Posts

Showing posts from February, 2023

कळवा ऐरोली मार्गिका कधी खुली करणार?

Image
नवी मुंबईमध्ये मोठमोठ्या औद्योगिक व आयटी कंपन्यांच्या कार्यालयांमुळे कल्याण डोंबिवली कडून इथे येणाऱ्या कामगार वर्गाची संख्या मोठी आहे. तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. मध्य मार्गावरील ठाणे स्थानकात उतरून ट्रान्स हार्बर मार्गावरून त्यांना प्रवास करावा लागतो. ठाणे स्थानकातील नऊ व दहा नंबरच्या फलाटांवर यामुळे मोठी गर्दी सकाळ सायंकाळच्या वेळी पाहायला मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असणारा कळवा - ऐरोली इलेव्हेटेड मार्ग प्रत्यक्षात अवतरत नसल्याने लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेला हा मार्ग रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणामुळे रखडला असेल तर त्यामागे काय राजकारण शिजते आहे हे पाहण्याची तसदी कुणी का घेत नाही असाही प्रश्न उपस्थित होतो. नवी मुंबईत प्रवास करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाच्या अशा ह्या मार्गाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी, खासदार व विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. जलवाहतूक सुरू झाली, ऐरोली- काटई मार्ग खुला होत आहे, अलीकडेच काम सुरू झालेले दिघा स्थानकही लवकरच स...

वेग आणि मोबाईलवर हवे नियंत्रण

Image
परभणीत बाईकवरून जाताना मोबाईलवर रिल्स बनवण्याच्या नादात दोन तरुणांना प्राण गमवावा लागला तर दोघे गंभीर जखमी झाले. अशा प्रकारचे अनेक अपघात रेल्वे प्रवासात स्टंट बाजी करण्यात, समुद्र, धरणे, डोंगर, दरी खोऱ्यांच्या ठिकाणी सेल्फी किंवा लाईव्ह करण्याच्या नादात होत असतात. मोबाईल क्रांतीच्या युगात आजची तरुणाई वेगाशी स्पर्धा करू लागली आहे. सुधारलेल्या अर्थव्यवस्थेत मुलांना पालकांकडून वाहनेही सहज उपलब्ध होत असल्यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये परवाना नसताना वाहने हाकण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यात नवनवे मोबाईल हँडसेट इंटरनेटसह हाती असल्याने वाहने चालवण्याचा इव्हेंटदेखील लाईव्ह करण्याचा घातक प्रयत्न तरुणाईकडून केला जातो. त्यात वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडवले जातात. वाहतूक विभागाकडूनही यात फार मोठा हस्तक्षेप किंवा सातत्यपूर्ण व पारदर्शक कारवाई दिसून येत नाही. यामुळे अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण धक्कादायक आहे. फेसबुकसारख्या सोशल माध्यमांवर लाईव्ह व्हिडीओ दाखवण्याचे प्रावधान असल्याने प्रत्येक प्रसंगाचे इव्हेंट लाईव्ह वा रेकॉर्ड करण्याचे फॅड वाढत आहे. यातून अपघातांचे दुर्दैवी प्रकार वारंवार ...

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

Image
आरोग्य सेवा आयुक्तालयांतर्गत कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी आरोग्य भवन येथे उत्साहात पार पडल्या. मर्यादित षटकांच्या अंडरआर्म पद्धतीने खेळवल्या गेलेल्या या स्पर्धांमध्ये आरोग्य भवनमधील विविध विभागांत काम करणाऱ्या खेळाडूंनी सहभाग घेतला. एकूण आठ संघांचा सहभाग असलेल्या ह्या स्पर्धेत प्रतापगड या संघाने अंतिम विजेतेपद तर रायगड या संघाने उपविजेतेपद पटकावले. स्पर्धांमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून जितेंद्र नागवेकर, गोलंदाज म्हणून संदीप सावंत तर अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून संदेश मोरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूचा एक वाचनीय पुस्तक भेट देऊन सामनावीर म्हणून गौरव करण्यात आला. या स्पर्धांमध्ये विभागातील ७० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धांसाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ संजीवकुमार जाधव, डॉ दुर्योधन चव्हाण, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री शैलेश पाटणकर यांनी भेट दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या क्रीडा व सांस्कृतिक समिती सदस्यांनी व कर्मचाऱ्यांनी मेह...

जय जय महाराष्ट्र माझा

Image
 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या  गीताचं दुसरं आणि तिसरं कडवं आता राज्यगीत म्हणून गायलं जाणार आहे. गीतकार राजा बढे यांनी लिहिलेलं श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत शाहीर साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजात गायलेलं आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी म्हणजे १ मे १९६० रोजी दादर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे शाहीर साबळे यांनी पहिल्यांदा गायलं. आज राज्याचे राज्यगीत म्हणून त्याचा गौरव झाल्यानं या गीताला खऱ्या अर्थाने राजवैभव प्राप्त झाले आहे. देशातील १२ राज्यांना स्वतःचं असं राज्यगीत आहे, त्यात आता महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. दोन कडव्यांचे एक मिनिट 45 सेकंदाचे हे राज्य गीत असणार आहेत. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत गाताना महाराष्ट्रवासीयांचा ऊर भरून येतो. मराठी माणसांच्या या अभिमानगीताला आता महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा मिळाला आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून हा निर्णय अंमलात येणार ...

मोबाईल आणि इंटरनेट

Image
आज आपल्‍या अवतीभवती जर आपण पाहिले लहान मुलांपासुन जेष्‍ठांच्‍या प्रत्‍येकाच्‍या हातात मोबाईल आल्‍याचे दिसुन येते. इंटरनेटच्‍या मायाजालात अवघा देश गुंतला असल्‍याचे आपणास पाहायला मिळते. दररोज मोफत इंटरनेट सेवा पुरविणा-या कंपन्‍यांमधील चढाओढ व ते इंटरनेट वापरण्‍यामधील लोकांची चढाओढ यातच सर्वांचा अधिक वेळ खर्ची होत आहे. मात्र वेळ वाया जाण्‍याव्‍यतिरीक्‍त मोबाईल व इंटरनेटचा सर्वात जास्‍त परिणाम लोकांच्‍या मानसिक व शारीरीक आरोग्‍यावर होत आहे. मोबाईल व  घरगुती इंटरनेटच्या वाढत्या प्रमाणामुळे 'इंटरनेट अॅडिक्शन' अर्थात 'इंटरनेट'चे व्यसन लागण्याचे  प्रमाण वाढले आहे. या व्यसनाधीनतेचा प्रत्यक्ष संबंध मेंदूमधील रसायनांचे प्रमाण बिघडण्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंटरनेट सायबर कॅफेच्या मर्यादीत वापराऐवजी मोबाईलमध्‍ये व घरोघरी इंटरनेट घेण्याचा कल वाढत आहे. इंटरनेटचा वाढता वापर चिंतेत भर घालणारा असून, कम्प्युटर, मोबाईल अथवा तत्सम इंटरनेट पाहण्याच्या साधनांच्या प्रमाणाबाहेर वापराने चिडचिड, अतिताण आदी विकार जडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन चार वर्षांपुर्वी प्रत...

यासाठी प्रबोधन आवश्यक

Image
मोबाईल क्रांतीच्या युगात आजची तरुणाई वेगाशी स्पर्धा करू लागली आहे. सुधारलेल्या अर्थव्यवस्थेत मुलांना वाहनेही सहज उपलब्ध होत असल्यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये परवाना नसताना वाहने हाकण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यात नवनवे मोबाईल इंटरनेटसह हाती असल्याने वाहने चालवण्याचा इव्हेंटदेखील लाईव्ह करण्याचा घातक प्रयत्न तरुणाईकडून केला जातो. त्यात वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडवले जातात. वाहतूक विभागाकडूनही यात फार मोठा हस्तक्षेप किंवा सातत्यपूर्ण व पारदर्शक कारवाई दिसून येत नाही. यामुळे अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण धक्कादायक आहे. फेसबुकसारख्या सोशल माध्यमांवर लाईव्ह व्हिडीओ दाखवण्याचे प्रावधान असल्याने प्रत्येक प्रसंगाचे इव्हेंट लाईव्ह वा रेकॉर्ड करण्याचे फॅड वाढत आहे. यातून अपघातांचे दुर्दैवी प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. प्रामुख्याने वाहन चालवताना परिस्थिती व वेगाचे भान राहत नसल्याने अनियंत्रित ड्रायव्हिंग अनेकांच्या जीवावर उठत आहे. यासाठी वाहतूक नियम तर अधिक कडक करावेच लागतील मात्र पालक-पाल्यांचे संभाव्य धोक्यांबाबत प्रबोधनदेखील गरजेचे आहे.  वैभव मोहन पाटील  घ...