Posts

Showing posts from November, 2023

एकाधिकारशाही संपवा

Image
मराठी मतांचे विभाजन करून महाराष्ट्रातील कट्टर मराठीवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न राज्यात सुरू आहेत. यासाठी राजकीय पक्षांसोबतच मराठी लोकांनादेखील एकमेकांपासून विभागले जात आहे. पक्षांच्या दावेदारीवरून न्यायालयीन लढाया सुरू झाल्यात. राजकीय पक्षांच्या फाळण्यांचे यशस्वी प्रयोग झाल्यानंतर सध्या मराठा - ओबीसी वाद पेटवला जात आहे. वास्तविक, मराठी मतदारांमध्ये फूट पडून त्यांची एकगठ्ठा मते ठराविक राजकीय पक्षाला मिळू नयेत व अमराठी मतदारांचे वर्चस्व राजकीय पटलावर निर्माण व्हावे यासाठी हे उद्योग सुरू असल्याचा संशय येतो. विकासाच्या प्रश्नांवर निवडणुका लढण्याचे सोडून एकमेकांची उणिधुनी काढण्यात राजकीय नेते व्यस्त आहेत. येत्या काळात लोकसभा, विधानसभेबरोबरच अनेक वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात उभे राहणाऱ्या उमेदवारांना पक्ष म्हणून नव्हे तर लोकांनी व्यक्ती पाहून मतदान करा. वर्षानुवर्षे चालत आलेली राजकीय पक्षांची एकाधिकारशाही आगामी निवडणुकांमध्ये संपवून सुशिक्षित, प्रामाणिक, पारदर्शक, समाजाप्रती संवेदनशील, अभ्यासू व लोकांच्या प्रश्नांची जा...

पराभवाने खचू नका, सर्वोक्तृष्ठ खेळ करा !

Image
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीचा आलेख सातत्याने उंचावत आलेला आहे. यंदाच्या विश्वचषकामध्येदेखील अंतिम सामन्यापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने न भूतो अशी कामगिरी करून दाखवली. फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अनेक विश्वविक्रम मोडीत काढले. यात प्रामुख्याने विराट कोहलीचे कौतुक करावेच लागेल. कामगिरीतले सातत्य टिकवून ठेवत त्याने विश्वचषक स्पर्धा गाजवली. अंतिम सामन्यात भारताचा झालेला पराभव हा खेळाचाच भाग आहे. गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात ऑस्ट्रेलियन खेळाडू सरस ठरल्याने त्यांनी विजय संपादन केला. उलट भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात अनेक चुका केल्या. भारतीय संघाच्या धावा रोखण्यात प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरले. केवळ चांगल्या फलंदाजी व गोलंदाजीनेच सामना जिंकता येत नाही तर क्षेत्ररक्षण व झेल किती महत्वाचे असतात हे या सामन्यातुन पुन्हा दिसून आले. जय पराभव हा खेळाचाच भाग आहे. त्यामुळे सलग १० सामने जिंकल्यानंतर फायनलपर्यंत पोहोचलेल्या मातब्बर संघाकडून ११ व्या सामन्यात पराभूत होणे यात आश्चर्य अजिबात नाही. मात्र विश्वच...

