Posts

Showing posts from December, 2019

मुंबईवर आदळणारे लोंढे थोपवा

Image
मुंबईवर आदळणारे परप्रांतीयांचे लोंढे पहायचे असतील तर रोज सकाळी मुंबईबाहेरून भरभरून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या पहाव्यात. इतक्या अतिप्रचंड संख्येत मुंबईत होत असलेले स्थलांतर भविष्याच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. याचा थेट परिणाम उद्या येथील नागरी सुविधांवर होणार आहे. हजारोंच्या संख्येने बाहेरील राज्यांमधील लोक आज मुंबई शहरात नोकरी धंद्यांच्या शोधात येत आहेत ज्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. मुंबई हे सर्वधर्मीय लोकांचे वास्तव्य असलेले शहर आहे असे अनेकदा अभिमानाने म्हटले जाते मात्र मूळचे महाराष्ट्रातील व मराठी नागरीकांच्या या शहरात इतर भाषिकांचे अतिक्रमण तरी कीती व्हावे याला काही मर्यादा असाव्यात की नाही? साहजिकच या गर्दीचा सर्वात जास्त भार रेल्वेसेवेवर पडतो जी मुंबईत सर्वात स्वस्त व जलद वाहतुकीचा मार्ग समजली जाते. पूर्वी केवळ नऊ डब्यांच्या चालवल्या जाणाऱ्या लोकल वाढती गर्दी पाहता कालांतराने बारा डब्यांच्या झाल्या व आता तर पंधरा डब्यांच्या लोकलदेखील वाढत्या गर्दीला कमी पडू लागल्या आहेत. इतकी गर्दी या शहरात स्थलांतरित होतेय पण कुणालाही त्याची तमा नाही. लोंढे थोपवण्यासाठी कुठल्याही ठोस ...

स्वागत नव वर्षाचे

Image
इंग्रजी नववर्षाच्या स्वागताला सर्वत्र मोठ्या जोशात तयारी सुरू झाली आहे. समुद्रकिनारे व महत्वाची देवस्थाने- पर्यटनस्थळे ऍडव्हान्स बुकिंगने हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे. खरेतर लोकांना नववर्षाच्या स्वागतापेक्षा मौज मजा व पर्यटनासाठी 31 दिसेम्बर म्हणजे एक हक्काचा उत्सव आहे असेच वाटत असल्याचे दिसून येत आहे. एरव्ही हिंदू नववर्ष सुरू होणाऱ्या दिवशी इतका उत्साह न दाखवणाऱ्या मुंबई महाराष्ट्रातील हौशी मंडळींचा अत्यानंद 31 डिसेंम्बरचे निमित्त साधून मात्र ओसंडून वाहताना दिसतो. अनेक पर्यटन स्थळे व हॉटेल्समध्ये तर मद्यपान करणाऱ्यांसाठी विशेष सरबराई असते. दारू व जेवणासाठी अनेक आकर्षक ऑफर्स देऊन लोकांना आकर्षित करण्यामागे सर्व हॉटेल व्यावसायिक व इव्हेंट मॅनेजर आघाडीवर आहेत. 31 डिसेंम्बरच्या मागेपुढे दोनचार दिवस पोलीस व सुरक्षा यंत्रणांना अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून खडा पहारा द्यायला लावण्यात कोणता शहाणपणा आहे समजत नाही. गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी नववर्षाची ही सुरुवात केवळ नशाबाजी, धांगडधिंगा व गुन्हेगारीचे स्वरूप असलेली बनत चालल्याने सुसंस्कृत मंडळी यापासून चार हात लांबच राहणे पसंद...

