Posts

Showing posts from March, 2023

राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ अरुण थोरात सेवानिवृत्त

Image
रक्तसंकलन व रक्तपुरवठ्यामध्ये बजावली मोलाची भूमिका राज्य रक्त संक्रमण परिषदेमध्‍ये सहायक संचालक पदावर कार्यरत असणारे डॉ. अरुण थोरात हे नियत वयोमानानुसार काल ३१ मार्च रोजी ३२ वर्षांच्‍या प्रदिर्घ सेवेनंतर शासकीय सेवेतून सेवानिवृत्‍त झाले. मुळचे जालन्‍याचे असलेले डॉ थोरात यांचे औरंगाबाद येथील शासकीय वैदयकीय महाविदयालयात एमबीबीएसचे शिक्षण पार पडले. त्‍यानंतर त्‍यांनी अंबाजोगाई, जि. बीड येथील एसआरटीआर मेडीकल कॉलेज येथुन एमडी पॅथॉलॉजीचे शिक्षण घेतले. औरंगाबाद जिल्‍हयातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र पिशोर या आरोग्‍य केंद्रापासून त्यांनी शासकीय वैद्यकीय सेवेची सुरुवात केली. पदव्‍यूत्‍तर शिक्षणानंतर त्‍यांची नियुक्‍ती उल्‍हासनगर येथील मध्‍यवर्ती रुग्‍णालयात करण्‍यात आली. मागील पाच वर्षांपासुन राज्‍य रक्‍त संक्रमण परिषदेची धुरा त्‍यांनी यशस्‍वीपणे सांभाळली आहे. या दरम्‍यान राज्‍यातील रक्‍तसाठे, रक्‍तदान मोहिमा, रक्‍ताचा तुटवडा याबाबत उपस्थित होणा-या प्रश्‍नांवर त्‍यांनी अत्‍यंत कुशलतेने व अनुभवसंप्‍पनतेने मार्ग काढत रक्‍तदानाची चळवळ अविरतपणे सुरु ठेवली. कोरोनासारख्‍या महामारीत राज्‍याती...

महापे येथे श्री राम नवमी उत्साहात साजरी

Image
राम नवमीनिमित्त हभप पांडुरंग महाराज भोईर यांचे कीर्तन दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रामनवमीनिमित्त नवी मुंबईतील महापे येथील श्री राम मंदिरात जाऊन हरकीर्तन, पूजा, जन्मोत्सव व दर्शनाचा लाभ घेतला. महापे येथील श्री रामांचे हे मंदिर खूप जुने असून मागील ३१ वर्षांपासून येथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्वर्गीय श्री अमृत पाटील यांनी सुरू केलेली परंपरा त्यांच्या ५ मुलांनी आजही एकत्रितपणे त्याच उत्साहात सुरू ठेवली आहे याचा खरेतर खूप अभिमान वाटतो. राम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी येथे पहाटेपासून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्यात सहभागी होतात. गेल्या २२ वर्षांपासून इथे आमचे पारमार्थिक व कौटुंबिक गुरुवर्य हभप पांडुरंग महाराज भोईर (आळंदी) यांचे न चुकता हरकीर्तन याच दिवशी आयोजित केले जाते. गेल्या काही वर्षांपासून मीदेखील या कार्यक्रमाध्ये नियमितपणे सहभागी होत आहे. आज राम नवमीच्या दिवशीदेखील सकाळी मी त्यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेतला व त्यानंतर राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झालो. कीर्तन ...

एसटी भाड्यात महिलांना सवलत देण्याचा निर्णय स्वागतार्ह पण..

Image
महिला प्रवाशांना निम्म्या भाड्यात एसटी प्रवास उपलब्ध करून देण्याचा सरकारचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र सदरची सूट ही केवळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत व सर्वसामान्य महिलांसाठी असायला हवी. ज्या महिला आलिशान आयुष्य जगतात त्यांना वास्तविक एसटी प्रवासाची गरजच नाही. तसेच एसटीची आजची अवस्था पाहिली तर अगोदर एसटी प्रवास आरामदायक व सुरक्षित करण्यावर भर द्यायला हवा. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यादेखील सरकारसमोर आ वासून उभ्या आहेत. यासाठी सरकारने एसटी महामंडळाला भरीव मदत करायला हवी. असो, राज्य सरकारचा हा निर्णय राज्यातील महिलांसाठी आनंददायी असून अशाच प्रकारे आता रेल्वे, मेट्रो, विमान यासारख्या प्रवाशी वाहतुकीमध्ये महिलांना विशेष सवलती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यायला हरकत नाही. तसेच जीवनावश्यक वस्तू व गॅसच्या किमतींवरदेखील सरकारी सूट देऊन त्यांच्या किंमती आटोक्यात आणून गृहिणींचा बजेट आवाक्यात आणावा अशी अपेक्षा आहे. वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

