आरोग्यमंथन - प्रवासातील प्रसूती


सरकारी कर्मचा-यांच्‍या संवेदनशिलतेची आणखी एक घटना नुकतीच समोर आली आहे. कर्मचारी आहेत यवतमाळ जिल्‍हयातील एसटी महामंडळाचे. अकोट ते यवतमाळ या बस वर चालक श्री. व्ही. ए. इंगळे आणि वाहक श्री ए. के. जाधव कर्तव्यावर असताना राजापेठ अमरावती वरुन यवतमाळ येथे जाण्‍याकरीता बस निघाली. त्‍या वेळी गरोदर महिला यवतमाळला जाण्याकरिता सदरील अकोट यवतमाळ बसमध्ये बसली. त्‍यानंतर धानोरा थांब्याच्या समोरुन बस निघाल्यावर सदर महिलेला प्रसव कळा येऊ लागल्या. अचानक सुरु या परिस्‍थीतीने काय करावे हे सहप्रवाशांना सुचेना. मात्र परिस्थीतीचे गांभीर्य पाहुन कामगिरीवरील चालक वाहकांनी बस रस्त्याच्या बाजुला उभी केली. बसमधील इतर महिला प्रवाशांच्या मदतीने बसमध्येच महिलेची प्रसुती करण्‍यात आली आणि कन्यारत्न जन्माला आले.  प्रसुती झाल्याबरोबर तात्‍काळ कर्तव्यावरील चालक वाहकांनी प्रसुती झालेल्या महिलेसह व नवजात बाळासह थेट बस नांदगाव खांडेश्वर येथिल शासकीय रुग्णालयाकडे नेली. आई व बाळाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. आई व नवजात बाळ दोन्हीही सुखरुप असुन दोघांचीही प्रकृती उत्‍तम आहे. अशा प्रकारे अकोट आगारातील चालक श्री. व्ही. ए. इंगळे व वाहक श्री. ए. के. जाधव यांनी दाखविलेली समयसुचकता व कर्तव्यनिष्ठतेने माणुसकी व संवेदनशिलतेचे उत्‍तम उदाहरण सर्वांसमोर आणले आहे. या घटनेने एसटी महामंडळाची प्रतिमा देखील  जनमानसात नक्‍कीच उंचविली आहे. अशा प्रकारच्‍या अनेक घटना समाजात घडत असतात. सरकारी सेवा व सरकारी कर्मचारी यांचेबददलचा जनतेत निर्माण झालेला दुषित ग्रह अशा घटनांनी बदलण्‍यास कारणीभुत ठरणारा आहे. आरोग्‍य ही आज सर्वांच्‍या दृष्‍टीने महत्‍वाची गरज आहे. आरोग्‍याच्‍या तक्रारी कधीही, कुठेही उदभवू शकतात. त्‍यामुळे सर्वसामान्‍य लोकांची व सार्वजनिक व्‍यवस्‍थेत काम करणा-या कर्मचा-यांची संवेदनशिलता अशा वेळी फार कामी येते. नोकरदार महिला आज गरोदरपणात देखील कामानिमित्‍त सर्रास प्रवास करत असतात. बस, लोकल प्रवासात गरोदर महिला आपल्‍याला नेहमी दृष्‍टीपथास पडतात. प्रत्‍येकीची गरोदरपणातील स्थिती व प्रसुतीचा कालावधी भिन्‍न असतो ज्‍याची कल्‍पना सहप्रवाशांना नसल्‍याने आपात्‍कालीन परिस्‍थतीत गोंधळ उडतो. अशा वेळी सार्वजनिक सेवेत काम करणा-या व्‍यक्‍तींचे महत्‍वपूर्ण ठरते. प्रवासामध्‍ये प्रसुती होण्‍याच्‍या अनेक घटना सातत्‍याने उघडकीस येत आहेत. मागिल महिन्‍यात मुंबईमध्‍ये लोकल मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेने प्रवासादरम्यान बाळाला जन्म दिला. ही महिला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ठाणे (Thane) येथे जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी तिच्या पोटात अचानक दुखू लागले. परंतु प्रवासादरम्यानच तिची प्रसुती झाली आहे. रेल्वे ठाणेच्या दिशेने जाण्यासाठी निघाली असता गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्या होत्या. तेव्हाच महिलेने चालत्या रेल्वेत मुलाला जन्म दिला. त्यानंतर महिलेला आपत्कालीन उपचारासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील एका रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी महिला आणि मुलाची प्राथमिक स्वरुपात काळजी घेतली. त्यानंतर महिला आणि बाळा एका शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा प्रवासादरम्यान ठाणे स्थानकातच महिलेला प्रसुतीकळा सुरु झाल्याने बाळाला जन्म दिल्याची घटना घडली होती. इशरत शेख असे महिलेचे नाव असून ती आंबिवली ते कुर्ला दरम्यान प्रवास करत होती. त्याचवेळी संध्याकाळच्‍या सुमारास मुलाला महिलेने जन्म दिला होता. 
अशीच घटना मागिल महिन्‍यातच कुर्ला स्‍थानकावर घडली. या घटनेत रेल्‍वे पोलिसांचा संवेदनशिल पणा समोर आला आहे.  रेल्वे आणि प्लॅटफॉर्मवर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम, रेल्वे स्थानकांतील गर्दी व्यवस्थापनाचा ताण, घरातील जबाबदारी ही मुंबईतील महिला रेल्वे पोलिसांची असते. जातीधर्माचे बंधन न मानता अडलेल्यांना मदत करण्यासाठी महिला रेल्वे पोलिस सदैव तत्पर असतात. याच महिला रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे ऑक्‍टोबर मध्‍ये कुर्ला रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर एका महिलेची प्रसुती होऊन गोंडस बाळाने जन्‍म घेतला. रुग्णालयात तपासणी करून ही २५ वर्षीय महिला घरी परतत होती. अमिरुन्नीस नसीम खान असे तिचे नाव असून ती कुर्ला येथे  येथे राहते. सात महिन्यांची गरोदर असलेली अमिरुन्नीस गरोदरपणातील तपासणीसाठी पतीसह भायखळा येथील रुग्णालयात गेली होती. तपासणीनंतर घरी जाण्यासाठी या दोघांनी भायखळा स्थानकातून कल्याण दिशेला जाणारी लोकल पकडली. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लोकलमध्येच अमिरुन्नीसला प्रसुती कळा सुरू झाल्या. स्थानकावर पोहचताच महिला पोलिसांनी तिला घेराव घातला. रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला अधिकाऱ्यांसह महिला तिकिट तपासनीसांच्या मदतीने तिच्याभोवती कपड्याचा आडोसा करून प्लॅटफॉर्म क्र. २ वर अमिरुन्नीसची सुखरूप प्रसुती करण्यात आली.
अशा प्रकारच्‍या एक ना अनेक घटना प्रवासामध्‍ये आपल्‍या आजुबाजुला घडत असतात. कधी सहप्रवाशांची माणुसकी कामाला येते तर कधी प्रवासातील सरकारी कर्मचारी. त्‍यामुळे या घटना समाजातील व सरकारी व्‍यवस्‍थेतील आपुलकी जिवंत असल्‍याचेच प्रतिक असुन सर्वांसाठी आदर्शवत आहेत.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवीन मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त