नव्या वर्षात संकल्प निरोगी आयुष्याचा

Image
आज मंगळवार ३१ डिसेंबर २०१९. वर्षातील अखेरचा दिवस व नव्या कोऱ्या वर्षाचे स्वागत करण्याचाही दिवस. आजचा दिवस हा उत्साहाचा, जल्लोषाचा आणि संकल्पाचा. नव्या कॅलेंडरसोबत आपले आरोग्यमंथन देखील उद्या आणखी एका नव्या वर्षात पदार्पण करणार आहे. नवीन वर्ष साजरे करण्याच्या अनेक देशी विदेशी पद्धती आपल्या समाजात दृढ आहेत. कुणी फिरायला शहर सोडून बाहेर पडतो, कुणी कुटुंबासह दिवस घालवतो, अगदीच हौशी मंडळी मित्रमंडळीसह या दिवसाचे सेलिब्रेशन करतो तर काही नव्या वर्षाचे विविध संकल्प सोडून नववर्षाचे स्वागत करतात. एखादा नवा उद्योगधंदा सुरू करण्याचा पण केला जातो, नवे घर, गाडी विकत घेण्याचा संकल्प किंवा दररोजच्या जीवनात ठराविक गोष्ट खाणे सोडणे, वागणे, बोलणे, चालणे यात बदल करण्याचादेखील संकल्प केला जातो. मात्र माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याचे आरोग्य. आरोग्य व्यवस्थित असेल तर त्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यात फारशा अडचणी उदभवत नाहीत त्यामुळेच आपले आरोग्य नीट सांभाळण्याचा संकल्प प्रत्येकाने नव्या वर्षात करायला हवा असे माझे मत आहे. नव्या वर्षाकडून आपल्यापैकी प्रत्येकाला अनेक आशा असतात....

नियमित कर्ज फेडणाऱ्यांचे काय

Image
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेनुसार 30 सप्टेंबरपर्यंत 2019 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाख रूपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे. मात्र याचा फायदा नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. राज्यात यावर्षी लांबलेला पाऊस, चक्रीवादळ, यामुळे खरीप हंगाम पुर्णत शेतकऱ्यांच्या हातातुन गेला आहे. त्यामुळे उत्पादनही नाही व डोकयावर शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर अशी अवस्था शेतकऱ्यांची आहे. मात्र तरीदेखील कर्ज नको म्हणून प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर सरकारकडुन अन्याय केला जात आहे असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. सतत बुडव्यांना कर्जमाफी दिली तर कर्ज न भरण्याची प्रवृत्ती बळावेल आणि आता ज्या प्रमाणे वित्तीय संस्था अडचणीत आल्या आहेत, त्याप्रमाणेच संपुर्ण बॅंकिग यंत्रणा कोलमडुन जाईल, अशी भीती काही शेतकऱ्यांच्या मनात आहे. जर कर्जमाफी द्यायचीच असेल तर ती सरसकट द्यायला पाहिजे तर कोकणातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. अन्यथा नियमित कर्जाची ...

प्रवाशी कट्टा दैनिक लोकमत

Image
आजकाल लोकल ट्रेन चा प्रवास म्हटला कि धडकी भरते. प्रत्येक स्टेशन वरील ओसंडून वाहणारी गर्दी, लोकलमधील गर्दी, चढताना असो वा उतरताना, सगळीकडे असणाऱ्या गर्दीच गर्दीने अगदी गुदमरायला होते. घणसोलीवरून नित्यनेमाने गेली दहा ते बारा वर्षे मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना कधी नव्हे इतका गर्दीने उच्चांक गाठलाय असे वाटायला लागते. दररोज प्रथम वाशी ठाणे या ट्रांसहार्बर व नंतर ठाण्यावरून सि एस टी कडे मध्य रेलवेचा प्रवास करताना उलट दिशेकडून येणाऱ्या गाड्या मात्र कमालीच्या रिकाम्या धावत असल्याचे निदर्शनास पडते. व यातूनच या भरून वाहणाऱ्या गर्दीवरील पर्याय देखील सापडतो. मुंबई शहरामध्ये विशेषतः फोर्ट, कुलाबा, चर्चगेट, नरिमन पॉईंट पासून अंधेरी पर्यंत असणारी मोठमोठया कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये, बँका, शासकीय व निमशासकीय कार्यालये यांकडे हि गर्दी रोज पोटापाण्यासाठी धाव घेत असते. जर यातील काही कार्यालये उपनगरांमध्ये स्थलांतरित केली तरी या गर्दीवर सोयीस्करपणे मार्ग काढता येऊ शकतो. या गर्दीचा प्रवासच फिरवता येऊ शकतो. यामुळे एकतर गर्दीचा समतोल साधता येईल व दुसरे म्हणजे दररोज रेल्वे प्रवासात जाणारे बळ...

दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नाही

Image
गेल्या काही दिवसांत बाजारातील भाज्यांचे चढे दर पाहिले तर त्याबद्दल खेद न वाटता थोडे समाधानाच वाटले. कधी नव्हे ते शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो हे पाहून फार बरे वाटले. दोनेक महिन्यांपूर्वी दहा वीस रुपये किलोने मिळणारा कांदा तर अद्याप शंभर ते दीडशे रुपये किलोच्या घरात आहे. किरकोळ बाजारामध्ये सध्या जवळपास सर्वच भाजीपाल्यांचे दर ८० ते १०० रुपये किलोच्या घरात आहेत. मात्र प्रत्यक्षात हा भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्याला इतका दर मिळतो का हा खरा प्रश्न आहे. याची शहानिशा करन्याच्या फंदात आपण पडत नाही उलट शेतकऱ्याच्या नावानेच सर्वत्र ओरड सुरू आहे. गेले काही दिवस टीव्ही व वर्तमानपत्रातील बातम्या बघितल्यावर मात्र भाज्यांच्या ह्या चढ्या दराचा फायदा शेतकऱ्यांना अजिबात होत नसल्याचा निष्कर्ष मी काढलेला आहे व तो खरादेखील आहे. मग शेतकरी ते बाजार आणि बाजार ते ग्राहक असा शेतमालाचा प्रवास बघितला असता मग हा मूनाफा नेमका होतो तरी कुणाला व पैसे जातात तरी कुठे असा गहन प्रश्न निर्माण होतो. कांद्यासारख्या सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातल्या वस्तूने सर्वसामान्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणल्याची सध्या ओ...

एनआरसी बाबत जनजागृती गरजेची

Image
नागरिकत्व कायद्यावरून देशभरात गदारोळ उठलेला असतानाच आता एनआरसी बाबत अद्याप कुठलीही चर्चा झालेली नसल्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे विधान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केलेले आहे. देशातील घुसखोरांना शोधून काढून त्यांना देशाबाहेर घालवणारे एनआरसी लागू करण्याबाबत सरकार आग्रही आहे हे लपून राहिलेले नाही. वास्तविकता अगोदर या कायद्याची परिणामकारकता व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्याचे महत्व लोकांना पटवून देणे गरजेचे आहे जेणेकरून त्याबाबत गैरसमज राहणार नाहीत. मात्र नोटबंदीच्या निर्णयानंतर झालेला प्रचंड विरोध या वेळीदेखील अटळ आहे याची कल्पना केंद्र सरकारला असावी. काळा पैसा शोधून काढून ते धन अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट नोटबंदीचे असून त्यामुळे सर्वसामान्य लोकांना काहीएक त्रास होणार नाही असे त्यावेळी म्हणणाऱ्या सरकारवर लोकांना झालेल्या मनस्तापामुळे मोठा विरोध सहन करावा लागला. इतके करूनही किती काळा पैसा सरकारजमा झाला हे अद्यापही कळायला मार्ग नाही. तशीच परिस्थिती एनआरसी बाबत घडेल अशी भीती कदाचित लोकांमध्ये आहे. आज देशात वाढलेले अनधिकृत घुसखोर, दहशतवादी शक्ती देशा...

महत्व नाताळचे

Image
नाताळ अर्थात ख्रिसमस हा सण प्रभू येशू यांचा जन्मदिन म्हणून २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. भारतातदेखील या सणाचा उत्‍साह अगदी शिगेला असतो. शाळा महाविदयालयांना या काळात अल्‍पकालीन सुटटया जाहीर केल्‍या जातात. बहुतांश शाळांमध्‍ये तर विदयार्थ्‍यांसह हा सण मोठया जल्‍लोशात साजरा केला जातो. वेगवेगळी  शुभेच्छापत्रे, भेटवस्तू एकमेकांना देऊन या सणात परस्परांना शुभेच्‍छा दिल्‍या जातात. रोषणाई करून या काळात आपापल्या घरांना सजवण्याची प्रथा आहे. सूचिपर्णी हे झाड ख्रिसमस वृक्ष म्हणून सजवले जाते. रात्री सांताक्लॉज ही काल्‍पनिक व्‍यक्‍तीरेखा याच दिवशी लहान मुलांसाठी वेगवेगळ्या भेटवस्तू वाटत असतो असा जनमानसात समाज प्रस्थापित आहे. यामुळेच लहान मुलांना या काळात भेटवस्‍तुंचे विशेष आकर्षण असते. शहरातील मॉल, बाजारपेठांमध्‍ये ख्रिसमस काळात सजावट, सेल व विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. असे असताना बहुतेक जण हा येशू नावाचा व्यक्ती कोण आहे आणि त्याचा जन्मदिन का साजरा केला जातो याबाबत अनभिज्ञ असतात. काहींच्या मते येशू हे एक समाजसुधारक होते, ते एक तत्त्वज्ञानी होते, ते एक यहूदी शिक्षक होते, किंवा येश...