सुदृढ आरोग्यप्रति जागरुकतेचा संदेश देणारी मॅरेथॉन

Image
दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो नवी मुंबईकरांच्या सहभागातून पाम बीच रोडवर आज २६ नोव्हेंबर रोजी स्वच्छ नवी मुंबईचा नारा देत हाफ मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ह्या स्पर्धेत यंदाही मी सहभाग घेत भल्या पहाटे धावण्याचा आनंद घेतला. कार्यालयीन सहकारी डॉ सुभाष घोलप, डॉ डी वाय पाटील रुग्णालयाचे डॉ लोंढे हेदेखील सोबत होते. नवी मुंबई मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री महेंद्र कोंडे व लेखन क्षेत्रातील आमचे आदर्श पत्रकार राजेंद्र घरत सर यांचीदेखील बऱ्याच दिवसांनी या कार्यक्रमात भेट झाली. मोराज सर्कल ते नेरुळ सिग्नलपर्यंत हाफ मॅरेथॉन आम्ही पूर्ण केली. पहाटे काही वेळ पावसानेही हजेरी लावली. सुदृढ आरोग्यासाठी चालण्याचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम आजच्या धकाधकीच्या जीवनात किती महत्वाचा आहे हे या मॅरेथॉन मधील हजारो नवी मुंबईकरांच्या उपस्थितीने दाखवून दिले. जेष्ठ नागरिक संघ, तृतीयपंथी संस्था व अनेक स्वयंसेवी संस्थानीदेखील यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आज बैठ्या कामामुळे व आरामदायक जीवनशैलीमुळे मणके, सांधे, पाठदुखीच्या असंख्य व्याधी उद...

व्यर्थ ठरली दुर्मिळ भेट

Image
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कॅलिफोर्निया येथील यूएस - चीन शिखर बैठकीनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा हुकूमशहा असा उल्लेख केला आहे. चिनचे सत्‍ताधीश जिनपिंग यांना हुकुमशहा संबोधुन अमे‍रिकेसारख्‍या महासत्‍तेचे अध्‍यक्ष बायडेन यांनी आपल्‍या बाल बुध्‍दीचे दर्शन घडवले. वास्‍ताविक आज जगात चिन व अमेरीका हे दोन्‍ही देश माहासत्‍ता म्‍हणून ओळखले जातात. युध्‍दजन्‍य परिस्‍थीतीत या दोन देशांचे पाठबळ अत्‍यंत महत्‍वाचे ठरते. त्‍यामुळे या दोन देशांच्‍या प्रमुखांची भेट संपूर्ण जगासाठी उत्‍सुकतेचा विषय ठरते. जगामध्‍ये घडत असलेल्‍या प्रमुख घडामेडी, युक्रेन युध्‍द, गाझा संघर्ष, कोरोनानंतरची परिस्‍थीती, वातावरणातील बदल, जागतिक मंदी, रोजगार यासारख्‍या विषयांवर या दोन सत्‍ताधिशांमध्‍ये चर्चा अपेक्षित होती. मात्र बायडेन यांनी ‘हुकुमशाहीने’चर्चेलाच पुर्णविराम दिला. त्‍या तुलनेत जिनपिंग यांची भूमिका संयमशील वाटली. शीतयुद्ध किंवा कोणत्याच युद्धात चीनला रस नाही, विस्तारवादाचे आमचे धोरण नाही, कोणत्याही देशाच्या प्रगतीच्या आड यायचे नाही ही त्‍यांची भूमिका चीनबाबत पसरत चाललेले दुषित...

सचिन तेंडुलकर व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी

Image
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर अनावरण करण्यात आले. भारतीय क्रिकेटला आंतराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देणाऱ्या सचिनच्या संपूर्ण कारकिर्दीची साक्ष देणारा हा पुतळा आहे. मुंबईत वानखेडेवर बसवण्यात आलेला हा पुतळा अनेक नवोदित क्रिकेटपटूंना नवस्फूर्ती व प्रेरणा देणारा ठरणार आहे. ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये  ३४,३५७ धावा करत सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतके आणि १६४ अर्धशतके केली आहेत. इतकी शतके ठोकणारा तो एकमेव खेळाडू आहे. एक दिवसीय सामन्यांत १८,४२६ आणि कसोटीत १५,९२१ धावांसह सचिनच्या नावावर दोन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा आहेत. वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा आणि २०० कसोटी सामने खेळणारा तो पहिला खेळाडू आहे. २०११ मध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग आहे. मुंबई इंडियनकडून खेळताना काही काळ त्याने आयपीएल मध्येदेखील कारकीर्द गाजवली. क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम कामगिरी करताना सर्वसाधारण राहणीमान व मराठमोळ्या विचारसरण...

