Posts

Showing posts from January, 2024

त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षण करा

Image
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने राज्यभरात खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांच्या मोबाईलवर प्रश्नांची भली मोठी यादी असलेले MSBCC SURVEY हे ॲप देण्यात आलेले असून, त्या माध्यमातून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांना मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये प्रचंड तांत्रिक अडचणी उदभवत आहेत. एकीकडे 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण संपवण्याच्या सूचना मागासवर्ग आयोगाने दिल्या आहेत, मात्र दुसरीकडे मोबाईल ॲप नीट चालत नसल्याने सर्वेक्षण संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेत हे सर्वेक्षण पूर्ण करणे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जिकिरीचे ठरणार असून घाईघाईत सर्वेक्षण उरकण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. त्यात सर्व्हे करताना घराघरातून माहिती मिळवतानाही खूप अडचणी येत आहेत. यामुळे अर्धवट, अपूर्ण वा चुकीची माहिती नोंदवली जाण्याची शक्यता अधिक आहे. या प्रक्रियेत काम करणारे बहुतांश कर्मचारी मूळ कार्यभारव्यतिरिक्त विविध अतिरिक्त सरकारी कामांमुळे बेजार आहेत. त्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची काम...

वाड्यात विद्यार्थी व पालक समुपदेशन कार्यशाळा संपन्न

Image
सौ ऋतुजा बांगर यांचा स्तुत्य उपक्रम माऊली ब्रेन डेव्हलपमेंट आणि समुपदेशन केंद्र, अशोकवन वाडा यांच्या वतीने वाडा शहरातील पी जे हायस्कुल तसेच स्वामी विवेकानंद हायस्कुल या शाळांतील विद्यार्थी व पालकांसाठी दिनांक २७ जानेवारी २८ जानेवारी रोजी विद्यार्थी व पालक कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी ब्रेनवे रिसर्च फाउंडेशन, पुणे येथील ब्रेनवे फाउंडेशनचे सर्वेसर्वा संचालक श्री डॉ अशोक सोनावणे उपस्थित होते. तसेच पंचायत समिती वाडा गट शिक्षणाधिकारी श्री भगवान मोकाशी, ज्ञानदा प्रकाशन चे सर्वेसर्वा व सामाजिक कार्यकर्ते श्री युवराज दादा ठाकरे  आदी मान्यवर उदघाटन प्रसंगी उपस्थित होते. पी जे हायस्कुल येथील इयत्ता ८वी व ९वी च्या एकूण ६०० विद्यार्थी तर स्वामी विवेकानंद हायस्कुलमधील इयत्ता ५वी ते ९वी च्या जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी या समुपदेशन कार्यशाळेचा लाभ घेतला. विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन माऊली ब्रेन डेव्हलपमेंट आणि समुपदेशन केंद्राच्या सौ ऋतुजा बांगर व श्री ज्ञानोबा तुकोबा सत्संग सेवा संस्थेचे हभप राजेश म बांगर यांनी क...

सार्वजनिक वाहतूक प्रबळ व्हायला हवी

Image
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या बिनधास्त, रोखठोक भूमिकेसाठी प्रचलित आहेत. अनेक राजकीय, बिगर राजकीय विषयांवर ते आपली सडेतोड भूमिका जाहीर कार्यक्रमांमधून व्यक्त करत असतात. महाराष्ट्रातील रस्ते बांधणीचे अनेक मोठमोठे प्रकल्प त्यांच्या दूरदृष्टी स्वभावामुळेच सिद्धीस गेले हे सत्य नाकारता येणार नाही. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्ग असो की समृद्धी महामार्ग अशा अनेक महत्वपूर्ण राष्ट्रीय महामार्गांमध्ये त्यांचे मौलिक योगदान लपून राहिलेले नाही. वाहतूक कोंडीतून सुटका करणारे देशातील सर्वाधिक उड्डाणपूल त्यांच्याच काळात झालेले आहेत. देशात वाढत चाललेली वाहन संख्या व त्यामुळे होणारे प्रदूषण यावर मार्ग काढण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय त्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात उद्भवणाऱ्या काही तांत्रिक अडचणी पाहता अद्यापही हा पर्याय पूर्णपणे यशस्वी होऊ शकलेला नाही. प्रदूषणाला मुख्य कारणीभूत ठरत असलेली खाजगी वाहतूक थोपवायची असेल तर सार्वजनिक वाहतुकीचे जाळे निर्माण करून सर्व स्तरांतील लोकांना सोयीस्कर व आरामदायी वाहतूक व्यवस्था सरकारने तयार करायला हवी जेणेकर...

