Posts

Showing posts from July, 2021

समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या मालिका

Image
टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या बहुतांश मराठी मालिकांची पातळी कमालीची घसरत चालली आहे. कौटुंबिक वादविवाद, विवाहबाह्य संबंध, सूड उगवण्याच्या भावनेतून कोणत्याही थराला जाणारी पात्रे या सर्वाचा दर्शकांच्या मनावर कोणता परिणाम होत असेल याचा विचार करताना कुणीही दिसत नाहीत. चित्रपट व वेबसिरीज यांचीदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. विकृतीला प्रोत्साहन देणाऱ्या अशा चित्रीकरणातून काय साध्य करायचेय तेच कळत नाही. वाचलेल्या गोष्टी एकवेळ लक्षात राहत नाहीत, परंतु पाहिलेल्या गोष्टी दीर्घकाळ स्मरणात राहतात. त्यामुळे केवळ टीआरपी साठी सुरू असलेल्या विकृत व समाज बिघडवणाऱ्या मालिकांचे भविष्यात गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. एका मराठी मालिकेच्या प्रोमोमध्ये ट्रेन प्रवास करणाऱ्या एका मुलाच्या हातावर, एका विकृत व्यक्तीने सेफ्टीपिन टोचली. प्रसंग इथेच थांबत नाही, मुलाचा रॉडवरचा हात सुटतो आणि तो ट्रेनमधून खाली पडतो. पुढे त्या मुलाचं काय होणार हे सर्वस्वी लेखकाच्या, दिग्दर्शकाच्या किंवा टीव्ही वाहिनीच्या मानसिकतेवर अवलंबून आहे! सूड उगवण्याच्या प्रसंगाचे रूपांतर म्हणून चित्रित केलेला हा प्रसंग ...

भटक्या कुत्र्यांना आवरा

Image
नवी मुंबईमध्ये सर्वत्र भटक्‍या कुत्र्यांनी अक्षरश उच्‍छाद मांडलेला आहे. दिवसरात्र या कुत्र्यांचा रस्त्यांवर अगदी मुक्त संचार सुरू असतो. झुंडीने फिरणारी ही कुत्री पादचाऱ्यांच्या, दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून जातात, जोरजोरात भुंकतात. लहान मुले व वृद्ध व्यक्तींना तर अंतर्गत रस्त्यांवर या कुत्र्यांच्या भीतीपोटी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. भटक्या कुत्र्यांच्या नाहक त्रासामुळे नागरिकांना व दुचाकीस्‍वारांना रात्रीच्‍या वेळी तर बाहेर फिरणेदेखील मुश्किल झाले आहे. पालिका दरवर्षी या भटक्या कुत्र्यांची संख्या व नसबंदी प्रक्रियेबाबत आकडेवारी जाहीर करते.  परंतु रस्‍त्‍यावर मुक्तपणे फिरणारा भटक्‍या कुत्र्यांचा भस्‍मासुर पाहिला पालिकेच्‍या नसबंदी क्रियेबाबत शंका येतेच पण नसबंदी केल्‍यानंतरदेखील या कुत्र्यांचा उपद्रव कमी न झाल्‍याचेच दिसुन येते. नवी मुंबई पालिका हददीमध्‍ये दरवर्षी शेकडो लोकांना श्‍वानदंश होत आहे. रात्रीच्‍या वेळी दुचाकीस्‍वारांच्‍या मागे लागल्‍याने त्‍यांचे होणारे अपघात व नागरिकांना या भटक्‍या कुत्र्यांच्‍या भुंकण्‍याने रात्रीअपरात्री होत असलेला त्रासदे...