नावांच्या रुपात गावांचे अस्तित्व

Image
नावांच्या रुपात गावांचे अस्तित्व टिकून ट्रान्स हार्बर मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. सकाळ सायंकाळ ठाण्याहून वाशी व पनवेलच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या प्रवाशांच्या मोठ्या गर्दीत धावत आहेत. ठाणे बेलापूर पट्ट्यातील मोठमोठ्या आयटी कंपन्या, कारखाने व या परिसरात वाढलेली लोकवस्ती यामुळे या मार्गावरील रहदारी वाढलेली आहे. ठाणे व ऐरोली रेल्वे स्थानकांमध्ये असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झालेले आहे. या स्थानकाचा लाभ दिघा व ऐरोली परिसरातील तसेच एमआयडीसीतील मोठया प्रमाणावरील प्रवाशांना होणार आहे. मात्र या स्थानकाला दिलेल्या नावामुळे वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झालेली होती. अशातच केंद्राकडून दिघा गाव या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे मात्र स्थानकाचे उद्घाटन कधी होणार याबाबत संभ्रम अजूनही कायम आहे. सन २०१६ मध्ये रेल्वे स्थानकांच्या कामाचे भूमिपूजन झाले. २०१८ मध्ये स्थानकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली, पण गुगल तसेच महसूलमध्ये नोंद असणाऱ्या दिघे नावाचा फलक प्रस्तावित रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी लावण्यात आल्याने स्थानिकांनी दिघेऐवजी...

ऑनलाइन शुभेच्छांची दिवाळी

Image
*ऑनलाईन शुभेच्‍छांची दिवाळी*  दिवाळी म्‍हटली की फराळ, फटाके, भेटवस्‍तू, आप्‍तभेटी, शुभेच्‍छापत्रे, शुभेच्‍छासंदेश अशा गोष्‍टी आपसुकच डोळयासमोर येतात. मात्र आजकाल नात्‍यांमधलेही ऋणानुबंध कमी होत चालल्‍याने पूर्वी दिवाळी सणासाठी एकत्र येणारा कुटुंबकबिला फार अपवादानेच दिसुन येतो. कौटुंबिक स्‍नेहमिलनाचा उत्‍सव म्‍हणून दृढ असलेली दिपावली सणाची ओळख आता केवळ शुभेच्‍छांपुरतीच मर्यादित राहिल्‍याचे दिसुन येत आहे. दिवाळीसह सर्वच सणांच्‍या बाबतीत थोडयाफार फरकाने हि परिस्‍थीती दिसुन येते.  आजकाल दररोज सकाळी उठून मोबाइल हातात घेतला की जवळपास ४०० ते ५०० मेसेजेस व्हाट्सअप वर दिसतात. त्यातील दिवाळी शुभेच्छांचेच ३०० ते ४००. शुभेच्छा द्याव्या पण किती ? मोबाईल, फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर मुळे आजकाल कुणी आप्तेष्ट वा मित्रमंडळींना फोन वगैरे करण्याच्या भानगडीत पडेनासाच झालाय. डायरेक्ट शुभेच्छा मेसेज द्वारेच दिल्या जातात व स्विकारल्यादेखील जातात. काल लोकलमध्ये बसल्याबसल्या असे मेसेज व्हाट्सअप वर चाळत होतो तर काही मेसेज चक्क शेकडो वेळा रिपीट झाल्याचे, तोच तोच मेसेज पुन्हा पुन्हा...