सावधान, इंटरनेटचे व्यसन वाढतेय

Image
आज आपल्‍या अवतीभवती जर आपण पाहिले लहान मुलांपासुन जेष्‍ठांच्‍या प्रत्‍येकाच्‍या हातात मोबाईल आल्‍याचे दिसुन येते. इंटरनेटच्‍या मायाजालात अवघा देश गुंतला असल्‍याचे आपणास पाहायला मिळते. दररोज मोफत इंटरनेट सेवा पुरविणा-या कंपन्‍यांमधील चढाओढ व ते इंटरनेट वापरण्‍यामधील लोकांची चढाओढ यातच सर्वांचा अधिक वेळ खर्ची होत आहे. मात्र वेळ वाया जाण्‍याव्‍यतिरीक्‍त मोबाईल व इंटरनेटचा सर्वात जास्‍त परिणाम लोकांच्‍या मानसिक व शारीरीक आरोग्‍यावर होत आहे. मोबाईल व  घरगुती इंटरनेटच्या वाढत्या प्रमाणामुळे 'इंटरनेट अॅडिक्शन' अर्थात 'इंटरनेट'चे व्यसन लागण्याचे  प्रमाण वाढले आहे. या व्यसनाधीनतेचा प्रत्यक्ष संबंध मेंदूमधील रसायनांचे प्रमाण बिघडण्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंटरनेट सायबर कॅफेच्या मर्यादीत वापराऐवजी मोबाईलमध्‍ये व घरोघरी इंटरनेट घेण्याचा कल वाढत आहे. इंटरनेटचा वाढता वापर चिंतेत भर घालणारा असून, कम्प्युटर, मोबाईल अथवा तत्सम इंटरनेट पाहण्याच्या साधनांच्या प्रमाणाबाहेर वापराने चिडचिड, अतिताण आदी विकार जडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन चार वर्षांपुर्वी प्रतिदिन...

सतर्कता महत्वाची

Image
महिला अत्याचाराविरोधात देशात अनेक कठोर कायदे आहेत मात्र न्यायालयीन पळवाटांच्या आधारे असे खटले वर्षानुवर्षे चालतात. प्रसंगी गुन्हेगार जामिनावर मुक्त होऊन पुन्हा स्वच्छंदी जीवन जगतात. हे थांबवण्यासाठी बलात्कारासारखे खटल्यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन पोलीस व न्यायालयांनी लवकरात लवकर दोषींना कडक शासन करून पीडितांना न्याय दिला देण्यासाठी पावले उचलायला हवीत. गुन्हा घडल्यावर तातडीने त्याचा तपास करणे, गुन्हेगार पकडणे व न्यायालायात हजर करण्याची जबाबदारी पोलिसांनी तर ह्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा देणे न्यायालयाचे काम आहे. ह्या प्रक्रिया दोन महिन्यांच्या कालावधीत कराव्यात यासाठी केंद्र सरकार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व मुख्य न्यायाधीशांना सूचना करणार असल्याची बाब आशादायक नक्कीच आहे मात्र त्याची अंमलबजावणी कशी केली जाते यावर सर्व अवलंबून आहे.  विकृती व वासनांधतेच्या गर्तेत अडकत चाललेले सामाजिक वातावरण आज महिलांसाठी सुरक्षित नक्कीच नाही. यासाठी पोलीस व न्याय यंत्रणानी पुढाकार घेणे गरजेचे असून अत्याचाराच्या घटनांतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन कायद्याचा धाक निर्माण कर...

कायद्याबाबत पुनर्विचार व्हावा

Image
केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात प्रचंड रोष व्यक्त असून देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर गदा येत असल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध विद्यार्थी संघटना, डावे, आंबेडकरवादी संघटना, पुरोगामी पक्ष तसेच मुस्लीम संघटनांदेखील या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्याने परिस्थिती बिकट बनत चाललेली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याच्या घटनादेखील अनेक ठिकाणी घडत आहेत. वास्तविकता केंद्र सरकारने संसदेत पारित केलेल्या या कायद्याविरुद्ध देशात वैचारिक विरोध निर्माण झालेला आहे. त्याची चाचपणी करून सदर विधेयक संसदेत सादर करणे अपेक्षित होते. धर्मनिरपेक्षवादी संघटनांचा याला होणारा संभाव्य विरोध पाहता या कायद्याच्या बाजूने जनमत आजमावणे गरजेचे होते. मात्र देशांतर्गत व्यवस्थेच्या दृष्टीने एव्हढा मोठा निर्णय एकतर्फी झाल्याची भावना निर्माण झाल्यानेच हा आक्रोश निर्माण झाला आहे. इतक्या अतिप्रचंड विरोधानन्तर सरकारला आता या कायद्याच्या बाजूने खंबीर भूमिका मांडणे जिकिरीचे ठरणार आहे. त्यामुळे सरकारने तूर्तास या कायद्याच्या अमंलबजावणीबाबत पुनर्विचार करावा असे वाटते.  ...

