Posts

Showing posts from May, 2021

देवमाणूस समारोपाकडे

Image
देवमाणूस ही झी मराठीवरील मालिका एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. गेली कित्येक महिने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ह्या मालिकेचा शेवट कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्य घटनेवर आधारित ही मालिका काहीशी भरकटत चाललेली असल्यामुळे मालिकेच्या काही अवास्तव भागांमुळे तिच्यावर बरीचशी टिकादेखील झाली. मात्र लवकरच या मालिकेतील बोगस डॉक्टरचा पर्दापाश होऊन हा डॉक्टर दिव्या सिंगच्या ताब्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिव्याला डॉक्टरविरोधात बरेचसे पुरावे मिळाले असल्याने डॉक्टरच खरा देवीसिंग आहे आणि गावात घडणाऱ्या घटनांमागे त्याचाच हात आहे हे आता तिच्या लक्षात आले आहे. देवमाणूस मालिकेत एकीकडे दिव्या सिंगचा सुरू असलेला तपास तर दुसरीकडे डिंपल आणि डॉक्टर अजितच्या लग्नाची लगबग या दोन्ही गोष्टी वेग घेताना दिसत आहेत. डिंपल आणि डॉक्टरच्या या लग्नाच्या सोहळ्यातच दिव्या सिंग डॉक्टरला अटक होणार असल्याचे प्रोमोद्वारे लक्षात येत आहे. त्यामुळे मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. एवढे दिवस मालिकेतील सरू आज्जी, टोण्या, डिंपल ,बज्या, नाम्या, या सर्वांच्या अ...

*जॉय ऑफ गिव्हिंग*

Image
*जॉय ऑफ गिव्हिंग* कोरोना काळामध्‍ये अनेक सामाजिक संस्‍था व व्‍यक्‍तींनी समाजभान जोपासत गरजूंसाठी सढळ हस्‍ते मदत केली. यात जिवनावश्‍यक वस्‍तुंपासून दररोजच्‍या जेवणापर्यंत सर्व प्रकारची मदत यथाशक्‍ती करण्‍याचा प्रयत्‍न समाजातील संवेदनशील घटकांनी केला. वास्‍ताविक स्वार्थ व वैयक्तिक हितासाठी झगडणाऱ्या आजच्या दुनियेत सामाजिक बांधिलकी व माणुसकी लोप पावत चालली आहे. प्रत्येक जण इथे फक्त स्वतःपुरताच विचार करतो. यामुळे गरीब श्रीमंत दरी समाजात वाढत चालली आहे. ही दरी कमी करायची असेल समाजातील गरीब, दुर्बल व वंचित घटकांचा विचार कुणीतरी करायला हवा. त्यांच्या अपेक्षा फार नसल्या तरी जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची मदत त्यांना मिळायला हवी. यासाठी समाजातील धनाढ्य, उद्योगपती, मोठमोठ्या सामाजिक संस्था यांचेमार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहेच पण समाजभान जपणाऱ्या संवेदनशील नागरिकांचा सहभागदेखील मोठा बदल घडवू शकतो. कोरोनाने आपल्‍याला बरेच काही शिकवले आहे. पैसा, संपत्‍ती, मालमत्‍ता या बाबी क्षणभंकूर असुन या सर्वांपेक्षा व्‍यक्‍तीचे आरोग्‍य व इतरांना केलेली मदत आयुष्‍यात सर्...

गर्दीवर नियंत्रण गरजेचे

Image
राज्‍यातील कोरोना रुग्‍णांची संख्‍या हळूहळू कमी होत असल्‍याचे दिलासादायक चित्र सध्‍या दिसत आहे. मात्र मागील वर्षी आलेली कोरोनाची पहिली लाट ओसरल्‍यानंतर आलेला गाफीलपणा पुन्‍हा दाखवून परवडणारे नाही. त्‍यामुळे येत्‍या काही दिवसांमध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सर्व दैनंदिन व्‍यवहार सुरु होणार असले तरी त्‍यात उताविळपणा व अतिआत्‍मविश्‍वासपणा  महागात पडू शकतो. मागील वर्षीची कोरोना लाट वर्षअखेर ओसरल्‍यानंतर सर्व प्रकारचे दैनंदिन व्‍यवहार व जनजिवन नियमितपणे सुरु झाले. मात्र यामध्‍ये लोकांच्‍या व यंत्रणांच्‍या गाफिलपणाची मोठी किंमत कोरोनामुळे हजारो जिव गमावून चुकवावी लागली. त्‍यातून बोध घेत यावेळी प्रशासनाने तिस-या लाटेसाठी जोरदार प्रतिबंधात्‍मक तयारी केलेली असली तरी त्‍यासाठी लोकांची साथदेखील महत्‍वाची ठरणार आहे. ओसंडून वाहणा-या बाजारपेठा व रेल्‍वेगाडया हे चित्र कायमस्‍वरुपी बदलावे लागणार आहे. सर्वसामान्‍यांसाठी लोकलसेवा सुरु झाल्‍यावर पुन्‍हा एकदा गर्दीचे लोंढे रेल्‍वेगाडयांमध्‍ये दिसणार आहेत. मुंबई उपनगरीय लोकलवाहतूक हे गर्दीचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. कोरोनाच्‍या आतापर्यंत...

