Posts

Showing posts from May, 2023

चारोळी उपक्रम

Image
भारतीय साहित्य सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी जालना जिल्हा आयोजित चारोळी उपक्रम  थंडीच्या आठवणी अन पावसाची ओढ बेभरवशी ऋतूचक्राने सुर्यदेवही कोपला  ओसाड राने अन सुकलेल्या फांद्या  उन्हाच्या काहिलीने, निसर्गही तापला  वैभव मोहन पाटील

मुंबई गोवा महामार्गाचे काम गतीने पूर्ण करा

Image
समृद्धी महामार्गाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करून त्याचे लोकार्पण देखील करण्यात आले. मात्र राजधानी मुंबई व उपनगरांतील सर्वात जास्त लोकांची गावे असलेल्या कोकणात जाण्यासाठी मात्र त्यांना वर्षानुवर्षे खराब रस्त्यातुन वाट काढावी लागते. आज राज्याच्या कोणत्याही भागापेक्षा जास्त संख्येने लोक मुंबई गोवा मार्गाने प्रवास करतात. यात प्रामुख्याने कोकणी लोकांची संख्या जास्त असते. सणासुदीला, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये, विविध यात्रांसाठी दरवर्षी मुंबईत राहणारी कोकणी कुटुंबे घराकडे धाव घेतात. मात्र रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे या मार्गावर अपघात, वाहने नादुरुस्त होण्याच्या घटना नेहमीच घडतात. अशा या महत्वपूर्ण मार्गाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे मात्र कधीच पूर्ण होत नाही. पावसाळ्यात तर या मार्गाची चाळण होऊन जाते. कोकण परिसर व गोव्यासारख्या राज्याला जोडणाऱ्या या मार्गाचे काम समृद्धीसारखा उपक्रम हाती घेऊन दर्जेदार व जलद गतीने पूर्ण करण्यास काय हरकत आहे? वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई

दोन हजारांच्या अडचणीच्या व अडगळीच्या

Image
मुळात दोन हजारांच्या नोटेने लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण केला होता. इतक्या मोठ्या चलनाची नोट बाजारात आणली गेली त्यावेळी तिला मिळणारा प्रतिसाददेखील फारसा नव्हता. उलट या नोटेमुळे ठिकठिकाणी लोकांची अडचणच व्हायची. किरकोळ रकमेचे व्यवहार करणारे नागरिक व व्यापारी या नोटेमुळे बेजारच होते. त्यात अशा प्रकारच्या नकली नोटा बाजारात आल्याच्या बातम्यांनी ही गुंतागुंत अधिकच वाढली होती. त्यामुळे दोन हजाराची नोट छापण्याचा उद्देश अजूनदेखील गुलदस्त्यातच आहे. आता ही नोट बंद करण्याचा आरबीआय चा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. त्याऐवजी ५०, १००, २०० यासारख्या लहान रक्कमेच्या नोटा अधिक प्रमाणात यायला हव्यात. तसेच दोन हजारांची नोट बँकेत जमा करण्यासाठी ठराविक मुदत ठेऊ नये. लोकांना जसे जमेल तसे ह्या नोटा बँकेत जमा करण्याचे प्रावधान असावे. देशातील बहुतांश व्यवहार आज यूपीआयद्वारे डिजिटल होत असल्याने नगदी व्यवहारांचे प्रमाण बऱ्याच अंशी घटले आहे. मात्र चलनी नोटा आजदेखील किरकोळ बाजारात वापरल्या जात आहेत. डिजिटल व्यवहारांपासून दूर असणारा घटक मोठया प्रमाणावर समाजात असल्याने या नोटा चलनात येणारच मात्र दोन हजार...

