Posts

Showing posts from October, 2021

एसटी दरवाढ कमी व्हायला हवी

Image
एसटी हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेच्या प्रवासाचे प्रमुख साधन आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार असे अनेक घटक स्वस्त व सुरक्षित प्रवास म्हणून एसटी वर अवलंबून आहेत. सरकारमार्फत चालवण्यात येणारी परिवहन व्यवस्था यामुळे ती सर्वसामान्यांना परवडणारीच असावी असे धोरण या सेवेचे असायला हवे. लालपरी नावाने ओळखली जाणारी ही एसटी ग्रामीण व शहरी भागाला जोडणारी जीवनवाहिनी मानली जाते. मात्र विविध कारणांनी सातत्याने एसटीची भाववाढ केली जात आहे. नुकतीच एसटी भाड्यात तब्बल १७ टक्क्यांनी वाढ करत महागाईने आधीच पिचलेल्या सर्वसामान्यांना सरकारने मोठा दणका दिला आहे. दररोजचे वाढत चाललेले इंधन दर व त्यामुळे खाजगी वाहनांचा वाढलेल्या प्रवास खर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सार्वजनिक वाहतुकीला बळ देऊन लोकांना दिलासा द्यायला हवा. एसटी सारख्या तळागाळात, खेडोपाडी पोहोचलेल्या परिवहन सेवेचे बळकटीकरण व अत्याधुनिकीकरण करायला हवे. मात्र गेल्या अनेक वर्षांमध्ये एसटी ची परिस्थिती जैसे थे आहे. त्यात आता सततची भाववाढ होत असल्याने सामान्य लोकांनी प्रवास करायचा तरी कशाने असा प्रश्न उपस्थित होत आहे. इ...

समाजभान जोपासणारे 'सूचक' व्यक्तिमत्त्व - श्री के टी पाटील

Image
समाजकार्याचा ध्यास घेतलेले के टी पाटील आपल्यातील अनेकांना आपले उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या करता करता समाजभान जोपासत समाजातील अडलेल्या नडलेल्यांसाठी यथाशक्ती काहीतरी मदत करण्याचा ध्यास असतो. सामाजिक बांधिलकी जोपासत प्रसंगी पदरमोड करत स्वकमाईतून इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करताना अनेक जण आपल्याला अवतीभोवती दिसतात. ह्याच ऋणानुबंधातून होणारी मदत अनेकांचे जीवन घडवणारी ठरत असते. त्यामुळे असे लोक जे आपल्या प्रापंचिक, व्यवसायिक जीवनातून वेळ काढत गरजूंना वेळप्रसंगी मदत करतात त्यांचा मला नेहमीच अभिमान वाटतो. अशा व्यक्ती खरे तर नाव, प्रसिद्धीसाठी सामाजिक जीवनात कधीच नसतात, मात्र त्यांचे समजासाठीचे योगदान व उदारतावादी दृष्टिकोन दुर्लक्षित करून चालणार नाही. श्री काशीनाथ पाटील उर्फ के टी पाटील हे सामाजिक कार्याच्या ध्यासाने व्यापलेले असेच एक व्यक्तिमत्व. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील डोंगस्ते या गावचे सुपुत्र असलेले के टी पाटील यांनी आपल्या प्रचंड मेहनतीने व इच्छाशक्तीने आपला व्यावसायिक डोलारा उभा केला आहे. सुरुवातीला एलआयसीमध्ये काम करत असताना त्यांनी दांडगा ज...

