आरोग्यमंथन - रस्ते अपघातांचे प्रमाण वाढतेय
रस्ते अपघातांचे प्रमाण वाढतेय
आज आपल्याला अवतीभोवती जिकडे बघावे तिकडे नुसती वाहनेच वाहने दिसुन येतात. सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब रांगा व वाहतूक कोंडीत उभी असलेली वाहने दररोज वाढतच चाललेली आहेत. दरदिवशी नव्याने नोंदणी होणारी हजारो वाहने थेट रस्त्यावर येऊन वेगाशी स्पर्धा करु लागली आहेत. यातुन दररोज रस्ते अपघातांचे प्रमाणदेखील प्रचंड वाढले आहे. अपघात या शब्दाबरोबर आपल्या डोळयासमोर वाहनांचे अपघात येतात. अपघात या शब्दाची काटेकोर व्याख्या करणे अवघड आहे, पण पूर्वसूचनेशिवाय, ध्यानीमनी नसता घडलेली घातक घटना असा ‘अपघात’ या शब्दाचा सामान्य अर्थ होतो. मात्र रस्ते अपघातांची संख्या आज प्रचंड आहे. जगात दरसाल १३ लाख लोक रस्त्यांवरील वाहनांच्या अपघातांत मृत्युमुखी पडतात. असे अपघात टाळावेत यासाठी गांभीर्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहतुक नियम कडक करण्यात आलेले असले तरी त्याची अंमलबजावणी फार परिणामकारक व पारदर्शकपणे होत नसल्याने परिस्थीती अधिकच भयावह बनत चाललेली आहे. बेदरकारपणाने वाहने चालवण्याचे प्रमाण वाढत आहे. रस्त्यांची अवस्थाही फार चांगली नाही. रस्त्यांची अवस्था वाहनांच्या अपघातांना निमंत्रण देणारी असतानाच दररोज हजारो वाहने नव्याने रस्त्यावर येत आहेत. यावर आजच काही परिणामकारक उपाय आखले नाहीत तर २०३० सालापर्यंत अपघात बळींची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युनोने नोव्हेंबर महिन्याचा तिसरा रविवार हा वाहतूक अपघातांत बळी पडलेल्यांसाठी स्मरण दिन म्हणून पाळण्याचे ठरविले. रस्त्यांवर होणारे वाहनांचे अपघात कमी करणे आपल्या हातात आहे, म्हणून २०११ ते २०२० हे दशक या निमित्ताने जनजागृतीचे दशक म्हणून पाळले जात आहे.
आज आपल्याला अवतीभोवती जिकडे बघावे तिकडे नुसती वाहनेच वाहने दिसुन येतात. सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब रांगा व वाहतूक कोंडीत उभी असलेली वाहने दररोज वाढतच चाललेली आहेत. दरदिवशी नव्याने नोंदणी होणारी हजारो वाहने थेट रस्त्यावर येऊन वेगाशी स्पर्धा करु लागली आहेत. यातुन दररोज रस्ते अपघातांचे प्रमाणदेखील प्रचंड वाढले आहे. अपघात या शब्दाबरोबर आपल्या डोळयासमोर वाहनांचे अपघात येतात. अपघात या शब्दाची काटेकोर व्याख्या करणे अवघड आहे, पण पूर्वसूचनेशिवाय, ध्यानीमनी नसता घडलेली घातक घटना असा ‘अपघात’ या शब्दाचा सामान्य अर्थ होतो. मात्र रस्ते अपघातांची संख्या आज प्रचंड आहे. जगात दरसाल १३ लाख लोक रस्त्यांवरील वाहनांच्या अपघातांत मृत्युमुखी पडतात. असे अपघात टाळावेत यासाठी गांभीर्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहतुक नियम कडक करण्यात आलेले असले तरी त्याची अंमलबजावणी फार परिणामकारक व पारदर्शकपणे होत नसल्याने परिस्थीती अधिकच भयावह बनत चाललेली आहे. बेदरकारपणाने वाहने चालवण्याचे प्रमाण वाढत आहे. रस्त्यांची अवस्थाही फार चांगली नाही. रस्त्यांची अवस्था वाहनांच्या अपघातांना निमंत्रण देणारी असतानाच दररोज हजारो वाहने नव्याने रस्त्यावर येत आहेत. यावर आजच काही परिणामकारक उपाय आखले नाहीत तर २०३० सालापर्यंत अपघात बळींची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युनोने नोव्हेंबर महिन्याचा तिसरा रविवार हा वाहतूक अपघातांत बळी पडलेल्यांसाठी स्मरण दिन म्हणून पाळण्याचे ठरविले. रस्त्यांवर होणारे वाहनांचे अपघात कमी करणे आपल्या हातात आहे, म्हणून २०११ ते २०२० हे दशक या निमित्ताने जनजागृतीचे दशक म्हणून पाळले जात आहे.

Comments
Post a Comment