Posts

Showing posts from March, 2024

छुप्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही

Image
सार्वजनिक ठिकाणी पाळावयाचे नियम व शिस्तीबाबत शासनाच्या विविध विभागांनी नियम ठरवून दिलेले आहेत. या नियमांचे पालन नीट होते की नाही, सार्वजनिक ठिकाणांवर लोकांची सुरक्षा व आरोग्याच्या बाबतीत दक्षता घेण्याची जबाबदारी मुख्यत्वे स्थानिक प्रशासन व पोलिसांची आहे. मात्र मुंबई व उपनगरांतील जवळपास सर्वच गल्लीबोळात ह्या नियमांचे तीन तेरा वाजवल्याचे चित्र आहे. फेरीवाले, चहा, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या गॅस- सिलेंडरसह सर्रास उघड्यावर अनधिकृतपणे सर्व नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करताना दिसतात. अतिशय बिनधास्तपणे सुरू असलेले हे उद्योग प्रशासन व पोलिसांच्या छुप्या पाठिंब्याशिवाय सुरू राहणे शक्यच नाही. अशा प्रकारच्या आर्थिक तडजोडी करून ठिकठिकाणी आपला जम बसवण्यामध्ये परप्रांतीय लोक आघाडीवर आहेत. फेरीवाले व इतर व्यवसायांसाठी ठराविक जागा व नियम निश्चित केलेले असताना जिथे जागा दिसेल तिथे हे उद्योग सुरू असल्याचे पाहायला मिळते. तसेच आजकाल मोकळ्या जागा, उड्डाणपूल, उद्याने ही मद्यपी, कॉलेज तरुण तरुणी, उनाड मुले, गर्दुल्ले यांचे अड्डे झाल्याचेही पाहायला मिळते. अनेक प्रकारे सुरू असलेले हे न पहाव...

पुस्तकभेटीचा आनंद

Image
कार्यालयात कुणाचाही वाढदिवस, निवृत्ती वा पदोन्नती असो, नित्यनेमाने त्यांना पुस्तक भेट देण्याचा उपक्रम गेली अनेक वर्षे मी कायम ठेवलेला आहे. खरंतर ह्या सर्व व्यक्ती आपापल्या क्षेत्रातील नैपुण्य व विशेषत्व धारण केलेल्या असतात. आपल्यावरील जबाबदारीला यथायोग्य न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील दिसतात. एखादे निमित्त साधून त्यांना छोटीशी भेट देऊन सन्मानित करण्याचा प्रसंग, भविष्यात त्यांचे व्यक्तिविशेष अधिक चांगल्या प्रकारे फुलवण्यासाठी नक्कीच पोषक ठरतो असे मत आहे. त्यामुळे वेळ व सवड पाहून सहकाऱ्यांसह त्यांना पुस्तकरूपी शुभेच्छा देण्याची संधी मी सोडत नाही. या आठवड्यात कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी श्री विकास सावंत, कार्यक्रम अधिकारी श्री अमित जयस्वाल यांचे वाढदिवसाचे निम्मित साधत शुभेच्छा दिल्या तर टाटा रुग्णालयात नव्या जबाबदारीसाठी रुजू होत असलेल्या डॉ अंकिता अहिरे यांना सहकारी अधिकाऱ्यांसह कार्यालयातून निरोप देत ह्या नव्या संधीसाठी शुभेच्छा दिल्या. वैभव

