भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आपल्या देशात अनेक थोर पुरुषांनी जन्म घेतला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासुन सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या अनेक महापुरुषांची नावे घेता येतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेदेखील आपल्या देशाला लाभलेले असामान्य व्यक्तिमत्व. भारतीय राज्यघटना ज्यांनी आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या जोरावर लिहीली व जीचे आजदेखील आपण विनयशिलतेने पालन करतो त्या राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव यांचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना चांगली पुस्तके वाचावयास आणून देत. त्यामुळेच बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि दलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून मानवतेची दिव्य ज्योत निर्माण केली. त्यामुळेच ही व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती आहे. अत्यंत सत्यप्रिय असणा-या बाबासाहेबांना भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्याय यांचा प्रखर तिरस्कार होता. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड असे ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत त्यामुळेच तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचा त्यांचा संकल्प होता. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही ही शिकवण देत सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. दलितांना सन्मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधीही त्यांनी जोरदार लढा दिला.
आपल्या देशात अनेक थोर पुरुषांनी जन्म घेतला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासुन सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या अनेक महापुरुषांची नावे घेता येतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेदेखील आपल्या देशाला लाभलेले असामान्य व्यक्तिमत्व. भारतीय राज्यघटना ज्यांनी आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या जोरावर लिहीली व जीचे आजदेखील आपण विनयशिलतेने पालन करतो त्या राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव यांचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना चांगली पुस्तके वाचावयास आणून देत. त्यामुळेच बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि दलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून मानवतेची दिव्य ज्योत निर्माण केली. त्यामुळेच ही व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती आहे. अत्यंत सत्यप्रिय असणा-या बाबासाहेबांना भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्याय यांचा प्रखर तिरस्कार होता. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड असे ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत त्यामुळेच तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचा त्यांचा संकल्प होता. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही ही शिकवण देत सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. दलितांना सन्मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधीही त्यांनी जोरदार लढा दिला.

Comments
Post a Comment