नाट्यगृहांना योग्य सुविधा उपलब्ध करा

Image
रंगभूमी असो वा मालिका किंवा चित्रपट, तीनही क्षेत्रात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते भरत जाधव हे रत्नागिरीतील नाट्यगृहाच्या दुरावस्थेवरून प्रचंड संतापल्याचे मागील शनिवारी पाहायला मिळाले. भरत जाधव यांच्या 'तू तू मी मी' ह्या नाटकाचा प्रयोग सुरू असताना येथील साऊंड सिस्टम सतत बंद पडत होती. या ठिकाणी असलेले एसी देखील नादुरुस्त झाले होते. प्रयोगात सतत येणारा व्यत्यय तसेच, प्रेक्षकांची होणारी गैरसोय पाहून भरत जाधव यांनी नाट्यगृहाची अशी अवस्था असेल, तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, असा संताप व्यक्त केला. एका प्रतिभावंत मराठी कलाकाराचा हा आक्रोश स्थानिक प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. नाट्यगृहांच्या बाबतीत नेहमीच दुजाभाव केला जातो. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नाट्यकलावंतांमधूनच मोठया पडद्यावरील कलाकार घडत असतात. जिथे रिटेकला संधी नसते अशा प्रत्यक्ष रंगमंचावरील अभिनयाची अनुभूती प्रेक्षकांना देणारे नाटक चांगल्या वातावरणात कलाकारांना करायला मिळावे व नाट्यप्रेमींना पाहायला मिळावे ही माफक अपेक्षादेखील नाट्यगृहात पूर्ण होऊ शकत नसेल तर ते दुर...

डॉ भावेश वाघ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Image
शांत, संयमी, विनम्र, अभ्यासू, आरोग्यवर्धिनी योजनेचे हजरजबाबी कार्यक्रम अधिकारी डॉ भावेश वाघ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आज कार्यालयीन बैठकीनंतर सन्मा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना सवयीनुसार पुस्तकभेटीचा योगायोग साधला. डॉ भावेश यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या कार्यक्रमावर चांगली पकड जमवली आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या सक्षमीकरण, पदभरती व ब्रँडिंगमध्ये त्यांची भूमिका मौलिक राहिली आहे. कार्यक्रमासंबंधीत उद्भवणाऱ्या अडचणी, न्यायालयीन प्रकरणे, तक्रारी यांच्या बाबतीत मार्गदर्शक सूचनांना बांधील राहत त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच नियमानुसार कार्यवाहीची भूमिका घेतली आहे. सहकाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच सौहार्द, नम्रता व मदतीची भावना ठेवणारे डॉ भावेश कार्यालयातील सर्वात मितभाषी अधिकारी म्हणून ओळखले जातात. राज्यात आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य संस्थांचा कायापालट होत असताना भविष्यात या केंद्रांच्या माध्यमातून गरजू लोकांना  पारदर्शक व अधिक परिणामकारक  आरोग्य सेवा पुरविल्या जाव्यात याकरिता ते यापुढेही प्रयत्नशील राहतील अशी ...

तिर्थयात्रांच्या माध्यमातून धार्मिक स्थळांची अनुभूती

Image
आळंदीवासी हभप पांडुरंग म भोईर यांचा उपक्रम ग्रामीण भागातील लोकांना पर्यटन आणि तिर्थयात्रांचे नेहमीच अप्रूप असते. शेती व इतर कामधंद्याच्या व्यापातून सवड मिळणे मुश्किल असल्याने यात्रांचा योग फार दुर्मिळच येतो. तसेच फिरायला जायचा विचार करत असताना अनेक ठिकाणांची नावे केवळ वाचन्यात आणि एकण्यातच आलेली असतात. तिथे कसे जायचे, काय पाहायचे, तेथील महात्म्य काय याबाबत त्यांच्या मनात प्रचंड अनभिज्ञता असते. गावातील अनेक लोकांसाठी सामुदायिक वारीचा प्रसंग यापूर्वी फक्त पंढरीच्या वारीपुरता मर्यादित असायचा. मात्र आता देशभरातील विविध तीर्थक्षेत्र अनुभवण्यासाठी यात्रा काढल्या जात आहेत. अशा यात्रा खाजगी एजन्सीमार्फत किंवा व्यक्तिगतरित्या केल्यास त्या अधिक खर्चिक ठरत असल्यामुळे त्याकडे ग्रामस्थ फारसे वळत नाहीत. मात्र नफ्याचा कुठलाही उद्देश न ठेवता स्थानिक ग्रामस्थांना तीर्थयात्रा घडवून त्यांना अध्यात्मिक अनुभूती अत्यल्प शुल्कात  मिळावी यासाठी ग्रामीण भागातील काही परमार्थ प्रेमी अशा यात्रांचे आयोजन नियमितपणे करताना दिसत आहेत. त्यातलेच एक म्हणजे पालघर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे प्रसारक हभप...