अधिकाधिक पदके जिंकण्याची अपेक्षा

Image
जपानमध्ये एकीकडे कोव्हिडशी संघर्ष सुरु आहे, तर दुसरीकडे टोकियोमध्ये २३ जुलैपासून आंतराष्ट्रीय प्रतिष्ठेची ऑलिंम्पिक स्पर्धा सुरू होणार आहे. टोकियोमध्ये मुळात 2020 मध्ये ऑलिम्पिक होणार होतं. पण कोव्हिड 19च्या जागतिक साथीमुळे ते वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलं. आता 2021 वर्षात हे ऑलिंपिक जपानची राजधानी टोकियोमध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये 33 स्पर्धा आणि 339 इव्हेंट्स असतील आणि 42 ठिकाणी त्या पार पडतील. ऑलिंपिक स्पर्धा जवळ येत असतानाच जपानची राजधानी टोकियोमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आल्यामुळे या स्पर्धा प्रेक्षकांविना होणार आहेत. ही स्पर्धा आंतराष्ट्रीय स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते. भारताचे १२६ खेळाडू खेळांच्या विविध १८ प्रकारांमध्ये सहभागी होत असून त्यांच्याकडून देशवासियांना मोठ्या अपेक्षा आहेत. या स्पर्धेत खेळाडू निवडताना त्या त्या खेळातील सर्वोत्तम खेळाडूंची निवड ऑलिम्पिक साठी होत असते. गेल्या काही वर्षांत भारताची या स्पर्धांमधील यशस्वी कामगिरी पाहता यंदादेखील अधिकाधिक पदके जिंकण्याच्या खेळाडूंकडून अपेक्षा आहेत. कोविडच्या पार्श्वभूमी...

माणूस मोबाईलचा गुलाम

Image
माणूस मोबाईलचा गुलाम आजकाल कुठल्‍याही दिवसाची सकाळ ही मोबाईलवर हजारो शुभेच्छा संदेशांनीच सुरू होते. सण असो किंवा एखादे निमित्‍त असो, दरवेळेस संदेशांची देवाणघेवाण करण्‍याचे एकमेव माध्‍यम आज प्रत्‍येकाच्‍या हातात उपलब्‍ध आहे व ते म्‍हणजे मोबाईल. हातोहाती असलेले अँड्रॉईड मोबाईल व त्या प्रत्येक मोबाईलमधील व्हाट्सएप व फेसबुकमुळे देशातील संदेश यंत्रणा भलतीच प्रभावित झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकमेकांना प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे शुभेच्छा देण्याचा जमानाच गायब झाला आहे. प्रत्येक सणाला व विशिष्ट दिवसाच्या शुभेच्छांसाठी व्हाट्सएप हे एक प्रभावी व सोयीचे माध्यम झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातील अद्ययावत तंत्रज्ञानामुळे एसएमएस ही बाबदेखील खूप दूर झाली आहे. दररोज मोबाईलवर हजारो संदेश या व्हाट्सएपवर येतात त्यात शुभेच्छा, लेख, उपक्रम, कार्यक्रम, फोटो यांचा प्रामुख्याने समावेश असतो. मात्र इतके संदेश वाचणे व त्यांना प्रतिसाद देणे हे माझ्याच काय कुणाच्याही आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे आजकाल रिप्लाय करण्याच्या भानगडीतही कुणी पडेनासा झालाय. सर्वांनाच आता याची सवय झाल्याने प्रतिसादाची कु...

ग्रामीण भागातील आरोग्यदूत "आशा"

शासनाच्‍या आरोग्‍य विभागामार्फत आशा स्‍वयंसेविकांची नियुक्‍ती खेडोपाडी करण्‍यात आलेली आहे. आशा ही स्‍वयंसेविका असुन ग्रामस्‍थ व आरोग्‍य यंत्रणा यांच्‍यामध्‍ये जागरुकता,सुसंवाद, समन्‍वय निर्माण करण्‍याच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण सामाजिक दुवा म्‍हणून काम करत आहे. गावपातळीवर स्‍थानिक ग्रामस्‍थांमधून व ग्रामसभेव्‍दारे आशाची निवड होत असल्‍यामुळे गावक-यांशी आरोग्‍य सुसंवाद साधणे व विविध आरोग्‍य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे यासाठी आशांचे योगदान अत्‍यंत महत्‍वाचे ठरत आहे. कोविड प्रादुर्भावाच्‍या काळात आशांनी आपली भूमिका अत्‍यंत चोखपणे बजावल्‍यामुळे कोरोना नियंत्रणासाठी आशांचे योगदान दुर्लक्षित करता येण्‍याजोगे निश्‍चीत नाही. कोरोनाच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यात  कोरोना अटकावासाठी अत्‍यंत महत्‍वपूर्ण ठरलेल्‍या शासनाच्‍या महात्‍वाकांक्षी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत आशांनी दिलेल्‍या अतुलनीय योगदानामुळे ही मोहिम प्रचंड यशस्‍वी ठरली होती. यात घरोघरी जाऊन रुग्‍ण सर्व्‍हेक्षण करण्‍याची जबाबदारी आशांनी पार पाडली होती. तसेच पल्‍स पोलिओ, कुष्‍ठरोग व क्षयरोग नियंत्रण, आरोग्‍यवर्धिनी यासारखे निरन...