खराखुरा नटसम्राट हरपला

Image
मराठी चित्रपट सृष्टीचे नटसम्राट म्हणून ओळखले जाणारे श्रीराम लागू यांचे त्यांच्या ९२ व्या वर्षी मंगळवारी दुखद निधन झाले. डॉ श्रीराम लागू हे केवळ अभिनेते नव्हते तर सामाजिक भान जोपासणारे एक जेष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते होते. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांची कारकीर्द गाजलीच पण हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांनी ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या अनेक गाजलेल्‍या सिनेमांमध्ये काम केलं. ‘नटसम्राट’ या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका लोकांनी डोक्यावर घेतली. त्यांनी भूमिका केलेली नाटके अजरामर झाली. त्यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे व नाट्यरसिकांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मुलनासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. कृत्रिमतेचा कुठलाही लवलेश नसलेला त्यांचा सहज सुंदर अभिनय एका कसलेल्या अभिनेत्‍याचा होता. डॉ लागू यांनी १०० हुन अधिक मराठी व हिंदी चित्रपटांमध्‍ये काम केले आणि विविध भाषांमधील ४० हुन अधिक नाटकांमध्‍ये काम केले आहे. शिवाय त्‍यांनी 20 नाटकांचे दिग्‍दर्शनही केल...

वाहनविक्रीवर निर्बंध हवेत

Image

माध्यमे जबाबदार

Image
नागरिकत्व कायद्यातील दुरुस्तीविरोधात देशातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विद्यार्थी दशेतील तरुण ज्यावेळी एखादे आंदोलन छेडतात त्यावेळी राजकीय हस्तक्षेपापलीकडे जाऊन तो वैचारिक विरोध असतो. शिक्षण, नागरिकत्व, देशभक्ती यांचेवर प्रहार करणाऱ्या घटनाबाह्य तरतुदींना विरोध करण्यासाठी तरुण पुढाकार घेत असतील तर ते चांगले संकेत आहेत मात्र आंदोलन हे लोकशाही मार्गाने व्हायला हवे. लोकशाहीमध्ये नानाविध प्रकारे आंदोलने करण्याची मुभा दिलेली असताना हिंसकतेकडे झुकणारे आंदोलन समर्थनिय अजिबात नाही. तरुणांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल अशा रीतीने आपला विरोध प्रकट न करता अहिंसेच्या मार्गाने निषेध नोंदवला तरी त्याची दखल माध्यमांनी घ्यायला हवी. तोडफोड, जाळपोळ यांशिवाय आंदोलनाला धार मिळत नाही हा समज गेल्या काही वर्षांत समाजात व विशेषतः तरुणाईत दृढ होत चालल्यामुळे आंदोलने अधिक हिंसक होऊ पाहत आहेत. याला कारणीभूत ठरणाऱ्या प्रसार माध्यमांनी याची दखल गांभीर्याने घ्यायला हवी.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम 2.0

Image
विशेष लसीकरण मोहिम २.०  लहान मुले आणि गरोदर मातांचे आरोग्‍य राखण्‍यासाठी विविध उपाययोजना आरोग्‍य विभागाच्‍या वतीने राबविण्‍यात येत आहेत. त्‍या दृष्‍टीने लसीकरण हा अत्‍यंत महत्‍वाचा घटक आहे. आरोग्य विभागाकडून क्षयरोग, काविळ-ब, पोलिओ, गोवर- रूबेला, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आदी आजारांच्या प्रतिबंधासाठी नियमित लसीकरण करण्यात येते. तथापि, काही कारणांमुळे लसीकरण न होऊ शकलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या गरोदर माता व बालकांचे संपूर्ण लसीकरण करण्यासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्‍य २.० ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेचा पहिला टप्पा डिसेंबर महिन्यात होत असुन दुसरा टप्पा जानेवारीत, तिसरा टप्पा फेब्रुवारी व चौथा टप्पा मार्चमध्ये राबविण्यात येणार आहे. ही मोहिम चार टप्प्यांत राबविण्यात येणार असल्याने लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही अशी खात्री आरोग्‍य विभागाला आहे. अशा प्रकारची मोहिम यापुर्वीदेखील केंद्र शासनामार्फत राबविण्‍यात आली होती. या मोहिमेदरम्‍यान लसीकरणापासून वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा व गरोदर मातांचा शोध घेवून त्‍यांचे लसीकरण केले जाते. ...