डिजिटल भारत

Image
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या युनायटेड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) द्वारे पेमेंट करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे किरकोळ व घाऊक पद्धतीत रोखीने व्यवहार करणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. आज किरकोळ बाजारात बहुतांश लोक निरनिराळ्या यूपीआय अँपद्वारे दुकानदारांचे पेमेंट करताना दिसतात. यात रोखीचे व्यवहार दुरापास्त झालेले आहेत. ह्या डिजिटल पेमेंट पद्धतीचा लाभ जसा नागरिकांना मिळत आहे तसाच तो व्यापारी, व्यवसायिकांनाही होत आहे. आज देशातील जवळपास ७४ टक्के व्यवहार हे यूपीआय द्वारे होत आहेत जे २०२६ पर्यंत ८८ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. केवळ फेब्रुवारी महिन्यात ६.२७ लाख कोटींचे व्यवहार देशात यूपीआय द्वारे झालेले आहेत. यात दैनंदीन सरासरी व्यवहारांची संख्या ३६ कोटी रुपये आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ऑनलाइन पेमेंट वर्ग करणाऱ्यांची संख्याही वाढती आहे. नागरिकांच्या सजकतेने व ऑनलाइन व्यवहारांना चालना देण्याच्या कृतीमुळे देश खऱ्या अर्थाने डिजिटल भारत म्हणून मार्गक्रमण करत आहे.  डिजिटल व्यवहारात देशाची सुरू असलेली वाटचाल आश्वासक असून लवक...

आरोग्‍य क्षेत्रातील डिजीटल क्रांतीचे आभा कार्ड

Image
आरोग्‍य क्षेत्रातील डिजीटल क्रांतीचे आभा कार्ड  वैदयकीय उपचार दिवसेंदिवस अत्‍यंत खर्चिक व  गुंतागुंतीचे होत आहेत. नवनवीन आजारांचा शिरकाव व त्‍या अनुषंगाने बदलती उपचारपध्‍दती यामुळे वैदयकीय सेवा अधिकच किचकट होऊ पाहत आहे. यात बहुतांश रुग्‍ण वैदयकीय सेवांबाबतच्‍या संभ्रमामुळे उपचारांबाबत अनभिज्ञ असतात. यामुळे एखादया ठराविक आजारावर कुठुन उपचार घ्‍यावेत, त्‍याचा खर्च किती असेल, उपचारांचा कालावधी किती राहील, आजाराच्‍या पार्श्‍वभुमीबाबतचे अज्ञान यामुळे रुग्‍ण गोंधळलेल्‍या स्थितीत असतो. यामुळे उपचारांसाठी एकापेक्षा अधिक वैदयकीय संस्‍था व पध्‍दतींचा वापर केला जातो. यामध्‍ये आजाराचे निदान होण्‍यास व त्‍याचा इतिहास जाणण्‍यास विलंब लागतो. याचा विपरीत परिणाम गंभीर आजारांच्‍या रुग्‍णोपचारावर संभवतो. त्‍यामुळे रुग्‍णाला जडलेल्‍या एखादया दिर्घकालीन आजारावर उपचार होण्‍यासाठी प्रचंड अडचणी उदभवतात. यावर मात करण्‍यासाठी केंद्र शासनाने डिजीटल पध्‍दतीचा वापर करत प्रत्‍येक व्‍यक्‍तीची आरोग्‍याची माहिती संकलित करणारी स्‍तुत्‍य योजना अंमलात आणलेली आहे. आरोग्‍य विभागाचे महत्‍वपूर्ण उपक्रम ड...

समृद्धी बनतोय मृत्युचा सापळा

Image
समृद्धी महामार्ग सध्या वेगाशी स्पर्धा करणारा ठरत आहे. ज्या उद्देशाने या महामार्गाची निर्मिती केली गेली त्याचे मोजमाप होणे अजून बाकी असताना या मार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीय. ११ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धीचे उदघाटन झाल्यानंतर आजवर तब्बल ५३ अपघात या महामार्गावर झालेले आहेत. या अपघातांमध्ये डझनभर लोकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील गावे जवळ करणारा हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय अशी अवस्था झाली आहे. यातील बहुतांश अपघात वेगाचे नियम न पाळल्याने झाले आहेत. कारसाठी १२० तर जड वाहनांसाठी ८० किमी प्रतितासाची मर्यादा असताना या ठिकाणी वेग व लेनची शिस्त पाळली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जातो त्या जिल्ह्यातील आरटीओ विभागाने वाहतुकीचे नियम पाळले जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे व सतर्कता दाखवणे गरजेचे आहे. वाहतुकीच्या बाबतीत शिस्त आणली नाही तर अनेकांसाठी लाभदायी ठरणारा हा महामार्ग कित्येकांसाठी जीवावर बेतनारा ठरेल यात शंका नाही.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

