Posts

Showing posts from January, 2022

विरोध स्वाभाविक

Image
अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन हा सर्व वाद सुरु आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. २०१७ मध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं. पण दिग्दर्शक आणि निर्मात्यांमधील वादामुळे हा चित्रपट रखडला होता. पण त्यांच्यातील वाद समन्वयाने मिटल्यामुळे हा चित्रपट आता पाच वर्षांनी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ज्या पक्षात ते सक्रिय आहेत त्या राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी नेहमीच नथुराम गोडसेला विरोध करत आली आहे. त्यामुळे एका प्रकारे नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणाऱ्या ह्या त्यांच्या चित्रपटाचं समर्थन राष्ट्रवादी पक्ष कधीही करणार नाही. आता प्रश्न राहिला तो त्यांच्या अभिनेते पदाच्या कारकिर्दीचा, तर एखादी व्यक्तिरेखा साकारणे व त्या व्यक्तिरेखेच्या विचारसरणीशी सहमत असणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता कधीही त्या नकारात्मक विचारांच्या पाठीशी नसतो. मात्र हिंसेचे समर्थन करणाऱ्या विचारांच्या प्रवृत्तीला जाहीरपणे अभिनयातून न्याय देण्याचा प्रयत्न करणे ही बाबदेख...

मराठी पाट्यांचा निर्णय स्वागतार्ह

Image
दुकांनांवरील नावाच्या पाट्या मराठीत करण्याचा सरकारचा निर्णय तमाम मराठी जनांसाठी स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेची सातत्याने होत असलेली गळचेपी, मराठीतर भाषेचा होत असलेला विस्तार, बंद पडण्याच्या मार्गावरील मराठी माध्यमाच्या शाळा, पाश्चात्य संस्कृतीचे नको तितके अनुकरण यामुळे राज्यात विशेषतः शहरी भागांमध्ये मराठी नावापुरतीच उरली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मराठी संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. शेजारील राज्ये आपापल्या मातृभाषेचा कडवा पुरस्कार करत असताना महाराष्ट्रात मात्र मराठीसाठी म्हणावा तितका अट्टाहास होताना दिसत नाही. राज्यात इतर भाषिकांचे वाढलेले स्थलांतर हे कारणदेखील त्याला आहे. त्यामुळे मराठीची सातत्याने होत असलेली पीछेहाट दुर्दैवी आहे. यासाठी शासकीय व्यवहार, न्यायालयीन कामकाज, बँक व्यवहारदेखील मराठीमध्ये करण्यासाठी आगामी काळात पावले उचलणे गरजेचे आहे. दुकानांवरील नावाच्या पाट्या मराठीत करण्याचा निर्णय याची नांदी ठरावी व सरकारच्या या निर्णयाला महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा. सरकारचा हा निर्णय म्हणजे 'देर आये दुरुस्त...

क्रिकेटला अवाजवी महत्व नको

Image
गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचे मोठ्या प्रमाणावर व्यवसायिकीकरण झाले. क्रिकेटरसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे जाहिरातीसाठी योग्य जागा म्हणून या खेळात व्यापारी कंपन्या व उद्योजकांनी मोठ्या संख्येने उडी घेतली. आयपीएलसारखे मर्यादित षटकांचे सामने या खेळातील शैली व खेळाडूवृत्ती हिरावू पाहत आहेत. त्यातच बीसीसीआयमधील राजकारण, सिनेसृष्टीचाही या खेळात वाढता हस्तक्षेप यामुळे क्रिकेटचे बाजारीकरण झाले आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती नाही. मुळात आपल्या देशात क्रिकेटला अवाजवी महत्व दिले गेल्याने पारंपारिक इतर भारतीय खेळ लुप्त झाले आहेत. कबड्डी, टेनिस, फुटबॉल यांसह ऑलिम्पिक खेळाडू मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिलेले आहेत. या खेळांना म्हणावे तितके बळ न दिले गेल्याने भारतात आज क्रिकेटशिवाय दुसरे खेळ आहेत की नाही इतपत शंका येते. ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धांमध्ये अजूनही आपल्याला फार मोठे यश मिळत नाही कारण त्यातील खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. आजही ऑलिम्पिकमध्ये मोजक्या पदकांवर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे क्रिकेटची मखलाशी थांबवून देशाच्या कानाकोपऱ्यातील विवि...