गावाकडची होळी

Image
होळी सणाच्या  निमित्‍ताने यंदाही पालघर जिल्‍हयातील देवघर या जन्‍मगावी जाण्‍याचा योग आला. गावातील होळीची परंपरा कित्येक वर्षे जुनी असून आजही एकाच ठिकाणी जमून गावातील सर्व ग्रामस्‍थ होळीदहन करतात. लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत चार पाचशे ग्रामस्थ यावेळी एकत्र जमतात. गावातील मध्यस्थानी असलेल्या एका शेतात अनेक दशकांपासून होळी दहनाचा हा प्रघात सुरू आहे. दरवर्षी गावच्या पोलीस पाटलांकरवी  अगदी शास्त्रोक्त पद्धतीने होळीचे पूजन केले जाते. गावातील सर्व महिला वर्ग यावेळी आरती ताट, नारळ वगैरे साहित्य घेऊन पूजेसाठी आवर्जून हजर असतो. पूजा झाल्यावर सामुदायिक महा आरती व त्यानंतर होळीला अग्नी देण्यात आला. गावातील अनेक नवविवाहित जोडपी यावेळी होळीला फेरे मारून आशीर्वाद घेताना दिसली. दुसरीकडे काही हौशी तरुणांकडून जोरदार आरोळ्या आणि बोंबा सुरू होत्या. होळीच्या मध्यभागी असलेला बांबूचा मध्यखांब पडल्याशिवाय कुणीही होळीजवळून निघाला नाही. या बांबूच्या फांद्या घराच्या दरवाजावर लावण्याचा प्रघात आहे त्यामुळे घरात अनिष्ट घटना, वीज, बाधा पोहोचत नाही असा समज दृढ आहे. नोकरी व्‍यवसायानिम...

विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल ही मोठी समस्या

Image
विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल आज सर्वात मोठी समस्या बनू पाहत आहे. शाळा महाविद्यालयातील बहुतांश मुलांना मोबाईलचे व्यसन जडलेले आहे. यामुळे स्टडी टाईम कमी होऊन स्क्रीन टाईम वाढत चाललेला आहे. कोविड काळात शाळा महाविद्यालये बंद होती मात्र मोबाईलच्या माध्यमातुन ऑनलाईन शिक्षण सुरू होते. मोबाईल न वापरणारी मुलेदेखील या काळात मोबाईल वापरू लागली. मात्र काळाची गरज म्हणून हातात आलेले मोबाईल आज मुलांचे व्यसन बनलेले आहे आणि त्यांचे शैक्षणिक करिअरदेखील त्यामुळे खराब होत आहे. हातोहाती असलेले अँड्रॉईड मोबाईल व त्यामध्ये सहज उपलब्ध होणारे इंटरनेट, तसेच व्हाट्सएप व फेसबुकमुळे देशातील तरुण पिढी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मोबाईल नव्हते तेव्हा मुले पुस्तकाजवळ होती आता मुले  मोबाईलमध्येच स्वतःचे विश्व शोधू लागलीत. पालकांची मोबाईलमधील व्यस्तता देखील मुलांना बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे. व्यस्त जनजीवन, मोबाईलच्या किंमतीत झालेली घट व वाढलेला दर्जा, जागोजागी वाय फाय सारख्या सुविधा, मोबाईलद्वारे होत असणारे सुलभ आर्थिक व कार्यालयीन व्यवहार व त्यामुळे वाचणारा वेळ तसेच मोबाइलवर व्हि...

मुंबईतील एसबीआय ग्रीन मॅरेथॉन मध्ये 'आभा कार्ड'बाबत जनजागृती

Image
मुंबईतील एसबीआय ग्रीन मॅरेथॉन मध्ये 'आभा कार्ड'बाबत जनजागृती "निरोगी आणि हरित मुंबई"चा नारा देत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने मुंबई तसेच भोपाळ शहरांमध्ये "ग्रीन मॅरेथॉन" चे आयोजन रविवार दिनांक १७ मार्च २०२४ रोजी करण्यात आले. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या ह्या मॅरेथॉन मध्ये पहाटेपासूनच हजारो मुंबईकर सहभागी झाले होते. ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अशा तीन टप्प्यांमध्ये पार पडलेल्या मॅरेथॉनमधील महिला व पुरुष गटातील आणि १८-४४ वर्षे तसेच ४५ वर्षावरील वयोगटातील विजेत्यांचा सन्मान यावेळी रोख पारितोषिके व भेटवस्तू देऊन करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर एसबीआयचे वरिष्ठ अधिकारी तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण नवी दिल्लीचे एबीडीएम संचालक मा श्रीमती लथा गणपती तसेच मा श्री विक्रम पगरिया आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा प्रथमच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणने या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेत आयुष्यमान भारत डिजिटल मिशन व आभा कार्डबाबत लोकांमध्ये जनजागृती केली. आभा कार्डच्या माध्यमातून नागरिकांचा संपूर्ण आरोग्य रेकॉर्ड एका ठराविक क्रमांकाच्या आधारे जतन क...

