Posts

Showing posts from April, 2021

कोरोनामुक्तीसाठी लसीकरण महत्वाचे

Image
केंद्र सरकार नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्याटप्प्याने लसीकरण प्रक्रिया राबवत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 'कोविन' या ऑनलाईन अप्लिकेशनद्वारे पार पडत असल्यामुळे ती पूर्णपणे पारदर्शी व लसीकरणातील सावळागोंधळ रोखणारी आहे. सुरुवातीला केवळ आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धयांना लस दिली जात होती. त्यानंतर 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक व 45 वर्षांवरील विविध व्याधींनी ग्रस्त व्यक्तींचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 45 वर्षांवरील सर्वच व्यक्तींना व येत्या १ तारखेपासून १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस उपलब्ध होणार आहे. टप्प्याटप्याने सर्वांनाच ही लस उपलब्ध होणार आहे. कोरोनाप्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व नागरिकांचे लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. सद्यस्थितीत सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड व भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ह्या स्वदेशी लसी लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत. मात्र दररोज कोट्यवधी लोकांना लस देण्यामुळे तसेच लसीच्या निर्यातीमुळे येत्या काळात लसीचा तुटवडा जाणवू लागणार ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. यामुळे लसीचा पु...

प्रेरणादायी धाडस

Image
सेंट्रल रेल्वे मुंबई विभागाचे पॉईंटर मॅन मयुरेश शेळके याने 17 एप्रिल रोजी वांगणी रेल्वे स्थानकात दाखवलेले धाडस अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याच्या प्रसंगावधानामुळे एका चिमुकल्याचे प्राण तर वाचलेच पण माणुसकी व समाजभान अजून जिवंत असल्याचेदेखील त्याने दाखवून दिले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील वांगणी येथे घडलेल्या थरारक प्रसंगामधून मयुरेश शेळके यांनी चिमुकल्याचे प्राण वाचवल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. एक अंध महिला आपल्या लहान मुलाला घेऊन वांगणी स्थानकातून जात होती. याचवेळी या चिमुकल्याचा तोल जाऊन तो प्लॅटफॉर्मवरुन थेट रेल्वे रुळावर कोसळला. याच दरम्यान, समोरुन उद्यान एक्स्प्रेस येत होती. यावेळी परिस्थितीचं भान राखत मयुरेश शेळके यांनी तात्काळ चिमुकल्याच्या दिशेने धाव घेतली आणि त्याचे प्राण वाचवले. एखाद्या चित्रपटातील सिनला देखील लाजवेल असे हे दृश्य सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले व सर्वांसमोर आले. मयुरेश याने दाखवलेले धाडस अचाटच आहे पण त्यात त्याने घडवलेले माणुसकीचे दर्शन दुर्मिळ होत चाललेय. सध्याच्या जगात कुणी ओळखीच्या, नात्यातल्या व्यक्तीच्या ...