विराटने खेळत राहावे

Image
विराट कोहली भारतीय क्रिकेटच्‍या आजवरच्‍या इतिहासातील सर्वात यशस्‍वी कर्णधार राहिला आहे. २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर ‘बीसीसीआय’ने कोहलीची नियुक्ती केली होती. कोहलीच्या कसोटी नेतृत्वाच्या कारकीर्दीत भारताने जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान गाठले. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे उपविजेतेपद पटकावले. विराटने ६८ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले, त्यापैकी ४० सामने भारताने जिंकले. कर्णधार म्हणून भारताने २०१५ मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली होती. २२ वर्षात प्रथमच भारताने हा पराक्रम केला. याशिवाय त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले. त्याच वर्षी भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिकाही जिंकली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अनपेक्षित पराभवानंतर विराट कोहलीने शनिवारी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) व तमाम क्रिकेट रसिकांना धक्का दिला आहे. गेल्‍या काही दिवसांपासुन कोहलीचे ‘बीसीसीआय’शी त्याचे संबंध चिघळले होते. त्‍यामुळे क्रिकेटमधील राजकारणाला कंटा...

पर्यावरण पूरक प्रजासत्ताक दिन साजरा करू या

Image
स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव तसेच भारताचा ७३वा प्रजासत्‍ताक दिन आज सर्वत्र माेठया उत्‍साहात साजरा होत आहे. प्रभात फेरी, ध्वजारोहन, वक्तृत्व व इतर क्रीडा स्पर्धांची रेलचेल, शाळा, महाविद्यालयांत पाहायला मिळेल तर आपल्या परीसरात अवतीभोवतीदेखील सर्वत्र सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची नांदी असणार आहे. कोरोनाचे सावट आपल्‍यावर अजूनही घोंघावत असल्‍यामुळे प्रजासत्‍ताक दिन साजरा करण्‍यासाठीदेखील आपल्‍याला काही मर्यादा आहेत. मात्र प्रजासत्‍ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र प्लॅस्टिकच्या ध्वजांची दयनीय अवस्था बघितली तर आपल्या बेगडी राष्ट्रप्रेमाची किव येते. प्लास्टिक हा अविघटनशील घटक असल्यामुळे निसर्गात त्याचा निचरा होत नाही. यामुळे जमा झालेले प्लास्टिक रसायनाचे रूप धारण करते व ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. निसर्गदेखील त्याला पचवू शकत नसल्याने त्याचा अतिरिक्त भार पर्यावरणावर पडतो व त्याचे देखील संतुलन बिघडते. प्रजासत्‍ताक दिनाच्या दिवशी मोठ्या अभिमानाने मिरवणाऱ्या राष्ट्रध्वजाचा इतर वेळी मात्र आपण नको तितका अवमान करतो. खरेतर प्‍लॅस्टिकजन्‍य पदार्थांपासुन बनवलेल्‍या राष्ट्रध...