सामाजिक कार्याने झपाटलेले व्यक्तिमत्त्व 'श्री गणेश हिरवे'

Image
सामाजिक कार्याचा महामेरू "श्री गणेश हिरवे" आमचे परममित्र व सामाजिक कार्यातील आदर्श श्री गणेश हिरवे सरांचा आज ५०वा वाढदिवस. गेल्या आठ दहा वर्षांपासून आम्ही संपर्कात आहोत. नवी मुंबई, ठाणे, पालघर मध्ये अनेक सामाजिक उपक्रम हिरवे सरांच्या सोबतीने राबवता आले. खरेतर आपल्यासारख्या कुटुंबवत्सल लोकांना कुटुंब, नोकरी वा व्यवसायिक जबाबदाऱ्यातुन वेळ काढणे म्हणजे एक दिव्यच. त्यातून वेळ मिळालाच तर आपण एखादा आवडीचा छंद जोपासतो. माझेच उदाहरण घेतले तर कौटुंबिक व्याप व नोकरीतील व्यस्तता यातून दररोजच्या लिखाणासाठीदेखील वेळ काढणे जिकरीचे ठरते. त्यातुनच मग लोकलप्रवासात लिखाण करण्याचा मध्यम मार्ग मी निवडला व याच लोकल प्रवासामुळे लिखाणाचा छंद आज जोपासून आहे. असो, तर दैनंदिन व्यापातून वेळ काढून सामाजिक बांधिलकी जोपासणे व समाजकार्यात स्वतःला झोकून देणे हा विचार सर्वसामान्य व्यक्ती करूच शकत नाही. त्यातून समाजसेवा म्हटली की पदरमोड आली जी प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडताना सर्वांना जमेलच असे नाही.   मात्र गणेश हिरवे सरांचे आजवरचे कार्य व त्यांची त्यातील तत्परता आपण जर पह...

श्री राम जय राम जय जय राम

Image
आयोध्येतील श्री राम प्रतिष्ठापना दिवस नवी मुंबईत उत्साहात साजरा आयोध्येतील श्री राम मंदिर प्रतिष्ठापणा दिनाच्या निमित्ताने नवी मुंबईत सर्वत्र जल्लोष पाहायला मिळाला. भगवे ध्वज व शोभायात्रांनी रस्ते व्यापून गेल्याचे मनोहारी व उत्साहवर्धक दृश्य सर्वत्र होते. अयोध्येत श्री राम मंदिर व मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापे येथील श्री राम मंदिरात गेले तीन दिवस हा उत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी दिवसभर मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. श्री राम मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट व स्व श्री अमृत पाटील यांच्या परिवाराच्या वतीने या दिवशी महाप्रसादाचे वाटप भाविकांमध्ये करण्यात आले. तब्बल पाच दशकानंतर अयोध्येत श्री रामांचे आगमन झाल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. जुहूगाव येथील हनुमान मंदिरात आज दिवसभर हजारो भक्तांनी श्री हनुमंतांचे दर्शन घेत हा उत्सव दिन साजरा केला. यावेळी दिवसभर मंदिरात भजन, हरिपाठ आदी कार्यक्रमांचे आयोजन मंदिर ट्रस्टमार्फत करण्यात आले. सायंकाळी मंदिरात सर्वत्र रांगोळी व दिव्यांची ...