नभ रंग दिवाळी अंक

Image
*मरावे परी अवयवरुपी उरावे* मना मानवा तू, मनाचे सुनावे । मरावे परी, अवयवरुपी उरावे ।। जगी श्रेष्ठ दान, असे रक्तदान । परि सर्वश्रेष्ठ, अवयव दान ।। दानाकडून जाऊ, कृतज्ञतेकडे । अवयवदानाने, मन समृद्धीकडे ।। एक एक अवयव, मिळे गरजवंता । पीडा हरी मिळे, आशीर्वाद दाता ।। निकामी अवयव, त्यासी पुसावे । महत्व अवयवांचे, जनासी कळावे ।। मानवी जीव असे, लाख लाख मोला । मिळे अवयवदाने, हर्ष पुनर्जन्माचा ।। कायदा आला, अवयव प्रत्यारोपणाचा । कायद्याने करा, संकल्प अवयवदानाचा ।। जिवंत पणी असो की, मृत्यू अखेर । दान सख्ख्या नात्यांत, नको बाहेर ।। लिव्हर, फुफ्फुस, स्वादुपिंड, मूत्रपिंड । जिवंतपणी होते या, अवयवांचे दान ।। नेत्र, त्वचा अन, अस्थींचे दान । करा रे तुम्ही, मृत्यूनंतर दान ।। रक्ताच्या नात्यातच, होते हे दान । आई-वडील, पती-पत्नी, भाऊ, बहीण ।। व्यवहार नको ह्या, अवयव दानात । कायद्याने व्हाल, शिक्षेस पात्र ।। असंख्य रुग्ण असती, दानाच्या प्रतीक्षेत । अवयवदानाने निर्मे, नवजीवन त्यांच्यात ।। राहा मरणोत्तर, जिवंत जगतात । दान अवयवांचे, सदैव ऋणात ।। चला जागृतीचा, वसा हाती घेऊ । गैरसमज दानाचे, चला दूर करू ...

वृत्तपत्रलेखक वैभव मोहन पाटील यांना मशाल गौरव पुरस्कार प्रदान

Image
वृत्तपत्रलेखक वैभव मोहन पाटील यांना मशाल गौरव पुरस्कार प्रदान विविध क्षेत्रांमधे आदर्शवत कामगीरी करणाऱ्या  समाजातील गुणीजनांना ठाणे - पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय ठरलेल्या मशाल या वृत्तपत्रातर्फे 'मशाल गौरव पुरस्कार' देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. वृत्तपत्रलेखक श्री वैभव मोहन पाटील यांना वृत्तपत्रलेखनातील अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मशालच्या २९ व्या वर्धापनदिनानिमीत्त गुरुवार दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी शहापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या समारंभामधे सदरच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते मा प्रकाश पाटील, शहापुरचे मा आमदार पांडुरंग बरोरा, हभप कैलास म निचिते, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संजय निमसे, रंजना ताई उधळ, मशालचे संपादक शरद पाटील, विद्याताई फर्डे, परिसरातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. शहापुरच्या सुख समृद्धी नर्सरी मध्य...

सण दिवाळीचा

Image
सण दिवाळीचा दिवाळीची चाहूल आनंदाची लहर  घराघरांत येई हर्षाचा मोहर लक्ष्मीच्या पावलांनी कुटुंब सुखावते गोडधोड पदार्थांनी घर प्रसन्न होते बच्चेकंपनीची धमाल जेष्ठांचीही साथ दिवाळीची गंमत करू एक साथ  लक्ष्मीपूजनाची तयारी पाने फुलांनी सजवू चला साकडे देवीला  समाधानासाठी घालू  धनत्रयोदशीची आरास  मनी घेऊनीया ध्यास सुखसंपन्नता नांदो अन राहो लक्ष्मीचा वास  नरकचतुर्दशी ते भाऊबीज दिन दिवाळीच्या उत्सवी आनंदाची वाट जावो देवा सर्वांच्या त्या दारी वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