श्रद्धावान आणि पर्यटकांना खुनावणारे श्री क्षेत्र जेजुरी - महाशिवरात्रीला जेजुरी श्री खंडेरायाचे दर्शन

Image
* भाविक आणि पर्यटकांना खुणावणारे श्री क्षेत्र जेजुरी * महाशिवरात्रीला श्री खंडेरायाचे दर्शन https://vaibhavmohanpatil.blogspot.com/2024/03/blog-post_9.html?m=1 महाराष्ट्रातील लाखो श्रद्धावानांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा देवस्थानच्या जेजुरी नगरीस भेट देण्याचा योग आला. यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्त जेजुरी गडावर जाण्याचा बेत महिनाभरापूर्वीच आखला होता. गडावरील ऐतिहासिक व पुरातन असलेले शिवमंदिर वर्षातून केवळ महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी खुले केले जाते. हेच निमित्त साधून यंदाच्या शिवरात्रीला श्री खंडोबाचे देशन घेतले. यावेळी प्रथमच गर्भगृहातील शिवपिंडीचे दर्शनदेखील घेता आले. जेजुरीच्या खंडेरायाची महती आज सर्वदूर पसरलेली आहे. जेजुरी हे वीरांचे दैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. आमच्या कुटुंबाचेदेखील कुलदैवत खंडोबा असल्याने दरवर्षी श्री क्षेत्र जेजुरी येथे कुटुंबासह जाण्याचा योग येतो. मात्र गेल्या चार पाच वर्षांपासून कोविड कालखंडानंतर दर्शनासाठी जाता आले नाही. यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी शुक्रवारी सकाळी ठाण्यावरून मुंबई - कोल्हापूर कोयना एक्स...

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने

Image
८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा होत आहे. महिला सक्षमीकरणाचा गजर सर्वत्र सुरु आहे. मात्र महिलांचे समाजातील स्थान, त्यांची सुरक्षितता, समानता, अधिकार, क्षमता, आरोग्य या बाबी स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षानंतरदेखील चिंताजनक आहेत हे मान्य करावेच लागेल. देशाच्या कुठल्यातरी दररोज भागात महिलांवर दररोज अत्याचार, बलात्कार, अन्याय या गोष्टी घडत आहेत, त्यांच्या सुरक्षेचा विषय आजही अनुत्तरीतच आहे. कोणतेही सरकार यावर ठोस उपाय शोधू शकलेले नाही. महिलांसाठी केवळ आरक्षणे देऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी लोकांची स्त्रीकडे पाहण्याची मानसिकता बद्दलायला हवी, त्यांना सामाजिक सुरक्षा बहाल करण्यासाठी कायद्यामध्ये कठोरता आणणे आवश्यक आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचे अनेक खटले वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित आहेत. असे खटले जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कडक शासन दिले पाहिजे जेणेकरून स्त्रियांप्रति समाजाचा दृष्टिकोन बद्दलेल. कायद्याचा धाक प्रस्थापित करणे काळाची व स्त्री सुरक्षेची सर्वात मोठी गरज आहे. स्त्री भ्रूण हत्येसारखे पातक करणाऱ्या अपप्रवृत्तीना जागीच ठेचून का...

