Posts

ताई (कविता) _ कु. ध्रुव गोतारणे

Image
ताई   तोंडाने नाय तर मी  शब्‍दांनी बोलू पाहतोय  तर आज मी पहा  कायतरी लिहू पाहतोय  लिहायलो गेलो तर  लिहू तरी काय  ताई शिवाय दुसरा  विषयच सापडला नाय  जेव्‍हा मित्रांनी सोडली  माझी साथ  तेव्‍हा ताईने फिरवला  मायेचा हात  ज्‍या ताईने माझेसाठी  केलं इतकं काय  तिच्‍याबददल वर्णन मी  करु तरी काय    जेव्‍हा जेव्‍हा नात्‍यांमुळे लागतो घरात वणवा  तेव्‍हा ताईच्‍या आवाजाने  पसरतो सर्वत्र गारवा  मित्रांमध्‍ये मी कितीही  हसून जरी वावरतो  हस-या चेह-यामागील दुःख  फक्‍त तिलाच सांगू पाहतो  शांत मला पाहून ती विचारी  ‘बंधूश्री झालंय तरी काय ?’ मी उत्‍तरतो ऋण तुझे प्रेमाचे  ‘फेडू तरी कसे काय ?’ देवा तुझे माझेवर  उपकार आहेत फार  मानलेली बहीण लावी  माया मला जिवा पाड  कवी ध्रुव गोतारणे  मु. गातेस,  ता. वाडा,  जि. पालघर

३१ मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन

Image
जागतिक तंबाखू विरोधी दिन ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा होत आहे. व्यसन कुठलेही असो, ते घातकच. मात्र तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे वाढते सेवन आज चिंतनाचा विषय आहे. आपल्या सभोवताली वावरणाऱ्या अनेक लोकांना तंबाखू, सिगरेट, मावा यासारख्या आरोग्याला अपायकारक गोष्टींचे व्यसन असल्याचे आपणास दिसून येते. या वर्षी, २०२६ मध्ये, जागतिक तंबाखू विरोधी दिनाची संकल्पना "आकर्षणाचा बुरखा फाडणे – निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणे " ही आहे. तंबाखू आणि निकोटीन उद्योग लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना आकर्षित करण्यासाठी उत्पादनांची विविध मार्ग अवलंबतात. त्याचा बुरखा फाडून अल्पवयीन मुलांना ह्या व्यसनापासून परावृत्त करणे हे या संकल्पनेचे उद्दिष्ट आहे. धुम्रपान हा अत्‍यंत गंभीर विषय असून महाविदयालयीन तरुणांमध्‍ये त्‍याचे वाढते प्रमाण चिंतेची बाब आहे. धुम्रपान हे मुख्‍यत्‍वे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांशी निगडीत आहे. या पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्‍याला जागोजागी दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्‍य पदार्थांचे धुम्रपान करणा-या लोक...

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

Image
सलग दुसऱ्या वर्षी डॉ डी बी मार्ग पोलीस दवाखान्यामार्फत शिबिराचे आयोजन  मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने डॉ. डी. बी. मार्ग पोलीस दवाखाना यांचेमार्फत  डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरासाठी डॉ. हितेश पगारे यांच्या नेतृत्वाखालील जे. जे. रुग्णालयामधील राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या ब्लड बँकेच्या टीममधील डॉक्टर व त्यांचे सहकारी यांनी महत्त्वाची भुमिका राबविली. डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन दळवी, पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत पाटील व त्यांचे सर्व सहकारी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आयोजनासाठी प्रत्यक्ष मदत करून सहकार्य केले. सदर शिबिराचे उदघाटन नागपाडा पोलीस रुग्णालयाचे पोलीस शल्य चिकित्सक डॉ. गजानन सानप यांचे हस्ते पार पडले. रक्तदानाचे सार्वजनिक जीवनातील महत्व विषद करून त्यांनी रक्तदात्याना मार्गदर्शन केले. सदर शिबिरात एकूण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उन्हाळ्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाण...

जागतिक आरोग्‍य दिन विशेष - "आरोग्यासाठी एकत्र, विज्ञानासोबत उभे राहू या"

Image
जागतिक आरोग्‍य दिन विशेष "आरोग्यासाठी एकत्र, विज्ञानासोबत उभे राहू या" ``स्वच्छतेतून आरोग्‍याकडे'' दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक आरोग्‍य संघटनेमार्फत एक घोषवाक्‍य निवडण्‍यात येते ज्‍याचा प्रचार व प्रसार जागतिक स्‍तरावर सर्वत्र करण्‍यात येतो. यंदाच्या आरोग्य दिनाचे घोषवाक्य “आरोग्यासाठी एकत्र, विज्ञानासोबत उभे राहू या” हे आहे. आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हाने पेलण्यासाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान या बाबींचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. अनेक असाध्य व्याधींवर उपचार करणे सोयीस्कर व्हावे यासाठी आधुनिक संसाधनांचा वापर अनिवार्य ठरत आहे. यामुळेच विज्ञान आणि आरोग्य यांची योग्य सांगड घालून आरोग्यदायी विश्व तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणारे यंदाचे घोषवाक्य आहे. आपल्‍या व कुटुंबाच्‍या निरोगी आयुष्‍यासाठी प्रत्‍येकाने दक्ष असणे आवश्‍यक आहे. यासाठी व्‍यक्‍तीगत स्‍वच्‍छता फार महत्‍वाची आहे. जागतिक आरोग्‍य दिनी आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने विविध उपक्रम दरवर्षी राबविण्‍यात येतात. या दिवशी स्थापन झालेल्या जाग‍तिक आरोग्‍य संघ...