पोलीस व न्यायालयाची भूमिका मोठी

Image
महिला अत्याचाराविरोधात देशात अनेक कठोर कायदे आहेत मात्र न्यायालयीन पळवाटांच्या आधारे असे खटले वर्षानुवर्षे चालतात. प्रसंगी गुन्हेगार जामिनावर मुक्त होऊन पुन्हा स्वच्छंदी जीवन जगतात. हे थांबवण्यासाठी बलात्कारासारखे खटल्यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन पोलीस व न्यायालयांनी लवकरात लवकर दोषींना कडक शासन करून पीडितांना न्याय दिला देण्यासाठी पावले उचलायला हवीत. गुन्हा घडल्यावर तातडीने त्याचा तपास करणे, गुन्हेगार पकडणे व न्यायालायात हजर करण्याची जबाबदारी पोलिसांनी तर ह्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा देणे न्यायालयाचे काम आहे. ह्या प्रक्रिया दोन महिन्यांच्या कालावधीत कराव्यात यासाठी केंद्र सरकार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व मुख्य न्यायाधीशांना सूचना करणार असल्याची बाब आशादायक नक्कीच आहे मात्र त्याची अंमलबजावणी कशी केली जाते यावर सर्व अवलंबून आहे.  विकृती व वासनांधतेच्या गर्तेत अडकत चाललेले सामाजिक वातावरण आज महिलांसाठी सुरक्षित नक्कीच नाही. यासाठी पोलीस व न्याय यंत्रणानी पुढाकार घेणे गरजेचे असून अत्याचाराच्या घटनांतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन कायद्याचा धाक निर्माण करण्य...

व्यापारी तुपाशी अन शेतकरी उपाशी

Image
गेल्या काही दिवसांत बाजारातील भाज्यांचे चढे दर पाहिले तर त्याबद्दल खेद न वाटता थोडे समाधानाच वाटले. कधी नव्हे ते शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो हे पाहून फार बरे वाटले. दोनेक महिन्यांपूर्वी दहा वीस रुपये किलोने मिळणारा कांदा तर अद्याप शंभर ते दीडशे रुपये किलोच्या घरात आहे. किरकोळ बाजारामध्ये सध्या जवळपास सर्वच भाजीपाल्यांचे दर ८० ते १०० रुपये किलोच्या घरात आहेत. मात्र प्रत्यक्षात हा भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्याला इतका दर मिळतो का हा खरा प्रश्न आहे. याची शहानिशा करन्याच्या फंदात आपण पडत नाही उलट शेतकऱ्याच्या नावानेच सर्वत्र ओरड सुरू आहे. गेले काही दिवस टीव्ही व वर्तमानपत्रातील बातम्या बघितल्यावर मात्र भाज्यांच्या ह्या चढ्या दराचा फायदा शेतकऱ्यांना अजिबात होत नसल्याचा निष्कर्ष मी काढलेला आहे व तो खरादेखील आहे. मग शेतकरी ते बाजार आणि बाजार ते ग्राहक असा शेतमालाचा प्रवास बघितला असता मग हा मूनाफा नेमका होतो तरी कुणाला व पैसे जातात तरी कुठे असा गहन प्रश्न निर्माण होतो. कांद्यासारख्या सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातल्या वस्तूने सर्वसामान्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणल्याची सध्य...

