Posts

Showing posts from January, 2020

प्रवाशी भार हलका करावा

Image
आज रेल्वेप्रवासातील मुख्य समस्या आहे ती म्हणजे गर्दी. लोकलसेवा क्षमतेपेक्षा अधिक मर्यादा ओलांडून धावत आहे तर मेल एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण मिळण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागते. हा प्रवाशी भार हलका करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद होणे गरजेचे आहे. नवे रेल्वेमार्ग टाकणे, रखडलेले प्रकल्प पूर्ण करणे, गाड्यांची व डब्यांची संख्या वाढवणे, रेल्वेतील सुरक्षा व सुविधा वाढवणे याबरोबरच काही मार्गांवर डबल डेकर रेल्वेसेवा सुरू करण्याबाबतदेखील विचार व्हायला हवा. मुंबईला उपनगरांशी जोडणाऱ्या लोकलसेवेची आजची जीवघेणी अवस्था पाहता रेल्वे प्रशासनाने त्याची कारणमीमांसा तपासावी. यासाठी राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांशी चर्चा करून मध्य व दक्षिण मुंबईतील काही शासकीय कार्यालये व खाजगी आस्थापना उनगरांमध्ये स्थलांतरित करण्याबाबत अधिकृत सल्ला द्यावा जेणेकरून गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

जलद व कठोर निकाल आवश्यक

Image
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. यातील गुन्हेगारांना कधी कडक शिक्षा मिळते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर या प्रकरणातील चारही आरोपींना १ फेब्रुवारी ला फाशीची शिक्षा देण्याचा आलेला निकाल स्वागतार्ह असून अशा घटनांतील इतर दोषींसाठीदेखील धोक्याची घटना वाजवणारा आहे. खरेतर हा खूपच उशिरा आलेला निर्णय आहे. याने निर्भयाचा गेलेला जीव परत मिळणार नसला तरी तिच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने या निर्णयातून न्याय मिळाला असेच म्हणावे लागेल. बलात्कारातील गुन्ह्यांमध्ये गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तातडीने फाशीचीच शिक्षा कायम करायला हवी जेणेकरून कायद्यातील पळवाटांचा आधार आरोपींना मिळणार नाही. कठोर शिक्षाच असे गुन्हे रोखण्यासाठी जालीम इलाज आहे. निर्भया प्रकरणानंतरदेखील अत्याचाराच्या अनेक घटना देशात घडत आहेत. कायद्याचा धाक समाजात राहिला नसल्याचा हा परिणाम असून गुन्हेगारांना विकृतीपुढे कुठलेही भय राहिले नसल्याचे द्योतक आहे. त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी जलद व कठोर निकालच पर्याय ठरू शकतील.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

आरोग्यमंथन - राज्य आरोग्य माहिती शिक्षण व संपर्क विभाग

Image
राज्य आरोग्य माहिती शिक्षण व संपर्क विभाग  कोणत्‍याही कार्यक्रमाची किंवा योजनेची माहिती लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्‍यासाठी संपर्क माध्‍यम उपलब्‍ध असणे आवश्‍यक असते. आज अशी अनेक माध्‍यमे आपल्‍यापुढे उपलब्‍ध आहेत. प्रिंट मिडीया, सोशल मिडीया, डिजीटल व न्‍यूज मिडीया यांचेमार्फत विविध कार्यक्रम, घटना, विचार पोहचवण्‍याचे काम केले जाते. शासनाच्‍यादेखील अनेक विभांगामध्‍ये अशा प्रकारचे जनसंपर्क विभाग कार्यान्वित आहेत. राज्‍याच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभागामध्‍ये आरोग्‍य शिक्षण व प्रसिध्‍दी कार्य अधिक प्रभावीपणे होण्‍यासाठी स्‍वतंत्र असा आरोग्‍य शिक्षण व संपर्क विभाग स्‍थापन करण्‍यात आला. सदयस्थितीत हा विभाग पुण्‍याच्‍या विश्रांतवाडी येथील आरोग्‍य भवन तथा परिवर्तन इमारत येथे कार्यान्वित आहे. या विभागाची तोंडओळख वाचकांना व्‍हावी हा उददेश या लेखाचा आहे. आरोग्‍य शिक्षण व प्रसिध्‍दी उपक्रमांचे योग्‍य प्राधान्‍यक्रमाने नियोजन करणे, आरोग्‍य खात्‍याअंतर्गत विविध विभागाकडून राबविण्‍यात येणा-या आरोग्‍य शिक्षण व प्रसिध्‍दी उपक्रमांविषयी सहकार्य व समन्‍वय साधणे, राज्‍याचे आरोग्‍य शिक्षण व प्...

