इंधन दर आटोक्यात आणा

दिवसेंदिवस वाढत असलेले इंधन दर सरकारविरुद्धचा आक्रोश अधिक तीव्र करणारे आहेत. इंधनाच्या सातत्याने वाढत चाललेल्या दरांमुळे देशात प्रचंड जनक्षोभ असून तो कधीही फुटण्याची शक्यता आहे. दरवाढीबाबत सातत्याने आंतराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या भाववाढीकडे बोट दाखवले जात असले तरी ते नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न कधीही दिसून आलेले नाहीत. इंधनाचा वापर न करणारे घर देशात क्वचितच सापडेल. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याच्या व जीवनमानाशी निगडित इंधनाचा विषय केंद्र सरकारने संवेदनशीलरीत्या हाताळणे आवश्यक असताना तसे प्रयत्न आजवर झालेले नाहीत. तीन आकड्यात गेलेल्या इंधनाची डोकेदुखी आज घरोघरी आहे. इंधनाची आधारभूत किंमत व त्यावर आकारण्यात येणाऱ्या विविध करांबाबतची स्पष्टता सरकारने करायला हवी. ही जाचक करप्रणालीच इंधनाच्या फुगत चाललेल्या दरांना कारणीभूत आहे. वस्तू व सेवा कराचा परतावा वेळेत होत नसल्याने बहुतांश राज्ये इंधनावरील करांवरच अवलंबून आहेत ही बाब खरी आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेच आता पुढाकार घेऊन इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. एकतर आंतराष्ट्रीय बाजारात जोवर तेलाचे दर स्थिरावत नाहीत तोवर देशांतर्गत करकपात करावी अथवा इंधनाला पर्याय अधिक सक्षमतेने व मुबलकतेने पुढे आणावेत. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई  


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त