वाहनसंख्येवर नियंत्रण हवे



महिन्याभरापूर्वी मुंबई पालिकेने वाहन पार्किंगचे नियम अधिक कडक करत दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ केली. मात्र या नियमांची काटेकोर अमलबजावणी कितपत होते हा संधोधनाचा विषय आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनीच त्याला विरोध केल्याने अडचणी निर्माण झाल्या. वास्तविकता पार्किंग धोरण ठरवण्यापूर्वी वस्तुस्थितीचा सखोल अभ्यास करणे आवश्यक होते. लोकसंख्या, वाहने व त्यासाठी उपलब्ध पार्किंग स्रोत यांचा अभ्यास करून पार्किंग नियम आखणे आवश्यक आहे. नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांचा मुंबईवर पडत असलेला अतिरिक्त भार आता मुंबईला झेपेनासा झालाय हे सर्वांनाच मान्य करावे लागेल. यासाठी नवी वाहने नोंदणी करण्यापूर्वी त्यांची आवश्यकता व उपलब्ध पार्किंगची जागा याचा कुठेतरी मेळ घालणे आवश्यक आहे. भरमसाठ संख्येने वाढलेली लोकसंख्या व वाहनांवर भविष्यात नियंत्रण आणावेच लागेल. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त