समाजकार्यात हरवलेले व्यक्तिमत्व

Image
आमचे परममित्र व सामाजिक कार्यातील मार्गदर्शक श्री गणेश हिरवे सरांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. खरेतर हिरवे सरांशी माझा परिचय गेल्या चार पाच वर्षांचाच. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो व विचारांची जुळणी झाल्याने संपर्क वाढला आणि नंतर त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रमांचा मीदेखील एक भाग झालो. खरेतर आपल्यासारख्या कुटुंबवत्सल लोकांना कुटुंब, नोकरी वा व्यवसाय या जबाबदाऱ्यातुन वेळ काढणे म्हणजे एक दिव्यच. त्यातून वेळ मिळालाच तर आपण एखादा आवडीचा छंद जोपासतो. माझेच उदाहरण घेतले तर कौटुंबिक व्याप व नोकरीतील व्यस्तता यातून दररोजच्या लिखाणासाठी वेळ देणे फारच जिकरीचे होत होते. त्यातुनच लोकलप्रवासात लिखाण करण्याचा मध्यम मार्ग मी निवडला. (हा लेखदेखील लोकलप्रवासातच लिहिला आहे बरं). असो, तर दैनंदिन व्यापातून वेळ काढून सामाजिक बांधिलकी जोपासणे व समाजकार्यात स्वतःला झोकून देणे हा विचार सर्वसामान्य व्यक्ती करू शकत नाही. मात्र गणेश हिरवे सरांचे कार्य व त्यांची त्यातील तत्परता आपण जर पहिली तर हा माणूस इतक्या साऱ्या गोष्टी यशस्वीपणे कशा करू शकतो याचे मला खरेतर अप्रूप ...

विरोध कायदेशीर मार्गाने व्हावा

Image
सुधारित नागरिकत्व कायद्याचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. त्याच्या अमंलबजावणीसाठी केंद्र सरकार प्रचंड आग्रही असल्यामुळे त्याची परिणामकारकता येत्या काळात दिसून येऊ शकते. सत्तर वर्षे वास्तव्य केल्यानंतर नागरिकत्व सिद्ध होऊ शकत नाही हा जेष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांचा दावा न पटणारा आहे. भारतीय नागरिकत्वाची व्याख्या  स्वातंत्र्योत्तर काळातच निश्चित करण्यात आली आहे. त्यात फार मोठे बदल गेल्या अनेक दशकांत झालेले नाहीत. मात्र देशात घुसखोरीचे व अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले आहे ही वस्तुस्थिती आहे. कायद्याला विरोध करण्याअगोदर त्यातील मुद्द्यांचा अभ्यास करून न पटणारे मुद्दे संदर्भासहित लोकांसमोर आणायला पाहिजेत जेणेकरून संभ्रम निर्माण होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत सरकार हा कायदा देशात लागू करण्याच्या मानसिकतेत असल्यामुळे त्याला विरोध करावयाचा झाल्यास कायदेशीर मार्गच अवलंबला पाहिजे. या कायद्याच्या अमंलबजावणीबाबत देशभरात अनेक मतमतांतरे असल्यामुळे गोंधळात भर पडत आहे. यासाठी केंद्र सरकारने कायद्याची बाजू जनजागृतीद्वारे देशवासीयांसमोर आणायला हवी....