नियमांमध्ये पारदर्शकता हवी

Image
अनियमित सार्वजनिक वाहतुकिला पर्याय म्हणून मुंबई शहरात खाजगी ट्रॅव्हल्स बसचे पेव फुटले आहे. प्रवाश्यांच्या गरजेचा फायदा घेऊन मनमानी भाडे आकारणे, हव्या तिथे बसेस उभ्या करणे, वाहतूक व पार्किंग नियमांचा भंग करणे हे या ट्रॅव्हलर्स साठी नित्याचेच झाले आहे. याबाबतीत कठोर नियम असतानादेखील सर्रास सुरू असलेले असे प्रकार वाहतूक पोलिसांचे अभय असल्याशिवाय घडू शकत नाहीत. वाहतूक पोलिसांच्या संशयास्पद कामकाजावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अंमलात आणायला हवी. यासाठी विशेष तपासणी पथके स्थापन केल्यास सत्य समोर येईल. नियम बनवणे सोपे आहे मात्र ते राबवण्यासाठी मानसिकतेत बदल घडायला हवा. नियमांमध्ये परदर्शकता हवी.  वैभव मोहन पाटील   घणसोली, नवी मुंबई

आरोग्यमंथन - सर्दी

Image
सर्दी वातावरणात झालेले बदल, संसर्ग अथवा दुषीत पाणी प्‍यायलाने उदभवणा-या नि‍रनिराळया त्रासांपैकी एक म्‍हणजे सर्दी. सर्दी हा नाक, घसा, श्वासनलिका ह्या सर्वांवर परिणाम करणारा एक सर्वसामान्य संसर्गजन्य विषाणू आहे. मात्र सर्दीने डोके वर काढले की हळूहळू इतर विकारदेखील शरीरात घर करु लागतात. ज्या विषाणूंमुळे सर्दी होते त्‍याला आपण व्हायरल इन्फेक्शन असे म्‍हणतो असे २०० पेक्षा जास्त विषाणू असतात. सर्दीचे जंतू खूपच संसर्गजन्य असतात. जेव्हा सर्दी झालेला एखादा माणूस खोकतो किंवा शिंकतो तेव्हा ह्या जंतूंचा हवेतून प्रादुर्भाव होतो. हा प्रादुर्भाव सर्दी झालेल्या माणसाचा रुमाल, टॉवेल वापरल्याने आणि त्या माणसाच्या जवळपास वावरल्याने सुद्धा होतो. सर्दी ही कुणालाही कुठल्याही वयात होऊ शकते. परंतु लहान मुलांमधे त्याचे प्रमाण जास्त दिसते. ह्याचे कारण म्हणजे मोठ्या माणसांची प्रतिकार शक्ती ही लहान मुलांपेक्षा प्रबळ असते.  धूर, धूळ, फुलांचे परागकण, डस्ट इत्यादींच्या अ‍ॅलर्जीमुळे शिंका येतात व सर्दी होते. यावेळी शिंकांचा त्रास फार होतो. नंतर नाक वाहायला म्हणजे सर्दीची सुरुवात होते. पुढे चालून डोके...

नागरिकांनीही सतर्कता बाळगावी

Image
महिला अत्याचाराविरोधात देशात अनेक कठोर कायदे आहेत मात्र न्यायालयीन पळवाटांच्या आधारे असे खटले वर्षानुवर्षे चालतात. प्रसंगी गुन्हेगार जामिनावर मुक्त होऊन पुन्हा स्वच्छंदी जीवन जगतात. हे थांबवण्यासाठी बलात्कारासारखे खटल्यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन पोलीस व न्यायालयांनी लवकरात लवकर दोषींना कडक शासन करून पीडितांना न्याय दिला देण्यासाठी पावले उचलायला हवीत. गुन्हा घडल्यावर तातडीने त्याचा तपास करणे, गुन्हेगार पकडणे व न्यायालायात हजर करण्याची जबाबदारी पोलिसांनी तर ह्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा देणे न्यायालयाचे काम आहे. ह्या प्रक्रिया दोन महिन्यांच्या कालावधीत कराव्यात यासाठी केंद्र सरकार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व मुख्य न्यायाधीशांना सूचना करणार असल्याची बाब आशादायक नक्कीच आहे मात्र त्याची अंमलबजावणी कशी केली जाते यावर सर्व अवलंबून आहे.  विकृती व वासनांधतेच्या गर्तेत अडकत चाललेले सामाजिक वातावरण आज महिलांसाठी सुरक्षित नक्कीच नाही. यासाठी पोलीस व न्याय यंत्रणानी पुढाकार घेणे गरजेचे असून अत्याचाराच्या घटनांतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन कायद्याचा धाक निर्माण क...