रेमडेसीविरसाठी नियमावली हवी

Image
जेव्‍हा रेमडेसीवीरला वाचा फुटते हा लेख (दै लोकसत्‍ता दि. 22 एप्रिल) वाचला. रेमडे‍सीवीर या इंजेक्‍शनवरुन राज्‍यभरात सध्‍या सुरु असलेल्‍या गोंधळावर या लेखाव्‍दारे अगदी अचूक बोट ठेवण्‍यात आले आहे. सध्‍या सर्वत्र केवळ दोनच गोष्‍टींची बोंबांबोंब आहे. एक म्‍हणजे हॉस्‍पीटल बेड आणि दुसरे रेमडेसिवीर. या दोन गोष्‍टींसाठी लोकांची सर्वत्र वणवण सुरु आहे. अगदी व्‍याकुळ होऊन लोक त्‍यासाठी सगळीकडे याचना करत आहेत. वास्‍ताविक रेमडेसीवीर या इंजेक्‍शनचा वापर व उपयुक्‍तता याबाबत कमालीची अनभिज्ञता व संभ्रम असल्‍यामुळे कोविड रुग्‍ण रेमडेसिवीर मिळाले नाही तर दगावतो हा समज सोयीस्‍कररीत्‍या पसरला आहे. वास्‍ताविक , रेमडेसीवीर कोविडवर रामबाण इलाज नाहीच. शरीरात कोरोना पसरण्‍याच्‍या सुरुवातीच्‍या काळात हे औषध त्‍याची वाढ थांबवते. कोरोनाने शरीरावर ताबा मिळवल्‍यानंतर ते परिणामकारक नाही. सरकारी रुग्‍णालयांमध्‍ये या इंजेक्‍शनचा वापर मोफत व नियोजनबध्‍दरित्‍या सुरु आहे. त्‍यामुळे त्‍याची परिणामकारकतेचे मोजमाप व्‍यवस्‍थीतरीत्‍या होत आहे. मात्र खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये या औषधाचा सुरु असले...

नुसते निर्बंध नको तर कडक अंमलबजावणीही हवी

Image
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात सरकारने अनेक निर्बंध घातले असले तरी रुग्णवाढ थांबण्याचे नाव घेत नाहीये. दररोजची रुग्णसंख्या पन्नास हजारांच्या आत यायलादेखील तयार नाही. यामुळे महाराष्ट्र रुग्णसंख्येच्या बाबतीत जगातील नंबर एकचे राज्य बनले आहे. राज्यातील चाचण्या व रुग्ण नोंदीतील पारदर्शकता ही कारणे याला असली अनियंत्रित लोकसंख्या व लोकांचा निष्काळजीपणा हे घटकदेखील याला कारणीभूत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. राज्यातील सुरक्षित जीवनमान, उद्योगधंदे व रोजगारासाठी पूरक वातावरण यामुळे देशाच्या इतर भागांतून मोठ्या संख्येने लोक महाराष्ट्रात स्थायिक झालेले आहेत. मात्र कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूसाठी हीच दाटीवाटी पोषक ठरतेय. सामाजिक अंतर राखण्याचे कितीही आवाहन सरकारने केले तरी फुगलेल्या लोकसंख्येत हा नियम पाळायचा कसा हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने नियम कितीही कडक करून लोकांच्या भ्रमंतीवर निर्बंध लावले तरी लोक ऐकायला तयार नाहीत. प्रत्येक व्यक्ती, वस्ती, गाव या ठिकाणी या निर्बंधांची सक्तीने अंमलबजावणी करणारी इतकी ...

ही तर सरळसरळ असंवेदनशीलताच की!

Image
एकीकडे कोरोनासारख्या भयंकर महामारीने देश व राज्य होरपळून निघत असताना काही लोकांना आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांचे डोहाळे लागलेत. गेले वर्षभर उद्योग, व्यवसाय, नोकऱ्यांची वाताहत झाली आहे. मात्र तरीदेखील सोन्याची खाण समजली जाणारी आयपीएल स्पर्धा भरवण्याचा घाट घातला जातोय. क्रिकेटसारख्या खेळाला भारतीयांनी डोक्यावर घेऊन भरभरून प्रेम व पैसा दिला. क्रिकेटपटू, स्पर्धा आयोजक, माध्यम प्रायोजक क्रिकेटला मिळणाऱ्या टीआरपीतून प्रचंड माया जमा करतात. अवघा देश कोविडसारख्या महामारीचा मुकाबला करत असताना आयपीएलसारख्या खेळाडूंची बोली लावणाऱ्या क्रिकेट लिगकडून सामाजिक बांधिलकी जपत सढळ हस्ते मदत होणे गरजेचे आहे. यासाठी यंदाची स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी लागणारा खर्च कोविड निर्मूलनासाठी वापरण्याचा निर्णय स्वागतार्ह ठरेल. मात्र पुन्हा एकदा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून भर कोरोनाच्या कहरात क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा उपद्व्याप असंवेदनशीलतेचे प्रतीक आहे. त्यामुळे हे क्रिकेट सामने निदान महाराष्ट्रात तरी भरवले जाऊ नयेत. आयोजक व खेळाडूंनीदेखील आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून कोरोनाशी लढण्यासाठी औषधे...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आपल्‍या देशात अनेक थोर पुरुषांनी जन्‍म घेतला. देशाला स्‍वातंत्र्य मिळवून देण्‍यापासुन सामाजिक कार्यात स्‍वतःला वाहून घेतलेल्‍या अनेक महापुरुषांची नावे घेता येतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेदेखील आपल्‍या देशाला लाभलेले असामान्‍य व्‍यक्तिमत्‍व. भारतीय राज्‍यघटना ज्‍यांनी आपल्‍या कुशाग्र बुध्‍दीमत्‍तेच्‍या जोरावर लिहीली व जीचे आजदेखील आपण विनयशिलतेने पालन करतो त्‍या राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव यांचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्‍यांना चांगली पुस्तके वाचावयास आणून देत. त्‍यामुळेच बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ ...