रिक्षा टॅक्सी वर दिव्यांचा निर्णय प्रवासी हिताचा

Image
मुंबई शहरात हजारो टॅक्सी रस्त्यांवर धावत आहेत. मुंबईत प्रवास करताना टॅक्सी नेहमीच महत्त्वाची भूमिका निभावते. मात्र अनेक प्रवाशांचे ह्या टॅक्सी सेवेबद्दल फार चांगले मत व अनुभव नाहीत हेही तितकेच खरे आहे. प्रवाशांना टॅक्सीला हात करुन टॅक्सी थांबवावी लागते. अनेकदा टॅक्सी रिकामी नसेल तरी लोक हात दाखवत टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर कधी टॅक्सी रिकामी असेल तरी टॅक्सी चालक आपल्याला घेऊन जाण्यास तयार होत नाही तर कधी रिकामी टॅक्सी न थांबता सुसाट निघून जाते. त्यामुळे प्रवाशांचे टॅक्सी चालकांशी नेहमीच वाद होतात. मात्र परिवहन विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी टॅक्सींवर तीन रंगाचे दिवे लावण्याचा घेतलेला निर्णय प्रवाशी हिताचाच आहे. यामुळे टॅक्सी आपल्यासाठी उपलब्ध आहे की नाही याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. टॅक्सी युनियनने या निर्णयास विरोध दर्शविला असला तरी प्रवाशांच्या दृष्टीने ह्या लाभकारी निर्णयाचे दूरगामी परिणाम सर्वांच्याच हिताचे व शिस्तीचे ठरतील एव्हढे नक्की.   वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

हा प्रयोग एकदा करून पहावाच

Image
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील नाईट लाईफ मुंबईत लवकरच प्रत्यक्षात अवतरताना दिसणार आहे. मुंबईकरांना रात्रीच्या वेळेस खाण्यापिण्याच्या व शॉपिंगच्या सुविधा मिळाव्यात हा यामागील उद्देश आहे. मात्र या निर्णयाचा वापर रात्रभर केवळ धांगडधिंगा करणाऱ्यांसाठी व बार - पब मालकांसाठी होण्याची शक्यतादेखील आहे. शिवाय सुरक्षा यंत्रणांवर पडणारा ताणदेखील आहेच. आज सर्वासामान्य मुंबईकर दिवसा कामधंदा करतो व रात्री निद्रा घेतो हा प्रचलित नियम आहे. त्यामुळे ह्या रात्रीच्या जगताचा फायदा नक्की कुणाला मिळणार हा सध्यातरी अनुत्तरित प्रश्न आहे. पर्यावरणमंत्र्यांना अभिप्रेत असलेली नाईट लाईफची संकल्पना लोकांना २४ तास सोयीसुविधा मिळाव्यात ही आहे. मात्र त्याचा परिणाम कितपत सकारात्मक होतो हे पाहण्यासाठी एकदा हा प्रयोग करून पाहण्यास काय हरकत आहे? वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

आरोग्य मनाचे

Image
आरोग्य मनाचे आरोग्‍य हा आपल्‍या प्रत्‍येकाच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत जिव्‍हाळयाचा व संवेदनशिल विषय आहे. आरोग्‍य निट ठेवण्‍यासाठी लोक नाना प्रकारचे उपाय व प्रयोग आपल्‍या शरीरावर करत असतात. त्‍यात व्‍यायाम, योगा, आहार, विविध सप्‍लीमेंट, नियमित वैदयकीय चाचण्‍या इत्‍यादी क्रिया सर्वसामान्‍यपणे वापरल्‍या जातात. फिटनेस राखण्‍यासाठी सर्व स्‍तरांतील लोक आग्रही असतात. फिटनेस म्हणजेच आरोग्य. फिटनेस हे शरीराचे महत्वाचे आहेच पण मनाचेही तितकेच महत्वाचे आहे. आज अनेकजण आपल्या व्‍यस्‍त जिवनशैलीतुन वेळ काढून जिम मध्ये जातात, डाएट करतात. विविध पथ्‍ये पाळतात. जे जे जमेल ते करून आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न करतात. पण आपण एका महत्वाच्या गोष्टीकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही आणि ते म्हणजे आपले मन. त्याचेही आरोग्य तितकेच महत्वाचे आहे. मन हे आपल्‍या शरीराचा अविभाज्‍य भाग आहे. त्‍यामुळेच मनाचे आरोग्‍य शारीरीक आरोग्‍याशी निगडित आहे. मनाचे महत्‍व ओळखूनच रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले आहेत जे आजही लोक आपल्‍या आचरणासाठी आदर्श मानतात. आपल्या धर्मामध्ये ध्यानधारणेला खूपच महत्व हे. आजकाल ज्याला आपण मेडिटे...