इंधनाला पर्याय हवेत

Image
सत्तेत असले की महागाईवर बोलायचे नाही आणि विरोधी पक्षात असले की महागाईविरोधात सत्ताधाऱ्यांवर तुटून पडायचे हा राजकीय पक्षांचा फंडा आता लोकांना समजू लागलाय. त्यामुळे महागाई विरोधातील राजकीय आंदोलनांमध्ये सर्वसामान्य नागरिक कधीही उतरताना दिसत नाहीत.  मात्र दिवसेंदिवस वाढत असलेले गॅस, इंधन दर सर्वसामान्यांच्या घरातील चिंता नक्कीच वाढवणारे आहेत. इंधनाच्या सातत्याने वाढत चाललेल्या दरांमुळे देशभरात प्रचंड जनक्षोभ असून तो कधीही फुटण्याची शक्यता आहे. दरवाढीबाबत सातत्याने आंतराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या भाववाढीकडे बोट दाखवले जात असले तरी ते नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न कधीही दिसून आलेले नाहीत. इंधनाचा वापर न करणारे घर देशात क्वचितच सापडेल. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याच्या व जीवनमानाशी निगडित इंधनाचा विषय केंद्र सरकारने संवेदनशीलरीत्या हाताळणे आवश्यक असताना तसे प्रयत्न आजवर झालेले नाहीत. तीन आकड्यात गेलेल्या इंधनाची डोकेदुखी आज घरोघरी आहे. इंधनाची आधारभूत किंमत व त्यावर आकारण्यात येणाऱ्या विविध करांबाबतची स्पष्टता सरकारने करायला हवी. ही जाच...

सारे काही टीआरपिसाठी

Image
अंमली पदार्थ सेवन प्रकरणात पार्टी सुरू असलेल्या क्रूझ वरून अनेकांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. मात्र यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सहभागी होता म्हणून या प्रकरणाला माध्यमांनी प्रचंड उचलून धरले. अगदी कस्टडीत असताना त्याने काय खाल्ले, काय नाही इथपर्यंत चर्चा रंगल्या. एशोआरामात जीवन जगणारे बॉलिवूड कलाकार, त्यांची मुले यांच्यासाठी ड्रग्स व इतर अंमली पदार्थांच्या पार्ट्या नव्या नाहीत. मात्र पकडला तो चोर अशी समजूत त्यांच्या बाबतीत खरी ठरते. अशा लोकांना दीर्घकाळ जेलची हवा देऊन मोठी शिक्षा व्हायला हवी. मात्र ग्लॅमर दुनियेतील व्यक्ती म्हणून स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी माध्यमे त्यांना लाईव्ह कव्हरेज देतात. कालांतराने अशा व्यक्ती जेलमधून सुटून बाहेर येतात व पुन्हा आपले रेड कार्पेटवरील जीवन एशोआरामात जगतात. महाराष्ट्रात आज अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. दाहक बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या व्यथा, महागाई, महिलांवरील रोजचे अत्याचार अशा घटना लोकांसमोर आणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सोडून दिवसभर या गुन्हेगार नटांच्या व त्यांच्या मुलांच्या मागे फिरून प्रसारमाध्यमे काय साधतात हे कळायला मार्ग नाह...

सरकार संवेदनशील नाही

Image
केंद्र सरकारचे नियोजित कृषीविषयक कायदे रद्द करण्यासाठी सुरू असलेले आंदोलन अजूनही थांबलेले नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच चाललेले लांबलचक आंदोलन म्हणून या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख होईल. इतक्या मोठ्या कालावधीनंतरदेखील शेतकऱ्यांच्या मागण्यांशी तडजोड करू न शकलेले सरकार म्हणूनदेखील विद्यमान केंद्र सरकार ओळखले जाईल. यात कहर झाला तो उत्तर प्रदेशातील लाखीमपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याच्या घटनेने. वास्तविक कुठल्याही सरकारचा अहंकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा मोठा असू शकत नाही. मात्र विरोध होत असलेल्या शेतकरी कायद्यांच्या बाबतीत केंद्र सरकार घेत असलेली भूमिका हेकेखोरपणाचीच आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असलेल्या ह्या कायद्यांवर तडजोडीची भूमिका सरकार का घेत नाही हा मोठा यक्षप्रश्नच आहे. इतका प्रदीर्घ काळ आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांप्रती सरकार संवेदनशील नाही का ? की हे कायदे रद्द करण्यासाठी सरकार पुढील लोकसभा निवडणुकीची वाट पाहतेय? वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा विसर