भावासारखा मित्र

Image
भावासारखा जिगरी मित्र  https://vaibhavmohanpatil.blogspot.com/2021/05/blog-post_11.html?m=1 * भावासारखा असा  मित्र पुन्‍हा होणे नाही * स्‍वप्‍नातदेखील वाटले नव्‍हते इतकी महाभयंकर महामारी सध्‍या कोरोनामुळे सुरु आहे. दूरवर दिसणारा कोरोना आता घराघरात येवून पोहोचला आहे. दोन महिन्‍यांपूर्वी कोरोनाच्‍या कमी झालेल्‍या भितीने लोकांना गाफील ठेवले व आज हाच कोरोना अनेक घरे उध्‍वस्‍थ करु लागलाय. मागच्‍या वर्षी मार्च महिन्‍यापासुन सुरु झालेली कोरोनाची पहिली लाट डिसेंबर अखेर ओसरतेय अशी शक्‍यता वाटत असतानाच या वर्षी पून्‍हा दुसरी लाट इतक्‍या जोरात आली की आरोग्‍य यंत्रणा अपु-या पडायला लागल्‍या. पेशन्‍टना बेड मिळत नाही, ऑक्‍सीजन नाही, व्‍हेंटीलेटर्स मिळत नाही, रेमडेसिवीर मिळत नाही अशी विदारक अवस्‍था मागच्‍या महिन्‍यात होती. यामुळे मिळेल तशी व मिळेल तिथून मदत घेण्‍याचा केविलवाणा प्रयत्‍न करताना लोक सर्वत्र दिसत होते. यादरम्‍यान अनेकांचे फोन येत होते, अजुनही येत आहेत. कुणाला अॅडमिट व्‍हायचे आहे, ऑक्‍सीजन बेड हवा आहे,आयसीयू बेड पाहिजे, कुणाला इंजेक्‍शन हवे आहे तर कुणाला लस हवी आहे. ...

प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे

Image
कोविड काळात आपल्यादेखील आजूबाजूची, नात्यातली, ओळखीची, अनोळखी, न भेटलेली पण परिचित अशा अनेक व्यक्ती अवकाळी आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्याबद्दलचे दुःख तर मनात आहेच मात्र ते मनात साठवण्यासाठी वेळदेखील मिळाला नाही एव्हढे मृत्यूतांडव अजूनदेखील सुरू आहे. येत्या काळात आणखी काय आपल्यासमोर वाढून ठेवलेय याची काणकुण कुणालाच नसेल. एखादा जवळचा नातलग गेल्याचे दुःख जेव्हढे आहे तेव्हढेच दुःख, हळहळ आपल्याला ओळखीतली एखादी व्यक्ती जग सोडून गेल्यावर होते. कोरोनाने केलेली हानी न भरून येणारी आहे. समाजातील प्रत्येक घटकाला त्याने बाधित केले आहे. पण मृत्यूची वेळ कुणावरही न ओढवो असे मात्र मनोमन वाटते. प्रत्येकाला जमेल, झेपेल तशी मदत करण्याचा प्रयत्न आपण करतो. मात्र वैद्यकीय गुंतागुंत व ईश्वर सत्तेपुढे बऱ्याचदा इलाज नसतो. गेल्या वर्षी कोरोनाकाळात विविध आजारपणांनी जवळच्या व ओळखीतल्या अनेक नातलगांनी निरोप घेतला. त्यातील अनेक कुटुंबियांच्या सांत्वनालादेखील जाता आले नाही इतकी विदारक परिस्थिती होती. मात्र यामुळे त्यांच्या जाण्याचे दुःख कमी होत नाही. यामुळे जितके दुःख होते तितकी काळजीदेखील वाटायला लागते...

लसीकरण केंद्रे कोरोनाचे हॉटस्पॉट बनू नयेत

Image
सध्या सर्वच कोविड लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. कोविन अप्लिकेशनद्वारे स्वयंनोंदणीची व्यवस्था आहे मात्र अनेक लाभार्थी लसीकरण केंद्रांवरच नोंदणी करणे पसंद करतात. त्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया लांबते व त्याचे पर्यावसन गर्दीत होत आहे. लसीकरण केंद्रांबाहेर लागलेल्या लांबलचक रांगा कोविड नियमांचे सर्रास उल्लंन्घन करणाऱ्या आहेत. सुरुवातीच्या काळात लसीकरणाच्या बाबत असलेली उदासीनता कोरोनाचा वाढता कहर पाहून संपुष्टात आलेली असून आता लोक स्वतःहुन लसीकरणासाठी उत्साह दाखवत आहेत. कोविड निर्मूलन मोहिमेतील लसीकरण हा एक महत्वाचा टप्पा असून लसीकरणासाठी लोकांचा हा उत्साह नक्कीच दिलासादायक आहे. मात्र त्यासाठी  उसळून येत असलेली गर्दी कोरोना संसर्गाला निमंत्रण देणारी आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध होणार आहे. त्यासाठी घाई गर्दी जीवावर बेतणारी ठरू शकते. लसीकरणाची राज्यातील गती पाहता सर्व नागरिकांना लस घेण्यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागेल अशीही स्थिती नाही. मुबलक प्रमाणात लसदेखील उपलब्ध होत असल्यामुळे भविष्यात तिचा तुटवडा निर्माण होईल अशी चिन्हे...

