उन्हाचा कहर

उन्हाचा कहर

उन्हाने सर्वत्र अगदीच कहर केलेला आहे. कधी नव्हे इतकी गर्मी सध्या राज्याच्या जवळपास सर्वच भागांत होत आहे. आटलेले जलस्रोत व लोप पावत चाललेला निसर्ग यांचा परिणाम म्हणून सर्वत्र उष्णता हाहाकार करत आहे. वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करणे हेच आज सर्वांचे मुख्य उद्दिष्ट झाले असून ग्रामीण व शहरी भागातील परिस्थिती वेगळी नाही. विदर्भात तापमानाने सर्वाधिक उच्चांक गाठला असून मानवी व प्राणी जीवनासाठी ही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली लग्नसराई व निवडणुकांनी तापलेल्या वातावरणात वाढते ऊन तेल ओतण्याचे काम करत आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघाटापासून वाचण्यासाठी आवश्यक उपाययोजना स्वतःच कराव्यात. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त