Image
महाराष्ट्रात सध्या विकासाच्या प्रकल्पांऐवजी राजकीय कुरघोड्या, उणिधुणी, ईडी, सीबीआय, श्रेयवाद हेच अधिक पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वसामान्यांच्या सण उत्सव साजरे करण्यावर, एकत्र येण्यावर असंख्य बंधने तर दुसरीकडे राजकीय कार्यक्रम मोठ्या जोशात सुरू असल्याचे दिसून येत आहे. कधी नव्हे इतकी राजकारणाने खालची पातळी गाठली असल्याचे नेत्यांच्या वक्तव्यांनी दिसून येत आहे. राजकीय कार्यक्रम, मेळावे, पत्रकार परिषदा ह्या केवळ एकमेकांवर आरोप करण्यासाठीच आयोजित केल्या जातात का इथपर्यंत शंका येते. एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी नेतेमंडळी सोडत नाहीत. चौकशा, घोटाळे, आरोप प्रत्यारोप नित्याचेच झालेत. विकासाची कामे तसेच शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, व्यापाऱ्यांचे प्रश्न यामध्ये कमालीचे दुर्लक्षित राहत आहेत. सत्ता हे एकमेव केंद्र डोळ्यासमोर ठेवून चालणाऱ्या आजच्या राजकारण्यांना महाराष्ट्राच्या गौरवशाली व वैचारिक परंपरेचा विसर पडलेला दिसतोय.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

महाराष्ट्र बंद अनाकलनीय

Image
शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वच राज्यांमध्ये समान आहेत. शेतकरी १००% सुखी असलेलं राज्य नाही. अनियमित पर्जन्यमान, सततचा दुष्काळ व नापिकी यामुळे शेतकरी बेजार आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदे व रोजगाराची अन्य साधने तो शोधू लागलाय. शेतकऱ्याची पुढची पिढी शेती करेल की नाही याची शास्वती नाही. त्यामुळे एकेकाळी कृषिप्रधान समजला जाणारा आपला देश शेतीजन्य उत्पादने परदेशातून आयात करू लागला तर नवल वाटायला नको. शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची जबाबदारी केवळ केंद्र  सरकारची नसून राज्य सरकारांनीही शेतकऱ्यांना वेळोवेळी बळ द्यायलाच हवे. उत्तर प्रदेशातील लाखीमपूर येथे घडलेली घटना निंदनियच आहे तिचे समर्थन होऊच शकत नाही मात्र तिचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय व तोही विद्यमान सरकारमधील सहभागी राजकीय पक्षांनी घेणे अनाकलनीय आहे. राज्यात शेतकऱ्यांचे, महिलांचे, बेरोजगारांचे व नुकतेच सुरू झालेल्या उद्योग व्यवसायांचे प्रश्न आ वासून उभे असताना लोकांना वेठीस धरणाऱ्या बंदचे फलित समजून आले नाही. उत्तर प्रदेश मध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेतील दोषींना कडक शिक्षा झालीच पाहिजे, तसे न झाल्यास न्याय मागण्य...

त्यांनी पुनरागमन न केलेलंच बरं!

Image
कलर्स मराठी चॅनेलवर सुरू झालेला मराठी बिग बॉसचा ३ रा सिजन त्यातील सहभागी स्पर्धक व त्यांच्यात सुरू असलेल्या हमरीतुमरीवरून बराच चर्चेत आहे. त्यातील दादूस , विकास पाटील आणि विशाल निकम यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. तर कीर्तनकार शिवलीला पाटील, तृप्ती देसाई यांचे उघड वाद सतत रंगताना दिसले. त्यातच आता शिवलीला पाटील या सदस्याने या घरातून तब्येतीच्या कारणास्तव काढता पाय घेतला आहे. सुरुवातीपासूनच शिवलीला पाटील यांच्या शोमध्ये येण्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. किर्तनकाराने पैसा प्रसिद्धीच्या मागे न जाता मोह मायेपासून दूर राहायला हवे अशी भावना त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली होती. त्यामुळे त्या किती दिवस या रोजचे वादविवाद, हेवेदावे, भांडणे दाखवणाऱ्या घरात टिकतील याबाबत शंका होतीच. मागील काही दिवसांपासून शिवलीला बिग बॉसच्या घरात राहून कुठल्याही टास्कमध्ये सहभागी झाल्या नव्हत्या. कीर्तन, प्रबोधन करणाऱ्या व्यक्ती बिग बॉस सारख्या वादविवादपर मनोरंजन कार्यक्रमामध्ये दिसणे जरा खटकणारेच आहे. त्यामुळे शिवलीला पाटील यांनी तब्येतीच्या कारणानं ...

