वाहतूक व्यवस्थेतील गैरप्रकार रोखणे गरजेचे
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना पावती न फाडता आर्थिक 'तडजोड' करून सोडून देण्याचे प्रमाण मध्यंतरीच्या काळात मोठया प्रमाणावर वाढले. यामुळे आरटीओ विभागाची फार मोठी बदनामीदेखील झाली आहे. कुठल्या तरी कारणाने वाहने थांबवुन त्यांना भला मोठा दंड आकारला जातो व त्यानंतर वाहनचालकांशी मध्यस्थी करत दंडापेक्षा कमी रक्कम व तीदेखील विना पावतीची घेऊन त्यांना सोडून देण्यात येते. प्रत्येक वाहनचालकाला अशा परिस्थितीचा अनुभव कधी ना कधी आलेला आहे. त्यामुळे आरटीओबद्दल फार चांगली भावना जनमानसात नक्कीच नाही. यामध्ये पारदर्शकता यावी म्हणून काही महिन्यांपूर्वी एखाद्या वाहनचालकाने वाहतुकीचा नियम मोडला तर त्याला रस्त्यातच दंड न करता त्याच्या गाडीचा व गाडीच्या नंबरचा फोटो काढून त्याला दंडाची रक्कम भरण्याचा आदेश थेट त्याच्या राहत्या पत्त्यावर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला व हा प्रयोग बऱ्याच अंशी सफलदेखील झाला. यामुळे वाहनधारक आपल्या वाहनांची व वाहतूक नियम पाळण्याची कटाक्षाने काळजी घेऊ लागले. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी चालकांना अडवून त्यांच्याकडून तोडपाणी करत दंड वसूल करण्याचे प्रकार घडताना दिसतात. माल...