खिळवून ठेवणारी नाट्यकृती

Image
मागच्या आठवड्यात गडकरीला "सफरचंद" हे अत्यंत प्रभावी नाटक पाहण्याचा योग आला. मराठी नाट्यसृष्टीतील अत्यंत कलात्मक असे हे नाट्य पाहताना सिनेमाच्या पडद्यावर नाटक पाहत असल्याचा भास झाला. अत्यंत सहजसूंदर अभिनय, सराईतपणे फिरवला जाणारा रंगमंच, चित्रीकरणाला साजेशे असे संगीत, नेत्रसुखद नेपथ्य, तितकेच प्रभावी प्रकाश संयोजन या वातावरणात नाटकाचे दोन्ही अंक कधी संपले कळालेच नाही. काश्मीर खोऱ्यातील वातावरणाचे दर्शन घडवणारे हे नाटक अनेक प्रसंगांमध्ये अक्षरशः अंगावर शहारे आणणारे आहे. जातीय भिंती बाजूला सारून माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे हे नाटक आहे. लेखिका स्नेहा देसाई यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि राजेश जोशी यांचं दिग्दर्शन असलेलं हे नाटक शंतनु मोघे, संजय जामखंडी, प्रमोद शेलार, शर्मिला शिंदें, अमीर तळवडेकर, रूपेश खरे, अक्षय वर्तक, राजआर्यन कासुर्डे या दमदार कलावंतांच्या जबरदस्त अभिनयानं मंत्रमुग्ध करणारं आहे. खुर्चीला खिळवून टाकणारी परिणामकारकता आणि जबरदस्त टीम वर्क यामुळे हे नाटक मी पाहिलेल्या आजवरच्या नाटकांमध्ये एका वेगळ्या धाटणीचे आहे एव्हढे नक्की.  वैभव मो...

नियमित व पारदर्शक कारवाई हवी

Image
महामार्गांवर होणारे बहुतांश मोठे अपघात सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीचे होतात. टूर्स ट्रॅव्हल्सच्या बसेस, टेम्पो, ट्रक, जीप या अक्षरशः बेदरकारपणे चालवल्या जातात. यांचे चालक बहुतांश प्रमाणात प्रशिक्षित व परवानाधारकदेखील नसतात. मद्यपान करून वाहने चालवणाऱ्यांची संख्याही वाढती आहे. त्यामुळे भरधाव वेगाने वाहने चालवताना त्यावरील नियंत्रण सुटते व मोठा अपघात घडतो. अशा अपघातांमधे अनेक निष्पाप बळी जातात. चालकाच्या चुकीची शिक्षा सहप्रवाशांना भोगावी लागते. अनेकांना कायमचे अपंगत्व देखील येते. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांचा हा दहशतवाद रोखायचा असेल वाहतूक विभागाने आपली भूमिका चोखपणे बजावायला हवी. वेगाने व विनापरवाना वाहने चालवणाऱ्या चालकांवर नियमित व पारदर्शक कारवाई व्हायला हवी. अशा चालकांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल व्हायलाच हवेत. मात्र घटना घडल्यानंतर कारवाई होण्यापेक्षा प्रतिबंधात्मक कारवाई करणे योग्य ठरेल. अनेक घटनांमध्ये तर चालकाचाही जीव जातो. त्यामुळे नेमकी कारवाई कुणावर करावी असा प्रश्नही उपस्थित होईल. यासाठी वाहतूक विभागाने सार्वजनिक वाहतूक सेवेवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. यासाठी चालक मालक ...