संग्रहालये जोपासा

Image
विविध प्रकारच्या पौराणिक व ऐतिहासिक वास्तूंची संग्रहालये मुंबईसह देशभरात स्थापन करण्यात आलेली आहेत. मात्र त्यांच्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे त्यांची अवस्था आज बिकट झाली आहे. पुतळे, स्मारके उभारण्यासाठी जितका खर्च आज केला जातो त्याच्या काही टक्का खर्च ह्या संग्रहालयांवर केला तर भारतीय इतिहासाचा हा अमूल्य वारसा जोपासला जाईल. आज अनेक परदेशी नागरिक इथे येवुन संग्रहालयातील वास्तुंचा व त्यामागील ऐतिहासिक पात्रांचा अभ्यास करण्यात जो रस दाखवतात तितकी रुची आजकाल आपल्या शालेय विद्यार्थ्यांमध्येदेखील निर्माण होण्यासाठी प्रयत्न होत नाहीत याबद्दल खेद वाटतो. आधुनिक पिढी ही डिजिटल क्रांतीच्या युगात वावरत असून त्यांना सर्व प्रकारची माहिती इंटरनेटवर उपलब्ध असली तरी ऐतिहासिक गोष्टींचा वारसा जोपासणारी संग्रहालये ही त्या माहितीचे प्रत्यक्ष पुरावे आहेत. त्यामुळे भावी पिढीला मार्गदर्शक ठरणारे हे संदर्भ जोपासलेच पाहिजेत.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई

नवी मुंबई वॉकेथॉन

Image
रविवारी १९ जानेवारीला एकीकडे मुंबईत "मुंबई मॅरेथॉन" रंगली होती तर दुसरीकडे नवी मुंबईत एमजीएम हॉस्पिटलच्या वतीने "निरोगी आयुष्याचे" स्लोगन घेऊन सलग ७व्या वर्षी नवी मुंबईकरांसाठी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजल्यापासून वाशी येथील सेक्रेड हार्ट शाळेसमोरील मैदानातून सुरू झालेल्या ह्या वॉकेथॉनमध्ये हजारो नवी मुंबईकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एमजीएम हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी चौक, वाशी डेपो, मरीआई मंदिर ते परत सेक्रेड हार्ट ग्राऊंड या मार्गावर वॉकेथॉन चालवण्यात आली. सुदृढ आरोग्यासाठी चालण्याचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम आजच्या धकाधकीच्या जीवनात किती महत्वाचा आहे हे या वॉकेथॉन मधील नवी मुंबईकरांच्या उपस्थितीने दाखवून दिले. जेष्ठ नागरिक संघ व अनेक स्वयंसेवी संस्थानीदेखील यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आज बैठ्या कामामुळे व आरामदायक जीवनशैलीमुळे मणके, सांधे, पाठदुखीच्या असंख्य व्याधी उद्भवत आहेत. त्यावर चालणे हा उत्तम इलाज आहे. दररोज चालण्याचा व्यायाम आपल्याला फिट ठेवण्यास कारणीभूत घटक ठरू शकतो....