रोज मरे त्याला कोण रडे

Image
पावसाळ्यात मुंबईमध्ये काही ठराविक भागांत दरवर्षी पाणी तुंबते. पावसाचे पाणी खाडी, नाला, नदी वा समुद्रापर्यंत व्यवस्थितपणे वहन करणारी यंत्रणा शहरांतर्गत अस्तित्वात नसल्याकारणाने पाण्याचे नियोजन नीट होत नाही व अतिवृष्टीत सर्वत्र पाणीच पाणी होऊन जाते. अनेकांच्या घरामध्ये, दुकानांमध्ये, वाहनांमध्ये पाणी शिरते व मोठे आर्थिक नुकसान होते. डोंगरमाथ्यावर व पायथ्याशी असलेली अनेक घरे, झोपडपट्ट्या किती धोकादायक ठरत आहेत हे नुकत्याच मुंबई ठाण्यात इमारती कोसळण्याच्या व घरांवर दरड कोसळण्याच्या घडलेल्या घटनांनी स्पष्ट झाले आहे. यामुळेच ठाणे, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, शीळफाटा या भागांतील सखल व डोंगरमाथ्याशी असलेल्या भागांत लोक जीव मुठीत घेवुन वास्तव्य करत आहेत. वास्तविक, ही शहरे मोठमोठ्या महानगरपालिकांच्या अखत्यारीत येत असून सुनियोजित मानली जातात. मात्र नियोजन व संनियंत्रणाचा अभाव यामुळे गेल्या काही वर्षांत या ठिकाणी अनधिकृत बांधकामांचे प्रचंड पेव आले व वस्त्याच्या वस्त्या अधिकृतरित्या शहरातील मोकळ्या व मोक्याच्या ठिकाणी उदयास आल्या. याला राजकीय पाठबळ देखील बऱ्याच अंश...

भिवंडी वाडा रस्त्याची दुरवस्था

Image
ठाणे व पालघर जिल्‍हयाला जोडणा-या भिवंडी ते वाडा या महामार्गाची अत्‍यंत दुरावस्‍था झालेली आहे. या रस्‍त्‍यावर दररोज नि‍रनिराळया ठिकाणी अपघात होत आहेत. रस्‍त्‍यांची अक्षरशः चाळण झालेली असुन रस्‍त्‍याच्‍या मधोमध मोठमोठे खडडे पडलेले आहेत. याचा मोठा त्रास वाहनचालकांना होत असुन जीव मुठीत घेऊन या रस्‍त्‍यावर प्रवास करावा लागत आहे. वर्षानुवर्षे रस्‍त्‍याची ही दयनीय अवस्‍था अनेक लहानमोठया अपघातांना आमंत्रण देत आहे. अपघातांमध्‍ये अनेकांचे जीवदेखील गेलेले आहेत. तरीदेखील सुस्‍त प्रशासनाला जाग येत नाही. या रस्‍त्‍याची डागडुजीवर आतापर्यंत कोटयवधी रुपयांचा निधी खर्च झालेला आहे मात्र रस्‍त्‍याची गुणवत्‍ता मात्र जैसे थे आहे. पावसाच्‍या पाण्‍यात खडडयांचा अंदाज येत नसल्‍याने अनेक वाहने भर रस्‍त्‍यात अडकून पडत आहेत. यात वाहनांचेदेखील मोठे नुकसान होत आहे. या रस्‍त्‍याच्‍या दुरुस्‍तीसाठी अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आंदोलने केली आहेत. मात्र तरीदेखील निर्ढावलेल्‍या यंत्रणा त्‍याची दखल घ्‍यायला तयार नाहीत. मुंबईपासुन हाकेच्‍या अंतरावर असलेल्‍या या महामार्गाची दयनीय अवस्‍था अपघातांना व पर्या...