विचारवंतांनी मानेंच्या पाठीशी उभे राहावे

Image
अभिनेते किरण माने यांना राजकीय पोस्ट करत असल्याचे सांगत एका वाहिनीने व निर्मात्याने त्यांचेवर मालिकेतून काढून टाकण्याची केलेली कारवाई एका जागरूक नागरिकाच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरील घाला आहे. अशा पद्धतीची कथित निरपेक्षवादी भूमिका कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवणारी आहे. किरण माने सोशल मीडियावर येणाऱ्या विविध पोस्टवर आपल्या शैलीत सातत्याने परखड लिखाण करतात. एखादी न पटणारी गोष्ट, आवडणारी-नावडणारी व्यक्ती, राजकीय पक्ष कींवा सामाजिक विषयांवर आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मग त्याचे कार्यक्षेत्र कुठलेही असो. आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत असताना आपल्या मतस्वातंत्र्याचा अधिकार जोपासताना अनेक कलावंत, खेळाडू, प्रशासनिक अधिकारी दिसतात. मात्र या कारणाने त्यांची गळचेपी करत घटनाधिकार हिरावून घेण्यासाठी दबाव निर्माण करणे हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. शेवटी मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असायलाच हवे. ते कुणाला पटत नसेल तर त्यावर दुमत व्यक्त करण्याचा अधिकारदेखील सर्वांना आहे. मात्र किरण माने राजकीय मते व्यक्त करतात म्हणून कुणाच्यातरी दबावाला बळी पडून त्यांचे...

निर्णय झाला , अंमलबजावणी कधी

Image
नवी मुंबईतील ५०० चौ फुटापर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे. नवी मुंबई हे देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर व सक्षम शहर आहे. मालमत्ता करातून मिळणारा महसूल कमी झाल्यास त्याचा फार बोजा पालिकेच्या तिजोरीवर पडणार नसल्याने हा निर्णय व्यापक जनहीताचा म्हणावा लागेल. गेल्या काही वर्षांत पालिकेच्या उत्पन्नाचे नवे स्रोत व विस्तार झालेला आहे. यामुळेच सामान्य लोकांचा अर्थभार कमी करण्यासाठी मालमत्ता करातून सूट देण्याचा पालिकेचा प्रस्ताव ऐतिहासिक आहे. मात्र येत्या काही महिन्यांत होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा राजकीय लाभ उठवण्याचादेखील पुरेपूर प्रयत्न राजकीय पक्षांकडून होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेख आहे. मात्र याचे श्रेय कुठल्याही राजकीय पक्षाला गेले तरी लोकांना थेट या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याने सर्वसामान्यांना या नाहक श्रेयवादाने काही फरक पडणार नाही. वास्तविक या शहरात अगदी उच्चभ्रू व्यक्तींपासून ते सर्वसामान्य लोक वास्तव्य करतात. सर्वसामान्य नागरिक राहत असलेल्या बहुतांश घरांचा आकार हा पाचशे चौरस फुटापेक्षा कमी आहे. त्...

भविष्यात असे प्रकार घडू नयेत

Image
पंतप्रधान हे आपल्या देशाचे सर्वोच्च पद आहे. या पदाचे संविधानिक महत्व मोठे असून त्या पदावरील व्यक्तीची सुरक्षितता ही राष्ट्रीय सन्मानाची बाब आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेली पंतप्रधानांची सुरक्षा सर्वोच्च प्रधान्याची बाब आहे. पंतप्रधान जेव्हा देशांतंर्गत प्रवास करतात तेव्हा तेथील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी राज्य व केंद्र यांची सामूहिक असते. दौऱ्याच्या काही काळ अगोदर प्रवास मार्ग व कार्यक्रम स्थळाची चोख तपासणी करण्यात येते. मात्र पंजाबमध्ये घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून पंतप्रधानांच्या सुरक्षा रचनेत अनेक उणिवा राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षेचे मोठे वलय व जाळे असतानादेखील एखाद्या अडथळ्याची कल्पना न येणे सुरक्षेत त्रुटी राहील्याचे दर्शवते. एखादे आंदोलन व धरणे अचानक उद्भवत नसते, त्याची कल्पना स्थानिक व राज्याचे पोलीस, प्रशासन किंवा महत्वाच्या व्यक्तीच्या प्रवासावेळी गुप्तचर यंत्रणांना असायला हवी. मात्र तसे न होता पंतप्रधानांचा मार्ग अचानक अडवला जाणे सुरक्षा यंत्रणांचे अपयश म्हणावे लागेल. त्यामुळे पंतप्रधानांच्या बाबतीत पंजाब राज्यात घ...