अस्मितांचे राजकारण

Image
सध्याचे राजकारण हे केवळ प्रांतीय, भाषिक व जातीय अस्मितांभोवतीच फिरताना दिसत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात काही महत्वाकांक्षी नेत्यांमुळे महाराष्ट्राची राजकीय अस्मिता उदयाला आली. मात्र ह्या अस्मिता इतक्या जोपासल्या गेल्यात की त्यात विकासगंगेला नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले. महाराष्ट्रात कित्येक खेडयांत ज्ञानगंगा अद्यापि पोहोचलेली नाही. तरुण बेरोजगार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न अधिकच तीव्र होत चालले आहेत. शेतीचा विकास मंदावलाय. गरिबी, दारिद्रय यांमुळे ग्रामीण आणि शहरी भागांतील आर्थिक दरी वाढत चालली आहे. विदर्भ-मराठवाडा भागांचे प्रश्न कागदोपत्रीच आहेत. बेळगाव सीमाप्रश्नासारखे प्रश्न इतके ताणले गेले आहेत की पुढल्या अनेक वर्षांत तरी हे प्रश्न सुटतील असं वाटत नाही. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शासनातर्फे सखोल प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी तज्ञ मंडळींच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या सर्वच प्रलंबित विषयांच्या अनुषंगाने निश्चित असा विकास आराखडा तयार करण्यात यावा. येत्या काळात सरकारे बदलतील मात्र अस्मितांच्या पलीकडे जाऊन काम करणारे राज्य...

सहकारी बँकांचे भवितव्य अंधारात

Image
पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर आरबीआयने निर्बंध लावून चार महिने उलटले तरी त्यावर कोणताही तोडगा काढण्यास सरकारला यश येत नाही. आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या या बॅंकेतील संचालक व एचडीआयएल या कर्जदार कँपणीचे चालक अटकेत आहेत. त्यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मात्र ह्या मालमत्तेचा लिलाव होईपर्यंत मोठा कालावधी उलटणार आपल्यामुळे पीएमसी खातेधारकाना त्यांच्या ठेवी लवकर मिळणे दुरापास्त झाले आहे. पैसे मिळत नसल्याच्या धक्क्यात सतरा खातेधारकांचा मृत्यू झालेला आहे ही सर्वात धक्कादायक बाब आहे. खातेधारक आपल्या स्वकष्टाच्या कमाईसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत. मात्र यावर अद्यापि कोणताही ठोस तोडगा निघु शकलेला नाही. दुसरीकडे या बँकेवर प्रशासक म्हणून एका निवृत्त अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे मात्र या प्रशासकामार्फतदेखील बँकेला वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नसल्यामुळे खातेधारक हवालदिल आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खातेधारकानी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अडचणींचा पाढा वाचला. नुकतीच माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे सर्वे...

निर्णय प्रवाशी हिताचा असावा

Image
काही मार्गिकांवर खाजगी मालकीतून रेल्वेसेवा चालवण्याच्या धोरणाला रेल्वेने नुकतीच मंजुरी दिली आहे. आज रेल्वेतील सोयीसुविधांबाबत प्रवाशी पूर्णतः समाधानी नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काही ठिकाणी रेल्वेचे खाजगीकरण करणे प्रवाशांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. खाजगी संस्थांमार्फत सेवा पुरवली जाणार असल्यामुळे सुविधा पुरवण्यासाठी रेल्वेबरोबर एक प्रकारची स्पर्धा निर्माण होईल व त्याचा फायदा प्रवाशांना मिळेल. या खाजगी रेल्वे सेवेवर पूर्ण नियंत्रण खाजगी चालकांचे राहणार असले तरी त्याच्या तिकीटदरांवर नियंत्रण मात्र सरकारचे राहणे अत्यंत गरजेचे आहे. रेल्वेप्रवास करणारे बहुतांश प्रवाशी सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यामुळे खाजगी चालकांमार्फत त्यांची लूट होता कामा नये. चांगल्या व किफायतशीर सुविधा व वक्तशीरपणा रेल्वेमध्ये येणे अपेक्षित आहे. त्यामध्ये रेल्वे असफल ठरताना दिसत असल्याने काही मार्गांचे खाजगीकरण हा यावर एक चांगला तोडगा असला तरी या खाजगी चालकांकडून प्रवाशांची आर्थिक पीळवणूक व्हायला नको.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