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रबळ हवी

Image
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या बिनधास्त, रोखठोक भूमिकेसाठी प्रचलित आहेत. अनेक राजकीय, बिगर राजकीय विषयांवर ते आपली सडेतोड भूमिका जाहीर कार्यक्रमांमधून व्यक्त करत असतात. महाराष्ट्रातील रस्ते बांधणीचे अनेक मोठमोठे प्रकल्प त्यांच्या दूरदृष्टी स्वभावामुळेच सिद्धीस गेले हे सत्य नाकारता येणार नाही. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्ग असो की समृद्धी महामार्ग अशा अनेक महत्वपूर्ण राष्ट्रीय महामार्गांमध्ये त्यांचे मौलिक योगदान लपून राहिलेले नाही. वाहतूक कोंडीतून सुटका करणारे देशातील सर्वाधिक उड्डाणपूल त्यांच्याच काळात झालेले आहेत. देशात वाढत चाललेली वाहन संख्या व त्यामुळे होणारे प्रदूषण यावर मार्ग काढण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय त्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात उद्भवणाऱ्या काही तांत्रिक अडचणी पाहता अद्यापही हा पर्याय पूर्णपणे यशस्वी होऊ शकलेला नाही. प्रदूषणाला मुख्य कारणीभूत ठरत असलेली खाजगी वाहतूक थोपवायची असेल तर सार्वजनिक वाहतुकीचे जाळे निर्माण करून सर्व स्तरांतील लोकांना सोयीस्कर व आरामदायी वाहतूक व्यवस्था सरकारने तयार करायला हवी जेणेकर...

देशात सद्भावना, परोपकार, शांतता, प्रामाणिकता व सत्यमार्गाचा आदर्श

Image
जवळपास ५०० वर्षांनंतर आयोध्या ह्या आपल्या जन्मस्थळावर श्री रामांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होत आहे ही समस्त हिंदू व भारतवासीयांसाठी आनंदाची बाब आहे. आपला देश मुळात ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी लाभलेला देश आहे. या ठिकाणी वास्तव्य केलेले धार्मिक गुरु, संत, देवता यांनी लोकांना सत्य व आदर्शवादाची शिकवण दिली. याच आदर्शवादी शिकवणुकीमुळे भारत आज जगात सर्वात सुसंस्कारित देश म्हणून ओळखला जातो. प्रभू रामचंद्र हे एक आदर्श पुत्र, एकपत्नी, एकवचनी व संघर्ष योद्धा म्हणून ओळखले जातात. त्यांचे भव्य मंदिर अयोध्येत व्हावे ही अनेक वर्षांपासूनची अनेक पिढ्यांची इच्छा होती. ती पूर्णत्वास जाण्याची वेळ या वर्षी आली ही आजच्या पिढीसाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. याबद्दल सध्याचे सरकार व ज्यांनी ज्यांनी या शुभ दिनासाठी प्रयत्न केले त्यांचे आभार देशवासियांनी मानलेच पाहिजेत. श्री रामांच्या आयोध्येतील प्रतिष्ठापणा दिनी संपूर्ण देशात एक भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. यातून अनेक चांगल्या गोष्टी देशभरात घडत आहेत. देवस्थळांची साफसफाई, सामाजिक उपक्रम तसेच अनेक गावांमध्ये दारूबंदी, मांसबंदी या निमित्ताने केली ज...