अवयवदानात पुन्हा महाराष्ट्र अग्रेसर

Image
"अवयवदान श्रेष्ठ दान"  अवयवदानामध्‍ये सर्वात अग्रेसर राज्‍य म्‍हणून केंद्र शासनातर्फे नुकताच नवी दिल्‍ली १२व्‍या भारतीय अवयवदान दिनाच्‍या निमित्‍ताने आयोजित राष्‍ट्रीय कार्यक्रमात केंद्रिय आरोग्‍य मंत्री डॉ. मनसुख मांडवीया आणि केंद्रीय आरोग्‍य राज्‍यमंत्री डॉ. भारती पवार यांच्‍या हस्‍ते महाराष्‍ट्राचा गौरव करण्‍यात आला. यामध्‍ये अवयावदानात सर्वोकृष्‍ठ कामगिरी करणारे राज्‍य म्‍हणून राज्‍य महाराष्‍ट्राचा गौरव मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. महाराष्‍ट्रामध्‍ये मागील वर्षभरात एकूण ८८ दात्‍यांनी मृत्‍यूपश्‍चात २४४ अवयवांचे दान केले. यासाठी महाराष्‍ट्रात जनजागृतीसाठी राज्‍यभर कार्यक्रम राबविण्‍यात आले. राज्‍यात अवयवदानाची चळवळीचे हे मोठे यश असुन केंद्र शासनाकडून सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकांने पुरस्‍कृत होणारे महाराष्‍ट्र हे एकमेव राज्‍य आहे. कोरोना काळातदेखील महाराष्‍ट्राने अवयवदानात केलेली ही कामगिरी दैदिप्‍यमान अशीच आहे. खरेतर याचे संपूर्ण श्रेय सर्व अवयवदाते व त्‍यांचे कुटुंबिय ज्‍यांनी मृत नातेवाईकांच्‍या अवयवदानाचा धाडसी व स्‍तुत्‍य निर्णय घेतला त...

निर्बंधांचे पालन करा

Image
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत चालली आहे. मोठया प्रमाणावर फैलावलेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध घातले जात आहेत. असे असले तरी पहिल्या दोन लाटांमध्ये लोकांमध्ये कोरोनाची असलेली दहशत आता कमी झालेली आहे. उपचाराने या आजारावर सहजपणे मात करता येत असल्याने लक्षणे जाणवल्यानंतर तातडीने चाचणी करून घेऊन औषधोपचार करून घेण्याकडे रुग्णांचा कल वाढत आहे. यामुळे जितक्या संख्येने रुग्ण भरती होत आहेत त्यापेक्षा जास्त संख्येने रुग्ण बरे होऊन येत्या काळात बाहेरदेखील पडणार आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार आता आपल्यातुन पूर्णपणे जाणे शक्य नाही. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण सापडणारच आहेत. मात्र हा संसर्ग होऊ न देणे व झाल्यानंतर योग्य उपचार वेळेत घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी लॉकडाऊनचा पर्याय समर्थनीय नक्कीच नाही. लॉकडाऊन मुळे उद्भवलेली विपरीत परिस्थिती अजूनही रुळावर येत नाहीये. उध्वस्त झालेले उद्योगधंदे, नोकरदार, शिक्षणव्यवस्था अद्याप सावरायचा प्रयत्न करतेय. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन करणे लोकांचा रोष ओढवून घेण्यास कारणीभूत ठरू शकते. त्याऐवजी घालण्यात आलेल्या ...

सकारात्मक देवमाणूस दाखवायला काय हरकत आहे?