चिन्मय मिशनची गीता चांटिंग स्पर्धा

Image
गीतेच्या प्रसारासाठी चिन्मय मिशनचे कार्य कौतुकास्पद आज ८ डिसेंबर, गीता जयंती. श्रीमदभगवतगीतेचा प्रसार सर्वदूर व्हावा व शालेय मुलांमध्ये गीतेबद्दल रुची निर्माण व्हावी म्हणून गेल्या काही वर्षांपासून अध्यात्मिक सेवेतील 'चिन्मय मिशन' ही अग्रगण्य संस्था विविध उपक्रम राबवित आहे. सन 2001 सालापासून शालेय मुलांच्या गीता पठणाच्या स्पर्धा ह्या संस्थेमार्फत घेण्यात येतात. दरवर्षी साधारणतः जून महिन्यामध्ये गीतेचा एक अध्याय निवडून मुलांच्या इयत्तांनुसार व वयोगटानुसार त्यातील श्लोक पाठांतरासाठी पुस्तकासह देण्यात येतात. सप्टेंबर महिन्यात स्पर्धेचा प्रथम राऊंड शाळांमध्येच घेण्यात येतो व फायनल राऊंडसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानंतर अंतिम स्पर्धा नोव्हेंबर - डिसेंम्बर महिन्यात चिन्मय मिशन केंद्रांवर घेतल्या जातात. नवी मुंबई विभागासाठी यंदा पहिलीत शिकणारी माझी मुलगी तनिषा हिचादेखील प्रथमच सहभाग नोंदवला होता व काही दिवसांतच ती गीतेच्या अठराव्या अध्यायातील दहा श्लोक ती आम्हालाही न जमतील अशा उच्चारांत अगदी अस्खलितपणे बोलू लागली. अपेक्षेप्रमाणे तिची फायनलसाठी निवडदेखील झाली...

कारशेडसाठी वृक्षतोड अयोग्य

Image
मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेने सुरुवातीपासूनच विरोध केलेला होता. मात्र सत्ताधारी पक्षात असूनदेखील हे काम थांबवणे सेनेला शक्य झाले नाही. यासंदर्भात न्यायालयानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र आता नवे सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कामास स्थगिती देण्याचा घेतलेला निर्णय अपेक्षितच होता. मूळ मुद्दा येथील कारशेडच्या कामासाठी होत असलेली वृक्षतोड हाच आहे. आणि वृक्षतोडीशिवाय येथे कुठलाही कारशेड उभा राहणे शक्य नाही. त्यामुळे मेट्रोच्या कारशेडचा सुरू झालेला हा प्रकल्प मोठ्या पेचात सापडणार आहे. राजकीय पक्ष व पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून कारशेडचे काम सुरू करणे जमणार नसून प्रकल्पास विरोध करणारे पक्ष आता सत्तेत बसल्यामुळे कारशेडचा मार्ग खडतर झाला आहे. मुळात वादग्रस्त जागेवर कारशेडचा घाट घालनेच संयुक्तिक नव्हते. मुंबईतून नष्ट होत चाललेली वृक्षसंपदा व जंगले वाचवण्यासाठी सुरू झालेल्या या लढाईचा अंतिम परिणाम काय निघतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

आरोग्य अधिकारी - कर्मचारी "योग"मय

Image
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयुष विभागामार्फत आरोग्य भवनमध्ये योग प्रशिक्षण वर्ग                                   प्राचीन काळी ऋषी मुनींनी अध्‍यात्मिक व आरोग्‍यविषयक संशोधनाचे एक शास्‍त्र निर्माण करुन त्‍याला योगशास्‍त्र हे नाव दिले. योग ही शरीराला संतुलित व प्रसन्‍न ठेवण्‍यासाठीची एक क्रिया आहे. आपण आपल्‍या शरीराकडे वेळीच लक्ष न दिल्यास आरोग्याच्या कुरबुरी सुरू होतात. हे टाळून निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग्य व्यायाम व आहार महत्वाचा ठरतो. योग ही क्रिया शरीराचे व मनाचे संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळेच सुदृढ आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने योगाचे महत्‍व आपल्‍या जिवनात अनन्‍यसाधारण आहे असे म्हटल्यास ते अजिबात वावगे नाही. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे असे म्‍हटले जाते. जागतिक स्तरावर योगाचा प्रसार अधिक वेगाने फोफावल्याने अनेक परदेशी नागरिक या क्रियेकडे वळू लागले आहेत. आपल्‍याला जडणा-या बहुतांशी व्‍याधींवर एकमेव, प्रतिबंधात्‍मक, कमी खर्चिक, घरात कार्यालयात बसल्‍याबसल्‍य...