Posts

Showing posts from September, 2023

प्रतीक्षा ऐरोली नाट्यगृहाची

Image
नवी मुंबईतील नाट्यरसिकांसाठी वाशी अथवा ठाणे हे दोनच पर्याय सध्या उपलब्ध आहेत. नवी मुंबईची वाढती लोकसंख्या व विविध सामाजिक, राजकीय उपक्रम यांमुळे वाशी येथील नाट्यगृह अपुरे पडत आहे. तसेच दिघा, ऐरोली भागातील नाट्यप्रेमींना ठाणे व वाशीतील नाट्यगृहे काही प्रमाणात गौरसोयीची आहेत. यासाठी १२ वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन ऐरोलीमध्ये नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला. नाट्यगृहाच्या कामाला सुरुवातही झाली. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे नाट्यगृहाचे काम सुरू होऊन थांबले. दहा वर्षांनंतर मागील वर्षी पुन्हा नाट्यगृहाच्या उभारणीला पुन्हा सुरुवात झाली. मात्र तरीदेखील हे काम अत्यंत संथगतीनेच सुरू आहे. सुरुवातीला या नाट्यगृहासाठी असणारा ३५ कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च आता जवळपास ७० कोटींवर गेला आहे. ऐरोलीत सेक्टर ५ मध्ये सिडकोकडून भूखंड घेऊन २०१४-१५ साली सुरू झालेले व रखडलेले या नाट्यगृहाचे बांधकाम मागील सप्टेंबर महिन्यात पुन्हा सुरू झाले आहे. आतापर्यंत नाट्यगृहाच्या इमारतीचे दोन स्लॅब उभारून झाले आहेत. तीन मजली इमारतीचे ८६० आसनक्षमता असलेले हे नाट...

सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा

Image
सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याच्या मुद्द्यावरून गेले काही दिवस महाराष्ट्रात मोठे रणकंदन सुरू आहे. सरकारी सेवेची आस लावून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी हा मोठा धक्का आहे. शासकीय नोकरी म्हणजे आर्थिक सुबत्ता व स्थैर्य प्राप्त करण्याचे साधन असा समज आहे. त्यामुळे सरकारी नोकरभरतीकडे राज्यातील तरुणांचा वाढता कल आहे. म्हणूनच दोन चार हजार रिक्त जागांसाठी दहा लाखांपेक्षा अधिक बेरोजगार अर्ज करत आहेत. त्याचप्रमाणे सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. अनेक प्रशासकीय विभागांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम व मनुष्यबळ यांतील तूट भरून काढण्यासाठी कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे कंत्राटी मनुष्यबळाची संकल्पना राज्यात नवी नाही. मात्र सरकारी पदांवर थेट कंत्राटी अधिकारी व कर्मचारी बसवणे संयुक्तिक ठरणार नाही. यामुळे जबाबदाऱ्या, कर्तव्य व प्रामाणिकपणा कितपत टिकून राहील यात शंका आहे. कंत्राटी अधिकारी ठराविक काळापुरता नियुक्त करण्यात येणार असल्याने कामाप्रति त्याचे समर्पण राहणार न...

अवयवदान प्रत्यारोपण प्रक्रिया - डॉ अरुण यादव

Image
अवयवदान (कॅडेव्हर/मृत)- प्रत्यारोपण- प्रक्रिया                अवयव प्रत्यारोपण हि एक मोठी शस्त्रक्रिया असून त्याला सामाजिक,नैतिक,आर्थिक व कायदेशीर अशा अनेक बाजू आहेत. या सर्व प्रक्रियेत अवयव प्राप्तकर्त्या रुग्णांना व अवयव दात्यांना आणि त्यांच्या परिवाराला मदत व्हावी म्हणून केंद्र शासनाने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-१९९४ अंमलात आणला आहे भारतात मानवी अवयवदान व प्रत्यारोपणाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र हे नेहमी अग्रेसर राहिलेले राज्य आहे.मुंबई पुण्या पाठोपाठ नागपूर,औरंगाबाद, कोल्हापूर,सोलापूर आणि नाशिक अशा ठिकाणीसुद्धा आता चांगल्या प्रकारे अवयव प्रत्यारोपणाच्या ऑपरेशनची सुविधा निर्माण होऊ लागली आहे. मानवी उपचाराकरिता तसेच मानवी अवयवांची व्यवसायिक विक्री होऊ नये याकरीता मानवी अवयव काढणे,जतन करणे, प्रत्यारोपण करणेकरीता भारत सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-१९९४ लागू केला आहे.केंद्र शासनाने दि. ४ फेब्रुवारी १९९५ अन्वये राजपत्रातील अधिसूचनेद्वारे हा कायदा अंमलात आणलेला आहे. महाराष्ट्र शासनानेही त्याच दिवशी हा कायदा राज्यात लागू केलेला...

गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक देखावे सकारावेत

Image
दरवर्षी गणेशोत्सव आला की महिनाभर आधी गणेशोत्सव मंडळांना गणेशमंडपासाठी सजावटीचे वेध लागतात. साधारणतः महिना दीडमहिना अगोदर ह्या सजावटीना सुरुवात होते. गणेशभक्तांना आकर्षित करण्यासाठी नवनवे देखावे साकारण्यात येतात. गणेशोत्सव मंडळ जितके मोठे तितकी तेथील आरासदेखील मोठी असते. मात्र हिंदूंच्या ह्या पवित्र उत्सवात साकारले जाणारे हे देखावे समाजप्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे असे वाटते. उत्सव कालावधीत सर्व स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने गणेशदर्शन व देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडत असल्याने प्रबोधनात्मक देखाव्यांच्या माध्यमातून मोठी जनजागृती करता येईल. यासाठी गणेशमंडळांनी पुढाकार घेऊन ज्वलंत सामाजिक प्रश्न घेऊन देखावे साकारायला हवेत. व्यसनमुक्ती, गुटखाबंदी, स्त्रीभ्रृण हत्या, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक, हुंडाबळी, पाणी वाचवा, वृक्षारोपण, अवयवदान, पार्किंग व रहदारी नियम अशा विविध विषयांवर जनजागृती केल्यास या उत्सवाचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होईल आणि सामाजिक जनजागृतीचे समाधानदेखील आयोजकांना लाभेल. आजची तरुण पिढी सोशल मीडिया, व्हिडिओ गेमस्, युट्युब व इंटरनेटच्या मायाजालात अडकून पडली आहे. बौद...