Image
झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेचा दुसरा सिझन नुकताच सुरू झालाय. डझनभर खून करून पसार झालेला पण गावकऱ्यांच्या दृष्टीने मेलेला डॉ अजितकुमार अर्थात देवमाणूस पुन्हा त्याच गावात राजस्थानी बनून साक्षात्कार झाल्याप्रमाणे राजस्थानी पत्नीसह परतलाय. त्याला मंगलच्या कुटुंबासह गावकऱ्यांनीदेखील ओळखले आहे. मात्र तो स्वतः अजितकुमार असल्याचे मानायला अजून तयार नाही. त्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये या नव्या रुपात आलेल्या देवमाणसाचे सदाचारी रूप पाहायला मिळते की पुन्हा नवे सावज शोधण्यासाठी त्याची ही खेळी आहे हे पाहायला आणखी काही भागांची वाट पाहायला लागेल. पहिल्या सीझनमध्ये दाखवण्यात आलेल्या देवीसिंगचे खरे रूप सत्यघटनेतील कथानकाप्रमाणे उघडे करण्यात आले होते. त्यावरून बरीच उलटसुलट चर्चादेखील झाली होती. त्यामुळे ह्या मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये ह्याच देवमाणसाचे गुन्हेगारी रूप न दाखवता सकारात्मक रूप प्रेक्षकांना दाखवून चांगला संदेश दिला जावा अशी अपेक्षा आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

शासनाच्या मध्यस्थीने घर खरेदीविक्री व्यवहार व्हावेत

Image
बिल्डरकडून ग्राहकांची फसवणूक होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. खाजगी बिल्डर्स हे सवलतीत, विविध ऑफर्स देऊन घर विकण्याच्या फसव्या जाहिराती करून सर्वसामान्य लोकांची उघड उघड फसवणूक करतात. कार्पेट-बिल्ट अप तसेच छुप्या खर्चाच्या जंजाळात ग्राहकांना अडकवून त्यांच्यावर अतिरिक्त भुर्दंड टाकला जातो. त्याचप्रमाणे सिडको, म्हाडा सारख्या गृहनिर्माण करणाऱ्या सरकारी संस्थांमध्येदेखील दलालांचे वाढते जाळे ग्राहकांची लूटमार करताना दिसून येते. इथे अगदी घरांच्या लॉटरीचे फॉर्म भरण्यापासून ग्राहकांची लूट सुरू होते. स्वतःचे घर विकत घेणे हे सर्वसामान्यांचे एक स्वप्न असते. यासाठी आयुष्यभर कमावलेली पुंजी घेऊन फिरणारा ग्राहक ह्या दलालांच्या व भामट्यांच्या तावडीत आयताच सापडतो. फसवणूक झाल्यानंतर मात्र पच्छाताप व वणवण नशिबी आलेले अनेक जण दिसून येतात. प्रामाणिकपणे गृहविक्रीचा व्यवसाय करणारे फार मोजके बिल्डर्स दिसून येतात. याला आळा घालण्यासाठी गृहविक्रीवर सरकारी नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. बांधकामाचा एरिया, गुणवत्तेनुसार दर व विक्री प्रक्रियेत सुसूत्रता राहील याची तजवीज संबंधित यंत्रणेने करणे आवश्यक ...

अनाथांची माय हरपली

Image
हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांच्या 'माई' बनलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने समाजसेवेतील एक आदर्श हरपला आहे. नुकतेच त्यांना 'पद्मश्री' किताबाने सन्मानित करून, केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची उचित दखल घेतली होती. मानवतेची केवळ भाषा न करता, ती कृतीतून साकारणाऱ्या सिंधुताई खऱ्या अर्थाने 'अनाथांच्या आई' होत्या. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत, आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभे केलेले काम प्रशंसनीय आणि वंदनीय आहे. त्यांची कहाणी महाराष्ट्राला काही नवीन नाही. खुद्द त्यांच्या भाषणांतून, त्यांच्यावरील लेखनांतून आणि चित्रपटातून ते सर्वांसमोर गेले आहे. सिंधुताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे. कोवळ्या वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा... पन्नास-साठच्या दशकात भारतातील बहुतेक महिलांची कहाणी अशीच असे. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे जन्मलेल्या सिंधुताईंची कथा सुर...