असामान्य व्यक्तिमत्वाच्या सानिध्याचे समाधान

Image
गझलनवाज पंडित भिमराव पांचाळे यांची भेट    विविध क्षेत्रातील नामवंत व्‍यक्‍तींच्‍या भेटी निरनिराळया निमित्‍ताने नेहमीच होत असतात. मात्र नुकतेच गजल क्षेत्रातील एक नामवंत व्‍यक्‍तीमत्‍व पं. भीमराव पांचाळे  यांची ते कार्यालयात काही निमित्‍ताने आले असता अनपेक्षित भेट झाली. आमचे कार्यालयीन सहकारी व कर्मचारी संघटनेचे श्री विजय बोरसे हेदेखील सोबत होते. पं. भीमराव पांचाळे हे महाराष्‍ट्रातील नामवंत गजलगायक म्‍हणून ओळखले जातात. त्‍यांचा जन्म: ३० मार्च, १९५१ रोजी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्‍यातील आष्टगाव येथे झाला. मराठी गजलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गजलसागर संमेलने आणि गजल कार्यशाळा आयोजित करत असतात. अमरावतीमध्‍ये त्यांनी नऊ वर्षं शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. वाणिज्य शाखा आणि मराठी-हिंदी भाषा साहित्य तसेच संगीत यांतील पदवी अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केले आहेत. सुरेश भटांचे गजल अभियान उत्तरोत्तर दृढ करण्यात गजलनवाज भीमराव पांचाळे यांचा मोठा वाटा आहे. मान्यवर शास्त्रीय गायनाच्या उस्तादांकडून परिपूर्ण शिक्षण घेऊनही भीमरावांनी मराठी गजल गायनाचे व्रत घेतले. त्यां...

चला पेटी शिकू या

Image
बालसंस्कार शिबिरात घेतला पेटीचा आनंद  पेटी वाजवणे ही खरंतर खूपच अवघड कला आहे मात्र नियमित सराव केला तर तुम्ही सराईतपणे ती आत्मसात करू शकता. पेटी लवकर शिकण्यासाठी स्वर ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी भरपूर सरावाची गरज आहे. अलंकार, राग, कॉर्डस यांचा सराव केल्यास, उत्तम प्रकारे रियाज केल्यास पेटी लवकर शिकता येते. तसेच पेटी शिकण्याकरता योग्य गुरु असणे महत्त्वाचे आहे. पेटी शिकण्याकरता तुम्ही ऑफलाईन, ऑनलाईन क्लास, तसेच यूट्यूब या माध्यमांचा वापर करू शकता. फक्त तुमच्याकडे पेटी असणे गरजेचे आहे. पेटी शिकणे किती दिवसात शक्य होईल हे सांगता येणे कठीण आहे, कारण आपण त्यात किती प्रावीण्य मिळेपर्यंत शिकणार आहात यावर ते अवलंबून आहे. नुकतेच आमच्या देवघर गावी बाल संस्कार शिबिरादरम्यान गेलो असता शिबिरातील पेटी पाहून ती हाताळणे मला आवरले नाही. मला पेटी वाजवता येते असे सांगण्याइतपत मला ती वाजवता येत नाही. एखादे गाणे वाजवून पाहिले तर तुटक वाटते. सराईतासारखा हात फिरत नाही. त्यासाठी अधिक वेळ क्लास आणि सराव करायला हवा होता, पण ते जमले नाही. पण आजही एखादे नवीन गाणे ऐकले की पेटीवरील बटने स्पष्ट दि...

