हा प्रयोग एकदा करून पहावाच
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील नाईट लाईफ मुंबईत लवकरच प्रत्यक्षात अवतरताना दिसणार आहे. मुंबईकरांना रात्रीच्या वेळेस खाण्यापिण्याच्या व शॉपिंगच्या सुविधा मिळाव्यात हा यामागील उद्देश आहे. मात्र या निर्णयाचा वापर रात्रभर केवळ धांगडधिंगा करणाऱ्यांसाठी व बार - पब मालकांसाठी होण्याची शक्यतादेखील आहे. शिवाय सुरक्षा यंत्रणांवर पडणारा ताणदेखील आहेच. आज सर्वासामान्य मुंबईकर दिवसा कामधंदा करतो व रात्री निद्रा घेतो हा प्रचलित नियम आहे. त्यामुळे ह्या रात्रीच्या जगताचा फायदा नक्की कुणाला मिळणार हा सध्यातरी अनुत्तरित प्रश्न आहे. पर्यावरणमंत्र्यांना अभिप्रेत असलेली नाईट लाईफची संकल्पना लोकांना २४ तास सोयीसुविधा मिळाव्यात ही आहे. मात्र त्याचा परिणाम कितपत सकारात्मक होतो हे पाहण्यासाठी एकदा हा प्रयोग करून पाहण्यास काय हरकत आहे?


Comments
Post a Comment