इंधन दर आटोक्यात आणा

Image
दिवसेंदिवस वाढत असलेले इंधन दर सरकारविरुद्धचा आक्रोश अधिक तीव्र करणारे आहेत. इंधनाच्या सातत्याने वाढत चाललेल्या दरांमुळे देशात प्रचंड जनक्षोभ असून तो कधीही फुटण्याची शक्यता आहे. दरवाढीबाबत सातत्याने आंतराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या भाववाढीकडे बोट दाखवले जात असले तरी ते नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न कधीही दिसून आलेले नाहीत. इंधनाचा वापर न करणारे घर देशात क्वचितच सापडेल. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याच्या व जीवनमानाशी निगडित इंधनाचा विषय केंद्र सरकारने संवेदनशीलरीत्या हाताळणे आवश्यक असताना तसे प्रयत्न आजवर झालेले नाहीत. तीन आकड्यात गेलेल्या इंधनाची डोकेदुखी आज घरोघरी आहे. इंधनाची आधारभूत किंमत व त्यावर आकारण्यात येणाऱ्या विविध करांबाबतची स्पष्टता सरकारने करायला हवी. ही जाचक करप्रणालीच इंधनाच्या फुगत चाललेल्या दरांना कारणीभूत आहे. वस्तू व सेवा कराचा परतावा वेळेत होत नसल्याने बहुतांश राज्ये इंधनावरील करांवरच अवलंबून आहेत ही बाब खरी आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेच आता पुढाकार घेऊन इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्ष...

तरुणाई कुणाच्या मागे पळतेय?

Image
मागील शनिवारी रात्री एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका क्रूझमधील रेव्ह पार्टीवर छापेमारी केली. हे प्रकरण तेव्हा चर्चेत आले जेव्हा यामध्ये बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या मुलाचे नाव समोर आले. अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट होताच एनसीबीने आर्यनसह काही प्रसिद्ध व्यक्तींनाही अटक केली. बॉलिवूडचे ड्रग्स कनेक्शन अनेकदा समोर आले आहे. अनेकदा एनसीबीच्या छाप्यामध्ये एखाद्या बॉलिवूडमधील कलाकाराचे नाव समोर येते आणि त्यानंतर संपूर्ण मीडिया हा विषय चवीने चघळत बसते. आता शाहरुख खान चा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज पार्टीतून अटक केली ही बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच सिनेसृष्टीमध्ये खळबळ उडालीच पण माध्यमांनीदेखील ही बातमी नको तितकी उचलून धरली. हीच तत्परता माध्यमांनी महिलांवर सातत्याने घडणाऱ्या सामूहिक  अत्याचाराच्या घटनांमध्ये दाखवायला हवी. मात्र महिला अत्याचाराविरुद्ध तावातावाने दाखवल्या जाणाऱ्या बातम्या व त्याचा पाठपुरावा थोड्या दिवसानंतर थांबून जातो हा इतिहास आहे. ड्रग्स पार्ट्यांच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास अशा प्रकारच्या अंमली पदार्थ सेव...

तोवर लोकशाहीचे हनन अटळ

Image
लोकशाही हा आपल्या देशाचा बळकट कणा आहे.  मजबूत न्यायपालिका, प्रशासन, प्रसारमाध्यमे आणि विधिमंडळ/ संसद/विधानसभा हे लोकशाहीचे चार स्तंभ मानले जातात. प्रत्येकाला स्वतःचे असे अधिकारक्षेत्र आणि साहजिकच यापैकी कोणीही दुसऱ्याच्या अधिकारक्षेत्रात ढवळाढवळ करू नये असा संकेत आहे. मात्र या अधिकारांच्या सीमारेषा ठळक नसल्याने त्यांचे सहजतेने उल्लंघन होताना दिसते. हे चारही स्तंभ आज एकमेकांशी संलग्न झाल्याने राजकीय क्षेत्र आज प्रचंड फार्मात आहे. पैशातून सत्ता व सत्तेतून लोकशाहीचे स्तंभ कमजोर करण्याचे प्रकार सर्रास घडताहेत. ज्याच्याकडे पैसा-संपत्ती त्यानेच राजकारणात पडावे हा लिखित नियम झालाय. त्यामुळे राजकारणात आलेले गडगंज नेते प्रशासन, न्यायव्यवस्था व माध्यमे यांचा सोयीप्रमाणे वापर करताना दिसतात. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना अडकवण्यात व संरक्षण देण्यास हाच राजकीय हस्तक्षेप कारणीभूत ठरला. केंद्र सरकारच्या मदतीने त्यांनी परदेशात पलायन केले असेल तर त्यांच्यामुळे सर्वाधिक बदनामी झालेले राज्य सरकार शांतपणे हे उघड्या डोळ्यांनी का बघत आहे हाही यक्षप्रश्नच. राजकारणात आता सुशिक्षित, अभ्या...