दूध भेसळीविरोधात व्यापक मोहीम घ्यावी

Image
https://m.maharashtratimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/take-an-extensive-campaign-against-adultery/articleshow/73236956.cms

शुध्‍द पाणी ही मुलभूत गरज

Image
शुध्‍द पाणी ही मुलभूत गरज   मनुष्‍य आणि प्राणी जातीमध्‍ये पाण्‍याचे महत्‍व अनन्‍यसाधारण आहे. पाणी म्हणजेच जीवन. म्हणूनच मानवी जीवनात स्वच्छ व शुद्ध पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. विविध आजारांची  उत्‍पत्‍ती ही दुषीत पाण्‍यामुळेच होते. दुषीत पाणी प्‍यायल्‍यामुळे शरीरातील क्रिया बिघडतात व परिणामी आजारपण गाठते. त्‍यामुळेच जलजन्य आजार व त्याला प्रतिबंध करण्यासाठी शुध्‍द पाणी व पाणी गुणवत्तेबाबत माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता म्हणजे पाण्यातील भौतिक, जैविक व रासायनिक घटकांची तपासणी करून त्याची योग्यता पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगधंद्यासाठी ठरविणे होय. पाणी गुणवत्ता, स्वच्छता आणि आरोग्‍य यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. स्वच्छता असेल तेथे आरोग्य नांदेल, आरोग्य नांदेल तेथे भरभराट होईल, असे म्हटले जाते. आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहाराबरोबर स्वच्छ मोकळी हवा, आसपासचा स्वच्छ परिसर आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी यांची आवश्यकता असते. त्‍यातील शुध्‍द पाणी हा घटक अत्‍यंत महत्‍वाचा आहे. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सर्व समाज आरोग्य संपन्न हवा, त्यासाठी भरपूर व बार...

प्रसारमाध्यमातील वृत्तपत्रलेखनाचे महत्व

Image
समाजात घडणाऱ्या अनेक अनुचित, अन्यायकारक व नियमबाह्य गोष्टींबाबत प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात प्रचंड चीड असते. ती व्यक्त करण्याचे कोणतेही साधन वा व्यासपीठ समान्यजनांकडे उपलब्ध नसते ही वस्तुस्थिती आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकाने उचललेली लेखणी व त्यातून मांडलेले विचार नागरिकांच्या नजरेतून प्रशासनाला भेदणारे ठरू शकतात याचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे. वृत्तपत्रातून सातत्याने विविध विषयांवर निस्वार्थीपणे लेखन करणारे वृत्तपत्रलेखक ही भूमिका चोख बजावत असतात. आज पत्रकारितेमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन अधिक प्रमाणात वास करत असल्याचे पाहायला मिळते, नेतेमंडळी व व्यावसायिकांकडून रक्कमा उकळून बातम्या लावणाऱ्या दलालांचा शिडकाव ह्या क्षेत्रातदेखील पाहायला मिळतो. मात्र अत्यंत प्रामाणिकपणे व सामाजिक जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडणारे पत्रकारदेखील कार्यरत आहेत ज्यांच्यामुळे लोकांचा व राजकारण्यांचा थोडाफार विश्वास व त्यांना भीतीयुक्त दरारा पत्रकारितेबाबत आजदेखील टिकून आहे. मात्र प्रत्येक वृत्तपत्राचा अविभाज्य भाग असणाऱ्या वृत्तपत्रलेखकाला मात्र उपेक्षित ठेवून चालणार नाही. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडी...