देशाचे औद्योगिक धोरण सुधारायला हवे

Image
या घुसखोरीचे काय हे संपादकीय(दै लोकसत्ता 19 जुलै) वाचले. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या घोषणा गेली कित्येक वर्षे आपण नुसत्या ऐकतच आलो आहोत. दिवाळीत चिनी बनावटीच्या लाईटच्या माळा, दिवे वापरले नाहीत म्हणजे चिनी मालावर बहिष्कार वगैरे टाकल्याच्या समजात कुणी राहू नये. कारण भारतीय बाजारपेठ ही चिनी वस्तूंनी पूर्णपणे व्यापलेली आहे. अगदी घरगुती वापरच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक समानापासून ते औषधांपर्यंत सर्वच वस्तू चीनमधून आयात होतात. गेल्या वर्षी तर भर कोरोनाच्या काळात चीनमधून आयात दुपटीने वाढली ही आकडेवारी स्तब्ध करणारी आहे. एकीकडून चीन सिमाभागातून भारतात घुसखोरी करत असताना भारतीय बाजारपेठेत चिनी मालाच्या आयातीचा आलेख उंचावता आहे. त्यामुळे भविष्यात भारत औद्योगिक क्षमतेसाठी चीनवर अवलंबून परावलंबी झाला तर आश्चर्य वाटू नये. याला जबाबदार आपल्या देशाचे औद्योगिक धोरण आहे. आंतराष्ट्रीय उद्योगधंद्यांना भारतात सन्मानाचे स्थान मिळत नसल्याने मोठमोठे उद्योग भारतात स्थिरावण्यास अजूनही धजावत नाहीत. त्यावर उतारा म्हणून देशांतर्गत उद्योग भरभराटीस येऊन आत्मनिर्भर वगैरे होण्याच्या वल्गना...

समान नागरी कायदा हवाच

Image
समान नागरी कायद्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. स्‍वातंत्र्योत्‍तर काळात उदभवलेल्‍या जातीय तेढींच्‍या पार्श्‍वभुमीवर या कायदयाची चर्चा यापूर्वी अनेकदा झाली. मात्र त्‍यावर म्‍हणावी तशी कृती दुर्दैवाने झाली नाही. यामागे देशातील तमाम राजकीय गणीते बिघडण्‍याची भिती असल्‍यामुळे कायदेमंडळातील कुणी या विषयाला हात घालण्‍यास राजी होत नाही. मात्र सर्वोच्‍च न्‍यायालय व दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने पुन्‍हा एकदा समान नागरी कायदयाचे समर्थन करत याला वाचा फोडली आहे. देशातील सर्व नागरिक कायदयाच्‍या दृष्‍टीने समान आहेत. समान नागरी कायदा ही देशाची गरज आहे. कायदयाप्रति विश्‍वासार्हता वाढवण्‍यासाठी त्‍याची अंमलबजावणी आवश्‍यक ठरते. त्‍यामुळे केंद्र सरकारने तात्‍काळ सर्वसमावेशक व  समाजातील सर्व घटकांतील नागरीकांना न्‍याय देणारा नागरी कायदा अंमलात आणावा. वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई

मालिकेतून पोलिसांची बदनामी नको

Image
झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. सत्य कथानकावर आधारित ही मालिका मूळ कथानकापासून भरकटत चालल्याचे वारंवार दिसून आले आहे. केवळ टीआरपी वाढवण्यासाठी मालिकेत अनेक प्रसंग, भाग अवास्तव व अवाजवी पद्धतीने घुसवलेले आहेत. एक बोगस डॉक्टर बिनबोभाटपणे अनेक खून करून ते पचवण्याचा प्रयत्न करतो. पोलिसांना त्याचे पुरावे मिळूनदेखील आरोपी स्वतःची वकिली स्वतःच करत निर्दोष सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. एसीपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याला हातोहात फसवणारा हा देवमाणूस जेलमधील हवालदार व जेलरला देखील पैशांचे अमिष दाखवून आपली मदत करायला लावतो. यात पोलीस खात्याची नको तितकी बदनामी व कमजोरी दाखवण्यात आलेली आहे जी योग्य नाही. महाराष्ट्रातील पोलीस हे सतर्क व कर्तव्यतत्पर समजले जातात. मात्र सत्य घटनेवर आधारित ही मालिका मूळ कथेला भरकटवत राजरोसपणे पोलिसांचे काढत असलेले वाभाडे नक्कीच आक्षेपार्ह आहेत. त्यामुळे पोलिसांना कमी लेखणाऱ्या या मालिकेला आता आवर घाला व खऱ्या घटनेत ज्याप्रमाणे बोगस व खुनी डॉक्टरला अटक होऊन शिक्षा झाली त्याचप्रमाणे कथेला विराम देऊन पोलिसांच्या तपास व चौक...

गणेशोत्सवात थोडी मोकळीक द्या

Image
श्रीगणेश हे हिंदूंचे आराध्य दैवत आहे. कुठल्याही शुभकार्याची किंवा चांगल्या गोष्टीची सुरुवात गणेशाच्या आराधनेने करण्यात येते. गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रात फार मोठ्या उत्साहात, जल्लोषात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. वर्षभर आपले दैनंदिन काम करण्याची ऊर्जा ह्या उत्सवातून भक्तांना मिळते. मात्र कोरोना प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून गणेशोत्सवासहित सर्वच सणांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. यंदा हा उत्सव दीड महिन्यांवर येऊन ठेपला आहे व सरकारने पुन्हा एकदा या उत्सवावर कडक निर्बंध घातले आहेत. वास्तविक कोरोनाशी गेले वर्ष दीड वर्ष मुकाबला करत असताना लोकांमध्ये आवश्यक काळजी घेण्याबाबतची जागरुकता नक्कीच निर्माण झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात फार मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करतील असे चित्र सध्यातरी दिसत नाहीत. गणेशमूर्तींची उंची कमी करण्यामागील लॉजिक तर समजतच नाही. शाडूची मूर्ती वापरण्याचे केलेले आवाहन पर्यावरणाच्या दृष्टीने ठीक आहे. मिरवणूका काढल्या तरी त्यावर गर्दीसाठी निर्बंध घालता येतील. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावनांशी निगडित गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांन...

सहकारी बँका टिकायला हव्यात

Image
सन २०१९ मध्‍ये आरबीआयने पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) निर्बंध लादल्‍याने या बॅंकेच्‍या लाखो खातेदारांच्‍या ठेवी दोन वर्षांपासुन  या बॅंकेत अडकलेल्‍या आहेत. गेल्‍या दोन वर्षांपासुन त्‍यावर कोणताही तोडगा निघत नसल्‍याने आयुष्‍यभराची कमाई या बॅंकेत ठेवलेले खातेदार अक्षरशः काकुळतीला आलेले आहेत. अनेक खातेदारांचा मानसिक व आर्थिक विंवचनेत मृत्‍यूदेखील झालेला आहे. नागरी भागात शंभरच्‍या वर शाखा असलेल्‍या या बॅंकेचे बहुतांश खातेदार सर्वसामान्‍य, जेष्‍ठ नागरीक, सेवानिवृत्‍त व छोटे व्‍यावसायिक आहेत. त्‍यामुळे पदरचे सर्व पैसे बॅंकेत अडकल्‍याने कोरोना काळात या खातदारांचे प्रचंड हाल झाले. मात्र या बॅंकेच्‍या पुनर्वसनासाठी आरबीआयने सध्‍या सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस या स्मॉल फायनान्स बँकेला पीएमसी बॅंकचे अधिग्रहण करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे पीएमसीच्या लाखो खातेदारांना दिलासा मिळणार असला तरी अधिग्रहणाची प्रक्रिया व खातेदारांच्‍या ठेवी परत करण्‍यासाठी प्‍लॅन तयार होण्‍यास अजुन मोठा विलंब लागणार असल्‍याने बॅंकेतील पैसे कधी परत मिळतील याची अदयापी शाश्‍वती नाही. प...

