महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
- Get link
- X
- Other Apps
येथील एका खोल कुंडांमध्ये असलेल्या माश्यांच्या चमत्कारिक आख्यायिकेमुळेच येथे हे मासे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते, मात्र हे मासे पाहण्यासाठी येणारी माणसे या माशांना खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाह्या, पाव तसेच इतर अनेक पदार्थ टाकत असतात. या पदार्थांमुळे हे पाणी घाण होते तसेच पाण्यावर तेलकट द्रावण तयार होते. त्यामुळे पाण्यातील माश्यांना ऑक्सिजन मिळण्यास अडचणी येत असल्याने श्वसनामध्ये बाधा येऊन हे मासे मारतात. तसेच पाण्यात खाद्य पदार्थाबरोबर प्लास्टिक च्या पिशव्या टाकल्या जातात. ह्या पिशव्यांची तसेच खाण्यासाठी टाकलेल्या पदार्थांनमुळे हे पाणी प्रदूषित होतेच मात्र नंतर हे मासे ह्या पिशव्या खाद्य म्हणून खातात. 3 ते 4 वर्षापुर्वी जवळ पास २५ ते ३० मासे महाशिवरात्रीनंतर मृत्यूमुखी पडले होते. ह्या मेलेल्या माश्यांच्या रिपोर्ट नुसार हे मासे प्लास्टिक खाल्ल्यामुळे तसेच काही माश्यांना ऑक्सीजन न मिळाल्यामुळे हे मासे मेले होते. हे मासे 'महाशीर' या दुर्मिळ जातीचे असून ते चीन आणि भारतात तिळसेश्वर येथे बघायला मिळतात.
तिळसेश्वर मंदिराशेजारी असलेल्या वैतरणा नदीच्या पात्रात मुबलक प्रमाणात पाणी सतत उपलब्ध असल्याने येथील लोक या पाण्याचा वापर कपडे व घरगुती वापरासाठी करतात. तसेच नदीपात्राशेजारी धार्मिक विधीदेखील करण्यात येतात. या नदीवरील पुलाला लागूनच विठ्ठल रखुमाईचे एक सुंदर मंदिर तयार करण्यात आले असून आजूबाजूला विविध फुलझाडे व भाजीपाल्याच्या शेतीमुळे तसेच मंदिराशेजारील जागेत सुशोभीकरण करण्यात आल्याने या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलते. मंदिराच्या सभामंडपात चोहोबाजूंनी संतांच्या प्रतिमा बसवण्यात आल्या असून त्याखाली दैनंदिन जीवनातील उपयुक्त त्यांच्या रचना व वचने रेखाटण्यात आली आहेत. एकंदरीत ठाणे मुंबई शहरापासून जवळपास 75 ते 80 किलोमीटर अंतरावरील तिळसेश्वर हे शिवशंभो महादेवाचे ठिकाण एक दिवसाच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण असून आपणदेखील या ठिकाणी भेट देऊन निसर्गसौंदर्य व आध्यात्मिक कलाकृतींचा आस्वाद घ्याल याची खात्री आहे.
वैभव मोहन पाटील

- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment