Posts

Showing posts from September, 2019

आरोग्य विभागाची संयुक्त रोग सर्वेक्षण मोहीम

Image
राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये २०२५ पर्यंत असंसर्गजन्य रोगांमुळे होणा-या अकाली मृत्यूंच्या संख्येमध्ये एकचतुर्थांश इतकी घट करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. तसेच सन २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मुलनाचे उददीष्‍ट ठेवण्‍यात आले आहे. असंसर्गजन्‍य आजारांमुळे जवळपास ६३ टक्‍के मृत्‍यू होतात. प्रामुख्‍याने ३५ ते ६५ वयोगटातील व्‍यक्‍तींमध्‍ये हे आजार आढळून येत असल्‍यामुळे देशाच्‍या विकासावर याचा मोठा परिणाम संभवतो. देशात साधारणतः मधुमेह ६ टक्‍के, उच्‍चरक्‍तदाब १५ टक्‍के तसे दर 1 लाख लोकसंख्‍येमागे कर्करोगाचे १०० रुग्‍ण आढळुन येतात. जिवनशैलीतील बदल, व्‍यायामाचा व हालचालीचा अभाव, आहारातील बदल, वाढता ताणतणाव, तंबाखू सेवन, धुम्रपान, मदयपान इत्‍यादी गोष्‍टींमुळे व्‍याधींमध्‍ये वाढ होत आहे.  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून कर्करोग, महुमेह, ह्रदयविकार यासारख्या असंसर्गजन्य रोगांवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहेत. यामध्ये या रोगांचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा आरोग्य विभागाकडूनही वारंवार उपाययोजना व विविध प्रकारच्या मोहीम हाती घे...

पीएमसी बँक प्रकरणात सर्वसामान्य अडकले

Image
मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आणि मुंबईसह इतर भागांतील पीएमसीच्या बँक शाखांमध्ये एकच गदारोळ झाला. बँकेला नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आलेले आहेत तर खातेदार केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम बँकेतून काढू शकणार आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणणे गरजेचे होते, असे रिझर्व्ह बँकेच्या आदेशात म्हटले असले तरी त्यात या बँकेच्या ग्राहकांच्या हिताबाबत कोणताही निर्णय नसल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. २३ सप्टेंबर पासून बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, त्याचबरोबर बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नये, असे असे आदेश देण्यात आलेले आहेत. पीएमसी ह्या बँकेच्या शेकडो शाखा विविध ठिकाणी कार्यरत असून त्यामध्ये लाखो ठेविदारांच्या गुंतवणुका विविध माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत. सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळख असल...

ऑनलाईन शॉपिंग मधील धोके

Image
ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी करण्यासाठी फेस्टिव्ह सीझन नावाची संकल्पना सध्या दृढ होऊ पाहत आहे. अमेझॉन सारख्या कँपन्यांनी या माध्यमातून देशभरात रोजगार उपलब्ध करून देण्याची केलेली घोषणा नक्कीच चांगली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या हजारो तरुणांना त्यामुळे तात्पुरता का होईना रोजगार मिळणार आहे. मात्र फेस्टिव्ह सीझनमध्ये ऑनलाईन सेलमधून वस्तू खरेदी करुन काही ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटना गेल्या काही वर्षात घडल्या असल्यामुळे ह्या फेस्टिव्ह सिझनवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या सेलमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्यामुळे व त्याचा मोठा फायदा उत्पादक व ग्राहकांमध्ये मध्यस्थीची भूमिका पार पडणाऱ्या ऑनलाइन कँपन्यांना होत असल्यामुळे फसवणूक झालेल्या मोजक्या ग्राहकांकडे कानाडोळा केला जातो. अनेकदा वस्तू न पोहचणे, खराब वस्तू मिळणे, निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा अशा बाबी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगमधील रोजगार हा एक पर्याय असला त्यावरील विश्वासार्हतेबाबतचे धोके ओळखले गेले पाहिजेत.  वैभव मोहन पाटील  घवणसोली, नवी मुंबई

निवडणुकांच्या वेळी बालाकोट?

Image
बालाकोटमधून दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची लष्करप्रमुखांची माहिती देशवासीयांसाठी धक्कादायकच आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर चवताळलेला पाकिस्तान कोणत्याही थराला जाऊ शकतो, त्यांचा हुकुमी एक्का समजला जाणारा दहशतवादी हल्ला घडवून आणू शकतो हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ह्या संभाव्य हल्ल्याकडे कानाडोळा करून त्याचे राजकीय भांडवल करणे योग्य नाही. केंद्र सरकार व लष्कर ह्या दोन यंत्रणा परस्परांशी संलग्न असल्या तरी निर्णयप्रक्रियेसाठी स्वतंत्र आहेत. त्यामुळे लष्करी अधिकाऱ्यांच्या विधानांचा किंवा कृतीचा संबंध सरकारशी जोडणे वस्तुस्थितीपूरक नाही असे वाटते. निवडनूकांच्या वेळीच बालाकोट, पुलवामाच्या घटना पुढे आणल्या जात असल्याचा आरोप होत असला तरी त्याला राजकीय पार्श्वभूमीची किनार आहे. महागाईसारख्या विषयावर आज देश झुंजत असताना त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. देशाची सुरक्षा व आतंकवादाशी लढाई हा विषय देशाच्या सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने प्राधान्याचा असून त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे उचित नाही असे वाटते.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई ...

आरोग्यमंथनचे शतक

Image
शतकीय आरोग्‍यमंथन   कोणत्‍याही गोष्‍टीची शंभरी ही तिच्‍याशी संबंधित व्‍यक्‍तीसाठी अत्‍यंत आनंददायी बाब असते. क्रिकेटमधील शंभर धावा असो की वयाची शंभरी असो, त्‍या खेळाडू किंवा व्‍यक्‍तीसाठी तो काळ अभिमानास्‍पदच असते. "आरोग्यमंथन" हया आठवड्याच्या दर मंगळवारी प्रकाशित होणा-या आरोग्यविषयक लेखमालिकेच्‍या बाबतीतदेखील हा शंभरीचा टप्‍पा आज पार पडत आहे. साधारणतः दोन वर्षांपूर्वी मी दैनिक नवे शहर या वृत्तपत्रामधून सुरू केलेल्‍या आरोग्‍यमंथन या लेख मालिकेतील शंभरावा लेख आज प्रकाशित होत आहे. आपणा सर्व हितचिंतक व वाचकांच्या आशीर्वादाने ही मालिका आज शंंभरीपर्यंत येऊन पोहोचली आहे. आज आरोग्यमंथन या आरोग्यविषयक लेख मालिकेतील १०० वा लेख आपल्यासमोर ठेवताना मला मनस्वी आंनद होत आहे. साधारण वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या ह्या आरोग्य जागृतीविषयी मोहिमेचा १०० लेखांचा पर्यायाने १०० आठवड्यांचा प्रवास कधी संपला हे कळलेच नाही. आज महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक आरोग्य योजना राज्यभरामध्ये राबवण्यात येत आहेत. या योजना म्हणाव्या तितक्या प...

सरकारी योजनांबाबत उदासीनता

Image
लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा 20 Sep 2019, 05:42 AM सरकारी योजनांची अंमलबजावणी व सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यप्रणाली याबाबत सर्वसामान्यांच्या मनात नाराजी असली तरी गेल्या काही वर्षांत केंद्र व राज्य सरकारने जनहिताच्या राबवलेल्या अनेक योजनांची परिणामकारकता वाढीस लागली आहे हेदेखील तितकेच खरे आहे. व्यापक जनजागृतीचा अभाव व शासकीय यंत्रणेबाबत लोकांची उदासीनता ही कारणे लक्षात घेता सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था तसेच जागरूक नागरिकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.  वैभव मोहन पाटील