अधिवेशनाचा कालावधी पुरेसा असावा

Image
विधिमंडळाची अधिवेशने ही लोकनियुक्त आमदारांसाठी आपापल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी हक्काची व्यासपीठे असतात. जिल्ह्यातील, गावांतील रखडलेल्या, ज्वलंत समस्या राज्याच्या कायदेमंडळासमोर आणून त्यांची सोडवणूक करण्यासाठी अधिवेशनाचे महत्व अबाधित आहे. सर्वसामान्य लोकदेखील त्यासाठी लोकप्रतिनिधी व सरकारकडे मोठ्या आशेने पाहत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अधिवेशनाचे कामकाज मर्यादित केल्याने म्हणावी तितकी संधी लोकप्रतिनिधींना मिळत नाही व त्याचा परिणाम विकासकामांवर संभवतो. विधिमंडळात निरनिराळ्या आयुधांद्वारे आमदार आपले प्रश्न मांडत असतात. प्रश्नोत्तरे, लक्षवेधी,ठराव, सूचना यांद्वारे आपली भूमिका सभागृहासमोर मांडुन संबंधित खात्यांच्या मंत्र्यांकडून त्या प्रश्नांची सोडवणूकदेखील केली जाते. त्यामुळे राज्यातील विकासकामे, जटिल प्रश्न, शेतकरी-बेरोजगार-व्यापारी यांसह सर्वच घटकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी अधिवेशनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. अधिवेशनच्या माध्यमातुन होणारी चर्चा राज्याच्या राजकारणाला व समाजकारणाला नवी दिशा देणारी ठरत असल्यामुळे अधिवेशनाचा कालावधी पुरेसा असणे गरजेचे आहे....

लस घेतली तरच लोकलप्रवास

Image
मुंबई उपनगरीय लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी सातत्याने होत आहे. उपनगरांतील चाकरमान्यांना मुंबईकडे प्रवास करताना होणारा त्रास पाहता ही मागणी खरेतर रास्तच आहे मात्र लोकलमधील भरमसाठ गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका पाहता सरकार रेल्वे प्रवास खुला करण्यास फारसे अनुकूल नाही. मात्र विविध संस्था, संघटना व प्रवाशांकडून वाढता दबाव पाहता व रेल्वे प्रशासनाचे होत असलेले आर्थिक नुकसान पाहता येत्या काही दिवसांत काळात लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करणे अपरिहार्य आहे. मात्र यासाठी प्रवाशांचे लसीकरण ही अत्यंत महत्वाची बाब आहे. कोविडची लस घेतली असेल तरच लोकलप्रवासासाठी अनुमती देण्यात यावी. यासाठी तिकीट देताना लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात यावे. लस घेतलेली व्यक्ती बऱ्याच प्रमाणात संसर्गापासून सुरक्षित ठरते. त्यामुळे अशा व्यक्तीलाच लोकलसारख्या सार्वजनिक प्रवासात संधी देणे इष्ट ठरेल. हीच बाब मेट्रो व लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीदेखील लागू करण्यात यावी. यामुळे लसीकरणाचे प्रमाणदेखील वाढेल व लसीबाबत अधिकाधिक जनजागृती...