मराठी नववर्षाची सुरुवात

Image
चैत्र शुध्‍द प्रतिपदा अर्थात, गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. घरोझारी गुढी उभारुन हा दिवस साजरा केला जातो. समस्त मराठी जणांना आनंद वाटावा, आपल्या नवसंकल्पांची सुरुवात जेथून करावी तो सण. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. गेल्‍या काही वर्षांपासुन स्‍वागतयात्रांच्‍या माध्‍यमातुन आपल्‍या संस्‍कृतीचे दर्शन घडवले जाते. गुढ्या, पताका, ध्वज उभारण्यापासून ते मिरवणुका व सांस्कृतीक कार्यक्रमांची अगदी रेलचेल या दिवशी ठेवली जाते. अनेकजण या दिवशी सोने चांदी व इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी शुभ दिवस म्हणून करत असतात. यंदा गुढीपाडव्‍यावर कोरोना या भयंकर महामारीचे सावट आहे. शासनाने सार्वजनिक कार्यकंमांवर निर्बंध लादलेले असल्‍यामुळे आपल्‍याला घरातुनच यंदाच्‍या नववर्षाचे स्‍वागत करावे लागणार आहे. गुढीपाडवा हा हिंदू सणांपैकी एक महत्वाचा सण आहे. गुढीपाडव्याबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. एका आख्यायिकेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हाने ह्या सृष्टीची निर्मिती केली होती. दुसऱ्या एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी राम चौदा वर्षे वनवास भोगून आणि रावणाचा प...

इतर कँपन्यांनादेखील लस पुरवठ्यासाठी परवानगी द्या

Image
कोरोनाप्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व नागरिकांचे लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. सुरुवातीला केवळ आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धयांना लस दिली जात होती. त्यानंतर 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक व 45 वर्षांवरील विविध व्याधींनी ग्रस्त व्यक्तींचा समावेश करण्यात आला. सध्या 45 वर्षांवरील सर्वच व्यक्तींना लस देण्यात येत आहे. टप्प्याटप्याने सर्वच नागरिकांना ही लस उपलब्ध होणार आहे. मात्र सध्या अनेक भागांमध्ये लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. सद्यस्थितीत सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड व भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ह्या स्वदेशी लसी लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत. मात्र दररोज कोट्यवधी लोकांना लस देण्यामुळे तसेच लसीच्या परदेशांतील निर्यातीमुळे येत्या काळात लसीचा तुटवडा जाणवू लागणार ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. यामुळे लसीचा पुरवठा करण्यासाठी सज्ज असलेल्या इतर कंपन्यांनादेखील लसीकरणाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. यामध्ये फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन यासारख्या काही कंपन्या लसीचे उत्...