सर्वसमावेशक धोरण गरजेचे

Image
लसलकव्यास उत्तर हे संपादकीय (दै लोकसत्ता ४मे) वाचले. एव्हाना केंद्र शासनास पूरक निर्णय घेणारे म्हणून ओळख झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने लसधोरणाबाबत केंद्र सरकारची केलेली कानउघडणी न्यायव्यवस्थेची समयसूचकता दर्शवते. आज कोरोना देशात मोठ्या प्रमाणावर मृत्युतांडव घडवतोय. अशा वेळी गेल्या दोन महिन्यांपूर्वी न पटलेले लसीचे महत्व मृत्यूच्या भयाने लोकांना आता पटू लागलेले आहे. त्यातच आता 18 ते 44 या उत्साही गटाचे लसीकरण सुरू झाल्याने लसीचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी बंद असलेली लसीकरण केंद्रे नियोजनाचा अभाव दर्शवतात. आधीच लसीचा पुरवठा करणाऱ्या कम्पन्या इन मिन दोन. त्यात खरेदी यापूर्वी केंद्रआधारित होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्यांना लस उपलब्ध करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर राज्यांनादेखील निम्मी लस खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आले. पण जितकी गरज तितकी लस उत्पादन होते का हे पाहणे कुणालाही औचित्याचे वाटत नाही. त्यातच केंद्र, राज्य व खाजगी व्यावसायिकांच्या लसखरेदी दरातील तफावत केंद्राच्या लसधोरणावर बोट ठेवते. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने हे धोरण सुधारण्याची के...

अन्यथा ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे

Image
रुग्णालयांमध्ये गेल्या काही महिन्यांत घडलेल्या आग लागण्याच्या घटना नक्कीच चिंताजनक आहेत. नियमित फायर ऑडिटचा अभाव, तांत्रिक उणिवा व मानवी चुका यामुळे ह्या घटना सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये घडताना दिसून येतात. आग प्रतिबंधात्मक उपकरणे असूनदेखील त्या हाताळण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना नसल्यानेदेखील ह्या आगीच्या घटना थांबवता येत नाहीत. जुनी उपकरणे, त्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत दाखवलेला निष्काळजीपणा याचा परिपाक आगीच्या घटनांमध्ये होतो. त्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने आपापल्या अग्निशामक यंत्रणेच्या माध्यमातून रुग्णालयासारख्या संवेदनशील वास्तूंचा आगप्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने नियमित आढावा घ्यावा. त्यात उणिवा आढळून आल्यास त्या रुग्णालयाचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे व जोवर आगीच्या दृष्टीने ती इमारत सुरक्षित होत नाही तोवर वापरास परवानगी देऊ नये. आगीच्या घटनांमध्ये जाणारे निष्पाप जीव वाचवण्यासाठी ठोस प्रयत्न येत्या काळात करावेच लागतील.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

वाचकांना वैविध्य देणारे वृत्तपत्र

Image
वृत्‍तपत्र काढणे व ते चालवणे म्‍हणावे तितके सोपे राहिलेले नाही. ते चालवताना वृतपत्र चालकांची होणारी दमछाक सर्वश्रुत आहे. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये माध्‍यम क्षेत्राचा इतका विस्‍तार झालाय की वृत्‍तपत्र व्‍यवसाय त्‍यात झाकोळला गेला आहे. मुळात वृत्‍तपत्र क्षेत्र हे आर्थिक सुबत्‍ता प्राप्‍त करण्‍यापेक्षा सामाजिक उत्‍क्रांतीचे साधन म्‍हणून पाहिले जाते. मात्र अनके वृत्‍तपत्रे पुरेशा आर्थिक पाठबळाअभावी तग धरुन राहत नाहीत. त्‍यातच एखादे दैनिक नियमित स्‍वरुपात चालवणे म्‍हणजे तारेवरची कसरतच. नवी मुंबईसारख्‍या एकविसाव्‍या शतकातील नगरीत नियमित प्रसारित होणा-या दैनिक नवे शहर हया वृत्‍तपत्राची वाटचाल गेल्‍या अनेक वर्षापासुन मी जवळुन बघत आलेलो आहे. मागील विसेक वर्षांपासून मी या वृत्तपत्राचा नियमित वाचक व अलिकडला लेखक आहे. साप्ताहिकाचे रूपांतर कालांतराने दैनिकात झाले व हे दैनिक आज दररोज ताज्या बातम्या, घडामोडी, ज्वलंत व दर्जेदार लेख घेऊन वाचकांची भूक भागवत आहे. खरेतर इतकी वर्षे एखादे वृत्तपत्र स्थानिक पातळीवर चालवणे कसरतच आहे. मात्र नवे शहर ने ही कसरत पूर्ण तर केलीच पण साप्‍ताहिकाचे दैनिकात...