जागतिक लोकसंख्या दिन

Image
आज ११ जुलै, जागतिक लोकसंख्‍या दिन. सन 1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटीच्या घरात होती. सन 1987 साली हि लोकसंख्या दुप्पट म्हणजे 500 कोटी झाल्याने वाढत चाललेल्या जागतिक लोकसंख्येच्या आकडेवारीला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने 11 जुलै 1987 पासून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. आज लोकसंख्या वाढ हि केवळ कोण्या देशाची वा प्रांताची समस्या नाही तर संपूर्ण जगाची समस्या बनलेली आहे. लोकसंख्या वाढीने उदभवलेल्‍या ग्लोबल वार्मिंगची समस्या देखील प्रचंड मनस्ताप देऊ लागलेली आहे. वाढत्या लोकाद्रेकाने  व मानवी गरजांनी निर्माण केलेल्या अनैसर्गिक व तांत्रिक गोष्टींमुळे निसर्गाची भयंकर हानी होऊन निसर्गव्यवस्थेचा विस्फोट होण्याची भीतीदेखील वाढ्लेली आहे. यामुळेच जागतिक पातळीवर लोकसंख्या वाढीची गंभीर दखल घेतली जात आहे. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. भारतामधील झपाटय़ाने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी, महागाई आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू ला...

जलव्यवस्थापन अग्रक्रमाने व्हावे

Image
माणूस एकवेळ पैशाशिवाय जगू शकतो पण पाण्याविना नाही. जल म्हणजे जीवन. निसर्गाकडून मोफत मिळणारे पाणी आज कर भरून विकत घ्यावे लागते. दरवर्षी निसर्ग पावसाच्या रुपात आपल्यावर धो धो बरसत असतो. मात्र या पाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे बाराही महिने आपल्याला पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. हवा ज्याप्रमाणे संसर्गाला कारणीभूत ठरते त्याच प्रमाणे माणसाला जडणारे बहुतांश आजार हे दूषित पाण्यामुळेदेखील पसरतात हे विसरून चालणार नाही. त्यामुळे शुद्ध पाणी ही माणसाची गरज आहेच पण ते उपलब्ध करणे हे आपले नैतिक कर्तव्यदेखील ठरते. पाणी आडवा पाणी जिरवा,  जलयुक्त शिवार, शेततळी, बंधारे, या माध्यमातून पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याचा सरकारी प्रयत्न होत असला तरी त्याची म्हणावी तितकी पारदर्शक अंमलबजावणी होत नसल्याने त्याची परिणामकारकता कमीच आहे. पाण्याचा अनिर्बंध वापर, अपव्यय, दुरुपयोग टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर आपापल्या परीने पावसाच्या पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करणेदेखील काळाची गरज आहे. जलसंवर्धनासाठी सरकारी उपाययोजनांना नागरिकांच्या सहयोगाची जोड मिळाली...

नवे ई कॉमर्स धोरण कुणाच्या फायद्याचे?

Image
ऑनलाईन वस्तूंच्या विक्रीवरील सवलतींवर निर्बंध आणणारे नवे ई कॉमर्स धोरण लवकरच सरकार आणणार आहे. वास्तविक ऑनलाईन बाजारपेठा आज ग्राहकहिताच्या आहेत हे जगजाहीर आहे. त्यामुळेच पारंपरिक दुकानदारांच्या पोटात उठलेला पोटशूळ शमवण्याचा प्रयत्न राजकीय हेतूने सरकार करत असेल तर ते योग्य नाही. किमान किंमतीपेक्षा कमी भावाने लोकांना वस्तू विकणाऱ्या ऑनलाईन कंपन्या लोकांचा आर्थिक भार कमी करण्याचाच प्रयत्न करताहेत. शिवाय घरपोच डिलिव्हरी, अनेकविध पर्याय, तक्रारींची संधी ह्या गोष्टीदेखील ग्राहकहिताच्या आहेत. त्यामुळेच किरकोळ बाजारात सर्वाधिक लोकप्रिय असलेले डी मार्ट सारखे जागोजागी दुकाने थाटलेले व्यावसायिकदेखील आज ऑनलाईन बुकिंगद्वारे घरपोच सेवा देण्याकडे वळताहेत. सध्याच्या कोरोना काळात तर बाजारपेठांमधील भरमसाठ गर्दी कमी करण्याचा एकमेव पर्याय ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून उपलब्ध आहे. मुळात बाजारातील किरकोळ व्यापारी दलालांनी वलयांकित आहेत त्यामुळे एमआरपीपेक्षा कमी भावाने वस्तु विकताना ते अपवादानेच दिसतात. सध्याची साथजन्य परिस्थिती पाहता वस्तूंची ऑनलाईन विक्री सर्वांच्याच दृष्टीने सोयीस्कर...

जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाची कौतुकास्‍पद कामगिरी

Image
*जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाची कौतुकास्‍पद कामगिरी * कोरोनाकाळात गरोदर महिलांची सुखरूप सुटका करण्याची बाब सर्वात महत्वाची व प्राधान्याची आहे. आज कोरोना साथीने घातलेले थैमान सर्वश्रुत आहे. गाव, शहरांतील अनेक खाजगी व शासकीय रुग्णालये आज कोरोना रुग्णांनी व्यापलेली आहेत. इतके असूनही कोरोना रुग्णांना बेड मिळण्यासाठी सर्वांचीच मोठी तारांबळ उडते. अशात एखादी गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह झाली तर अडचणींना पारावारच राहत नाही. मग त्या महिलेचे व तिच्या कुटुंबियांचे हाल यांना सीमाच उरत नाही. मात्र तशाही परिस्थितीत काही डॉक्टर देवदूत म्हणून धावून येत असतात. त्यातल्या त्या सरकारी आरोग्य सेवेमधील डॉक्टरांप्रती असलेली जनमानसांतील उदासीनता आपल्या कृतीतून पुसण्याचा प्रयत्न काही ध्येयवेड्या सरकारी डॉक्टरांचा दिसून येतो. ही संवेदनशीलता बऱ्याचशा सरकारी रुग्णालयांमध्ये सातत्याने दिसून येते. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोविड महामारीच्या काळात अविरतपणे सेवा बजावण्याचे काम सरकारी यंत्रणा करत आहेत. दिवसरात्र रुग्णसेवेत व्यस्त असणारे अनेक डॉक्टर समाजाप्रती संवेदशीलता जपण्याचा प्रयत्न कसोशीने करता...

पालघर जिल्ह्यात मोबाईल मेडिकल सेवेचा शुभारंभ

Image
देवघर व काटी गावात (जि.पालघर) मोबाईल मेडीकल युनिट सेवेचा लाभ केंद्र व राज्‍य शासनाच्‍या सहयोगातुन राज्‍यभरात चालवल्‍या जाणा-या मोबाईल मेडिकल युनिट या उपक्रमांतर्गत राज्‍यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्‍ये ज्‍या ठिकाणी आरोग्‍याच्‍या सेवांपासून लोक वंचित राहतात अशा लोकांपर्यंत आरोग्‍याच्‍या सेवा पोहोचवण्‍यात येत आहेत. हा मोबाईल मेडिकल युनिट हा प्रकल्‍प स्वयंसेवी संस्‍थांच्‍या माध्‍यमातून चालविण्‍यात येतो. राज्‍यातील ग्रामीण भागांमध्‍ये आरोग्‍य सेवांपासून वंचित व अर्धवंचित लोकांना प्राथमिक, प्रतिबंधात्‍मक, उपचारात्‍मक आणि संदर्भ आरोग्‍य सेवा त्‍यांच्‍या गावामध्‍ये पुरविणे, अत्‍यावश्‍यक प्राथमिक आरोग्‍य सेवांसह निदानात्‍मक सुविधा पुरविणे, बालमृत्‍यु, माता मृत्‍यु दरात घट, आयुर्मान वृध्‍दी इत्‍यादीसाठी मोबाईल मेडिकल युनिटच्‍या माध्‍यमातून प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍वरुपाच्‍या आरोग्‍य सेवा व संदर्भ सेवा देणे ही उदिदष्‍टे या कार्यक्रमांतर्गत ठेवण्‍यात आलेली आहेत.  मोबाईल मेडिकल युनिटव्‍दारे प्राथमिक उपचार, संदर्भसेवा, कुटुंबनियोजन, प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्‍चात माता व बालसंग...