घनसोलीत प्रशांत पाटील मित्रमंडळाच्या वतीने सन्मान

Image
घनसोलीत प्रशांत पाटील मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन नुकतेच आमदार मा श्री गणेश नाईक, मा नगरसेविका कमलताई पाटील, सुवर्णाताई पाटील यांच्या उपस्थितीत सेंट्रल पार्कमध्ये करण्यात आले होते. या प्रसंगी नवी मुंबईतील अनेक नामांकित पत्रकारांसोबतच घणसोलीतील वृत्तपत्र लेखक म्हणून घणसोली नगरीचे माजी नगरसेवक श्री प्रशांत दादा पाटील यांचे शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. तसेच यावेळी पार्कमध्ये आमदार निधीतून महिलांसाठी भव्य व्यायामशाळा उभारण्याचेदेखील आमदार श्री गणेश नाईक यांनी जाहीर केले. यावेळी स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडवणे, स्मशानभूमी उपलब्ध करणे, सेंट्रल पार्कमधील मैदानाचे भाडे कमी करणे, तरणतलाव सुरू करणे या मागण्या आमदार महोदयांसमोर करण्यात आल्या.

गुढीपाडवा

Image
चैत्र शुध्‍द प्रतिपदा अर्थात, गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. घरोघरी गुढी उभारुन हा दिवस साजरा केला जातो. समस्त मराठी जणांना आनंद वाटावा, आपल्या नवसंकल्पांची सुरुवात जेथून करावी तो सण. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. गेल्‍या काही वर्षांपासुन स्‍वागतयात्रांच्‍या माध्‍यमातुन आपल्‍या संस्‍कृतीचे दर्शन घडवले जाते. गुढ्या, पताका, ध्वज उभारण्यापासून ते मिरवणुका व सांस्कृतीक कार्यक्रमांची अगदी रेलचेल या दिवशी ठेवली जाते. अनेकजण या दिवशी सोने चांदी व इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी शुभ दिवस म्हणून करत असतात. गुढीपाडवा हा हिंदू सणांपैकी एक महत्वाचा सण आहे. गुढीपाडव्याबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. एका आख्यायिकेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हाने ह्या सृष्टीची निर्मिती केली होती. दुसऱ्या एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी राम चौदा वर्षे वनवास भोगून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्या, तोरणे उभारून रामचे स्वागत केले होते. गुढीपाडव्याचा अजून एक इतिहास असा कि शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या...

भटक्या कुत्र्यांची दहशत

Image
मुंबई व उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस अधिक फोफावत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी महापालिकांनी निर्बिजीकरण मोहीम सुरू केली असली तरी या मोहिमेच्या अपयशामुळे कुत्र्यांची दहशत वाढतीच आहे. गेल्या दोन वर्षांत भटक्या कुत्र्यांनी तब्बल एक लाख १२ हजार ७६९ मुंबईकरांचा चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर सन २०१४ ते डिसेंबर २०२२ पर्यंत तीन लाख ८८ हजार ४२० भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. यावरून मुंबईतील भटक्या कुत्र्यांची वाढत असलेली प्रचंड संख्या आपल्या लक्षात येईल. कुत्र्यांना जखम झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर देवनार येथील प्राण्यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात येते. सात दिवसांनंतर तपासणी केल्यावर प्रकृती स्थिर असल्यास आहे, ज्या ठिकाणांहून आणले त्या ठिकाणी पुन्हा सोडण्यात येते. कुत्र्याने चावा घेतलेल्या व्यक्तीला रेबीज होण्याचा धोका असतो. त्यामुळे चावा घेतल्यानंतर तातडीने इंजेक्शनचा कोर्स करणे आवश्यक असते. दुर्लक्ष केल्यास संबंधिताच्या जिवावर बेतू शकते. निर्बिजीकरण न केलेली कुत्र्याची एक मादी एका वेळेस चार पिलांना जन्म...

नव्या विषाणूची चिंता

Image
लोकांना कोरोनाचा विसर पडत जनजीवन सुरळीत होत असताना पुन्हा एका नव्या व्हायरसने सर्वांच्या चिंतेत भर टाकली आहे. H3N2 या व्हायरसचा प्रसार सध्या जोरात होत असून देशभरात आतापर्यंत २ जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या 'H3N2' या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिला आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्य सरकारांना सतर्क राहण्याच्या आणि वाढत्या संसर्गावर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. वातावरण बदलांमुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यात आता या नव्या विषाणूने चिंता वाढवली आहे. संसर्गाने पसरणाऱ्या ह्या विषाणूचा प्रभाव मोठा असल्याने सार्वजनिक प्रवास व कार्यक्रमांमध्ये काळजी घेण्याची गरज भासू लागली आहे. मास्कचा वापर आपल्याला ह्या संसर्गापासून दूर ठेवू शकतो. त्यामुळे सार्वजनिक स्थळांवर वावरताना मास्कचा वापर करणे हितावह आहे. त्यामुळे भविष्यात या विषाणू बाधित रुग्णसंख्या वाढ...