डॉ नेहा कोळी यांची अभियानातून एक्झिट

Image
कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी डॉ नेहा कोळी या आणखी एका अधिकाऱ्याने अभियान कार्यालयातून एक्झिट घेतली. गेल्या पाच वर्षांपासून नागरी आरोग्य अभियानाच्या व मागील वर्षभरापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या राज्य कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ कोळी यांनी नुकताच कार्यालयाचा निरोप घेतला. नागरी अभियानात काम करताना महानगरपालिकांमधील यंत्रणांसोबत त्यांचा दांडगा संपर्क तयार झाला होता. वैद्यकीय क्षेत्रात बिडीएस आणि एमबीए इन हेल्थ केअर मध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर मुंबई महानगरपालिकेमध्ये शहरी अभियानात शहर कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून काम पाहिले व त्यानंतर त्या राज्य कार्यालयात २०१७ मध्ये राज्य कार्यक्रम अधिकारी म्हणून रुजू झाल्या. नोव्हेंबर २०२२ पासून त्यांनी संपूर्ण एनएचएमच्या एसपीएम पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहिला. सीआरएम, यशदा येथील राज्यस्तरीय कार्यशाळा, जागतिक महिला दिनाचे कार्यक्रम, विविध बैठकांचे नियोजन, सादरीकरण, माहिती संकलन, पीआयपी इत्यादी कामकाजात त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली. कार्यकारी समितीच्या सर्वाधिक बैठका त्यांच्या कारकिर्दीत ...

रेल्वे प्रवाशांकडेही लक्ष द्या

Image
मुंबईतून पुणे किंवा कोकणात जाण्यासाठी शिवडी ते नाव्हा शेवा असा अटल सागरी सेतू बांधून तयार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 12 जानेवारीला त्याचे लोकार्पण होणार आहे. या प्रकल्पामुळे 22 किलोमीटरचे अंतर 15 ते 20 मिनिटात पार करता येणार आहे. मुंबईच्या विकासाला चालना देणारा प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जात असले तरी त्यामुळे सध्या सर्वात जास्त गर्दीची वाहतूक सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर त्याचा कितपत परिणाम होईल याबाबत साशंकताच आहे. मुंबईहून वाशी खाडी पूल मार्गे प्रवास करणारी बरीचशी वाहने या सागरी सेतुवरून जाणार असल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडी काही अंशी फुटेल. मात्र रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा कुठलाही फायदा होणार नाही. हार्बर मार्गावर रेल्वे ट्रॅक वाढवण्यात येत असलेल्या अडचणी, नवी मुंबईच्या पुढे वाढत चाललेली लोकवस्ती व त्याचा रेल्वे सेवेवर पडत असलेला ताण पाहता सर्वसामान्य प्रवाशांना विचारात घेऊन हार्बर रेल्वे वृद्धिंगत करण्याची गरज आहे. या मार्गावर सध्या भरमसाठ संख्येत वाढलेला प्रवाशी भार हलका करण्यासाठी उपाययोजना आखणे अत्यं...

या दौऱ्याने लक्षद्वीपला नवी ओळख

Image
लक्षद्वीप हे ठिकाण भारतीयांसाठी पर्यटनासाठी हॉटस्पॉट बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात लक्षद्वीपला भेट दिली. त्यानंतर हे ठिकाण अचानक प्रकाशझोतात आले आहे. समुद्रकिनारी त्यांचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर मालदीवच्या मंत्र्यांनी सोशल मीडियावर केलेल्या "अपमानजनक" टिप्पणीविषयी तेथील सरकारने हे "मत वैयक्तिक आहे" आणि त्याच्या दृष्टीकोनाचे प्रतिनिधित्व करू नये असे मत व्यक्त करत कारवाई केली. आधुनिक भारतात विकासाचा अर्थ खूपच बदलला आहे. विकास पर्यावरण अनुकूल क्षमतांसह अनुकूल असणे आवश्यक आहे, त्यामुळे पर्यावरण अनुकूल विकासाद्वारे नेहमीच समृद्ध होण्याची आवश्यकता असते. लक्षद्वीप हे एक असे ठिकाण आहे जेथे विकासाची मोठी व्याप्ती आहे परंतु पर्यटन विकासाच्या बाबतीत तेथे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. लक्षद्वीप हे भारतातील सर्वात कमी कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. यामध्ये एक विमानतळ आहे पण देशाविदेशाशी कनेक्टिव्हिटी फार नाही. जर लक्षद्वीपला पर्यटकांसाठी तयार करावे लागले तर पर्यटन-अनुकूल पायाभूत सुविधा योग्यरित्या स्थापित करण...