हीच तत्परता जिवंत शेतकऱ्यांच्या बाबतीतही हवी

Image
नामांतर हेच उत्तर हे संपादकीय (दै लोकसत्ता ६ ऑक्टो) उत्तर प्रदेशातील शेतकरी हत्याकांडाचे अचूक विवरण करणारे आहे. आर्थिक मदत, नुकसान भरपाई हे शब्द देशात सर्वमान्य झालेत. एखादी अनुचित घटना घडली की त्यावर पांघरून घालण्याचे काम हे शब्द अचूकपणे करतात. मग कितीही मोठा गुन्हा घडला की त्यात राजकीय हस्तक्षेप आपसूकच होत असल्यामुळे तो दडपणे सोपे जाते. यूपीतील शेतकऱ्यांचा गाडीखाली चिरडून झालेला मृत्यू दुर्दैवीच आहे. या प्रकरणाचा संभाव्य उहापोह पाहता मृतांच्या नातलगांना तातडीने ४५ लाखांची मदत, सरकारी नोकरी व त्यात भरीस भर म्हणून केंद्रीय मंत्रिपुत्रावर दाखल झालेला गुन्हा विरोधी राजकीय सूर धूसर करून गेला हे खरे आहे. हीच नीती अशा प्रकारच्या घटनांची वाच्यता अधिक होऊ न देण्यासाठी कामी येते हेदेखील योगी सरकारने दाखवून दिले. भरघोस मदत मिळाल्यानंतर जिवंत नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनादेखील आणखी काय हवे हा उदात्त दृष्टिकोन त्यामागे असावा. अशाच प्रकारचे सरकारी योगदान यूपी सरकारने उर्वरित काळात शेतकऱ्यांचे पीक नुकसान व रोजगार निर्मितीच्याबाबतीत दिल्यास राज्यातील...

दोन्ही कार्यक्रमांच्या वेळा वेगवेगळ्या हव्यात

Image
बिग बी अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला सोनी टीव्हीवरील रिऍलिटी शो कौन बनेगाा करोडपती प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या २३ ऑगस्टपासून या कार्यक्रमाचा १३वा सिझन सुरू झालेला आहे. याच कार्यक्रमाच्या धर्तीवर काही वर्षांपूर्वी 'कोण होणार करोडपती' हा मराठी रिअलिटी शो सुरू करण्यात आला होता जो खूप लोकप्रिय ठरला. सध्या प्रसिद्ध अभिनेता सचिन खेडेकर यांचं होस्टिंग असलेल्या या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. मागच्या वर्षी करोना प्रादुर्भावामुळे या रिअलिटीशोचं प्रसारण झालं नाही मात्र मार्च पासून हा शो पुन्हा एकदा सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेला आहे. मराठी व हिंदीतील दोन्ही दिग्गज कलाकारांच्या सोबत सर्वसामान्य व्यक्तींना बसून ज्ञानाचा हा खेळ पाहताना प्रेक्षकांचे खूप मनोरंजन होते व सोबतच ज्ञानातदेखील भर पडते. मात्र सध्या या दोन्ही कार्यक्रमांची वेळ एकच रात्री ९ वाजता असल्याने दोन्ही कार्यक्रमांच्या चाहत्यांची मोठी निराशा होत आहे. त्यामुळे सोनीच्याच मराठी व हिंदी वाहिन्यांवर सुरू असलेल्या एका चांगल्या ज्ञानवर्धक कार्यक्रमांची वेळ एकच न ठेवता दोन्ही कार्यक्रमाच्या ...