दहीहंडीच्या खेळाची मजाच न्यारी

Image
दहीहंडीच्या खेळाची मजाच न्यारी,  गोविंदा पथकांचा सराव लय भारी ।। थरांवर थर, मनोऱ्यांवर मनोरे,  गोपाळांचा खेळ पाहताना दंग सारे ।। गोविंदांची सुरक्षा अन आयोजकांचा थाट,  बंदोबस्ताने सरळ होते पोलिसांची पाठ ।। न्यायालयाचे आदेश अन सरकारची बंधने,  तरीही नाही थांबली आपल्या सणांची स्पंदने ।।  पाऊस आणि मानवी मनोऱ्यांचा मनोहारी खेळ,  कृष्ण लीला आणि थरांचा मात्र बसत नाही मेळ ।। गोविंदाचे वय झाले चौदा - सोळा,  उंचावरील गोविंदा पाहून उठतो पोटात भीतीचा गोळा ।।  सणांवरील बंधने म्हणे आता सहन होत नाहीत,  पण बालगोपाळांच्या जीवाची किंमत त्याच्या कुटुंबालाच माहीत ।। गोविंदानो,अतिउत्साहाने देऊ नका नियमांना फाटा,  खेळाचा रसभंग होऊन उघडतील मृत्यूच्या वाटा ।। व्यसन आणि नशेपासून अंतर राखा,  खेळ आणि संस्कृतीचा निर्मळ आनंद चाखा ।। उत्सवाची शान अन सभ्यतेचा सन्मान,  सुरक्षा नियम पाळून बाळगा हिंदूत्वाचा अभिमान ।। वैभव मोहन पाटील  घणसोली नवी मुंबई

ग्रामीण साहित्यिक योगेश गोतारणे यांच्या "आगोठच्या बाता" या कुणबी बोलीभाषेतील कथासंग्रहाचे प्रकाशन

Image
ग्रामीण साहित्यिक योगेश गोतारणे यांच्या बहुप्रतिक्षित _"आगोठच्या बाता"_ या कुणबी बोली भाषेतील कथासंग्रहाचे प्रकाशन शेती करणारा तो कुणबी, कुणब्यांच्या सांस्कृतिक वाटचालीचा लिखित ठेवा जपण्याचे काम हा कथासंग्रह करेल  -  विश्वनाथ पाटील, कुणबी सेना प्रमुख      वाडा तालुक्यातील गातेस गावचे योगेश गोतारणे यांच्या बहूप्रतिक्षित "आगोठच्या बाता" या कुणबी बोली भाषेतील कथासंग्रहाचे आज (ता.३ )  प्रकाशन झाले. नॅशनल स्कूल कुडूस येथे रंगलेल्या या कार्यक्रमास साहित्यिक, प्रकाशक तथा जोशी बेडेकर काॅलेज ठाणे येथील मराठी विभाग प्रमुख डाॅ. संतोष राणे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, नॅशनल कॉलेजचे संस्थापक मुस्तफा मेमन, चित्रकार सतिश खोत  आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ कला समीक्षक लक्ष्मण पाटील यांनी भूषविले.           विजय जोगमार्गे यांच्या रंगतदार प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक खऱ्या अर्थाने कुणबी संस्कृतीचा उलगडा करून दाखवणारे ठरेल अशी प्रतिक्रिया मुस्तफा मेमन यांनी दिली.       ...

गोरगरिबांना सरकारी रुग्णालयांचाच आधार

Image
महानगरपालिका व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे बहुतांश रुग्ण हे गरीब, गरजू व मध्यमवर्गीय असतात. खाजगी रुग्णालयांत उपचारांचा महागडा खर्च परवडत नसल्याने सरकारी रुग्णालये गरिबांसाठी आज आधार बनलेली आहेत. मोफत व अल्प दरांमध्ये सर्व प्रकारचे औषधोपचार होत असल्याने सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळे साहजिकच ह्या रुग्णालयांवर रुग्णभार वाढत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीत, आयसियू बेड भरलेले असतात तर बऱ्याच रुग्णालयांत जमिनीवर बेड टाकून उपचार करण्याचीदेखील पाळी रुग्णालयांवर येते. सरकारी रुग्णालयांत तुलनेने सोयी, सुविधा, सेवा यांच्या बाबतीत थोडी तडजोड करावी लागत असली तरी अनेक सरकारी रुग्णालये क्षमतेपेक्षा अधिक भार वाहत असंख्य गोर गरीब रुग्णांचा आधार बनलेली आहेत हेदेखील तितकेच खरे आहे. सरकारी निधीचा अधिकाधिक वापर ह्या रुग्णालयांवर करून तेथील सुविधा अधिक परिपूर्ण व बळकट करायला हव्यात याबाबत दुमत नाही मात्र आज ग्रामीण व शहरी भागांमध्ये सर्वदूर पसरलेल्या खाजगी रुग्णालयांच्या उपचार शुल्कावरदेखील नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे. रु...