प्रदूषणाबाबत जागरूकतेची गरज

Image
प्रदूषण हा विषय अत्यंत गंभीर व दुर्लक्ष करण्याजोगा नक्कीच नाही. शहरी भागांत आढळणारी ही समस्या आता ग्रामीण भागातही डोके वर काढू लागली आहे. ज्या गोष्टींमुळे पर्यावरणाला व मानवी आरोग्याला त्रास होतो ती गोष्ट प्रदूषणाच्या व्याख्येत बसते. आज बेसुमार वाहनांमुळे तसेच बांधकामे, खोदकामे, रस्‍ते दुरुस्‍ती यांमुळे होत असणारे वायू प्रदूषण व नद्यांमधील जलप्रदूषण ही समस्या अत्यंत घातक ठरू पाहत आहे. वाढत्या लोकसंख्येला आळा घालणारे कोणतेही तंत्र किंवा उपाययोजना आज अंमलात आणण्यात येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या लोकसंख्येची गरज म्हणून प्रचंड संख्येने वाहने सर्वत्र वाढली आहेत. छोट्या छोट्या शहारांतदेखील हजारोंच्या संख्येने धावणाऱ्या ह्या वाहनांमुळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी उंचावली आहे ज्याचा थेट व विपरीत परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. प्रदूषण हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असल्याने त्याविषयी महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागरूक असणे गरजेचे आहे. मात्र वाहनसंख्या व जलप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कारखानदारिवर अंकुश आणण्याचे प्रयत्न फार अपवादानेच होताना आढळतात...

प्रदूषणाचा विळखा नवी मुंबईलाही

Image
ट्रान्स हार्बर मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. सकाळ सायंकाळ ठाण्याहून वाशी व पनवेलच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या प्रवाशांच्या मोठ्या गर्दीत धावत आहेत. ठाणे बेलापूर पट्ट्यातील मोठमोठ्या आयटी कंपन्या, कारखाने व या परिसरात वाढलेली लोकवस्ती यामुळे या मार्गावरील रहदारी वाढलेली आहे. ठाणे व ऐरोली रेल्वे स्थानकांमध्ये असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झालेले आहे. या स्थानकाचा लाभ दिघा व ऐरोली परिसरातील तसेच एमआयडीसीतील मोठया प्रमाणावरील प्रवाशांना होणार आहे. मात्र या स्थानकाला दिलेल्या नावामुळे वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झालेली होती. अशातच केंद्राकडून दिघा गाव या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे मात्र स्थानकाचे उद्घाटन कधी होणार याबाबत संभ्रम अजूनही कायम आहे. सन २०१६ मध्ये रेल्वे स्थानकांच्या कामाचे भूमिपूजन झाले. २०१८ मध्ये स्थानकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली, पण गुगल तसेच महसूलमध्ये नोंद असणाऱ्या दिघे नावाचा फलक प्रस्तावित रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी लावण्यात आल्याने स्थानिकांनी दिघेऐवजी दिघा असे नाव देण्याची मागणी रेल्वे प्र...

प्रदूषणाने जीवन होईल असह्य

Image
प्रदूषण हा विषय अत्यंत गंभीर असून दुर्लक्ष करण्याजोगा नक्कीच नाही. ज्या गोष्टींमुळे पर्यावरणाला व मानवी आरोग्याला त्रास होतो ती गोष्ट प्रदूषणाच्या व्याख्येत बसते. आज मोठया प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे, तोडकामे, मेट्रो, रस्ते, नाले यांच्या कामांमुळे हवेच्या प्रदूषणात भरमसाठ वाढ झाली आहे. मुंबईसह उपनगरांतील हवेच्या गुणवत्तेत कमालीची घट झाली असून त्यामुळे अनेक लोकांना श्वसनाचे विकार जडलेले आहेत. स्वच्छ शहर आणि राहण्याजोग्या शहरांच्या यादीत देशात तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावणारे नवी मुंबईसारखे शहरदेखील हवेच्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. नवी मुंबईची हवा देशात दिल्लीपेक्षा अतिशय वाईट असल्याचे सफर या संस्थेनेदेखील नोंदवले आहे. पावसाळ्यानंतर नवी मुंबईत हवेचा दर्जा प्रचंड खालावला आहे. नवी मुंबईत सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाकरिता शेकडो मातीचे ट्रक रस्त्यावर धावत असतात. तसेच या भागात डोंगरावरील मातीचे खणन सुरू आहे. शहरात सुरू असणारे इमारतींचे बांधकाम, विमानतळाच्या पायाभरणीकरिता केले जाणारे खोदकाम यामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. त्यातच संध्याकाळी...