ताण तणाव, राग, द्वेष, लोभ, चिडचिड कमी करण्याचा मार्ग - विपश्यना

Image
मनाची स्थिरता मिळण्याचा प्रयास म्हणजे विपश्यना आपल्या सर्वांच्या आयुष्यात केवळ दोनच गोष्टी महत्वपूर्ण असतात ज्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करावे लागते. एक शरीर व दुसरे मन. शारीरिक स्वास्थ्यासाठी आपण व्यायाम, कसरत, चालणे, धावणे यासारखे उपाय अवलंबितो. आजकाल व्यायामशाळा, मॉर्निंग वॉक, मॅरेथॉन अशा विविध प्रकारांतून आपण आपले शारीरिक फिटनेस राखण्याचा प्रयत्न करतो. मात्र मनाच्या आरोग्याकडे कुणाचेही फार लक्ष जात नाही. आजकाल दररोजच्या नोकरी व्यवसायाच्या ताण तणावामुळे मनावरील भार प्रचंड वाढला आहे. त्याचा परिणाम मानसिक अस्थिरतेत होत आहे. त्यामुळे मानसिक स्थिरता मिळवण्याच्या विविध उपायांकडे अनेकांचा कल वाढतो आहे. यासाठी एक उत्तम व हुकमी इलाज आज प्रचलित आहे व तो म्हणजे विपश्यना धारणा म्हणजेच मेडिटेशन. श्वासाच्या गतीवर व अनापनेवर लक्ष केंद्रित करून त्यातून मनाची स्थिरता मिळवण्यासाठी केलेला प्रयास म्हणजे विपश्यना. याच विपश्यनेच्या माध्यमातुन अनेकांना लाभ होत असून मानसिक स्थिती परावर्तित करण्याची ताकत ह्या धारणेत असल्याचे सिद्ध झाले आहे. देशभरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे विपश्यनेचे कोर्स चालव...

जेष्ठ साहित्यीक प्रा डॉ राम नेमाडे सर

Image
साहित्य व समाजसेवेचा वसा घेतलेले व्यक्तिमत्त्व  जेष्‍ठ साहित्‍यीक प्रा राम नेमाडे सर यांच्‍या निधनाची दुखःद बातमी मंगळवारी कानावर आली आणि धक्‍का बसला. प्रा नेमाडे सरांचा माझा परिचय केल्‍या दोनेक वर्षापूर्वीचा. त्‍यांच्‍या प्रत्‍यक्ष भेटीचा योग दोनदा आला. आमच्‍या जॉय संस्‍थेच्‍या वर्धापन दिनाच्‍या कार्यक्रमात त्‍यांना हिरवे सरांनी प्रमुख अतिथी म्‍हणून आमंत्रित केले होते. त्‍यावेळी त्‍यांचे स्‍वागत करण्‍याचा व त्‍यांच्‍या हस्‍ते सन्‍मानित होण्‍याचा बहुमान प्राप्‍त झाला. दुस-यांदा आमचे मित्र अनंत बोरसे सर यांच्‍या शहापूर येथे आयोजित पूस्‍तक प्रकाशन समारंभादरम्‍यान सरांची भेट झाली. त्‍यावेळी त्‍यांना माझे आरोग्‍यमंथन भेट दिले. त्‍यावर प्रतिक्रिया देण्‍यासाठी त्‍यांनी आवर्जुन फोन केला व पुस्‍तकातील अनेक लेख माहितीपूर्ण व विस्‍तृत असल्‍याची पोचपावतीही दिली होती. त्‍यानंतर काही न काही निमित्‍ताने सरांशी फोनवर बोलणे व्‍हायचे. आमच्‍या आरोग्‍य विभागाची दरमहा प्रकाशित होणारी आरोग्‍य पत्रिका त्‍यांना मी पाठवत होतो. सरांच्‍या निधनाची अचानक पडलेली बातमी ऐकून धक्‍का बसला व त्‍यांच्‍या...