खाजगी शाळांच्या शुल्क वाढीवर नियंत्रण कुणाचे

Image
खाजगी शाळांचे शुल्‍क दरवर्षी वाढवले जाते. दरवर्षी १५ ते २० टक्‍क्‍यांपर्यंत फी वाढवली जात असुन पालकांना नाईलाजाने हे शुल्‍क भरुन शाळांमध्‍ये किंवा पुढच्‍या वर्गामध्‍ये पाल्‍यांचा प्रवेश घ्‍यावा लागतो. काही शाळांमध्‍ये अगदी पहिलीच्‍या वर्गातील प्रवेशाचे शुल्‍कदेखील लाखाच्‍या घरात असते. सर्वसामान्‍य कुटुंबांसाठी हे भरमसाठ शुल्‍क अवाक्‍याबाहेरचे ठरत आहे. त्‍यामुळे घराजवळ शाळा असुनही अनेकदा लांबच्‍या शाळांमध्‍ये प्रवेश घ्‍यावा लागतो. अनेक खाजगी व कॉन्‍हेंट शाळा अगदी मनमानी पध्‍दतीने शुल्‍क वाढवतात. विविध सुविधांच्‍या नावाखाली पालकांचा खिसा या संस्‍थांकडून रिकामा केला जातो. परवडत असेल तर या शाळेत शिका ना‍हीतर अन्‍य शाळांचा पर्याय शोधा अशी भुमिकाही काही शाळांमार्फत घेतली जाते. याला काही ठिकाणी पालक, लोकप्रतिनिधी यांचेमार्फत विरोध केला जातो. अनेकदा स्‍थानिक राज‍कीय पुढा-यांच्‍या मदतीने शुल्‍क कमी केल्‍याचा दावाही केला जातो. मात्र काही कालावधीनंतर पून्‍हा पालकांच्‍या मागे शुल्‍कवाढीचा ससेमिरा चालू होतो. मात्र पालक व विदयार्थ्‍यांची उघड लूट करणा-या या प्रकारावर शासकीय यंत्रणेचा कुठल...

शब्द चुकला तर वाक्य बिघडते मात्र संस्कार चुकले तर आयुष्य बिघडते - वैभव पाटील

Image
मुलांना मोबाईलमधून बाहेर काढण्यासाठी बाल संस्कार शिबिरे उपयुक्त  वाडा तालुक्यात निवासी बाल संस्कार शिबिरांचे आयोजन सध्या शालेय मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये मुलांवर अध्यात्मिक संस्कार व्हावेत या हेतूने पालघरमधील वाडा तालुक्यातील देवघर व गांधरे येथे निवासी बाल संस्कार शिबिरांचे आयोजन परमार्थप्रेमींच्या माध्यमातून करण्यात आले आहे. देवघर विभाग शिक्षण प्रसारक मंडळ ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळ देवघर यांच्‍या वतीने सोमवार दिनांक १ मे ते १६ मे २०२३ या कालावधीत के जी पाटील विद्यालय देवघर येथे सलग सहाव्या वर्षी तर श्री ज्ञानोबा तुकोबा सत्संग सेवा संस्था, आळंदी सारशी (वाडा) यांच्‍या वतीने हभप राजेश महाराज बांगर यांच्‍या माध्‍यमातून गांधरे, वाडा येथील कुणबी समाज सभागृह येथे दुसऱ्या वर्षी दिनांक ४ मे ते १७ मे २०२३ या कालावधीत निवासी बाल सुसंस्‍कार शिबीरे सुरू झाली आहेत. दोन्ही शिबिरांमध्ये एकूण १२० मुले सहभागी झाली आहेत. शिबीरादरम्‍यान आचरण व अध्‍यात्मिक संस्‍कारांबरोबरोबच योगासने, सूर्यनमस्कार, टाळ, पकवाज, पेटी, अभंग, हरिप...