श्री राम जन्मोत्सव २०२६

Image
महापे येथील राममंदिरात श्री राम जन्मोत्सव उत्साहात साजरा सालाबादप्रमाणे यंदाही श्री राम नवमी निमित्त नवी मुंबईतील महापे येथील श्री राम मंदिरात किर्तन, भजन, जन्मोत्सव व महाप्रसादाचे आयोजन श्रीराममंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. महापे येथील श्री रामांचे हे मंदिर अत्यंत जुने असून मागील ३४ वर्षांपासून येथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्वर्गीय श्री अमृत पाटील यांनी सन १९९२ साली सुरू केलेली परंपरा त्यांच्या चंद्रकांत, भगीरथ, प्रभाकर, भानुदास, देविदास ह्या त्यांच्या ५ मुलांनी आजही एकत्रितपणे त्याच उत्साहात सुरू ठेवली आहे. राम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी येथे पहाटेपासून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले होते. गेल्या २६ वर्षांपासून गुरुवर्य हभप पांडुरंग महाराज भोईर (आळंदी-देवघर) यांचे  हरिकीर्तन या ठिकाणी श्री राम नवमीच्या दिवशी आयोजित केले जाते. या वर्षीदेखील हभप पांडुरंग महाराजांचे श्री राम जन्मोत्सवावर सुश्राव्य कीर्तन झाले व त्यानंतर दुपारी १२ वाजता जन्मोत्सव...

मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने...

Image
डिजिटल युग आणि मराठी वाचन संस्कृती मराठी ही केवळ भाषा नसून एक संस्कृती आहे. अनदीकाळापासून या भाषेचे महत्व व अस्तित्व अधोरेखित आहे. मराठी भाषेमध्ये जितके साहित्य उपलब्ध आहे तितके खचितच अन्य एखाद्या भाषेत तयार झाले असणार. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक ह्या सर्वच क्षेत्रांत मराठी भाषेचे आमूलाग्र योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच मराठीला एक जागतिक वारसा लाभलेला आहे जो केवळ महाराष्ट्रपुरता सीमित नाही. भारत देशात भाषावार प्रांतरचना अस्तीत्वात आहे. याच विभागणीतून मराठी भाषकांच्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन आज अनेक वर्षे उलटून गेली आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाला गती आणि दिशा देण्यासाठीच महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. भाषावार प्रांतरचनेची उद्दिष्टच भाषांना समृद्ध करण्याची होती.  परंतु मराठी भाषा संवर्धनासाठी जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध प्रयत्न सातत्याने झाले नाहीत किंवा करण्यात आलेले प्रयत्न पुरेशा सामर्थ्याने झालेले नाहीत. म्हणूनच आज मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल चर्चा करण्याची गरज प्रकर्षाने भासत आहे. आजचे युग विज्ञ...

मुलांनो, जोमाने अभ्यास करा, पण आरोग्य सांभाळून !

Image
*मुलांनो, तब्‍येत सांभाळुन अभ्‍यासाला न्‍याय दया ! यश तूमचेच* महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा १० फेब्रुवारीपासून तर दिनांक २० फेब्रुवारीपासुन इयत्ता दहावीची परीक्षादेखील सुरु झाली आहे. दहावी व बारावीची वर्षे ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी वर्षे. त्यामुळे विद्यार्थी गेल्या काही अनेक महिन्‍यांपासुन विदयार्थी अभ्‍यासात मग्‍न आहेत. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे. राज्‍यातील १०,६६४ महाविदयालयांतील १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत ज्‍यात ७ लाख ९९ हजार ७७३ विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे, ३,८०,६९२ विद्यार्थी  कला शाखेचे, तर ३,२०,१५२ विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देत आहेत. ३३८७ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडत आहे. तसेच १६ लाख १५ हजार विद्यार्थी दहावीची परिक्षा देत आहेत. यंदा परीक्षा नियोजित वेळेपेक्षा अगोदर सुरू झालेल्या असून निकालही लवकर जाहीर होण्‍याची शक्‍यता आहे. खरेतर दहावी व बारावीची वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाची व टर्निंग पॉईंट ठरणारी वर्षे....