सकारात्मक हेतूने चित्रपटांना अनुदान

Image
ऐतिहासिक चित्रपटांना गेल्या काही वर्षांपासून दर्शकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद दिलासादायक आहे. त्यामुळेच या श्रेणीतील अनेक चित्रपट चांगले यश मिळवत आहेत. ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात समाज घडवण्याचे कार्य करणाऱ्या व सामाजिक विषयांवरील चित्रपटांना १ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. वाद विवाद, प्रेमप्रकरणे, भांडणे, गुन्हेगारीतील रहस्य व अश्लीलतेकडे झुकत चाललेल्या चित्रपटसृष्टीला पुन्हा समाजप्रबोधनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाचा हा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह म्हणावा लागेल. चित्रपट आज केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेला नाही तर ज्ञान व प्रबोधनाचे उत्तम माध्यमही आहे. समाज घडवण्यास मोलाचा हातभार लावलेल्या महान व्यक्तींवर चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांच्या आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांच्या निर्मितीसाठी शासन अर्थसहाय्य देणार असल्याची बाब स्वागतार्हच आहे. मात्र अशा प्रकारच्या ऐतिहासिक चित्रपटांच्या कथानकावरून अलीकडच्या काळात उद्भवलेले वाद चिंतेची बाब आहे. त्यामुळे ऐतिहासिक घटना दाखवणाऱ्या चित्रपटांची सत्यता तपासणारी यंत्रणादेखील ...

नैसर्गिक उपचारांचे गुणकारी आरोग्य केंद्र

Image
स्नेहलता निसर्गोपचार केंद्र  आरोग्यासाठी एक आवाज, निसर्गाच्या सानिध्यात शनिवारी पनवेलनजीकच्या स्नेहलता निसर्गोपचार केंद्रास भेट देण्याचा योग आला. निसर्गोपचार ही पद्धती तशी आपल्या समाजात फार दृढ नाही. मात्र निसर्गनियम झुगारून केलेल्या वर्तनामुळे जडलेल्या व्याधी दूर करण्यासाठी थकलेले लोक अखेरचा उपाय म्हणून ह्या कमी खर्चिक, नैसर्गिक संसाधन वापराच्या व सोप्या पद्धतीच्या निसर्गोपचाराकडे वळत आहेत. यासाठीच निरोगी शरीरासाठी स्नेहलतासारख्या निसर्गोपचार केंद्राचे महत्व आगामी काळात नक्कीच वाढणार आहे. शांतीवनच्या कुष्ठरोग निवारण समितीच्या जवळपास ७५ एकर विस्तीर्ण जागेवर पसरलेला हा परिसर कमालीचा शांत, नैसर्गिक व मानसिक शांतता देणारा आहे. ८०च्या दशकामध्ये कुष्ठरोग पीडित रुग्णांची संख्या वाढती असताना संस्थेने यातील काही एकर जागा रुग्णांवरील उपचारासाठी विकत घेतली व शासनाकडून मिळालेल्या उर्वरित जागेवर सध्या कुष्ठरोग उपचार केंद्र, वृद्धाश्रम, आधार केंद्र, आदिवासी आश्रमशाळा, बालवाडी, गौशाला, निसर्गोपचार केंद्र यांसारखे उपक्रम सुरू आहेत. संस्थेच्या कार्याबद्दल जाणून ...

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

Image
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यातील गरीब, गरजू व दुर्बल घटकांपर्यंत मोफत व परिणामकारक आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्‍य सुविधा जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपलब्ध व्हाव्यात यासाठी देशभरासह महाराष्ट्रातदेखील 'आरोग्यवर्धिनी केंद्र' ही योजना राबविण्यात येत असून राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व शहरी भागातील नागरी आरोग्य केंद्रांचा या योजनेच्या माध्यमातून कायापालट करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यभरातील हजारो सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये महत्वपूर्ण व गरजेच्या आरोग्य सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून याद्वारे रुग्णांना आपल्या जवळपासच्या शासकीय दवाखान्यातच सर्व प्रकाराचे उपचार मिळू लागले आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता 'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेची आखणी व नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आहे. आपला दवाखाना हा उपक्रम म्...