अडवली भुतावली शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांची 190 वी जयंती साजरी

Image
अडवली भुतावली शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांची 190 वी जयंती साजरी नवी मुंबई मनपा शाळा क्र ४१, अडवली भुतावली शाळेत दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी बालिकादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेत बालिकादिन, क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांची 190 वी जयंतीदेखील विद्यार्थिनींच्या विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री सावंत सर आणि नगरसेवक श्री रमेश डोळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मोहन डोळे आणि सर्व शिक्षक, कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी मुला मुलींनी सावित्री बाई आणि ज्योतिबा फुले यांचा पेहराव केला होता, तसेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील सादर केले.  यावेळी शाळेने सावित्री बाई फुले यांची प्रतिमा, विविध ग्रंथ यांच्या पालखीची संपूर्ण गावात लेझीम ढोल ताश्यासह भव्य मिरवणूक घोषणा देत काढली. त्यात ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध ठिकाणी रिंगण घालून लेझीम प्रात्यक...

नवी मुंबई पालिकेची एसी बस सेवा

Image
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाद्वारे मोठा गाजावाजा करत काही मार्गांवर एसी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. लोकांना चांगली, किफायतशीर व आरामदायक सेवा उपलब्ध करून देणे हे त्यामागील उद्दिष्ट आहे. मात्र मागच्या रविवारी एक वेगळाच अनुभव मला ह्या सार्वजनिक परिवहन सेवेचा आला. रविवार सुट्टीचे निमित्त साधत मी कुटुंबासह दादर येथील सिद्धीविनायकाच्या दर्शनास गेलो होतो. येताना एनएमएमटीची 121 क्रमांकाची एसी बस पकडली. मंदिर बस स्टॉप पासून घणसोलीपर्यंत तिकीट प्रतिप्रवाशी 90 रुपये. सोबत पाच वर्षांची मुलगी असल्याचे वाहकास सांगीतल्यानंतरदेखील त्यांनी अर्धे तिकीट न देता तीन व्यक्तींचे 270 रुपयांचे तिकीट दिले. याबाबत विचारणा केल्यानंतर या बसमध्ये लहान मुलांना अर्ध्या तिकिटाची व्यवस्था नसल्याचे वाहकाने सांगितले. अगोदरच या बसचे तिकीट खूपच जास्त असल्यामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. वृद्ध, महिला, गरोदर स्त्रिया, अपंग यांना बसण्याची अपुरी व्यवस्था व तिकीटाचे दर ऐकूनच अनेक प्रवाशी बसमधून उतरत असल्याचे दिसून येत होते. त्यातच लहान मुलांनादेखील तिकिटातून सूट मिळत नसेल तर ही सेवा नेमकी कुणासाठी आहे ...

आरोग्यमंथन पाठदुखी

Image
पाठदुखी  सध्‍या आपली जीवनशैली फारच व्‍यस्‍त होत चाललेली आहे. करिअर व प्रापंचिक कर्तव्‍ये पार पाडण्‍याच्‍या धावपळीत प्रत्‍येकाला आपल्‍या शारीरीक व्‍याधींविषयी विचार करण्‍यास वेळच राहिलेला नाही. यामुळे निरनिराळी शारीरीक दुखणी डोके वर काढू लागली आहेत. त्‍यातलेच एक सर्वश्रुत दुखणे म्‍हणजे पाठदुखी. पाठदुखीचा त्रास झाला नाही अशी व्यक्ती सापडणे फार कठीण आहे. अनियमित व धवपळीच्‍या आयुष्‍यामुळे आजकाल फार कमी वयातच ही पाठदुखी सुरु होते. अपघात, व्‍यायामाचा अभाव, ताठ न बसण्‍याची सवय, बैठया स्‍वरुपाचे कामकाज, मऊ गादीवर झोपण्‍याची सवय, जढ वस्‍तू उचलणे, उंच टाचेच्‍या चपला घालणे यासारख्‍या कारणांमुळे आजकाल पाठदुखीसाठी वयाचे बंधन राहिलेले नाही. आरामदायी जिवनामूळे शारीरीक हालचाल कमी झाल्‍याने कोणत्‍याही वयात पाठदुखीचा त्रास जाणवू लागलेला आहे.  तरीही आपण सर्वच पाठदुखीविषयी फारच बेफिकीर राहतो. पाठदुखीची तीव्रता सौम्य असेल, तर आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र नंतर तिचा त्रास जास्त होतो. कधी एखादी वस्तू उचलताना पाठ सणकन भरुन येते, कमरेत लचक भरते, तर कधी सकाळी झोपेतून उठतानाच पाठीने बंड...