राज्यात स्थानिकांना संधी मिळायला हव्यात

Image
मराठा आरक्षणावरून सध्या राज्यभरात रान उठलेय. शिक्षण व नोकरी मिळवण्यासाठी गुणवत्ता असूनही केवळ आरक्षणामुळे मराठा समाजातील गुणवंत मुले इतरांच्या मागे पडतात वा त्यांना आर्थिक सवलती मिळत नाहीत ही बाब कुणालाही नाकारता येणार नाही. मात्र मुळात शिक्षण संस्था व नोकऱ्यांमध्ये राज्यात उपलब्ध होणाऱ्या किती जागा राज्यातील मुलांना मिळतात हा संशोधनाचा विषय ठरेल. भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्र हे मराठीबहुल राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र राज्यात बहुतांश ठिकाणी परप्रांतीयांनी आपले बस्तान बसवल्याचे दिसत असून अनेक व्यवसाय, खाजगी नोकऱ्यांमध्ये त्यांचे प्रस्थ दिसून येईल. आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक गुणवत्तेच्या आधारे ते विविध क्षेत्रांत यशस्वी होत असतीलही मात्र यामुळे राज्यातील स्थानिक तरुणांच्या अनेक संधी कमी होताना दिसत आहेत हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे राज्यात उपलब्ध असणाऱ्या सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील शिक्षण, नोकरी व व्यवसायात स्थानिक तरुणांना योग्य प्रमाणात संधी उपलब्ध झाल्यास एक प्रकारचा प्रादेशिक समतोलही राखला जाईल व आरक्षणासारखा गहन विषय इतक्या बारकाईने हाताळण्याची वेळही सरकारवर येण...

भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव

Image
भटक्या कुत्र्यांचा त्रास समाजाला नवा नाही. मात्र त्याकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष अनेकांच्या जीवावर उठत आहे. काही दिवसांपूर्वी ‘वाघ-बकरी चहा’चे मालक पराग देसाई यांच्या मृत्युमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे. देसाई यांच्यासमोर अचानक आलेले कुत्रे आणि कुत्र्यासमोर अचानक आलेला माणूस यांमुळे अपघात होऊन, ‘ब्रेन हॅमरेज’मुळे त्यांचा मृत्यू झाला. देसाईंच्या मृत्यूनंतर भुंकणाऱ्या कुत्र्यांची दहशत किती आहे, तेही समोर आले. रागिष्ट असलेल्या जातीचे कुत्रे पाळण्याची सध्या फॅशन सुरू झाली आहे. अनेक देशांमधे कुत्र्यांच्या ज्या जातींना पाळण्यास बंदी आहे त्या जातिदेखील आपल्याकडे वाढलेल्या दिसतात. तसेच रस्त्यावरील फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा त्रास सर्वानाच होत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे घडणाऱ्या घटनांमागील कारणे शोधणे आणि त्या कारणांवर योग्य मार्ग काढणे अत्यंत आवश्यक आहे. कुत्री मागे लागतात, तेव्हा त्यातून वाचण्याच्या प्रयत्नांत गाडी चालकांचा अपघात होतो. दुचाकीस्वार असंख्य वेळा जखमी होतात किंवा काही वेळा त्यात जीवही जातो. लहान मुलांना चावा घेण्याच्या अनेक घटनाही समो...