक्षणे नसलेल्‍या पॉझीटिव्‍ह व संशयित व्‍यक्‍तींना क्‍वारंटाईन सेंटरमध्‍ये भरती केले जात आहे. ग्रामीण भागात रुग्‍णसंख्‍या अजुनही नियंत्रणात असल्‍याने या कोविड सेंटरवरील भार प्रकर्षाने दिसुन येत नाही. मात्र शहरी भागात मात्र याच्‍या विपरीत अवस्‍था आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाण्‍यासारख्‍या मोठया व दाटीवाटीच्‍या शहरांत रुग्‍णसंख्‍या झपाटयाने वाढत आहे. यात लक्षणे असलेल्‍या व नसलेल्‍या दोन्‍ही प्रकारच्...

आरोग्य आयुक्तालयात जागतिक योग दिन संपन्न

Image
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत योग दिन साजरा आज २१ जून म्हणजे जागतिक योग दिवस. दरवर्षी हा दिवस भारतासह जगभरात योगविषयक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना विषाणूचे सावट पाहता सामाजिक अंतर कायम राखत सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता लोकांना घरच्या घरी विविध अँपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने हा दिवस साजरा करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. तशा प्रकारच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागानेदेखील सर्व जिल्ह्यांच्या आरोग्य यंत्रणांना निर्गमित केलेल्या आहेत. या दिवसाचे औचित्य साधून राज्य आरोग्य विभागाचे मुख्यालय असलेल्या आरोग्य भवन मध्ये हा दिवस शुक्रवार दिनांक १९ जून २०२० रोजी किमान अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग चे पुरेपूर पालन करत साजरा करण्यात आला. आरोग्य भवनच्या तळमजल्यावरील मुख्य सभागृहात राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ अनुप कुमार यादव, आरोग्य सेवा संचालक डॉ साधना तायडे, वित्त संचालक श्री रवींद्र शेळके, अति अभियान संचालक डॉ सतीश पवार, सहसंचालक डॉ विजय कँदेवड व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या योग दिनाच्या ह्या क...

याचसाठी केला होता का अट्टाहास

Image
मुंबईमध्‍ये लॉकडाऊन ब-याच अंशी शिथील करण्‍यात आलेला आहे. कोरोनाग्रस्‍तांचे आकडे कमी होण्‍याचे नाव घेत नसले तरी ढासळती अर्थव्‍यवस्‍था सावरण्‍यासाठी लॉकडाऊनकडून आता अनलॉकची गिणती सुरु झालेली आहे. बाजारपेठा व कार्यालयेदेखील गर्दीने फुलू लागलेली आहेत. मुंबईमध्‍ये येणारे बहुतांश व्‍यावसायिक व चाकरमानी उपनगरांतून मुंबईकडे रोजगारासाठी धाव घेत असतात. त्‍यांंना स्‍वस्‍त व जलद प्रवासाचे एकमेव साधन उपलब्‍ध असते ते म्‍हणजे मुंबईची जिवनवाहिनी लोकल सेवा. सध्‍या सर्व व्‍यवहार, ऑफीसेस सुरु झाली असली तरी सुरक्षेच्‍या कारणास्‍तव लोकलसेवा मात्र बंंदच असल्‍यामुळे नोकरदार वर्गाचे मोठे हाल होताना दिसत आहेत. सध्‍या त्‍यांच्‍यासाठी खाजगी वाहने, बेस्‍ट व एसटी बससेवेशिवाय पर्याय नाही. लॉकडाऊन ज्‍या दिवशी शिथील केला त्‍याच  दिवशी सोमवारी ८ तारखेला व त्‍यानंतर बसेस व रस्‍ते गर्दीने तुडुंंब भरुन वाहताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी तर बस पकडताना चेंगराचेंगरीसदृश्‍य परिस्‍थीतीदेखील दिसुन आली. वास्‍ताविकतः कार्यालये, व्‍यवसाय सुरु करताना मुंबईतील गर्दिचा अंदाज घेऊन लोकांसाठी मुबलक वाहतूक व्‍यवस्‍था उपलब्‍ध आहे का ...

अशी ही समाजसेवेची वादळवाट

Image
श्री संतोष गायकवाड - एक अवलीया सामाजिक कार्य करणारे अनेक लोक आज आपल्या समाजात आजूबाजूला वावरत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने गरजूंसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर परिस्थितीने गांजलेल्या लोकांसाठी यथाशक्ती मदत करणारे अनेक लोक समाजामध्ये सक्रिय आहेत. सर्वसामान्य लोक आपल्या व आपल्या कुटुंबापुरता विचार करतात. दिवसभर राब राब राबतात, काही तर सोळा ते अठरा तास काम करतात फक्त आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह  चालवण्यासाठी.. कुटुंबाचं सुख हे त्यांचं सुख असते. त्यातच ते समाधान मानत असतात. खरेतर तर समाधान हे मानन्यावर आहे. कोण कशात समाधान शोधतो तर कोण कशात? एखाद्याच्या पाठीला खाज आली व आपला हात काही पाठीपर्यंत पोहचत नाही मग तो ती पाठ भिंतीला रगडतो व त्यात समाधानी होतो. मात्र काही लोक दुसऱ्यांसाठी केलेल्या मदतीमध्ये आपले समाधान शोधत असतात. परिस्थिती कशीही असो, मिळकतीतला थोडा जरी हिस्सा दुसऱ्याला देता आला तरी त्यात अशा सद्विचारी लोकांना समाधान मिळत असते. आमच्या घणसोली मध्ये असाही एक थोर समाजसेवक माझ्या माहितीत आला असून उदरनिर्वाहाव्यतिरिक्त इतरांची सेवा करण...