वाडा तालुक्यातील एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ

Image
गुंज काटी येथील भागीर्थी मंदिर पालघर जिल्ह्यातील गुंज काटी येथील भागीरथी - अंबाबाई मातेचे ऐतिहासिक मंदिर व त्यासमोरील पाण्याने बारमाही तुडुंब भरलेले पुरातन जलकुंड. मंदाकिनी पर्वताच्या पायथ्याशी वसलेला हा परिसर अत्यंत निसर्गरम्य असून गौरी गणपती सणांमध्ये विसर्जन घाट म्हणूनदेखील याचा वापर होतो. नैसर्गिक कलाविष्कारांची व सौंदर्याची आवड असलेल्या हौशी पर्यटकांनी एकदा तरी या ठिकाणाला अवश्य भेट द्यावी.

आरोग्यसेवेची संवेदनशीलता - दैनिक सामना

Image
सार्वजनिक आरोग्य सेवा दिवसागणिक संवेदनशील बनत चालल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. आरोग्य सेवेतील काही असंवेदनशील घटकांमुळे पूर्ण विभागाला दूषणे लागतात. मात्र ह्या सेवेत काम करणारे अनेक कर्मचारी रुग्णांप्रति प्रचंड सहानुभूती ठेवून काम करतात हेदेखील तितकेच खरे आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत याचा परिचय कोल्हापूर जिल्ह्यात आला. कोल्हापुरातील निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या नीता खंदारे या गरोदर महिलेच्या कुटुंबियांना हा शासकीय सेवेच्या आपुलकीचा रोमांचक अनुभव आला. साखरी येथे राहणाऱ्या नीता खंदारे यांना दुपारी बाराच्या सुमारास निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी भरती करण्यात आले. मात्र तेथे प्रसूतीसाठी प्रयत्न केल्यानन्तर सायंकाळी पाच वाजता त्यांची प्रकृती चिंताजनक बनू लागली. तेथे अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्यामुळे त्यांना त्वरित कोल्हापूर येथे हलवणे गरजेचे होते. मात्र कोल्हापूर गगनबावडा या रस्त्यावर पावसाचे प्रचंड पाणी जमा झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला होता. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने...

बाबा - संस्काररुपी आधारवड

Image
प्रथम पुण्यसमरण - ०४.०९.२०२०  विठ्ठल हेच दैवत, मानवता हीच जात, संस्कार आमच्या बाबांचे, कायम राहणार कुटुंबात                                         ।। राम कृष्ण हरी ।। बुधवार दिनांक ४ सप्टेंबर २०१९ रोजी माझे आजोबा श्री गणपत टोलू पाटील (बाबा) यांना वयाच्या ९६ व्या वर्षी देवाज्ञा झाली आणि आमच्या घरातील कौटुंबिक संस्काराचा आधारवड हरपला. स्वातंत्र्यपूर्व काळात १९२३ साली जन्मलेल्या बाबांनी अथक परिश्रमातून कुटुंब सांभाळले व वाढवले. जेमतेम बेताची परिस्थिती असलेल्या आमच्या कुटुंबाला बाबांनी शेती व किराणा दुकानाच्या व्यवसायातून प्रापंचिक आधार दिला. त्याचबरोबर मुला नातवंडांवर कडक शिस्तीचे व संस्कारांचे धडेदेखील गिरवले. अनेकदा कठीण घडीला बाबांनी कुटुंबाला खंबीरपणे मानसिक व शाब्दिक आधाराने सावरले. अखेरच्या क्षणापर्यंत बाबांचा शब्द आमच्या कुटुंबात प्रमाण मानला गेला. संस्कारांबरोबर त्यांनी आपले कौटुंबिक स्वास्थ्य व कुटुंबकबिला कधीही हरवू दिला नाही. वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरदेखील त्यांच्य...