निसर्गराजा एक सांगते

Image
निसर्ग राजा ऐक सांगते गुपीत जपलं रे  मेघांनो, वृक्षांनो वेलींनो, कळ्यांनो, फुलांनो तेरी भी चूप, मेरी भी चूप कोणाला काही सांगू नका, कबूल निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे कुणी माझ्या मनात लपलंय रे तो दिसला अन्‌ मी पाहिले पाहिले परि ते कुर्ऱ्याने डोळ्यांत इशारे हसले हसले ते मोठ्या तोर्‍याने हे कसे न त्याला कळले कळले न तुझ्या त्या ओठाने ओठ न हलले, शब्द न जुळले, थोडे चुकले रे कुणी माझ्या मनात लपलंय रे का चाललात ? तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना ...... का ? वा छान दिसतंय ..... काय ? हे रूप भिजलेलं .... आणि ते पहा ...... काय ? तुमचं मनही भिजलेलं ...... कशानं ? प्रेमानं प्रेमानं प्रेमानं निसर्गराजा ऐक सांगतो गुपित जपलं रे कुणी माझ्या मनात लपलंय रे तो भाव प्रीतिचा दिसला दिसला मग संशय कसला ? हा नखरा का मग असला ? असला हा अल्लड चाळा प्रेमात बहाणा कसला ? कसला तो प्रियकर भोळा प्रीत अशी तर रीत अशी का, कोडं पडलंय रे लहानपणापासून ऐकत आलेल्या ह्या गाण्याचे शब्द, स्वर आजही मनाला सुखद गारवा देतात. लहानपणी रेडिओवर हे गाणे लागले की सभोवतालचा निसर्ग पाहून या गाण्यात वावरत असल्याच...

एक धाव स्वच्छतेसाठी - नवी मुंबई महापौर मॅरेथॉन

Image
नवी मुंबई महापौर मॅरेथॉन नवी मुंबई महापौर मॅरेथॉन आज रविवार ६ जानेवारी रोजी पहाटेच्या गार व स्वच्छ वातावरणात प्रचंड उत्साहात पार पडली. नवी मुंबईचा रत्नहार समजल्या जाणाऱ्या पाम बीच रोडवर आयोजित करण्यात आलेल्या ह्या मॅरेथॉनमध्ये हजारो नवी मुंबईकर व विद्यार्थी स्वच्छतेचा संदेश देत धावले. नवी मुंबई महानगरपालिका व एनसीआरडी स्टार्लिंग इन्स्टिट्यूट तसेच स्मार्ट कन्सेप्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही मॅरेथॉन भरवण्यात आली. एक पाऊल स्वच्छतेकडे ही संकल्पना घेऊन नवी मुंबई नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये धाव घेतली. महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई सातत्याने अग्रस्थानी राहत आहे. तसेच स्वच्छतेच्या बाबतीत गेल्या वर्षी देशातील सातव्या क्रमांकाचे शहर राहिलेल्या नवी मुंबईने यंदा थेट देशातील तिसऱ्या क्रमांकावरील स्वच्छ शहर म्हणून झेप घेतली आहे. हाच संदेश घेऊन यंदाची महापौर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. यात २१, १०, ५, ३, २ किलोमीटरसाठी आयोजित स्पर्धेत विविध स्तरांतील व वयोगटातील हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला ज्यात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. वयोवृद्ध, महिला तसेच तरुण...