सरकारचा योग्य निर्णय

Image
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पहिली तो आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय रास्तच आहे. मागील वर्षभर शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी सर्वच मुलांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या 2020-21 हया शैक्षणिक वर्षाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यातच अंतिम परीक्षेच्या वेळेला कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून मागील वर्षीपेक्षा भयंकर लाट सध्या राज्यभर पसरलेली आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या परीक्षा घेणे व त्याचे नियोजन करणे शिक्षक व शाळांसाठी महाकठीण काम आहे. ऑनलाइन परीक्षांना खरे तर अडचण नाही मात्र अनेक मुलांना ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत सहभागी होण्यास निर्माण झालेल्या अडचणी पाहता काही मुले ऑनलाईन परिक्षांपासून वंचीत राहण्याची शक्यता आहेच. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विदयार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय स्वागतार्ह आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा एकतर पुढे ढकलाव्यात किंवा ऑनलाइन प्रक्रि...

धोरणरोग टाळा

Image
धोरणरोग टाळा हे संपादकीय (दिनांक 7 एप्रिल 2021) वाचले. सध्‍या अवघे विश्‍व कोरोनामय झालेले असल्‍यामुळे कोरोना आजार गंभीर आजारांच्‍या यादीत सर्वोच्‍च स्‍थानी आहे ही बाब खरी आहे. सरकारी मदतीपासुन खाजगी वैदयकीय विम्‍यापर्यंत सर्व प्रकारचे लाभ कोरोनावर अगदी मेहरबान आहेत. झापाटयाने बदलणा-या जीवनशैली व वातावरणामुळे नवनवे आजार उदभवत आहेत. नवा आजार आला की जुने व दुर्मिळ आजार दुर्लक्षित होतत त्‍यामुळे त्‍या रुग्‍णांना लाभ मिळण्‍यात अडचणी निर्माण होतात. जगात एकूण सात ते आठ हजार दुर्मिळ आजार अस्तित्‍वात असल्‍याचे जागतिक आरोग्‍य संघटनेचे म्‍हणणे आहे. या आजारांच्‍या एकूण ३० कोटी रुग्‍णांपैकी ८ कोटी रुग्‍ण केवळ भारतात असतील तर देशासाठी ते चिंताजनक आहे. दुर्लक्षित असलेल्‍या आजारांच्‍या रुग्‍णांना सरकारी आरोग्‍य सेवा मिळण्‍यातील अडथळे दुर करणे अत्‍यंत गरजेचे आहे. त्‍यासाठी सरकारी धोरणात बदल करणे इष्‍ट आहे. सरकारी धोरणानुसार तीन गटांमध्‍ये विभागल्‍या गेलेल्‍या दुर्मिळ आजारांचा तिसरा गट खर्चाच्‍या बाबतीत काहीसा दुर्लक्षित असुन या गटातील रुग्‍णांना उपचारांच्‍या व लाभाच्‍या प्रवाहात...

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने

Image
७ एप्रिल - जागतिक आरोग्‍य दिनाच्या आरोग्यमयी शुभेच्छा *https://kiranhegdelive.com/celebrate-world-health-day-with-cleanliness/* ७ एप्रिल हा संघटनेचा स्थापना दिवस सर्वत्र जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्थापन झालेल्या जाग‍तिक आरोग्‍य संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ १९२ देशांचा सहभागी झाले. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीतजास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरिल उपाय यावरच मर्यादित न रहाता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो. नविन वैद्यकीय शोधांना मदत पुरविणे, रोग निवारण व रोगनियंत्रण यासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, लोकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत माहिती पुरवणे, लोकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे, इत्यादि कामे या संघटनेमार्फत केली जातात. प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो; त्यासंदर्भात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चर्चा, परिसंवाद, पथनाट्य, फिल्म्स, प्रसारमध्यमे आदिमार्फत त्याविषयाबाबत लोकांत जागृती निर्माण के...