अभ्यास करा जोमाने पण आरोग्य सांभाळून

Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या तर एक मार्चपासून दहावीच्या परीक्षांना सुरवात झालेली आहे. राज्यात 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर 10 हजार 497 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तसेच 5 हजार 86 केंद्रांवर दहावीची परीक्षा होत असून 23 हजार 272 माध्यमिक शाळांमधून 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. खरेतर दहावी व बारावीची वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाची व टर्निंग पॉईंट ठरणारी वर्षे. त्यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थी सर्व शक्तीनिशी या परीक्षेची तयारी करण्यात व्यग्र आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, पदवी यासारख्या शाखांची दारे इथूनच पुढे उघडत असल्याने शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने मुले अगदी झोकून देऊन अभ्यासात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळते. वर्षभर मुले अगदी मन लावून अंतिम परीक्षेची तयारी करत असतात. मात्र वर्षभर तयारी केल्यानंतर ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांचे आजारपण जर आडवे तर? कल्पनाही करवत नाही ना ! हा विच...

आधार बेस मतदान घ्या

Image
यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. एकापाठोपाठ लोकसभा, विधानसभा व त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका राज्यात होणार आहेत.  पारंपरिक पद्धतीच्या मतपत्रिकांद्वारे होणाऱ्या मतदानप्रक्रियेत काळानुरूप बदल घडून आला आणि मतपत्रिकांची जागा ईव्हीएम मशीन सारख्या अद्ययावत यंत्रांनी घेतली. मात्र असे असले तरी दरवेळी शिक्षक, ग्रामसेवक व इतर विविध खात्यांतील सरकारी कर्मचारी सर्वेक्षण, प्रशिक्षण व निडणुकांच्या कामांमध्ये जुंपले जातात. यामुळे त्यांच्या मूळ कामकाजावर परिणाम होतो ही तक्रार खरी आहे. आता तर ईव्हीएम मशिन्सवर अनेक शंका उपस्थित करण्यात येत असल्यामुळे कालांतराने या मशीनही कालबाह्य होतील हे नाकारता येणार नाही. त्यामुळे मतदार नोंदणी व मतदान प्रक्रियेत पारदर्शकता येणे फार गरजेचे आहे. आज सर्वत्र आधार कार्ड सक्तीचे केले जात असताना याच आधार क्रमांकाचा वापर मतदान प्रक्रियेत का केला जात नाही हा मोठा प्रश्न आहे. बँकांमधील खाती, पॅन कार्ड, सिम कार्ड काढण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य असून केवळ बोटांच्या ठशांद्वारे त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती व इतिहास ऑनलाईन उपलब्ध होते जीचा व...

मोठया प्रबोधनाची गरज

Image
आंदोलनाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही हा समज गेल्या काही वर्षांमध्ये समाजात दृढ होत चालल्यामुळे आंदोलनांची संख्या व आक्रमकताही वाढत चाललेली आहे. सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढत चाललेल्या असून त्यासाठी मोठमोठी आंदोलने उभी केली जात आहेत. ज्वलंत व जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी आजकाल कुठल्याही राजकीय पाठबळाविनादेखील आंदोलनांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षण हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र अशी आंदोलने अनियंत्रित स्वरूपाची असल्याने ती हिंसक होताना दिसत आहेत. एकतर कुठल्यातरी राजकीय पाठिंब्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांचा जोश शिगेला असतो. त्यात लोकांच्या भावना गुंतलेल्या असल्याने आंदोलनाला एक प्रकारची धार प्राप्त होते. आणि मग त्यात इप्सित साध्य न झाल्यास आंदोलन भरकटते व हिंसेकडे वळते. यात मग सरकारी वा सत्ताधाऱ्यांची मालमत्ता भक्ष्यस्थानी पडते तर काहींच्या जीवावरदेखील बेतते. आंदोलनादरम्यान जाळपोळ, तोडफोड, रास्ता रोको हे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. मात्र या सर्वांचा परिपाक सर्वसामान्य लोकांना मनस्ताप व सरकारी मालमत्तेचे नुकसान यामध्ये होतो. हे रोखण्यासाठी ...